नागपूर:कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्व सामना करत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होत असली म्हणून निश्चिंत होणे योग्य होणार नाही. पुढे काय होईल याबाबत सांगितले जाऊ शकत नाही. तिसरी व चौथी लाटदेखील येऊ शकते व त्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्पाईस हेल्थच्या फिरत्या आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे गुरुवारी लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्पाईस हेल्थचे संचालक अजय सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर शहरातील कोरोनाबाधितांसाठी २०० व्हेंटिलेटर्स आले आहेत. शिवाय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता लवकरच हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील येणार असून, या सर्वांचे वितरण विदर्भातील ग्रामीण भागात होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी १२ तास करण्याचासुद्धा प्रयत्न आहे. संबंधित अहवाल मोबाईलवरच मिळणार असल्याने प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
सीएसआरमधून मेयो, मेडिकलला १५ कोटी रुपये गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. सीएसआरअंतर्गत वेकोलितर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयोला १५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. सोबतच इतर पाच रुग्णालयांनादेखील सीएसआरमधून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करणार आतापर्यंत विदर्भातील सरकारी इस्पितळांना दीडशे तर मनपाच्या दवाखान्यांना २५ व्हेंटिलेटर्स दिले आहेत. ऑक्सिजन वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून तीन हजार सिलेंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
सफाई कर्मचाऱ्यांचे मौलिक योगदान या संकटकाळात मेडिकलचे कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग यांचे मौलिक योगदान राहिले आहे. ते जीव धोक्यात टाकून काम करत असून त्यांना जनतेने पूर्ण सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाचले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पीटलमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीरची कमतरता भासत आहे. सोशल मीडियावरुन लोक मदत मागत आहेत. या सर्व गोष्टींची माहिती एकाच वेबसाईवर एकत्र करुन लोकांपर्यंत माहिती काही वेबसाईट पोहोचवत आहेत. यामुळे रुग्णांना फायदा होत आहे. या वेबसाईटवरुन लोकांना ऑक्सिजन, बेड, प्लाज्मा, रेमडेसिवीर इंजेक्शन या सर्व गोष्टींची माहिती मिळते.
सद्या या कोरोना संकटात पाच वेबसाईट महत्वाचे काम करत आहेत. या संकटाच्या काळात या पाच वेबसईचा उपयोग आपल्याला होऊ शकतो.
Covidfightclub.org या वेबसाईटवर आपण आपल्या शहराच्या नावाने सर्च बॉक्समध्ये आपली गरज लिहून शोधू शकता. या शिवाय सर्चबाक्स च्या खाली शहर आणि आपली गरज निवडून त्या वस्तुचा विक्रेता शोधू शकता. आपल्याला सेवा देणारी मिळतील. यासह त्यांचा मोबाईल नंबर, पत्ताही माहिती मिळेल. ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केलेली असते. ही पोस्ट कधी केली आहे याची माहितीही मिळते.
Covid.army ही वेबसाईट सुद्धा आहे. यात अगोदर आपले शहर निवडावे लागेल. यानंतर आपली गरज दोन्ही फिल्टर लावताच आपल्यालाला आपल्या कामाचे ट्विट दिसायला लागतील. जे आपल्या कामाची असतील. सर्चमध्ये अलीकडच्या पोस्ट पहिल्यांदा दाखवले जातील.
Covid19helpindia.in या वेबसाईटवर तुम्हाला डाव्या बाजूला सर्च बॉक्स दिसेल. यासह शहराचे नाव त्यासह रुग्णवाहिका, डॉक्टर, प्लाझ्मा, औषध, यांची यादी मिळेल. आपण आपल्या गरजेची वस्तु शोधू शकतो किंवा सर्च बॉक्समध्ये सर्च करु शकता. यानंतर सर्व यादी मिळेल. यावरुन आपण मदत घेऊ शकता.
Covidtools.in ही वेबसाईट सुरु करताच पहिल्यांदा आपल्याला गरज असलेली वस्तु निवडावी लागणार आहे. यानंतर आपल्याला प्रत्येक शहरातील मदत पोहचवणाऱ्यांची यादी मिळेल. सर्च बॉक्समध्ये आपल्या शहराचे नाव टाकावे लागणार आहे. यात आपल्या शहरातील संपर्क मिळतील. यात शेवटची माहिती कधी अपडेट केली याची वेळही मिळेल. यात आपणही माहिती अपडेट करु शकतो.
Covidwin.in ही वेबसाईट सगळ्यात सोपी आहे. यात आपल्याला राज्य निवडावे लागणार आहे. त्यानंतर आपले शहर किंवा जिल्हा निवडावा लागणार आहे. यानंतर आपल्याला गरज असलेल्या वस्तुचे नाव निवडायचे आहे. आपलेल्या गरजेच्या वस्तुंची यादी मिळेल. यात त्या वस्तु पुरवणाऱ्या लोकांचे संपर्क मिळणार आहेत.
या सर्व वेबसाईटवर माहिती सोशल मीडियावरील पोस्टवरुन आली आहे. या माहितीची खात्री करुनच पुढ पैशाची देवाण घेवाण करा. कारण या कोरोना महामारीतही पैसे लुटनाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे याची सत्यता तपासुनच पुढच पाऊल टाका.
नागपूर: नागपूर शहरातील कामठी येथील लष्करी छावणी परिसरात शौचालयाच्या खिडकीला शॉल बांधून २४ वर्षीय जवानाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नवीन राम निवास ,असे मृत जवानाचे नाव आहे.
नवीन हा लष्करातील अर्जुन स्पोर्ट्स कंपनीत तैनात होता. तो बास्केटबॉल खेळाडू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पोर्ट्स कोट्यातून तो लष्करात भरती झाला होता. पाच महिन्यांपूर्वीच नवीन याचे लग्न झाले होते. मंगळवारी सायंकाळी तो शौचालयात गेला तो परतलाच नाही. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ‘गिनती’ला हजर झाला नाही. तो अनुपस्थित असल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर अधिकारी त्याच्या घरी गेले. तो घरी नव्हता. अधिकाऱ्यांनी शौचालयाची तपासणी केली असता नवीन हा गळफास लावलेला दिसला.
या घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एन. ए. मदनकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून त्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. नवीन याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. जुनी कामठी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नागपूर : क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून २२ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना पाचपावली परिसरात मंगळवारी रात्री घडली.
रूपेश कुंभारे (रा. मराठा चौक, बांगलादेश) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांना अटक केली. तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. प्रवीण ऊर्फ गोलू वाघमारे (वय २५), गौरव गिरडे (वय २६) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.
रूपेश केशकर्तनालयात काम करायचा. मंगळवारी सायंकाळी रूपेश हा वेगाने मोटारसायकल चालवित होता. गोलू व गौरवने त्याला हटकले. रूपेशने त्या दोघांसोबत वाद घातला. तसेच त्याने दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली. रात्री १० वाजताच्या सुमारास गोलू, गौरव आणि त्याच्या साथीदारांनी रूपेशला गाठले. धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली व पसार झाले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तिघांना ताब्यात घेतले. दोन दिवसांतील हत्याकांडाची पाचपावलीतील ही दुसरी घटना होय. यापूर्वी पिंकी शर्मा या तरुणीची हत्या करण्यात आली होती.
The upcoming weekend episode of Sony Entertainment’s television renowned musical show Indian Idol Season 12 will be bringing a bunch of entertainment and giggling. The show will be hosted by the dashing singer Aditya Narayan who will rise the laughter riots along with lots of interesting moments with the contestants. This special weekend show will be a marvelous roller coaster ride for all the viewers to witness the talented voice and the well-known music director Anu Malik and lyricist Manoj Muntashir as judges.
An incredible performance of Ashish Kulkarni on the song Aye Bhai Zara Dekh Ke Chalo and Tumne Mujhe Dekha hokar meherbaan has flabbergasted the judges on the set. Aashish’s rocking performance has made all the contestants and judges happy to see him back with his rocking performance on stage. After listening to him Anu malik praises him for his singing talent and asks him for his autograph.
Further, Anu Malik shares, I am a die heart fan of you Aashish this was a rocking performance by you. I have heard you earlier also on this stage you just have an unbelievable voice. After listening to this I want your autograph. I feel blessed that I am part of this show and getting this chance to listen to such talented voices of India.
Adding onto this Manoj Mutashir also challenges Ashish and Pawan deep to sing a song for him and if they sing well they will get a chance to meet the veteran of the country Bhushan Kumar to which they gave a wondrous performance on stage and Manoj Mutashir was amazed to see this and further he says “I am highly impressed by you both and I will surely make you meet Bhusan Kumar for you to be the next superstars of the music industry.
Nagpur: On the occasion of World Malaria Day, Wockhardt Hospitals, Nagpur organized a drawing competition for children between the age group of 3 to 12 years. The campaign was conducted to raise awareness among the children about Malaria and its eradication.
The campaign was conducted online. Kids, not just from Nagpur, but also from various cities also participated in the event. Entries were also received from Indian National children from other countries like Australia validating the ‘Draw from Distance’.
“It is a difficult time for all of us physically as well as mentally. Children are confined at home which is important for their safety but also quite tedious. We initiated this activity to involve children in something creative”, said Mr Abhinandan Dastenavar, Centre Head, Wockhardt Hospitals, Nagpur. “The idea behind this was to spread awareness while having fun and to overcome the current challenging situation going on in Nagpur as well as the country”, he added.
World Malaria Day All the participants were given goodie bags and a participation certificate as a token of appreciation. The top three entries will be posted on the social media pages of the hospital. The themes for drawings were Malaria awareness posters and the Role of Healthcare workers in the ongoing pandemic.
Corona Virus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतावर मोठा तडाखा बसला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढू लागल्याने भारत सरकार समोर कोरोनाला रोखण्याचं आव्हान आहे. भारतातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून जगातील अनेक देशांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. जगभरातील दहा लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरेकिनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिले आहे. भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही ३ लाखांहून अधिक झाल्याने जगभरात तो चिंतेचा विषय झाला आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना उद्रेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे.
स्वीडिश हवामान कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिने म्हटले आहे की, जागतिक समुदायाने ताबडतोब पुढे येऊन भारताला मदत करावी. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मॅरिसे पायने यांनीही भारताबाबत सहवेदना व्यक्त केली असून, ‘भारताने आम्हाला लशी पुरवून मोठे औदार्य दाखवले होते, आता भारतात दुसरी लाट आली असताना आम्ही त्या देशाला मदत करण्यास तयार आहोत’, असे स्पष्ट केले आहे. आपण भारताच्या मदतीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया चीनकडून गुरूवारी देण्यात आली. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचं चीनने म्हटले आहे. युरोपीय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, युरोपीय समुदाय एकजुटीने भारतीय लोकांच्या पाठीशी आहे. ही केवळ भारताची एकट्याची लढाई नसून संयुक्त लढाई आहे. ८ मे रोजी भारत व युरोपीय समुदायाची बैठक होत असून त्यावेळी यावर चर्चा होईलच पण त्याआधी आम्ही मदत देण्यासही तयार आहोत.
कोणत्या देशाकडून भारताला काय होणार मदत ब्रिटन
कोरोनाला हरवण्यासाठीच्या या युद्धामध्ये युनायटेड किंग्डम भारतासोबत असल्याचं म्हणत ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह काही ६०० मेडिकल डिव्हाईस भारताला पुरवले जाणार आहेत.
सौदी अरेबियाकडून वायूपुरवठा
सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन भारताला पाठवला असून अदानी समूह व लिंडे कंपनी यांच्या सहकार्यातून हा ऑक्सिजन भारतात येणार आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, अदानी समूह व मे. लिंडे कंपनी यांच्या मदतीने ऑक्सिजन भारतात पाठवण्यात येत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, ८० मेट्रिक टन ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. दम्मम ते मुंद्रा या मार्गाने या टँकरचा प्रवास सुरू आहे.
पाकिस्तान देणार रुग्णवाहिका
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतातील परिस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केली असून या आव्हानाशी जागतिक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील एइधी फाऊण्डेशनने भारताच्या मदतीसाठी ५० रुग्णवाहिका पाठवण्याची तयारी दर्शवली असून त्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आले आहे.
सिंगापूर, संयुक्त अरब अमिर, आणि युरोपीय समुदाय व रशिया
सिंगापूरने चार क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्या पाठवल्या आहेत. ५०० बीआयपीएपीस, २५० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साहित्य घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल झाले आहे.
संयुक्त अरब अमिरातीही भारतीय दूतावासाच्या मदतीने ऑक्सिजनच्या टाक्या पाठवण्याच्या विचारात आहे. युरोपीय समुदाय व रशिया यांनी ऑक्सिजन संबंधित व इतर औषधांची मदत भारताला देण्याचे ठरवले आहे.
जर्मनी
जर्मनीतून ऑक्सिजन निर्मितीचे २३ मोबाइल प्रकल्प एअरलिफ्ट करुन भारतात आणणार आहे. तंत्रज्ञांच्या मदतीने हे प्रकल्प देशात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत केले जातील. जर्मनीतून भारतात येत असलेल्या प्रत्येक प्रकल्पातून एका मिनिटात ४० लिटर याप्रमाणे दर तासाला २४०० लिटर द्रवरुप ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. उच्च दाबाने सिलेंडरमध्ये साठवलेल्या या ऑक्सिजनचा वापर रुग्णांसाठी केला जाणार आहे.
चीन
कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. “चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे,” असे त्यांनी उत्तर देताना सांगितले.
अमेरिका
भारताच्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लससाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेतून लवकरच येणार आहे. अमेरिकेने कोरोना संकटाशी लढण्यासाठी भारताला सर्वोतोपरी मदत देण्याचे जाहीर केले आहे. यात लससाठीचा कच्चा माल, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
फ्रान्स
फ्रान्स पण भारताच्या मदती धावून आला आहे. मेडिकल ऑक्सिजन भारताला पुरवणार असल्याची माहिती मिळाली आहे. युके पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच भारताला मदती करणार असल्याचं ट्विट समोर आल्यानंतर फ्रान्सनेही मदतीसाठी हात पुढे केला आहे,
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने(Corona) कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे. मागील २४ तासात ३ हजार ६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालया कडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पण वाढता मृत्यूचा आकडा धडकी भरवत आहे, गेल्या २४ तासात ३ हजार ६४५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. ही संख्या पकडून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे.
आता दक्षिण भारतातात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात जलद गतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ३० लाख ७७ हजार १२१ इतकी झाली आहे. बरं होण्याचा दर खाली येत असून आता ८२.३३ टक्के झाला आहे, तर मृत्यू दर १.१२ टक्के झाला आहे. तर आयसीएमआरच्या नुसार, २७ एप्रिल पर्यंत देशात २८ कोटी २७ लाख ०३ हजार ७८९ नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मंगळवारी १७ लाख २३ हजार ९१२ नमुन्यांची चाचणी झाली होती.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
देशात मागील २४ तासांमध्ये ३ हजार ६४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, राज्यात १०३५ जणांचा मृत्यू झाैला आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीचा नंबर असून तेथे ३६८, उत्तर प्रदेशात २६५ छत्तीसगडमध्ये २७९, कर्नाटकात २२९, गुजरातमध्ये १७४, राजस्थानमध्ये ८५, पंजाबमध्ये १४२, हरियाणा ९५, बिहारमध्ये ८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. दहा राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे ७८ टक्के आहे. दरम्यान देशात सध्याच्या घडीला ३० लाख८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झालं आहे.
आयपीएलच्या 23 व्या (IPL 2021) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गायकवाडने 75 तर फॅफने 56 धावांची खेळी केली. या खेळीसह फॅफने (Orange Cap) ऑरेंज कॅप पटकावली आहे.
गब्बरला पछाडत मिळवली कॅप
फॅफने या सामन्यात शानदार अर्धशतक लगावलं. यासह फॅफने दिल्लीचा सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनला पछाडत ऑरेंज कॅप पटकावली आहे. या सामन्याआधी ही कॅप धवनकडे होती. मात्र फॅफने या खेळीसह ऑरेंज कॅप मिळवली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते.
जॉनी बेयरस्टो, सनरायजर्स हैदराबाद, 6 मॅच, 218 धावा
ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसची शानदार भागीदारी
विजयी धावांचे पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 75 तसेच फॅफने 56 धावांची खेळी केली.
चेन्नईचा विजयी पंच
चेन्नईने हैदराबादवर मात केली. यासह चेन्नईने या मोसमातील सलग 5 वा विजय साकारला. चेन्नईची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतरच्या सर्व सामन्यात चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
नागपूर: नागपूरच्या कन्हान तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी घाई करणाऱ्या आरोग्य केंद्राने चार-पाच नव्हे तर तब्बल 20 दिवसानंतर गावकऱ्यांना कोरोना चाचणीचा अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे पालक मंत्री नितीन राऊत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला आहे. या घटनेमुळे आरोग्य केंद्राच्या कारभारावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.
8 एप्रिलला कन्हान येथील कान्द्री प्राथमिक आरोग्य केंद्रात 92 लोकांनी कोविड टेस्ट केली. यापैकी 81 लोकांचे अहवाल संबंधितांना कळविण्यात आले. मात्र उर्वरित 11 लोकांना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे काहीही कळविण्यात आले नाही. कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम नितनवरे आणि त्यांच्या पत्नी यांचीही टेस्ट करण्यात आली होती. चाचणी अहवाल न मिळालेल्या 11 लोकांमध्ये त्यांचाही समावेश होता. त्यामुळे ते व अन्य काही लोक सतत आरोग्य केंद्रावर जाऊन डॉ. योगेश चौधरी, डॉ. डुडमवार व त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्या अहवालाचे काय झाले याची विचारणा करीत होते. मात्र त्यांना काहीही माहिती दिली जात नव्हती.
राऊतांनी फैलावर घेतले, चक्रे फिरली कोविड अहवालाबाबत कुणाकडूनही काहीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी अखेर पालकमंत्री डॉ. निती राऊत यांच्याकडे दाद मागितली. या तक्रारीनंतर राऊत यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना फैलावर घेतलं. चाचणी होऊन 20 दिवस झाल्यावरही अहवाल दिले जात नाहीत ही गंभीर बाब आहे असे सांगत राऊत यांनी संबंधितांना फैलावर घेतले. जिल्ह्याचे मुख्य शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर यांना या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश राऊत यांनी दिले. त्यानंतर प्रशासनातील चक्रे फिरली आणि सबंधितांना आज अहवाल कळविण्यात आले.
बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा चाचणी अहवाल प्राप्त न झाल्याने संक्रमित व्यक्ती आजूबाजूला बिनधास्त फिरत होते. या काळात त्यांनी कुटुंबातील व परिसरातील किती लोकांना कोरोना संक्रमित केले असेल याची तुम्हीच कल्पना करू शकता. आम्ही निगेटिव्ह होतो तर ही माहिती आम्हाला द्यायला आरोग्य प्रशासनाला 20 दिवस का लागले? आम्ही पती-पत्नीने खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला विलगिकरणात ठेवले, 14 दिवस आमचे कामही ठप्प होते. अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गौतम नितनवरे यांनी केली.
एखादा व्यक्ती दगावला असता तर गेले 20 दिवस आम्ही सर्वानी तणावात काढले. चाचणी अहवालच आले नाही तर औषध उपचार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झालेला होता. ज्या- ज्या डॉक्टर्सने दाखवले त्यांनी रिपोर्ट आल्यावर पुढचे औषधे देऊ असे सांगितले. जर एखाद्या रुग्णाची स्थिती गंभीर होऊन तो दगावला असता तर या निष्काळजीपणासाठी सरकारी यंत्रणाच दोषी ठरली असती, अशी संतप्त भावनाही नितनवरे यांनी व्यक्त केली.
अखेर माहिती दिली कांद्री येथील मतिमंद शाळेतील चाचणी केंद्रात 8 एप्रिल रोजी 102 लोकांनी चाचण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 लोक प्रत्यक्ष चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. त्यामुळे 92 लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी 7 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. 85 लोकांचे नमूने आरटीपीसीआर चाचणीसाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी 81 लोकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट प्राप्त झाले. गौतम व सुषमा नितनवरे यांची चाचणी अँटिजेन निगेटीव्ह आली. निधी प्रसाद ही 11 वर्षीय मुलगी आणि 35 वर्षीय नितीन वैद्य यांचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कोणतीही लक्षणे नव्हती,असे या चाचणी केंद्राच्या प्रमुखांनी राऊत यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
श्रीकाकुलम: रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात काल घडली. मरण पावलेली 50 वर्षीय महिला मांडासा गावातील होती.
या महिलेला करोनाची लक्षणे होती. त्यांनी तिची करोना चाचणी केली मात्र त्याचा निकाल येईपर्यंत त्यांची तब्येत ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. तोपर्यंत त्यांना करोना झाला आहे की नाही हे समजू शकले नव्हते. मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनांसाठी बरेच प्रयत्न केले.
खूप वेळ वाट पाहूनही वाहन अथवा रुग्णवाहिका मिळत नसल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा मुलगा आणि जावयाने मोटारसायकलवरून मृतदेह गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. दरम्यान आंध्र प्रदेशात सोमवारी 9881 नवे बाधित सापडले. या राज्यात राविवारी 12 हजार 634 अशी विक्रमी बाधितांची नोंद झाली होती.
Nagpur : एका बाजूला सध्या कोरोना बाधितांचा उपचार करणारे रुग्णालय रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. तिथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायलाही वेळ नाही. अशातच एका खासगी कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
धक्कादायक म्हणजे अश्लील लगट केल्याचा आरोप तिथल्या एका वरिष्ठ डॉक्टरवरच लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 25 वर्षीय महिला डॉक्टरने तिच्या वरिष्ठ डॉक्टरवर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयात ती गेले काही दिवसांपासूनच नोकरीवर लागली होती. 26 एप्रिल रोजी रात्री तिथेच काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरने तिला रात्रपाळीच्या ड्युटी वेळी चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले. कामानिमित्त डॉक्टरांनी बोलावले असेल म्हणून ती चेंजिंग रूममध्ये गेली असता आरोपी डॉक्टरने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला.
Nagpur अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे महिला डॉक्टर प्रचंड घाबरली. तिने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत स्वतःचे घर गाठले. तिला घाबरलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सर्व प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत डॉक्टर नंदू रहांगडालेला अटक केली आहे.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल मोसमाची अडखळती सुरुवात केली आहे. मुंबईला पाच पैकी केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. मात्र, मुंबईला बहुतांश मोसमांत सुरुवातीला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश येत असल्याचे पाहायला मिळाले असून हा संघ मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावतो. यंदा मुंबईचे सुरुवातीचे पाचही सामने चेन्नईमध्ये झाले. परंतु, आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून मुंबईचे पुढील चार सामने दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानात होणार आहेत. गुरुवारी मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल.
फलंदाजांना धावांसाठी झुंजावे लागले मुंबईने यंदाच्या मोसमात पहिल्या तीन पैकी दोन सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा सलग दोन सामन्यांत पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या पराभवांमध्ये मुंबईने जेमतेम १३० धावांचा टप्पा पार केला होता. चेन्नईच्या खेळपट्ट्या या संथ आणि फिरकीला अनुकूल होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता मुंबईच्या फलंदाजांना या खेळपट्ट्यांवर धावा करण्यासाठी झुंजावे लागले. त्यामुळे आता दिल्लीत सामने होणार असल्याचा मुंबईच्या फलंदाजांना नक्कीच आनंद असेल.
रोहितने पाच सामन्यांत २०१ धावा केल्या असून यंदा दोनशे धावांचा टप्पा पार केलेला तो मुंबईचा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे रोहितला इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे. मुंबई ने मागील दोन सामन्यांत केवळ तीन परदेशी खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्लीच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळण्याची अपेक्षा असल्याने नेथन कुल्टर-नाईलला संधी मिळू शकेल. दुसरीकडे राजस्थानने मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केल्याने त्यांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
भारतात लाेकांमध्ये बहिरेपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते ध्वनिप्रदूषण, ८० डेसिबलपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाजामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास हाेताे. तसेच सतत हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी एेकल्यामुळेही हा त्रास हाेताे. सध्या देशभरातील सुमारे ६.३ टक्के लाेक या आजाराने त्रस्त आहेत. औरंगाबादच्या कान-नाक-घसा डाॅक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सावजी यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन आहे. ‘हिअरंग केअर फॉर ऑल’ ही या वर्षीची थीम आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी ही माहिती देण्यात आली.
ध्वनिप्रदूषण, हेडफोनचा अतिवापर, काही वेळा अपघात-आजार वा जन्मजात व्यंगामुळे बहिरेपणाचे रुग्ण वाढत आहेत. कानावर आवाजच पडत नसेल तर संवाद साधता येत नाही आणि त्या व्यक्तीचे आयुष्य कठीण बनते. मूकबधिर व्यक्तींचे आयुष्य तर अधिक कठीण असते. या पार्श्वभूमीवर आैरंगाबादेतील ईएनटी डाॅक्टरांनी बहिरेपणा आणि त्यासंबंधित उपचार पद्धतीबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. डीजे बँड वाजवणाऱ्या लोकांना बहिरेपणाची समस्या लवकर जाणवते. कंपनीमध्ये मोठमोठ्याने होणाऱ्या आवाजाचा परिणामही कामगारांवर होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
हेडफोनचा अतिवापर टाळा
डाॅ म्हणाले, ‘मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाच्या समस्या वाढत आहेत. हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे बहिरेपणाची समस्या जाणवत असल्याचे अनेक रुग्णांच्या तपासणीतून जाणवते. ८० डेसिबल्सपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज यामुळे श्रवणशक्तीचा ऱ्हास होतो. याबाबत काळजी घ्यावी.’
डाॅ म्हणाले, ‘मूकबधिर मुलांसाठी वरदान ठरणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांटसारख्या शस्त्रक्रियांची व्याप्ती वाढत आहे. ५ वर्षांपेक्षा लहान मुलांवर ही शस्त्रक्रिया केल्यास त्यांना फायदा होतो. यामध्ये ७ ते ८ लाख रु. खर्च येतो. शासनाच्या अँडिम स्कीमच्या माध्यमातून ९०% खर्च केला जात आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतही या शस्त्रक्रियेची व्याप्ती वाढत आहे.
IPL 2021, CSKvs SRH : सलामीवीर ऋतूराज गायकवाड ने 44 चेंडूत केलेल्या 75 धावा आणि फाफ ड्युप्लेसिसच्या 38 चेंडूतील 56 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवला. 6 पैकी 5 विजयासह 10 गुणासह चेन्नईच्या संघाने पॉइंट टेबलमध्ये पुन्हा अव्वलस्थानी मजल मारली. सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकात 171 धावा केल्या होत्या. सलामीवीर बेयरस्टो अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर ऑरेंज आर्मीचा कर्णधार डेविड वॉर्नरने 55 चेंडूत 57 धावांची खेळी केली. मनिष पांड्येने 46 चेंडूत 61 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांच्या शतकी खेळीनंतर केन विल्यमसनने 10 चेंडूत 26 आणि केदार जाधवने 1 चेंडूत 12 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून लुंगी एनिग्डीने दोन तर सॅम कुरेनने एक विकेट घेतली.
ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीसने चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात केली. 172 धावांचा पाठलाग करताना ओपनिंग पेयर्सने 129 धावांची भागीदारी करुन हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. ऋतूराजच्या रुपात राशीद खानने संघाला पहिले यश मिळवून दिले. तो 44 बॉलमध्ये 75 धावांची खेळी करुन परतला. त्याने आपल्या बहरदार खेळीत 12 खणखणीत चौकार खचले. फाफ ड्युप्लेसीस 38 चेंडूत 56 धावा केल्या. मोईन अली 8 चेंडूत 15 धावा करुन परतला. तिन्ही विकेट्स राशीदनेच घेतल्या. रविंद्र जडेजा नाबाद 7 आणि सुरेश रैनाच्या नाबाद 17 धावांसह चेन्नई सुपर किंग्जने 18.3 ओव्हरमध्ये 7 गडी राखून सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्जचा स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाला सामना करावा लागला होता. त्यानंतर चेन्नईच्या संघाने जोरदार कमबॅक करत प्रत्येक सामना जिंकला आहे.
IPL 2021 चेन्नई सुपर किंग्जने 6 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुण कमावले असून उत्तम सरासरीच्या जोरावर ते पहिल्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने देखील 6 पैकी 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स 5 पैकी 2 सामन्यातील विजयासह चौथ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स 4 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर असून हैदराबाद 6 पैकी 1 विजय आणि 5 पराभवासह 2 गुणांसह सर्वात तळाला आहे.
मुंबईःकरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्यानं मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण पणे लसीचे १२ कोटी डोस लागणार असल्याची माहिती आहे. मोफत लसीकरणामुळं राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.#BreakTheChainpic.twitter.com/7JwMj3FbKo
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
उत्तम नियोजन करावे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे
१ मेला लसीकरण सुरु होणार नाही लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १मेपासून लसीकरण शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोविन अॅपवरुन रजिस्टर लसीकरणासाठी जाताना कोविन अॅप वापरुन रजिस्टर करुन मगच केंद्रावर जावं. जे लसीकरण होईल ते कोविन अॅपच्या माध्यमातूनच होईल.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊनबाबत चर्चा झाली मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेता सध्या जे लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत ते १५ मे पर्यंत वाढवले जावेत असे मत बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले असून ३० एप्रिल रोजी यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील करोना संसर्गाची भीषण स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन वाढवावा लागणारच आहे. यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे आता नेमका १५ दिवस लॉकडाऊन वाढवायचा की त्यापेक्षा कमी वा अधिक दिवस याबाबत निर्णय घ्यायचा असून ३० एप्रिल रोजी त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. १५ दिवसांच्या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब होऊ शकते असा माझा अंदाज असल्याचेही ते पुढे म्हणाले.
राज्यात १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत. त्यासोबत संचारबंदीचा आदेशही लागू आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. सोमवारी (२६ एप्रिल) राज्यातील नवीन बाधितांचा आकडा ४८ हजारांपर्यंत खाली आला होता. तर दुसरीकडे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवल्यास करोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत होणारच आहे शिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताणही त्यातून कमी होणार आहे. आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगाने काही तातडीची कामे तडीस नेण्यासही हातभार लागणार आहे. यासाठीच लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही मंत्रिमंडळ बैठकीआधी लॉकडाऊन वाढवण्यात यावा असे माझे स्पष्ट मत असल्याचे नमूद केलेले आहे. लॉकडाऊनमुळे नाशिकमधील रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी लागू केली होती. परंतु, आता या योजनेत नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे, दहावी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे बंधनकारक आहे. मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा दुसर्या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल. कुटुंब नियोजनानंतर सरकारकडून एका मुलीच्या नावे 50,000 रुपये किंवा दुसर्या मुलीच्या जन्मानंतर आणि नसबंदीनंतर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा होणार आहेत. मात्र, या योजनेत आता काहीअंशी बदल करण्यात आलेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2014 अन्वये ‘सुकन्या’ योजना सुरु करण्यात आली आहे. सुकन्या योजनेचे लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञेय आहेत. तसेच केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे. (यात परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो.) मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या, तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ‘सुकन्या’ योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.
योजनेचा उद्देश : ‘सुकन्या’ योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘सुकन्या’ योजनेच्या सर्व अटी व शर्ती ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेमध्ये लागू करण्यात आले.
लिंग निवडीस प्रतिबंध करणे
बालिकेचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे असे या योजनेचे उद्देश आहेत.
‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.
दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या प्रमुख अटी :
मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक
कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी 1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक
कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक
एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
सदर योजनेचा लाभ ऑगस्ट 2017 व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल.
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणार आहे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप : सुरुवातीला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते (Joint Account) उघडण्यात येईल. यामध्ये ५००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील.
शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. 50,000 मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. 25000)
जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी 6 वर्षांची झाल्यावर काढता येईल. त्यांनतर पुन्हा मुलगी 12 वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल. (मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेता येईल.
दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
बँक खात्याचे पासबुक
उत्पन्नाचा दाखल
रहिवासी दाखल
मुलीचा जन्मदाखला
पासपोर्ट साइज फोटो
अर्ज करण्याची पध्दत : सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
योजनेची अधिक माहिती ‘येथे’ उपलब्ध : या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
महत्वाचे : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे
ही योजना सुरू झाल्याने मुलींच्या संख्येत वाढ होणार आहे.
प्राप्त झालेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
उत्पन्नाची मर्यादा अधिक ठेवण्यात आली आहे, जेणेकरून अधिक कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
जर आपल्याला मुलगी जन्माच्या 6 महिन्यांत (1 वर्षाच्या आत) किंवा दोन मुलींचे कौटुंबिक नियोजन केले, तर लोकसंख्या नियंत्रणात वाढ होईल, तरच हा लाभ देण्यात येईल.
आई व मुलीच्या नावे खाते उघडले जाईल.
माझी कन्या भाग्यश्री योजना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ योजना’ला चालना देईल.
Coronavirus In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संकटाच्या काळात प्रत्येकानं स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाची सामान्य लक्षणं जरी जाणवली तरीदेखील तात्काळ कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे. लक्षण जाणवल्यानंर RT-PCR चाचणी करण्यावर अनेक लोक भर देतात. मात्र, अनेक जणांच्या RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना खोकला, ताप, अशक्तपणा यासारखी कोविडची लक्षणं जाणवतात, अशा वेळी आपण जास्त सावधान राहिलं पाहिजे, असा सल्ला एआयआयएमएसमधील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. कोरोना विषाणू काळानुरुप आपलं रुप बदलत आहे. भारतीय स्ट्रेनचा कोरोना विषाणूमुळे लक्षणं असतानाही RT-PCR चाचणी निगेटिव्ह येतेय, असं गुलेरिया म्हणाले.
कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि एआयआयएमएसमधील प्रमुख डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, लक्षणं असतानाही RT-PCR चाचण्या निगेटिव्ह येते. लक्षणं असताना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बिंदास्त राहू नका, काळजी घ्या. अशा रग्णांनी नियमांप्रमाणे कोरोनाचे उपचार घ्यावेत. भारतामध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन धोकादायक आहे. एक मिनिट जरी तुम्ही बाधित रुग्णांच्या संपर्कात आलात तर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते.
सध्याची ‘RT-PCR’ चाचणी ही मूलत: विषाणूच्या ‘आरएनए’ची तपासणी करते. कोरोनाच्या सर्व नवीन रूपांमध्ये आरएनए हे विषाणूसारखेच आहेत, केवळ त्यांचे ‘स्पाइक प्रोटीन’ बदलले जातात. सध्याच्या सर्व चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूची नवीन रूपेदेखील शोधली जात आहेत. परंतु, खरी समस्या अशी आहे, की ‘आरटी-पीसीआर’चा संवेदनशीलता दर (परिणामकारकता दर) हा केवळ ६० ते ७० टक्के आहे. याचा अर्थ असा, की ‘RT-PCR’ चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, तरी संबंधित रूग्ण हा पॉझिटिव्ह असण्याची शक्यता ३०ते ४०टक्के इतकी असतेच.
PNG Jewellers has launched the 3rd season of the “Pure Price Offer” to bring back the joy of certainty in these uncertain times. Customers can pre-book their jewellery purchases during the period of 21st April 2021 to 15th May 2021 to avail of the offer. The Pure Price offer this season offers additional benefits to customers on making charges on 22kt gold as well as diamond jewellery.
With the onset of the festive and wedding season marred by lockdowns in Maharashtra and
an increase in the number of cases all across the country due to rising covid 19 cases have once again caused uncertainty leading to an upward swing in prices of the yellow metal, the brand aims to create a cushion for buyers and protect them against the rise in gold prices. Customers who book diamond jewellery between this period at the current price will get a flat 50% off on making charges and Rs. 2000 off per carat on diamond value. Customers booking 22kt Gold Jewellery will get a flat 25% off on making charges. Bookings are open till the 15th of May and can be redeemed by the 10th of November 2021. The brand has assigned store managers across all its locations to help customers with any queries.
Saurabh Gadgil, Chairman and Managing Director, PNG Jewellers said,” It is a tradition to buy gold jewellery during the festive season. Akshay Tritiya is just around the corner, weddings are getting postponed too. Gold buying surges considerably during these days every year.
However, the current situation in the country and the swings in gold prices have put customers in a fix. This initiative is to protect our customers from oscillating prices and create a win-win situation for them.
The First and second season of the Pure Price Offer received a phenomenal response. With
gold prices spiralling upwards and existing incessant uncertainty right now, we decided to come back with Season 3 of the Pure Price Offer. Through this initiative, we want our customers to know that we are actively coming up with initiatives to support their needs and our offerings are designed to make the purchase of jewellery easier for them. We wouldn’t want our customers to miss out on buying the jewellery they desire because of uncertainty in gold prices. Hence, we have launched this offer again to thank all our patrons and tell them that we are here to serve them and facilitate gold buying for them during this festive and wedding season in an insulated environment which otherwise is marred with uncertainty across the board”.
About P.N. Gadgil Jewellers:
PNG Jewellers is one of the most reputed jewellers in the country, with over 187 years of
excellence in creativity and trusted service for customers all over the world. Under the able
leadership of Dr Saurabh Gadgil, a visionary businessman, P. N. Gadgil Jewellers Pvt Ltd is
creating a brand that is catering to customers globally.
बलरामपूर:कोविड -१९ संसर्गामुळे संपूर्ण छत्तीसगडमध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत विवाहसोहळ्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये बलरामपूर जिल्ह्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वर आपल्या दुचाकीवरून एकट्याने आपल्या वधूला घ्यायला आला आहे. वर हा झारखंडचा रहिवासी आहे. दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले.
किंबहुना बलरामपूर रामानुजगंज जिल्ह्यातील सणावल येथे वराचे लग्न होणार होते. सर्व काही निश्चित होते. परंतु लॉकडाऊनमुळे लग्नाच्या वरात काढणं शक्य नव्हते. अशा परिस्थितीत वराने ड्रेस घातला आणि हेल्मेट घालून वधूला दुचाकीवरून आणायला गेला. रामानुजगंजच्या सीमेवर पोलिस पथकाने वराला एकटे पाहिले तेव्हा पोलिस पथकही आश्चर्यचकित झाले.
वराला थांबण्यास सांगितले
यानंतर पोलिसांनी वराला थांबवून विचारले की, आपण लग्न करणार आहात. हिंदू प्रथेनुसार किमान ५ लोक असावेत पण वर येथे फक्त एकटाच होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचा लग्न करण्याचा आग्रह पाहून पोलीस त्याला म्हणाले किमान ५ जणांना बोलवा तरच आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांकडून जाण्याची परवानगी मिळवून देऊ. वराला पटले नाही आणि त्याला वाटले की ५ लोकांच्या चक्करमध्ये त्याचे लग्न मोडू नये. तो पोलिसांना नकार देऊन लग्नासाठी एकटाच निघून गेला.
व्हिडिओ व्हायरल झाला आहे
आता वराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पोलिस त्याला समजावताना दिसत आहेत. वर म्हणाला की, कोरोना विषाणूमुळे गावातले लोक वरातीत सामील होणार नाहीत, त्यांना जबरदस्तीने कसे आणता येईल. त्याचवेळी, उपस्थित काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनविला आहे.
Nagpur: The wife was looking for a bed in the hospital for her husband, giving her bed, the elderly said – ‘I lived my life’ and after three days said goodbye to the world.
In the second wave of Coronavirus, there is a shortage of oxygen to bed in many cities of India. Meanwhile, the 85-year-old elder of Nagpur presented such an example, due to which he is being praised a lot. Narayan Bhaurao Dabhadkar had become infected with Corona. He was in his bed in the hospital. At that time, a woman was looking for a bed to save her husband’s life. Giving his bed, he said, ‘I am 85 years old, have seen life, but if that woman’s husband dies then the children will be orphaned, so it is my duty to save that person’s life.’
He died three days after returning from the hospital. Narayan Dabhadkar got infected with Corona a few days ago. His oxygen level had reached 60. The daughter and son-in-law took him to Indira Gandhi Government Hospital. After much effort, he got a bed. Then the woman was looking for a bed to save her 40-year-old husband. Astpal refused to recruit him, because there were no beds empty. Seeing the weeping woman, his heart ached and he gave his bed.
The hospital administration got his letter written. In which he wrote, ‘I am voluntarily emptying my bed for another patient.’ After writing this much, he returned home and died three days later.
अमेरिकेतील ब्रिटनी आणि ब्रायाना या जुळ्या बहिणी जन्मापासून खऱ्या अर्थाने एकत्र आहेत. म्हणजे शाळा, कॉलेज पदवी त्यांनी बरोबरच केली यात विशेष नाही. वाहन चालक परवाना दोघींनी बरोबरच घेतला.त्यात त्या दोघी आयडेन्टीकल ट्विनस आहेत. म्हणजे एकीला झाका आणि दुसरीला काढा. ओळखता येणार नाहीत इतक्या सारख्या दिसणाऱ्या. त्यात एकसारखे कपडे घातले की बघायलाच नको. त्यांचे इन्स्टाग्राम पेज आहे आणि त्या दोघी सध्या थोड्याच अंतराने त्यांच्या मुलांना जन्म दिल्यामुळे चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे या दोघीं जुळ्या चे नवरेही जुळे आहेत. तेही आयडेंटिकल ट्विन आहेत. २०१७ मध्ये त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि सहा महिने डेटिंग केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे चौघे आणि आता त्यांची मुले सर्व एकत्र राहतात. या लग्नामुळे या दोघींना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले होते. प्रथम आपला नवरा नक्की कुठला हे त्यांना ओळखूच येत नसे. पण हळूहळू काही विशिष्ट खुणा, लकबी, हालचाली यावरून त्यांना आपापले नवरे नीट ओळखू येऊ लागले असे त्या सांगतात.
कोरोना साथीच्या दुसर्या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी 28 एप्रिल म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेय. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारनं लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आहे.
आपला नंबर लसीसाठी कसा येईल?
1 मेपासून वय वर्षे 18 हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती 24 एप्रिलपासून सुरू होईल, असं सांगण्यात येत होते. पण सरकारनं 24 नव्हे तर 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता. https://selfregifications.cowin.gov.in/.
नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार का?
कोरोना लस नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल आणि या लस देण्यास 1 मेपासून सुरुवात होईल. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना भेटीशिवाय लसीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
स्पॉट रजिस्ट्रेशनचे काय होईल?
45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे 18 अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा आदेश देण्यात आला आहे.
नोंदणी कशी करावी?
पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.
येथे संपूर्ण प्रक्रिया
पोर्टलवर नोंदणीचा एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.
येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो 180 सेकंदात टाईप करावा लागेल.
नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.
या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या
नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.
यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.
केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.
“तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.
खासगी कंपन्याही आपल्या कर्मचार्यांना लसी देऊ शकतात?
कॉर्पोरेट क्षेत्रातून अशी मागणी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये येत आहे. ब्रिज कँडी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, आधी उत्पादन आणि वितरण यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण होते, पण आता त्यात शिथिलता आली आहे. कंपन्यांनी लस उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारला देतील आणि उर्वरित 50 टक्के बाजारात विक्री करू शकतात, असे सरकारने स्पष्ट केलेय. राज्य सरकारदेखील कंपन्यांकडून थेट मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत नर्सिंग होम किंवा खासगी रुग्णालयांच्या मदतीने खासगी कंपन्या आपल्या कामगारांना समांतर लसीकरण मोहीमदेखील चालवण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जोखीम असलेल्या लोकांना लसी देण्यात येत होती. दुसऱ्या टप्प्यात, ही लस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना दिली गेली. आणि आता 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यात 18+ लोकांना देखील लसीकरण मोहिमेत समाविष्ट केले गेले आहे.
नागपूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करीत स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. तसेच लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री Amit Deshmukh यांनी दिले.
शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळेच कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. मेयोतील कोरोना संसर्गातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास 90 टक्के आहे. ही बाब समाधानकारक आहे. असे सांगत देशमुख म्हणाले, कोविड संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास घरगुती उपचार करण्यात वेळ न दडवता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
बरेचदा पेशंट अत्यव्यस्थ झाल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांवर मर्यादा पडतात. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यापुढे रेमिडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. गरजेप्रमाणे रेमिडेसिवीर औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीही ठराविक औषधाचा आग्रह करु नये. येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गातून बाहेर पडलेल्या रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुदानातून मेयो येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय विभागासमोर खूप आव्हाने आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच नर्सिंग स्टाफची पदभरती लवकरच करण्यात येईल, असेही Amit Deshmukh यावेळी म्हणाले.
डॉ. केवलिया यांनी मेयोमधील कोरोना उपचारासंबंधीची माहिती यावेळी दिली. सध्या येथे कोरोना रुग्णांसाठी 600 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 100 रुग्णांसाठी डोझी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आणखी 100 डोझी यंत्रे येथे लवकरच बसविण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाची माहिती देण्यासाठी माहिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
सध्या 166 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून त्यापैकी 143 कोविड रुग्णांसाठी तर उर्वरित 23 नॉन कोविड व सारी रुग्णांसाठी वापरण्यात येत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्सची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटी तत्वावर बायोमेडिकल इंजिनिअरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीनंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचवेळी ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा माल आणि इतर वैद्यकीय सामग्री अशावेळी अमेरिकेसह इतर देश पुरवत आहेत.
दुसरीकडे आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. भारतातील कॉर्पोरेट्सपैकी टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांनीही सरकारला आणि प्रत्यक्ष जनतेला वेगवेगळ्या रूपांत मदत सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी गुगल आयटी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना कार्यासाठी मदत निधी म्हणून 135 कोटी रुपये मदत भारताला देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनीही मायक्रोसॉफ्ट कंपनी पले स्रोत भारतातील वैद्यकीय मदत कार्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केले.
त्यानंतर Apple या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही आज भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत करण्याचा कंपनी विचार करत असल्याचे सांगितले आहे. पण कूक यांनी कंपनी किती रक्कम देणार आहे हे मात्र जाहीर केलेले नाही.
आपल्या ट्विटमध्ये Apple चे सीईओ टीम कूक यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे भारतात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत जे कोरोना महामारीविरुद्ध लढत आहेत,ते कोरोना योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण आणि आमच्या कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही वैचारिकदृष्ट्या ठामपणे उभे आहोत. भारतातील मदत कार्यासाठी लवकरच ॲपल आर्थिक मदत देईल.
प्राणाची बाजी लावून भारतातील हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर हे कोरोनाविरुद्ध लढत असून त्यांना साधने कमी पडत आहेत. ऑक्सिजन सिलेंडर, मेडिकल इक्विपमेंट्स यांची टंचाई जाणवत आहे. ही परिस्थिती पाहून इतर अमेरिकी कंपन्यांनी मदत जाहीर केल्यावर ॲपलनेही मदत जाहीर केली.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळानं बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळानं दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी जाहीर केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
दहावीच्या परीक्षा रद्द, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कोणत्या आधारावर केलं जाणार, याबाबतीत विद्यार्थी आणि पालक यांच्यात कमालीची उत्सुकता आणि तेवढाच संभ्रमही पाहायला मिळत आहे. परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या आधारावर देण्यात येणार? याबाबतीतही अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचा पर्याय असून शिक्षण विभाग त्यावर चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पास करुन पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यानंतर नववीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डात सेमिस्टर पद्धत असते. तसेच याव्यतिरिक्त अंतर्गत मूल्यांकनही होत असतं. याआधारावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची केवळ बोर्डाची परीक्षा पार पडत असते. तसेच अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचंच असतं. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांना कशाच्या आधारावर गुण द्यायचे, हा प्रश्न कायम आहे.
Patna: A 105-year-old woman from Patna defeated COVID-19 in just 11 days with home isolation. The woman along with her family had tested positive for COVID-19 on April 11.
Dr. DN Akela, 68, resident of Ashiana Nagar, Patna, with his 105-year-old mother and 61-year-old wife tested positive on April 11. Th entire family had taken both the doses of COVID-19 vaccine.
The family immediately isolated themselves and began taking medicines given without panic. On April 22, the report of the whole family came negative.
The 105-year-old Demanti Devi said that she had fever and throat problems but now she is feeling fine.
However, Demanti Devi is not the only elderly women to recover from coronavirus. Last year, a 105-year-old woman from Karnataka on September 13 recovered from COVID-19 who isolated at home and refused to get hospitalised. Also, a 110-year-old Kerala women Randathani Variath Pathu, recovered from COVID-19 last year in August. She became the oldest to recover from COVID-19 in the state. The 105-year-old Asma Beevi, a Kollam native, was discharged after recovering from the disease, in July. Asma Beevi who also had other age-related ailments was monitored by a special medical board.
Meanwhile, Bihar reported a total of 11,801 new COVID-19 cases on Monday escalating the virus caseload to 4,15,397, with capital Patna being worst-hit in the state, health department bulletin said.
The state saw 67 fresh casualties, taking the COVID-19 death toll to 2222, it said. Among the new cases, Patna’s share was a maximum of 2,720, while Saran had 568 infections, West Champaran (460), Saharsa (433), and Purnea (384).
Supreme Court on April 26 said Centre must clarify the rationale for pricing of COVID-19 vaccines and that modalities should be put in place to ensure shortage of doses would be looked into.
A bench led by Justice DY Chandrachud said that the union government should clarify the projected requirements of vaccine doses as the vaccination coverage is being expanded starting from May 1 to the 18-44 age group.
Everyone above 18 years of age will be eligible to get vaccinated against COVID-19 from May 1, the central government had announced on April 19 as it liberalised the vaccination drive to allow states, private hospitals and industrial establishments to procure the doses directly from manufacturers.
India has granted emergency use approval to three COVID-19 vaccines – Covishield, Covaxin and Sputnik V. All three jabs have a two-dose regimen.
The Serum Institute of India (SII), which produces Covishield, and Covaxin’s manufacturer Bharat Biotech have announced prices at which they will be selling doses to state governments and private hospitals. On April 26, the Centre had asked both vaccine manufacturers to lower the prices of their respective vaccines.
Sony Entertainment Television’s Super Dancer – Chapter 4 is showcasing extraordinary young dancing talents from across the nation. The Super 13 contestants have impressed the judges and the audience with their phenomenal dancing skills. This weekend, Remo D’Souza and Farah Khan will grace the show with their presence as the guest judges. They are enthralled with all the power-packed acts by Super 13.
Kids are kids after all, and they all love a treat! Contestant Eesha Mishra, who is a huge foodie, was in for a surprise and special treat courtesy guest judge, popular choreographer-filmmaker Farah Khan. Eesha, who is eight years old, has been open about her love for food. In the upcoming episode, Eesha impresses the judges with an electrifying dance performance on the song ‘Chhamma Chhamma’. Her confidence, expressions and energy were appreciated by the judges.
Remo lauded Eesha for her ” beautiful expressions” and said he could watch her “outstanding” dance for the whole day. He also commended choreographer Ashish for giving a wonderful twist to the traditional dance form of Lavani. Geeta expressed her happiness about seeing Eesha’s growth so far despite not being professionally trained. She also spoke about the little one’s love for food, and quipped, “Your growth is so good. Khaane ke saath saath ye toh bahut logo ko khaa jaayegi!” On a serious note, she told Eesha, “You are wonderful to watch, you have great energy. Keep working hard.”
Farah complimented Eesha for a ” well done” performance, which she called the “cutest” of the evening. “Your expressions are too good. ‘Chhamma chhamma ‘ was performed by Urmila Matondkar, and we used to be in awe of how she gave four expressions in one line! But with your dance, not only did you match up with her but superseded those expressions because you gave eight expressions in one line!”
Farah then sprang up a surprise and brought a tiffin box full of delicacies for Eesha. She gorged on Aloo Tikki and Samosa to her heart’s content, and even joked how fitness-conscious judge Shilpa Shetty Kundra would have treated her with ‘ Baingan Ka Halwa’ instead!
Watch Super Dancer – Chapter 4, every Saturday and Sunday at 8:00 PM, only on Sony
Entertainment Television
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...