Home Blog Page 84

IPL 2021 हंगामात मोठा सेटबॅक, KKR च्या खेळाडूंना करोनाची लागण; आजची लढत पुढे ढकलली

IPL 2021 हंगामात मोठा सेटबॅक, KKR च्या खेळाडूंना करोनाची लागण; आजची लढत पुढे ढकलली

आयपीएलच्या (IPL) १४व्या हंगामात एक मोठा सेटबॅक बसला आहे. आज सोमवारी होणारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(RCB) यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाातील अनेक खेळाडूंची प्रकृती बरी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित वेळेनुसार ही लढत आज संध्याकाळी ७ वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होती.

आयपीएलच्या १४व्या हंगामाची सुरूवात ९ एप्रिल रोजी झाली होती. आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. पण बायो बबलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला करोना झाला नव्हता. आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.

मला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे मुख्य कार्यकरी अधिकारींकडून मेसज आला आहे. आज होणारी लढत पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सामन्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचीव अनिल पटेल यांनी सांगितले.

कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.कोलकाता संघातील दोघा खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ त्याच्या सोबत खेळण्यास उत्सुक नाही. वरुण आणि संदीप यांची टेस्ट पॉझिटीव्ह झाल्याने आरसीबीच्या संघात काळजी वाढली आहे. यामुळेच ही लढत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले.

नागपुरात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक

नागपुरात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक

नागपूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ६,३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्या तुलनेत ५,००७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. दिवसभरात ११२ मृत्यूंनी मात्र चिंता वाढवली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन ते तीन दिवसात प्रथमच करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १३,७५१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे करोनामुक्त होण्याची टक्केवारी ८०.५१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जिल्ह्यात रविवारी १८,६२९ चाचण्या करण्यात आल्या. यात ५,००७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. शहरात प्रथमच तीन हजारांच्या खाली म्हणजे २ हजार ७२४, तर ग्रामीणमध्ये २ हजार २६९ रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सध्या करोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार १२७ इतकी झाली आहे. एकीकडे रुग्ण बरे होत असले तरी मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक ठरत आहे. यात जिल्ह्याबाहेरून उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे भर पडली आहे.

दिवसभरात जिल्ह्यात ११२ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात शहरात सर्वाधिक ६२, तर ग्रामीणमधील ३६ मृत्यूंचा समावेश होता. तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे १४ मृत्यूही नोंदवण्यात आले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ७,५९९ इतकी झाली आहे.

जिल्ह्याची स्थिती

  • रविवारचे बाधित : ५,००७
  • रविवारी बरे झालेले : ६,३७६
  • रविवारचे मृत्यू : ११२
  • अॅक्टिव्ह बाधित : ७४,१२७

करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी ‘औषध बँक’; गरिबांसाठी ठरतेय वरदान

करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी 'औषध बँक' ; गरिबांसाठी ठरतेय वरदान

नागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावामुळे सध्या अर्थकारणाची चाके ठप्प झाली आहेत. राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे संपूर्ण आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे अर्थचक्राची गतीच मंद झाली आहे. नागपूरातील उद्योग, व्यापारापासून सर्वच अर्थकारण कुलुपात बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या हजारो श्रमजीवींच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधिच गेल्या महिन्याभरापासून घरात दोन वेळची चूलही पेटणे मुश्किल झालेले असताना करोना विषाणूची बाधा झालेल्या गरिबांचे जीव औषधोपचारा अभावी धोक्यात आले आहेत. हे नैराश्याचे वातावरण असताना नागपूर सिटीझन फोरम ही स्वयंसेवी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग़रीब करोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण बनत एक पाऊल पुढे आली आहे.

तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या संस्थेने उभी केलेली औषध बँक दारिद्र रेषेखालील करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी वरदान ठरत आहे. करोना प्रादुर्भावाच्या धास्तीने सध्या जीवनाश्यक वगळता सर्वच उद्योग, व्यापारी प्रतिष्ठानांना टाळे लागले आहे. त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेले मजूर, कामगार, नोकरदार, श्रमजीवी, छोटे व्यावसायिक, कारागिरांना बसला आहे. वाहतूक व्यवस्थाही बंद असल्याने ऑटोचालक, रिक्षाचालकांपासून ते व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये नोकरदारी करणाऱ्यांची रोजीरोटी थांबली आहे.

शिवाय या टाळेबंदीमुळे अनेकांना नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्याने घरात दोन वेळची चूल पेटणे देखील दुरापास्त झाले आहे. त्यात कुटुंबात करोनाचे संक्रमण झाल्यानंतर दुर्बल घटकातील या आजारग्रस्तांना उपचार करणे देखील अशक्य होत आहे. ही गरज ओळखून नागपूर सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेने दुर्बल घटकातील करोनाग्रस्तांसाठी औषध बँक सुरू केली. पाहता पाहता या संस्थेने आतापर्यंत शेकडो गरिबांकडून एक रुपया देखील न स्वीकारता त्यांना करोनाच्या संक्रमणातून बाहेर काढण्यासाठी लाखो रुपयांची औषधे अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही औषध बँक आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरिबांना उपचारा अभावी आलेल्या नैराश्यातून बाहेर काढण्यास आशेचा किरण दाखविणारी ठरली आहे.

सलमान खानच्या ‘राधे’ फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू.

सलमान खानच्या ‘राधे

बॉलिवूड सुपरस्टार ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याची कोणतीही फिल्म असली, तरीही त्याच्या फिल्मसाठी सर्वांनाच उत्सुकता असते. प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी ‘दबंग’ अभिनेता सलमान खान त्याची फिल्म रिलीज करून त्याच्या चाहत्यांना भेट देतच असतो. यावर्षी सुद्धा ईदच्या दिवशी म्हणजेच येत्या १३ मे रोजी बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड’ ही फिल्म रिलीज होणार आहे. ही फिल्म रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांकडून कमालीची पसंती मिळतेय. फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही या फिल्मसाठीची उत्सुकता दिसून येतेय. या फिल्मसाठी आता परदेशात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

एसके फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय, “फिल्म राधेसाठी मध्य पूर्व देशांमधून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. यूएई, कतार, कुवेत, सौदी अरब आणि बेहरीन या देशांमधून फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे”. ही माहिती शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय, “सलमान खानच्या फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे! तुम्ही तुमच्या जवळच्या सिनेमागृहाच्या वॉक्स सिनेमा, नोवो सिनेमा, रील सिनेमा आणि स्टार सिनेमा सारख्या वेबसाईटवरून तुमची सीट बुक करू शकता. सुरक्षित रहा!”

सध्या भारत देशावर सुरू असलेल्या करोना संकटामुळे भारतात ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज करण्याबाबत शंका असली तर इतर देशात मात्र ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही अशा राज्यांत मल्टीप्लॅटफॉर्मवर ही फिल्म रिलीज करण्यात येणार आहे.

प्रभूदेवा दिग्दर्शित ‘राधे’ या फिल्ममध्ये अभिनेता सलमान खान हा ९७ एनकाऊंटर्स केलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी सोबतची केमिस्ट्री देखील रंगलेली दिसणार आहे. सोबतच अभिनेता रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

महाराष्ट्राच्या मदतीला धावली लता मंगेशकर मुख्यमंत्री म्हणाले, “धन्यवाद!”

लता मंगेशकर

एकीकडे जरी करोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजला असला तरी या संकट काळात सर्व जण एकत्र येऊन संकटाचा सामना करत असल्याचे दिसून येत आहेत. तसंच एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. देशाची ‘गानकोकिळा’ अशी ओळख असलेल्या ९१ वर्षीय गायिका लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७ लाख रूपये देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतंच महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आलीये.

महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या या ट्वीटमध्ये लिहीलंय की, “भारतरत्न लता मंगेशकर यांनी #मुख्यमंत्रीसहायतानिधी #COVID_19 साठी ७ लाख रुपयांची दिली मदत. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मानले आभार. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन”.

महाराष्ट्राच्या या कठीण परिस्थितीत ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. करोना विरोधात लढाईसाठी आर्थिक मदत देणाऱ्यांसाठी राज्य शासनाने कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापन केली आहे.

महाराष्ट्र डीजीआयपीआरने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत माहिती देणारे एक टेम्प्लेट देखील शेअर केलं आहे. तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन करोना विरुद्धच्या लढाईसाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

धक्कादायक घटना! कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक घटना! कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोरोना लस देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका तरुणीला लस देण्याचं आमिष दाखवत एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

तरुणीने बलात्काराला विरोध केला असता आरोपींनी तिचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात रुमालही कोंबला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी याचा अधिक तपास केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील जमुनापूर परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. एका तरुणीला आरोपीला कोविड लस देण्याचं आमिष दाखवून जमुनापूर भागातील एका निर्जन घरात नेण्यात आलं. याठिकाणी दोघांनी पीडित तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

पीडित तरुणीने याला विरोध केला. तेव्हा आरोपींनी हात-पाय घट्ट बांधले. तिच्या तोंडात रुमालही कोंबला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पीडितेने तरुणी आपली सुटका केली आणि घरी पोहचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. नातेवाईकांनी जमुनापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विवाहित प्रेयसीवरील रागात एका प्रियकराने केले तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण

विवाहित प्रेयसीवरील रागात एका प्रियकराने केले तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण

विवाहित प्रेयसीवरील रागात एका प्रियकराने तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवलीत घडली असून महिलेने पोलिसात प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेच्या तीन वर्षीय मुलीचं अपहरण करणाऱ्याला शोधून काढलं.

डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. नंतर मैत्रींच रूपांतर प्रेमात झालं. मात्र, महिला ही विवाहित होती. तिला दोन लहान मुली आहेत. तरी महिलेने कशाचा विचार न करता प्रेमाला महत्व दिलं. तिने प्रियकरासाठी संसार सोडला. नवरा आणि मुलींना सोडून ती प्रियकरासोबत राहू लागली. पण काही दिवसातच दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. अशात महिला वैतागली आणि तिने आरोपी दिनेश तिवारी याची साथ सोडली. तिने आपल्या पतीची माफी मागितली आणि ती पतीसोबत राहू लागली.

प्रेयसीचं हे वागणं न पटल्याने संतापलेला दिनेश तिवारी महिलेच्या घरी आला आणि पुन्हा सोबत चल असा तगादा त्याने तिच्यामागे लावला. मात्र, यावेळी महिलेने सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे दिनेश आणखीन संतापला. त्याने महिलेला त्रास देण्याचं ठरवलं. त्याने तिच्या मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला. मुलगी खेळत असताना त्याने चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सगळीकडे मुलीचा शोध घेतल्यावरही सापडत नसल्याने महिलेने पोलिसात तक्रार दिली.

महिलेने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. यावेळी महिलेने आरोपी दिनेश तिवारी या व्यक्तीशी वाद झाल्याचं सांगितलं. यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. त्यानंतर अवघ्या सहा तासात पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी तीन वर्षाच्या चिमुकलीस तिच्या आईच्या स्वाधीन केलं आहे.

बिहारचा ‘बाहुबली’ नेता, हत्या प्रकरणातील दोषी मोहम्मद शहाबुद्दीन याचा करोनाने मृत्यू

बिहारचा 'बाहुबली' नेता, हत्या प्रकरणातील दोषी मोहम्मद शहाबुद्दीन याचा करोनाने मृत्यू

बिहारचा ‘बाहुबली’ नेता आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेला माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचा शनिवारी करोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शहाबुद्दीन तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी तुरुंगातच तो करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दिल्ली स्थित दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दीन दयाल रुग्णालयात मृत्यू                                                                                            जवळपास दहा दिवसांपूर्वी मोहम्मद शहाबुद्दीन करोना संक्रमित असल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्ली स्थित तिहार तुरुंगातील २ क्रमांकाच्या तुरुंगातील उच्च सुरक्षित सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग परिसरातच शहाबुद्दीनवर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती आणखीनच खालावल्यानंतर त्याला दिल्लीच्या दीन दयाल रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथेच त्याचा शनिवारी मृत्यू झालाय.

कुटुंबीयांचा तुरुंग, रुग्णालय प्रशासनावर आरोप                                                                          शनिवारी पहाटे शहाबुद्दीन याची प्रकृती अधिकच खालावली होती. शहाबुद्दीन याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीपासून तो कोमामध्ये गेला होता.

मोहम्मद शहाबुद्दीन मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबानं तिहार तुरुंग प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. तिहार तुरुंग प्रशासनानं शहाबुद्दीन आणि छोटा राजनच्या कोठडीत एका करोना संक्रमित पाकिस्तानी दहशतवाद्याला हलवलं होतं. त्यामुळेच शहाबुद्दीन आणि छोटा राजन दोघंही करोना संक्रमित झाले. तसंच रुग्णालय प्रशासनानंही शहाबुद्दीनवर उपचाराप्रसंगी बेजबाबदारपणा केला, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय जनता दलाचा माजी नेता शहाबुद्दीन याला २०१८ मध्ये बिहारच्या सीवान तुरुंगातून तिहार तुरुंगात हलवण्यात आलं होतं.

पत्नी पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना पतीने रस्त्यात थांबवले आणि मग…..

पत्नी पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना पतीने रस्त्यात थांबवले आणि मग.....

अमरावती: शहर पोलीस विभागात कार्यरत पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. रस्त्यांवर बघ्याची गर्दी झाली होती. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दीड वर्षांपासून माहेरी राहणाऱ्या एका महिला पोलिसाला तिच्याच पतीने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना शहरातील जोग स्टेडियमसमोरील मार्गावर घडली. पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार बुधवारी (ता. २८) गाडगेनगर पोलिसांत दिली. तक्रारदार महिला पोलिसाच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात पोलिसांनी मारहाण करणे तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पती सातत्याने शारिरीक व मानसिक त्रास देत असल्यामुळे, पत्नी गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत आहे. २६ एप्रिलला तक्रारदार महिला पोलीस ही पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. यावेळी तिला शिविगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच प्रथम फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु हा प्रकार घडला ते ठिकाण गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत दिली आहे.

ऑक्सिजनअभावी बहिणीचा मृत्यू, मात्र या धक्क्यातून सावरत अनेक रुग्णांसाठी ठरत आहे ‘आरोग्यदूत’

ऑक्सिजनअभावी बहिणीचा मृत्यू, मात्र या धक्क्यातून सावरत अनेक रुग्णांसाठी ठरत आहे आरोग्यदूत

नागपूर : करोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याने जगभरात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. रक्ताच्या नात्यातील लोकांनी डोळ्यासमोर जीव सोडताना पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत इतरांच्या कुटुंबातही अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून काहींनी स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिलं. नागपूरमधील बाबा मेंढे हेदेखील अशांपैकीच एक आरोग्यदूत ठरले आहेत.

करोना संक्रमणामुळे ऑक्सिजनअभावी आपल्या बहिणीला वाचवू न शकल्याने बाबा मेंढे यांच्या मनात मोठं शल्य आहे. हे शल्य तर कधीच कमी होणार नाही. मात्र, त्या वेदनेची धार कमी करण्यासाठी मेंढे यांनी गरजूंना स्व:खर्चातून मोफत ऑक्सिजन पुरवण्याचा विडा उचलला आहे.

काही दिवसांपूर्वीच बाबा मेंढे यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. करोना संक्रमणाचे निदान उशिरा झाल्याने आणि ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याच्या नादात त्यांच्या बहिणीचा जीव वाचू शकला नाही. त्यांनी मोठ्या संघर्षानंतर ३० ते ३२ हजार रुपये मूळ किंमत असलेले ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर ७० हजारांना मिळवले. मात्र, एक दिवस उपयोग होऊन दुसऱ्या दिवशी बहिणीला जीव गमवावा लागला.

बहिणीच्या मृत्यूनंतर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही बाबा मेंढे हे खचले नाहीत. आपल्या बहिणीसारखा त्रास दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते पुन्हा उभे राहिले. त्यांनी स्वत:कडील एक ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आणि इतरांकडे उपयोग झाल्यानंतर उरलेले ९ कन्सन्ट्रेटर मिळवून ते ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत मोफत पुरवण्याचे काम सुरू केले. याचा लाभ आज अनेक गरजूंना होत आहे. मात्र, दररोज शेकडो फोन येतात. त्या प्रत्येकापर्यंत ते पोहोचवता येत नसल्याची खंत बाबा मेंढे यांना आहे.

ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर इलेक्ट्रिसिटीद्वारे चार्ज होते. ते सिलिंडरप्रमाणे रिफिल करावे लागत नाही. ९० ते ९३ या मात्रेत ऑक्सिजनची पातळी असणाऱ्यांचे ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यास हे कन्सन्ट्रेटर उपयोगी पडते.

इतर नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन                                                                                  ‘ऑक्सिजन लेव्हल व्यवस्थित ठेवण्यासाठी हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर उपयोगी पडते. शहरात बहुतांश लोकांकडे कोरोना संक्रमणात हे कन्सन्ट्रेटर आहेत. त्यांच्याकडील उपयोग झाल्यावर ते तसेच पडून राहणार आहेत. अशा स्थितीत ते रिकामे पडून राहण्यापेक्षा गरजूंना उपयोगी यावेत, यासाठी त्यांनी ते कन्सन्ट्रेटर द्यावेत, जेणेकरून अनेकांचा जीव वाचवता येईल,’ असं आवाहन बाबा मेंढे यांनी शहरातील नागरिकांना केलं आहे.

तडीपार असताना २४ वर्षांच्या तरुणाने चोरी केल्या १३ दुचाकी गाड्या

तडीपार असताना २४ वर्षांच्या तरुणाने चोरी केल्या १३ दुचाकी गाड्या

अमरावती: शाळा महाविद्यालयात जाऊन भविष्याचे नियोजन करण्याच्या वयात त्याने घफोड्या सुरू केल्या. पोलिसांनी अनेकदा समज दिली. शेवटी पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार घोषित केले. मात्र त्याने तडीपारीचा आदेश धुडकावून जिल्ह्यात दुचाकी चोरीचा सपाटाच लावला. शेख समीर शेख सलीम नामक या २४ वर्षांच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १२ ते १३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

समीर हा परतवाडा मुगलाईपुरा येथील रहिवासी आहे. समीर हा घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी करायचा. त्यामुळे त्याला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. वास्तविकता शेख समीर हा केवळ पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तडीपार होता. कारण त्याने या काळात परतवाडा, ब्राम्हणवाडा थडी तसेच अमरावती शहरातून दुचाकी चोरी केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपाल उपाध्याय व त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २९) सायंकाळी समीर धारणीवरून परतवाडा येत असताना त्याला पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. ही दुचाकीसुद्धा चोरीची असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, समीर शेखला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मागील काही महिन्यात बारा ते तेरा दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले. या सर्व दुचाकी त्याने परतवाडा व परिसरात विक्री केल्या आहेत. तशी कबुली त्याने दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या चोरट्यासह जप्त केलेल्या दुचाकी एलसीबीच्या पथकाने परवताडा पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहेत.

लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं

लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं

देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून त्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आजपासून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात लस वाटप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं असून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे.

पुण्यात गोंधळ कायम
पुणे लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ कायम आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्यात 20 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त 19 केंद्र सुरू असून 2 केंद्र पुणे शहरात आहेत. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण 700 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.

नांदेडमध्ये लसी नसल्याचा रुग्णालयासमोर बोर्ड
नांदेड जिल्ह्यातील जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील व शहरातील काही मोजक्या रुग्णालयामध्ये कोविड लसीकरण अत्यंत सुरळीतपणे सुरू होते. मात्र या रुग्णालयांना आता गेल्या तीन दिवसांपासून लस पुरवठा झालाच नाही. परिणामी 45 वर्षापुढील अनेक नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या मात्रेचा खोळंबा झालाय. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक मोहीम सरकारी तसेच निमसरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविताना विविध शहरातील निवडक सुसज्ज खासगी व शासकीय रुग्णालयावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती सशुल्क असली तरी शहरातील अनेक नागरिकांनी शासकीय लसीकरण केंद्रावर जाण्याऐवजी खाजगी रुग्णालयांना पसंती दर्शवली होती.

गेल्या महिन्यात या रुग्णालयांना गरजेपेक्षा कमी लस पुरवठा झाला.पण गेल्या तीन दिवसांपासून शहरातील व जिल्ह्यातील रुग्णालयांना लस पुरवठा न झाल्यामुळे एक वेळा लसीकरण केलेल्या अनेक जेष्ठ नागरिकांची लस कोंडी झालीय. नांदेड शहरातील श्याम नगर, पौर्णिमानगर, जंगमवाडी सह शहरातील अनेक लसीकरण केंद्र लस अभावी बंद पडल्याचे चित्र आहे. लसीकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यात केवळ शासकीय रुग्णालयात लसीकरणास सुरवात करण्यात आली होती. शहरातील व जिल्ह्यातील हजारों नागरिकांनी या रुग्णालयातून कोवॅक्सिन ची पहिली मात्रा घेतली होती. परंतु आता खासगी व शासकीय आशा दोन्ही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या मात्रेचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न रुग्णांसमोर उभा आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
बुलडाणा जिल्ह्यात आज 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केलीय. मात्र सामान्य रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली. तर याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचं चित्र दिसलं. आजपासून राज्यात व्यापक लसीकरण सुरू झालं आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी 7500 लस उपलब्ध झाली असून जिल्ह्यात 5 ठिकाणी याचे वाटप केलेय. मात्र आज सकाळपासूनच नागरिकांनी केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळालंय. यामध्ये वृद्ध नागरिकसुद्धा आहेत. प्रशासनाने यापूर्वीच नियोजन करणे आवश्यक असताना ृ त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. त्यामुळे रुग्णालय प्रशासन यावर किती संवेदनशील आहे हे दिसतेय.

नाशिकमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्याची घोषणा सरकारने केली. मात्र लसच उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र दिनी या मोहिमेचा फज्जा उडाल्याच बघायला मिळत आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ उडाला असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

नाशिक जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटासाठी केवळ 5 ठिकाणी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात नाशिक शहरात 2,मालेगाव मनपाचे 1 आणि ग्रामीण भागात 2 केंद्र आहे. नाशिक मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णलयात 18 ते 44 वयोगटासाठी लस दिली जाणार आहेत. जिल्ह्यासाठी केवळ दहा हजार लस आल्या आहेत. इंदिरा गांधी रुग्णलयात आज सकाळी दुसरा डोस घेण्यासाठी 45 वयोगटावरील आणि ज्येष्ठ नागरिक दाखल झाले होते. त्याना लस दिली नसल्याने एकच गोंधळ उडाला, नागरिक संतप्त झाले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण पोलीस आणि नागरिकांतच वाद झाला. अखेर समजूत घालून नागरिकांना माघारी पाठविण्यात आले. मात्र पुन्हा कधी लस घेण्यासाठी यावे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळात आणखी भर पडली आहे.

धुळे शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यासाठी 7 हजार लसींचा डोस प्राप्त झाले आहेत. शहरात फक्त एकच ठिकाणी हे लसीकरण सुरू असून याठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा, 50 हजार दंडासह एफ.आय.आर. दाखल

कोविड नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा, 50 हजार दंडसह एफ.आय.आर. दाखल

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने (BMC) संबंधित सभागृहावर 50 हजार दंड आकारलाय. तसेच सभागृह लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर गावदेवी पोलिस ठाण्यात एफ. आय. आर. दाखल केलाय. ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याबाबत ही माहिती दिली

बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या ‘संस्कृती हॉल’मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. याची माहिती महापालिकेच्या विभाग कार्यालयाला प्राप्त झाली. ही माहिती प्राप्त होताच विभाग कार्यालयाच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचं आणि सुमारे 150 व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचं आढळून आलं. या ठिकाणी उपस्थित व्यक्तींमध्ये नियमानुसार आवश्यक असणारे शारीरिक अंतर देखील राखण्यात आले नसल्याचं समोर आलं.

अशाप्रकारचा हा लग्नसोहळा महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन असल्याने या हॉलवर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई केली. या कारवाईमध्ये प्रामुख्याने संबंधित हॉल चालकांवर तात्काळ 50 रुपये हजार दंड ठोठावण्यात आला. तसेच हॉल चालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल केला.

वारंवार लोकांना आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल: जयंत पाटील

वारंवार लोकांना आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल: जयंत पाटील

सांगली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले.

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे म्हटले. कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनापासून बचावासाठी व्यवस्था अधिक उत्तम करण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही आपल्याला तोंड देता आले पाहिजे. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देणे, हेच राज्य सरकारचे धोरण
राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन देणे, हेच सरकारचे धोरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक केंद्रांवर लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. मात्र, एका डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे मानण्यात अर्थ नाही. दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?
देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

Covid-19 test: ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान

Covid-19 test: ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान

नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे वेळेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोनाचे तातडीने निदान होणे आवश्यक आहे. नीरीच्या शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवले आहे. ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान होत आहे. नीरीच्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अशा ५४ हजार टेस्ट केल्या आहेत.

पर्यावरण विषाणूशास्त्र कक्षाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय स्वॅब टेस्टिंगमुळे केवळ वेळ वाचत नाही, तर पैसे व मनुष्यबळाचीही बचत होते. सध्या देशात सर्वत्र आरटीपीसीआर टेस्टिंग सुरू आहे. त्यात कोरोना विषाणूला सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट द्रवाचा उपयोग केला जातो. ड्राय स्वॅब टेस्टिंगमध्ये संबंधित द्रवाची गरज नाही. या पद्धतीत ४ डिग्री तापमानातील रिकामी ट्यूब वापरली जाते. ही ट्यूब सहज हाताळता येते. त्याद्वारे संक्रमण होण्याची शक्यता शून्य टक्के आहे. ही पद्धत केवळ नीरी लॅबमध्ये वापरली जात आहे. ही पद्धत सोपी असून या चाचणीचे ४० प्रयोगशाळांच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतरही ही पद्धत वापरण्यास उदासीनता दाखवली जात आहे. या टेस्टमुळे कोरोना चाचणीचा खर्च अर्ध्यावर आला आहे.

नागपूरमध्ये वापरण्याचा विचार                                                                                                येणाऱ्या काळात ही कोरोना चाचणी पद्धत नागपूरमध्ये वापरण्याचा विचार केला जाईल. ही पद्धत सोयिस्कर असून तिला आयसीएमआरने मान्यता प्रदान केली आहे.

‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा’; कापडाचा मास्क व्हायरसपासून संरक्षण देत नाही!

'आपला मास्क विचारपूर्वक निवडा'; कापडाचा मास्क व्हायरसपासून संरक्षण देत नाही!

कोरोना माहामारीच्या काळात पोलिसांकडून वारंवार नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी प्रशासनानं चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाकाळात संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. आता मास्कच्या वापराबाबत मुंबई महापालिकेकडून लोकांना ‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा.’ असा संदेश देण्यात आला आहे.

तुम्ही कापडाचा मास्क वापरत आहात का? असा प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यानंतर जर तुम्ही कापडाचा मास्क वापरत असाल तर त्याच्या आत सर्जिकल मास्क असायला हवा. तरच व्हायरसपासून संरक्षण मिळू शकेल, असा संदेश देण्यात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी डबल मास्क लावण्यास ते जास्त सुरक्षित राहतील. यासाठीच मुंबईकरांना कॉटन मास्क लावण्याआधी सर्जिकल मास्क लावण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

याशिवाय कोणता मास्क वापरल्यानं कितपत संरक्षण मिळतं हे सुद्धा सांगितले आहे. यानुसार सर्जिकल मास्क आणि एन-९५ मास्क वारल्यानं कोरोना व्हायरसपासून ९५ टक्के संरक्षण मिळतं. तर कापडाचा मास्क वारल्यानं ० टक्के संरक्षण मिळत असल्याचा दावा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

शेतात आढळून आला जुन्या काळातील हातबॉम्ब, युवकाने तो जमीनीवर आपटला आणि..

शेतात आढळून आला जुन्या काळातील हातबॉम्ब, युवकाने तो जमीनीवर आपटला आणि..

अहमदनगर: रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमातील जुन्या हातबॉम्ब चा स्फोट होऊ दोघे किरकोळ जखमी झाले. नगर तालुक्यातील नारायणडोह गावात एका वस्तीवर ही घटना घडली आहे. खोदून आणलेल्या मुरूमासोबत जुना हातबॉम्ब तेथे आला असल्याचा अंदाज आहे. तो फोडत असताना त्याचा स्फोट झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. मात्र, आणखी स्फोटके तेथे आढळून आली नाहीत. नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील हातबॉम्ब आढळून आला. शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बॉम्ब गोळा दिसला. त्यांनी तो जवळच शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला. त्याने तो जमीनीवर आपटला. यावेळी त्याचा मोठा स्फोट झाला. यात अक्षय व मंदाबाई फुंदे दोघेही जखमी झाले. दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. त्यामुळे ग्रामस्थ जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पाहणी केली. या परिसरात आणखी काही स्फोटके आहेत का, याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र काहीही आढळून आले नाही. जेथून मुरूम आणला, तेथेही पाहणी करण्यात आली. जुन्या काळात हा जिवंत बॉम्ब मातीत गाडला गेला असावा. मुरूम खोदताना तो निघून मुरूमासोबत रस्त्यावर टाकण्यात आला आसावा, असा अंदाज आहे. स्फोट फार मोठा झाला नाही आणि त्यामध्ये जास्त धोदादायक रसायने नसल्याने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

“Shooter Dadi” Chandro Tomar dies; She was COVID positive

"Shooter Dadi" Chandro Tomar dies; She was COVID positive

Veteran shooter Chandro Tomar, popularly known as “Shooter Dadi (grandmother)”, has died due COVID-19. She was 89.
Chandro Tomar was admitted to a hospital in Uttar Pradesh’s Meerut earlier this week.

“An epitome of gender equality and champion of women’s rights Smt. Chandro Tomar, known as ‘Shooter Dadi’ by her fans and admirers is no more. The courage with which she challenged patriarchy and took up shooting as a sport will inspire generations to come. Condolences to her family,” Union Minister Hardeep Singh Puri tweeted.

Chandro Tomar, who belonged to UP’s Baghpat, started competitive shooting at the age of 65. She won over 30 national championships and numerous other competitions in her career.

Her sister-in-law Prakashi Tomar is also one of the oldest sharpshooters in the world.

Their lives inspired the 2019 Bollywood film “Saand Ki Aankh” in which Tapsee Pannu and Bhumi Pednekar played the lead roles.

The actors paid tribute to the veteran shooter.
Ms. Tomar was a celebrity on Twitter with thousands of followers.

Several politicians, Bollywood personalities and celebrities had wished her on Twitter when she had announced her illness on the website.

The unfortunate news comes on a day the country lost senior journalist Rohit Sardana and Bihar chief secretary Arun Kumar Singh due to Covid complications.

India on Friday reported highest-ever 3,498 deaths in the last 24 hours amid the more dangerous second wave of coronavirus infections. The country also logged 3,86,442 Covid cases, which is the biggest spike since the start of the pandemic.

India has been recording more than 3 lakh daily coronavirus cases for several days. The massive caseloads across the country have triggered shortages of hospital beds, medicines and life-saving oxygen.

Maharashtra Government to Take Back COVID-19 Vaccines from Private Hospitals

लसीकरण : स्तनदा मातांनी घ्या ‘कोव्हिड-19’ची लस

Mumbai: The Maharashtra government on Friday announced that it would take back COVID-19 vaccines from private hospitals and administer these doses to people through state-run health centres only.
State Health Minister Rajesh Tope said the government has decided to do so it as per the Centre’s orders.

“The Maharashtra government is going to take back the vaccines given to private hospitals for the inoculation drive as per the Centre’s orders. These vaccine doses will then be administered to beneficiaries through state-run hospitals and centres only,” he said.

Talking about the vaccination drive for the 18-44 age group that is supposed to start from May 1 as per the central government’s instructions, Mr. Tope said, “We need to reduce the number of vaccination centres so that it can offer the doses smoothly on daily basis.”

“We have been told by the vaccine makers that up to 18 lakh vials could be supplied to Maharashtra in the month of May. In such situation, the state is planning to set up one centre per district to inoculate people against COVID-19,” he said.

Mr. Tope insisted that people should visit the vaccination centre with prior appointment.

It will avoid crowding and every one will get the dose, he added.

“Unless we get adequate supply of vaccines, we cannot increase the coverage of population. A detailed statement about it will be made by the chief minister,” Mr. Tope said.

Commenting on the vaccine procurement policy, he said, “The Centre is going to buy 50 per cent of the total vials produced by the manufacturers. Now, the crucial question is who should get the vaccines from the remaining 50 per cent quota, which the Centre has allowed to be sold directly to the state governments and hospitals. I think the central government will have to intervene here as well.”

Every state is reporting a surge in COVID-19 cases, which means more demand for vaccines, he said, adding that the central government needs to come up with some policy so that every state gets an equal share of doses.

Uber announces cash incentives for vaccinating first batch of 150,000 drivers

Uber

April 30, 2021: Uber today unveiled an INR 18.5 crore (USD 2.5 million) initiative to get 150,000 drivers on its platform vaccinated over the next six months, stepping up its efforts to help India fight against the second wave of COVID-19 infections.

The company will compensate Car, Auto, and Moto drivers on its platform for time spent
getting their shots. Drivers showing valid digital vaccination certificates will be eligible for
INR 400 for each of their two shots. All drivers able to show they’ve been vaccinated before
April 30 will also be able to claim the funds.

Speaking about the initiative, Pavan Vaish, Head of Supply & Driver Operations, Uber
India South Asia, said, “Mass vaccination is key to tackling India’s COVID crisis, and this is
the best way to ensure that drivers, riders, and the broader community can get protected as soon as possible. Over the last year, Uber drivers have shown time and time again they are essential in keeping India moving and connected, so we want to support them in getting the best possible access to the vaccination program. We will soon begin communicating this initiative to drivers across all our product lines, and encourage them to take up the offer.”

The vaccination drive is the latest addition to Uber’s COVID-19 response in India.

In March this year, Uber pledged INR 10 Crores worth of free rides to help people get to and from the nearest vaccine center.

This year alone, Uber has facilitated 9,000 free online
medical consultations for drivers and their families through DocsApp.

Since the early days of the pandemic, Uber has been providing financial assistance for up to 14 days to drivers who are diagnosed with COVID-19 or have been asked to self-isolate by a public health authority.

From April to June 2020, the Uber Care Driver Fund disbursed grants to approximately
100,000 drivers.

Nelson Hospital to Start Covid Care Centre at the Hotel Pride Nagpur

Nelson Hospital to Start Covid Care Centre at the Hotel Pride Nagpur

Nagpur: Today when entire country is battling the deadly second wave of Corona Virus with lakhs of positive patients being reported daily & thousands of people losing their lives, our own city is amongst the worst hit cities in the country. The situation has put medical facilities under deep stress, with respect to availability of hospital beds, Oxygen supply or medicines.

Amidst all this chaos, Nelson Hospital has decided to start a Covid Care Centre from 1st of May, at Hotel Pride, Wardha Road, to address the shortage of beds in our city & treat patients with mild & moderate symptoms.

The approval for the Covid Care Centre has come under the noble initiative of Nagpur Municipal Corporation & District Collector’s Office. This Centre will provide 97 rooms with total 127 beds.

As per the Doctors, the severity or mortality rate can be controlled if the disease is diagnosed & treated in the early stages. This Centre will serve patients with mild & moderate symptoms having HRCT score less than 10 & SPO2 (Oxygen Saturation) more than 90.

The other facilities at this Centre will be:

  • Availability of Doctors Round the clock
  • Dedicated Cardiac Ambulance
  • Oxygen Concentrators
  • Essential Medicines
  • Planned diet by Nutritionist
  • Physiotherapy & patient counselling

This Centre will be inaugurated on 1st of May, at 12:00 noon through a virtual ceremony at the hands of Shri Nitinji Gadkari – Hon’ble Cabinet Minister, Road Transport & Highways, Micro, Small & Medium Enterprises, Government of India as Chief Guest and Shri Devendraji Fadnavis – Hon’ble Leader of Opposition, Maharashtra State as Guest of Honour.

The Inauguration will be followed by expert talk from Team Luke Coutinho (Celebrity Health Guru in India) on the topic “Health & Wellness during Covid Times”. The Inauguration will be broadcast live on the Facebook page of Nelson Mother & Child Care Hospital.

Enquiries for the Covid Care Centre can be made at 8766822317/ 8208518265/ 8208507048. People can also send their enquiry by filling form at www.nelsonhospitals.com/covidcc

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधतील. कालच लॉकडाउन वाढण्याची घोषणा करण्याता आली आहे. त्यामुळे भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?, लसीकरण आणि अर्थव्यवस्थेला चालना कशी देणार? त्या दृष्टीने मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा आहे.

कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे राज्यात सध्या लॉकडाउन सुरु आहे. आज लॉकडाउनचा पहिला टप्पा संपत असताना आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या कमी झालेली नसली, तरी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसते. त्यामुळे लॉकडाउनचे परिणाम आणखी दोन आठवड्यात दिसू शकतात.

या काळात उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होतेय. राज्य सरकारने काही घटकांसाठी मदत जाहीर केली आहे. पण ती अत्यल्प आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कोरोनाचा फैलाव रोखताना अर्थव्यवस्थेचं चाक सुद्धा रुतणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

मुख्यमंत्री उद्धव जनतेशी पुन्हा संवाद साधणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 एप्रिल) संध्याकाळी महाराष्ट्राच्या जनतेला सोशल मीडियाद्वारे संबोधित करणार आहेत. १ मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री करणार राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील लॉकडाऊन 15 वाढविण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत नेमकं काय-काय बोलणार याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊन 15 वाढविण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत नेमकं काय-काय बोलणार याकडेच आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : Coronavirus Nagpur updates: नागपुरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

राज्यात लॉकडाऊन लागू करुन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात दररोज ६५ हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशावेळी आता उद्धव ठाकरे संबोधनातून राज्यातील जनतेला नेमकं काय सांगणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सचिन आला मदतीला धावून, ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दान

सचिन तेंडुलकर

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आता भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मदतीला धावून आला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी आता तब्बल एक कोटी रुपये दान केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करण्यासाठी आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवण्यात यावेत यासाठी सचिनने हे दान दिले आहे. त्याने आपल्या योगदानाबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे. आताच्या परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होणे गरजेचे आहे. ही समस्या लक्षात घेऊन लोक पुढे सरसावत असल्याचे पाहून समाधान वाटते. २५० हून अधिक युवकांनी मिळून मिशन ऑक्सिजनची सुरुवात केली आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करणे आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवणे हा मिशन ऑक्सिजनचा हेतू आहे. मीसुद्धा माझ्या वतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

हेही वाचा : नागपूर; सोनू सूदची दरियादिली, नागपुरातील कोरोनाग्रस्त मुलगी हैदराबादला एअरलिफ्ट

सचिन तेंडुलकर प्रमाणेच अन्य क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले होते. तसेच ब्रेट लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भारतभरात थैमान घातलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या लाटेत अनपेक्षितपणे जास्तीत जास्त तरूणांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. अशातच एक दुर्वैवी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे निधन झालं. जगदीश हे केवळ ३४ वर्षांचे असताना कोरोनानं त्यांचा बळी घेतला असून बडोद्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जगदीश यांच्या निधनाने त्यांचे नातेवाईक आणि बॉडीबिल्डिंग विश्वातील सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जगदीश हे नवी मुंबईत वास्तव्यात होते. गेल्यावर्षीच त्यांनी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असतानाच शारीरिक स्थिती गंभीर झाल्याचं त्यांचा मृत्यू झाला.

कमी वयात बॉडी बिल्डींगला केली होती सुरूवात                                                                            जगदीश लाड यांनी फार कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवत या क्षेत्रात आपले वेगळे स्थान प्राप्त केले. अनेक तरूणांसाठी जगदीश हे प्रेरणास्थान होते. त्यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकं मिळवली होती. इतकंच नाही तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवलं होतं.

जगदीश यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केलं आहे. एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. जाता जाता आपण फिट आहोत, आपल्याला काहीही होणार नाही असं समजत असलेल्या लोकांनाही धोक्याची सुचना देऊन गेले आहेत.

धक्कादायक! आजतक चे लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचं निधन

धक्कादायक! आजतक चे लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचं निधन

आजतक चे अँकर रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर दिल्लीत करोनावर उपचार सुरू होते. पण याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. टीव्ही जगतात रोहित सरदाना हे एक मोठं नाव होतं. त्यांनी आज तकसोबतच या अगोदर झी न्यूजसोबत प्राईम टाईम अँकर म्हणून काम केलं आहे. आज तकवर त्यांचा दंगल हा कार्यक्रम लोकप्रिय होता.

वार्तांकन करत असताना आतापर्यंत अनेक पत्रकारांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या एक वर्षात रोहित सरदाना यांच्यासह एकूण ६५ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यातील ३२ पत्रकार फक्त २०२१ मधील चार महिन्यातच देशाने गमावले आहेत. उत्तर प्रदेश आणि तेलंगणातील सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही गेल्या वर्षी पुण्यात मृत्यू झाला होता.

याशिवाय महाराष्ट्रातही पत्रकारांचा करोनाने मृत्यू होत आहे. उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बेदमुथा ( वय ६७ ) यांचे हैद्राबाद येथे कोरोनाने काल निधन झाले. आठच दिवसापूर्वी त्यांचे मोठे बंधू पत्रकार मोतीचंद बेदमुथा ( वय ६९ ) यांचे कोरोनाने निधन झाले होते.

Coronavirus Nagpur updates: नागपुरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Nagpur reports Very Good Recovery Rate, 4,306 fresh cases, 79 deaths

नागपूर: जिल्ह्यात दररोज सात ते साडेसात हजार नव्या करोनाबाधितांची नोंद होत असली तरी गेल्या काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी दिवसभरात ६ हजार ९८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे या आजारातून मुक्त होण्याचे प्रमाण ७९.१० टक्क्यांपर्यंत गेले आहे. दुसरीकडे दिवसभरात जिल्ह्यात ७ हजार ४९६ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. तर ८९ मृत्यू नोंदवण्यात आले.

आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या ‘रिकव्हरी रेट’ वाढला असल्याचे दिसते. गुरुवारी दिवसभरात शहरात ४ हजार ४२२, तर ग्रामीणमध्ये ३ हजार ६७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ६२७पर्यंत गेली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक ठरत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकूण ७ हजार ३०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गुरुवारी ८९ मृत्यू नोंदवण्यात आले. यात शहरात ४९, तर ग्रामीणमधील ३३ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश होता. जिल्ह्याबाहेरील सात रुग्णांच्या मृत्यूचाही यात समावेश आहे. वर्षभरात शहरात करोनाबाधितांच्या ४ हजार ४४१, तर ग्रामीणमध्ये १ हजार ८१४ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरीर १ हजार ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

नागपूरची स्थिती

बाधित : ७,४९६

मृत्यू : ८९

बरे होऊन परतलेले : ६,९८४

अॅक्टिव्ह रुग्ण : ७७ हजार ६२७

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कंपन्यांना फायदा, वर्षभरात वाचवले ७४०० कोटी रुपये

'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांना फायदा, वर्षभरात वाचवले ७४०० कोटी रुपये

गेल्या वर्षी जगभरात करोना व्हायरस आल्याने अनेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. वर्ष लोटले असले तरी अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत असला तरी कंपन्यांना मात्र फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. गुगलने वर्क फ्रॉम होममुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले आहेत.

यातून वाचले कंपनीचे पैसे
महामारी मुळे गुगलचे कर्मचारी वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला २६८ मिलियन डॉलर म्हणजेच १९८० कोटी रुपये वाचवता आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोविड १९ मुळे हे शक्य झाले आहे. दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर १ बिलियन डॉलर म्हणजेच ७ हजार ४०० कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण पैसा कंपनीचा वाचला आहे.

करोनामुळे गुगलचा बिझनेस वाढला
महामारीमुळे अनेक सेक्टरला फटका बसला आहे, हे आपण अनेकदा वाचले, ऐकले आहे. परंतु, या दरम्यान इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे गुगलला अच्छे दिन पाहायला मिळाले. गुगलचा रेवेन्यू जवळपास ३४ टक्के वाचला आहे.

या ऑफिसला उघडण्याची प्लानिंग गुगल करीत आहे
कंपनी या वर्षीच्या अखेरला ऑफिसमध्ये काम सुरू करण्याची प्लानिंग करीत आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर रुथ पोराटने गुंतवणूकदारांना सांगितले की, कंपनी हायब्रिड मॉडलवर लोकांना ऑफिसला बोलावण्याची योजना बनवीत आहे. ज्यात ऑफिस येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी असणार आहे.

कार्तिक ‘दोस्ताना २’ नंतर आणखी एका चित्रपटातून बाहेर.

कार्तिक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन चाहत्यांचा लाडका आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. परंतु, करण जोहर आणि कार्तिक यांच्यामधील वादामुळे ‘दोस्ताना २’ मधून कार्तिकला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला. ‘दोस्ताना २’ नंतर आणखी एक चित्रपट कार्तिकच्या हातून निसटला आहे. काही काळापूर्वी कार्तिकने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाची तयारी देखील सुरू केली होती. परंतु, आता कार्तिकने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक वसन बाला या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट एका कॉमिकच्या सुपरहिरोवर आधारित आहे. चित्रपटाचं नाव ‘फँटम’ असून हा एक सायन्स फिक्शन असलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी कार्तिकची निवड करण्यात आली होती. परंतु, आता मात्र कार्तिकने चित्रपटातून माघार घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या प्रकारचा चित्रपट बाला यांना बनवायचा होता ती पद्धत कार्तिकला पटत नव्हती. चित्रपटाबद्दल कार्तिकची मतं काही निराळी होती. हा कार्तिकचा पहिला सुपरहिरो असलेला चित्रपट असणार होता त्यामुळे कार्तिकच्या नुसार हा चित्रपट बिग बजेट असायला हवा होता. परंतु, बाला यांचं म्हणणं वेगळं होतं.

क्रिएटिव्ह इशुमुळे कार्तिकने या चित्रपटाला नकार दिला आहे. आता तो या प्रोडक्शनसोबत दुसरा चित्रपट साइन करणार आहे. कार्तिकने या चित्रपटाबद्दलची घोषणा केल्यावर त्याचे चाहते प्रचंड आनंदित झाले होते. परंतु, याबातमीसोबतच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कार्तिक लवकरच त्याच्या ‘धमाका’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. कार्तिकच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता आहे.

धक्कादायक! रायगडमध्ये 90 रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनमुळे दुष्परिणाम; तात्काळ इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

Police arrests First-year Psychology Student in Remdesivir scam

रायगड: गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत (Remdesivir injection )एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साधारण 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आले होते. यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आले होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे आता रेमडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनमुळे कोरोनाच्या रुग्णांना खात्रीशीररित्या फायदा होईलच असे नाही, हे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगूनही अनेकजण रेमडेसिविरच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी अचानक वाढली आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
34 ° C
34 °
34 °
18 %
1.5kmh
20 %
Mon
36 °
Tue
36 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
38 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...