नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी आहे. नागपुरात सध्या खासगी रुग्णालयात १३७७ बेडस आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस उपलब्ध आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे तर शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.
नागपुरात सध्या ३ शासकीय, २ धर्मादाय आणि ३३ खासगी रुग्णालय कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. यात लवकरच नवीन कोविड रुग्णालयांची भर पडणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपुरात कोविड टेस्टिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० टेस्टिंग होत होती. आता मनपा व खासगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६ हजार लोकांची टेस्टिंग होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
अंतिम टप्प्यातील उपचारामुळे मृत्यू
आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची टीम डेथ अनॅलिसिस करीत आहे. तीन ते चार तास होणाऱ्या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वेळीच चाचणी करा
कोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा कोविड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मनपाच्या नजीकच्या केंद्रात चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले.
नागपूर : एरवी कोरोनाबाधितांचा आकडा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा मोठा असताना शुक्रवारी रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती. २६५९ रुग्ण बरे झाले तर २०६० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४८,५५० झाली आहे. आज ५३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मृतांची संख्या १५६९ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १६०९, ग्रामीणमधील ४४७ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यासोबतच आता सप्टेंबर महिन्यातही रुग्ण व मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. परंतु समाधानकारक बाब म्हणजे, बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ३१ ऑगस्ट रोजी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५.११ टक्क्यांवर होते, आता ते ७३.६१ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत ३५,७३८ रुग्ण बरे झाले आहेत. यात होम आयसोलेशनमधील १९७२४ रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८,८८८ तर ग्रामीणमधील ६८५० रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत शासकीयसह, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये ११२४३ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये ५८६९ रुग्ण आहेत. ९०५८ चाचण्यांमधून
६९९८ रुग्ण निगेटिव्ह
आज अॅन्टिजन व आरटीपीसीआर असे एकूण ९०५८ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६९९८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, ५१३१ रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ४३७० रुग्ण निगेटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये १७७१ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ७४५ रुग्ण पॉझिटिव्ह तर १०२६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १८२, मेयोमधून १९८, माफसूमधून १२०, नीरीमधून ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोविडने घेतला डॉ. संजय पुरी यांचा जीव
रामनगर येथील रहिवासी, वरिष्ठ कन्सल्टंट फिजिशियन डॉ. संजय पुरी (६६) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सात महिन्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित डॉक्टरचा हा पहिलाच मृत्यू आहे. डॉ. पुरी यांची उत्कृष्ट शिक्षक व फिजिशियन म्हणून ओळख होती. गेल्या २५वर्षांपासून रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा देत होते. डॉ. पुरी यांनी एमबीबीएस व एमडीचे शिक्षण मेडिकलमधून पूर्ण के ले होते. काही वर्षे त्यांनी मेडिकलमध्ये लेक्चरर्स म्हणून विद्यार्थ्यांना शिकविले. त्यानंतर कामगार विमा रुग्णालयात त्यांनी सेवा दिली. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. २२ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली २३ ऑगस्टपासून त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. पुरी हे गेल्या ३५ वर्र्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत होते.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ८८७४
बाधित रुग्ण : ४८,५५०
बरे झालेले : ३५,७३८
उपचार घेत असलेले रुग्ण : ११२४३
मृत्यू :१५६९
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला. यात १२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तींना ही लस देण्यात आली. यात १२ ते १८ वयोगटातील ८ मुले असून ६० ते ६५ वयोगटातील ५ ज्येष्ठ , शिवाय २२ महिलांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ५५ व्यक्तींना लस देण्यात आली होती. कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. २८ ते ३१ जुलै या कालावधीत पहिला डोस देण्यात आला. ११ ते १४ आॅगस्ट दरम्यान दुसरा डोस देण्यात आला. लसीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी १४, २८ व ४२ दिवसानंतर संबंधित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.
कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशातील के वळ ८ केंद्रांची निवड करण्यात आली. यात पुन्हा गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिल्लूरकर म्हणाले, पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशातून ७५० व्यक्तींना लस देण्यात आली होती. परंतु वाढता प्रादुर्भाव पाहता दुसºया टप्प्यात ही संख्या कमी करून ३८० वर आणण्यात आली. त्यानुसार गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये ७५ व्यक्तींची तपासणी केली. यात १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तर ८ व्यक्तींना कोरोना होऊन गेल्याचे दिसून आले. उर्वरित ५० व्यक्तींची मानवी चाचणीसाठी निवड करण्यात आली. मागील तीन दिवसांत त्यांना कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली.
नागपूर : प्रवाशांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने गांधीधाम-खुर्दा रोड-गांधीधाम दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२९७३ गांधीधाम-खुर्दा रोड ही गाडी गांधीधाम येथून १६ सप्टेबरला बुधवारी रात्री ११ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी गुरुवारी वीरमगम येथे २.३४ वाजता, अहमदाबादला पहाटे ४ वाजता, आनंद येथे ५.३४ वाजता, वडोदराला ६.१७ वाजता. जळगावला दुपारी २.०५ वाजता, भुसावळ २.४० वाजता, वर्धा ८.०४ वाजता, नागपूरला रात्री ९.५० वाजता आणि खुर्दा रोडला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२९७४ खुर्दा रोड-गांधीधाम ही विशेष रेल्वेगाडी खुर्दा रोडवरून १९ सप्टेबरला शनिवारी सकाळी ११.४० वाजता सुटेल.
ही गाडी दुर्गला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता, गोंदियाला सकाळी ६ वाजता, नागपूरला रविवारी सकाळी ८.२० वाजता, वर्धा ९.३० वाजता, भुसावळला दुपारी २.२० वाजता, बडोदराला रात्री ११.२० वाजता आणि तिसऱ्या दिवशी गांधीधामला सकाळी ६.४० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण २३ कोच असून त्यात १० स्लिपर क्लास, १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ६ साधारण आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा आलेख उंचावत चालला आहे. मागील २४ तासांत १,९३४ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ४६,४९० झाली असून मृतांची संख्या १,५१६ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,४५०, ग्रामीणमधील ४७८ तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्ण आहेत. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर ७१ टक्क्यांवर गेल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. नागपूर जिल्हात मागील काही दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या १७०० ते २००० च्या घरात जात आहे. यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण रुग्णसंख्या एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, रोज ४० ते ५० मृत्यूची नोंद होत असल्याने एकूण मृत्यूची संख्या तीन हजारावर जाण्याचीही शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत शासकीय व खासगी रुग्णालयांची व्यवस्था तोकडी पडत आहे. रात्री ७ नंतर खासगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
खासगी लॅबवर वचक कुणाचा?
गुरुवारी खासगी लॅबमधून ६९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सूत्रानुसार, काही लॅब क्षमतेपेक्षा जास्त नमुने गोळा करीत असल्याने व अहवाल देण्यास २४ तासांपेक्षा जास्त वेळ लावत आहेत. उशिरा अहवालामुळे रुग्णांची जोखीम वाढत आहे. या लॅबवर वचक कुणाचा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
३,०३३ अॅन्टिजन चाचणीतून ६७० पॉझिटिव्ह
शहर आणि ग्रामीण मिळून ३,०३३ रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय, ३,६७८ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात एम्स प्रयोगशाळेमधून १७, मेडिकलमधून १९७, मेयोमधून २०१, माफसूमधून ५७, नीरीमधून ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल, कोविड के अर सेंटरमध्ये ५,१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह अलगीकरण कक्षात ६,७२८ रुग्ण आहेत.
१५१३ रुग्ण झाले बरे
आज विविध रुग्णालयांतून १,५१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील १,३४२ तर ग्रामीणमधील १७१ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ३३,०७९ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील २६,६४९ तर ग्रामीणमधील ६,४३० रुग्ण आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७१.१५ टक्क्यांवर पोहचले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,२७१
बाधित रुग्ण : ४६,४९०
बरे झालेले : ३३,०७९
उपचार घेत असलेले रुग्ण : ११,८९५
मृत्यू : १,५१६
नागपूर : महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरकरांनी गर्दी करणे सुरू केले होते. सकाळी ९ वाजता मुंढे हे मुंबईकडे प्रयाण करणार असल्याने आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी त्यांचे समर्थक एकवटले आहेत.
तुकाराम मुंढे यांची नागपुरातील कारकीर्द आरंभापासूनच वादग्रस्त राहिली. लोकप्रतिनिधी व प्रशासन असा हा लढा अखेरीस मुंढे यांच्या बदलीनंतरच थांबला.
कोरोनाच्या काळात मुंढे यांनी नागपुरात अतिशय कडक असे धोरण राबवून कोरोनाचा प्रकोप रोखण्यात यश मिळविले होते. मात्र व्यापारी वर्गाचा दबाव आणि स्थानिक राजकारण याची परिणती त्यांच्या बदलीत झाली होती.
मुंढे यांनी गुरुवारी आपण नागपूरचा निरोप घेत असल्याचे सोशल मिडियावर सांगून, सगळ््यांचे आभार व्यक्त केले होते.
नागपूर : एमएचटी-सीईटीच्या तारखा घोषित होताच विद्यार्थ्यांची चिंता कमी होण्याऐवजी अधिकच वाढली आहे. ही चिंता परीक्षेची नाही तर परीक्षा नियोजनाची आहे. ही
सीईटी सेलने एमएचटी-सीईटीचे आयोजन दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व बॉयोलॉजी (पीसीबी) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन होईल. दुसऱ्या टप्प्यात १२ ते २० ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स (पीसीएम) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन केले जाणार आहे. विदर्भातील बहुतेक विद्यार्थी दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देतात. पूर्वी पीसीबी व पीसीएमची परीक्षा एकाच दिवशी होत होती आणि केवळ अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी फिजिक्स व केमिस्ट्रीचा पेपर देत होते. दुसऱ्या सत्रात गणिताचा पेपर होत होता. फार्मसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पीसीबीचा पेपर देत होते. त्यांना गणिताचा पेपर देण्याची गरज नव्हती. दोन्ही अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणिताचा पेपर द्यावा लागत होता.
गुरुवारी घोषित परिपत्रकानुसार, सीईटी सेलने पीसीबी व पीसीएमचा पेपर वेगवेगळ्या चरणात घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे पीसीबीनंतर दुसऱ्यांदा पीसीएमचा पेपर द्यावा लागणार का, असा पश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. मात्र सीईटी सेलकडून याबाबत सध्यातरी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. याबाबत तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपली भूमिका परीक्षेत सहकार्य करण्याची असून बाकी कार्य सीईटी सेलचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सीईटी सेलकडून सविस्तर दिशानिर्देश जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी सेलच्या वेबसाईटवर चौकशी करीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी महापालिकेने ६५ रुग्णवाहिकांचा ताफा उभा केला. प्रत्येक झोनमध्ये चार रुग्णवाहिका दिल्या. परंतु जेव्हा रुग्णवाहिकेसाठी संबंधित झोनला फोन केला तेव्हा अनेकांनी थेट रुग्णवाहिका चालकांचे मोबाईल नंबर दिले. यातील काहींचे नंबर मुके होते, ज्यांचे सुरू होते त्यांनी डॉक्टरांच्या पत्राशिवाय रुग्णवाहिका येणार नाही, असे म्हणून हात वर केले, काहींनी डिझेल नसल्याचे, काहींनी सॅनिटायझर नसल्याचे तर काहींनी डॉक्टरांचा फोन आल्यावरच येणार असे सांगितले. एकाने चक्क ऑटोने घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. यावरून महापालिके चा रुग्णवाहिकेचा बोजवारा उडाला असून, रुग्णवाहिके चा फायदा कुणाला, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना रुग्णवाहिकांची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू के ल्या. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या. मागील आठवड्यात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिकांची भर पडली. आता मनपाकडे एकूण ६५ रुग्णवाहिका आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिकेचा शुभारंभ के ला. परंतु उद्घाटनानंतर गुरुवारी सायंकाळी दहाही झोनला ‘लोकमत’ प्रतिनिधीने फोन लावल्यावर मंगळवारी झोन वगळता प्रत्येकाने टाळण्याचाच प्रयत्न केल्याचे वास्तव समोर आले.
-लक्ष्मीनगर झोनचा नंबर व्यस्त, धरमपेठ झोनने सांगितला एक तासाचा वेळ
लक्ष्मीनगर झोनचा ०७१२-२२४५०५३ हा फोन नंबर अनेक तासांपासून व्यस्त असल्याचे आढळून आले. धरमपेठ झोनच्या ०७१२-२५६७०५६ या क्रमांकावर फोन के ल्यावर तेथील कर्मचाऱ्याने थेट रुग्णवाहिकेचा मोबाईल नंबर दिला. रुग्णवाहिका चालकाला फोन केल्यावर आता ड्रायव्हर नाही, एका तासाने येईल, त्या पेक्षा ऑटोरिक्षाने घेऊन जाण्याचा सल्ला देऊन फोन कापला.
-हनुमाननगर व धंतोली झोनच्या चालकाने घेतले आढेवेढे
हनुमाननगर झोनच्या ०७१२-२७५५५८९ या क्रमांकावर फोन के ल्यावर नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून घेण्यास वेळ लावला. त्यानंतर एका रुग्णवाहिकेचा नंबर दिला. त्या नंबरवर रिंग जात नव्हती. धंतोली झोनच्या ०७१२-२४६५५९९ वर फोन केल्यावर त्यांनीही माहिती लिहून घेत रुग्णवाहिकेचा नंबर दिला. रुग्णवाहिका चालकाला फोन के ल्यावर कुठे यायचे असे न विचारता कुठे जायचे, तिथे खाट आहे का, रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आहे का, रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर व डॉक्टर नसल्याचे सांगत आढेवेढे घेत फोन कापला.
-नेहरूनगर झोन म्हणते, हा कंट्रोल रूमचा नंबर
नेहरूनगर झोनच्या ०७१२-२७०२१२६ या क्रमांकावर फोन के ल्यावर हा कंट्रोल रूमचा नंबर आहे, असे सांगून फोन कापला. पुन्हा फोन के ल्यावर येथे रुग्णवाहिका नाही, असेही उत्तर मिळाले.
-गांधीबाग झोनला हवे डॉक्टरांचे पत्र
गांधीबाग झोनच्या ०७१२-२७३९८३२ क्रमांकावर फोन केल्यावर त्यांनी थेट तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिकांचे मोबाईल नंबर देऊन हात वर के ले. यातील दोघांचे फोन लागले नाहीत, एकाचा फोन लागल्यावर त्याने डॉक्टरांचे पत्र मिळाल्यावरच रुग्णवाहिका येईल, असे सांगून फोन बंद केला.
-लकडगंज झोनच्या रुग्णवाहिकेत डिझेलच नाही
लकडगंज झोनच्या ०७१२-२७३७५९९ या क्रमांकावर फोन के ल्यावर संबंधितांनी रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून मनपाच्या कंट्रोल रूमला फोन करण्यास सांगितले. सतरंजीपुरा झोनला फोन के ल्यावर तेथील कर्मचाऱ्याने एका अधिकाऱ्याचा नंबर दिला. त्यांना फोन के ल्यावर अधिकाऱ्याने झोनमध्ये येऊन रुग्णवाहिका घेऊन जाण्याचा सल्ला दिला. थोड्या वेळाने त्याच अधिकाऱ्याने रुग्णवाहिका चालकाचा फोन आला होता का, अशी विचारणाही के ली.
-आसीनगर झोनच्या रुग्णवाहिका चालकाला हवे सॅनिटायझर
आसीनगर झोनच्या ०७१२-२६५५६०५ या कमांकावर फोन केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने रुग्णावाहिका चालकाचा नंबर दिला, तो पत्त्यावर येतोही म्हणाला, पण माझ्याकडे सॅनिटायझर नाही, पीपीई किटही नसल्याचे सांगत आपली कैफियत मांडली.
-मंगळवारी झोनने दिला मदतीचा हात!
मंगळवारी झोनच्या ०७१२-२५९९९०५ या क्रमांकावर फोन केल्यावर दोन रुग्णवाहिकांचे मोबाईल नंबर दिले. एक लागला नाही, मात्र नीलेश मंडपे रुग्णवाहिका चालकाचा फोन लागला. त्याने आढेवेढे न घेता थेट पत्ता विचारत १० मिनिटात पोहचतो म्हणून सांगितले. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका मिळाली का, याचीही विचारपूस झोनमधून झाली.
नागपूर : महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु मागील आठ महिन्यापासून यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या खांबावर अद्याप एलईडी दिवे बसविण्यात आलेले नाही. यामुळे रात्रीच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे.
पथदिवे बसविण्यासाठी १२ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही वित्त विभागाने निधी उपलब्ध न केल्याने पथदिवे बसविण्याचे काम रखडले आहे.
तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी पथदिव्याच्या फाईलला मंजुरी दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी सहमती दर्शविल्याने ही फाईल मंजूर करून स्थायी समितीने वित्त विभागाकडे पाठविली होती. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता विकास कामांना ब्रेक लावले होते. यात पथदिव्यांची फाईल मागील काही महिन्यापासून वित्त विभागाकडे प्रलंबित होती. महापौरांनी सभागृहात प्रलंबित विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही.
अधिकाऱ्यांना नोटीस बजावली पण प्रश्न कायम
महापालिका कलम ७२ (सी) अंतर्गत निर्धारित कालावधीत फाईलवर निर्णय न घेतल्या प्रकरणी स्थायी समितीने वित्त अधिकारी मोना ठाकूर यांना नोटीस बजावून या संदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिले होते. परंतु त्यानंतरही फाईल मार्गी लागली नाही.
प्रशासन गंभीर नाही
मागील आठ महिन्यापासून पथदिव्यांची फाईल प्रलंबित आहे. खांब उभे आहेत परंतु त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात विद्युत विभाग व वित्त विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप प्रदीप पोहाणे यांनी केला आहे.
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात नव्याने विकसित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीमुळे भविष्यात उत्पादकता आणि कुशलता वाढणार आहे. या कार्यपद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून याकरिता नवीन नियम आणि कायदे तयार करावेत, अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या कार्यपद्धतीत भविष्यात कर्मचारी आणि मालकांमध्ये वाद वाढणार आहेत. त्यात निवाडा आणि प्रणाली सक्षम बनविण्यासाठी मजबूत नियम व कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. लोकमतशी चर्चेदरम्यान ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारत आणि जगात एका नवीन कार्यप्रणालीला जन्म दिला आहे. वेळ आणि परिस्थिती पाहून स्वत:च अस्तित्वात आली असून विपत्रीत परिस्थितीत काम करण्यासाठी एक यशस्वी मॉडेल ठरले आहे. कॉर्पोरेट, उद्योग आणि छोट्या व्यवसायाशी जुळलेल्या क्षेत्रानेही या प्रणालीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून अवलंब केला आहे. यामध्ये अनेक लाभांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक कमी करण्याची क्षमता आहे. कोरोनानंतरही हे मॉडेल सुरूच राहणार असून पुढे गतिशील बनणार आहे. नव्यानेच जन्म झालेल्या या प्रणालीसाठी नियम वा कायदे नाहीत. पंतप्रधानांनी सर्व पैलूंचा विचार करून वर्क फ्रॉम होम वर्किंग मॉडेलकरिता एक विस्तृत व व्यापक नियम आणि कायदे तयार करावेत.
भरतीया म्हणाले, कोणत्याही कंपनीचा १७ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर होतो. वर्क फ्रॉम होम संकल्पनेत कंपन्यांच्या या खर्चात १२ टक्के बचत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कमी होऊन रस्त्यावरील भार कमी होण्यासह प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतरही वर्क फ्रॉम होम मॉडेल राज्य व केंद्र शासन, बँकिंग क्षेत्र, व्यापार, उद्योग, आरोग्य सेवा, शैक्षणिक क्षेत्र, मीडिया, मनोरंजन, विमा, वित्तीय सेवा आणि विभिन्न अन्य क्षेत्रात यशस्वीरित्या सुरू राहणार आहे. याशिवाय वैयक्तिक चर्चा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलन, संस्थांचे एजीएम, राजकीय रॅली आदींसह अन्य कार्यक्रमही व्हर्च्युअल सुरू आहेत. हे मॉडेलचा अवलंब वेगाने होत असून यशस्वी प्रयोग असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर : शहर पोलिसमधील एका हवालदाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोराडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मृत ५२ वर्षीय विजय श्रीवास्तव आहेत. श्रीवास्तव पोलीस मुख्यालयात ग्रील इन्स्ट्रक्टर होते. ते बºयाच दिवसांपासून गॅँगरीनने त्रस्त होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबीयानी बुधवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात आणले. त्यांना भरती करावे, अशी विनंती नातेवाईकांनी केली. परंतु डॉक्टरांनी त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना आपात्कालीन कक्षातच ठेवले. श्रीवास्तव यांची पूर्वीही दोन ते तीन वेळा प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांची अवस्था लक्षात घेता, सहकाऱ्यांनी पोलीस रुग्णालयाचे डॉक्टर व वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली.
नातेवाईकांचे म्हणणे आहे की पोलीस रुग्णालयातील डॉक्टर खानापूर्ती करण्यासाठी खासगी रुग्णालयात आले. श्रीवास्तव यांची माहिती घेऊन ते परतले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे, हवालदार प्रमोद दिघोरे रुग्णालयात पोहचले. सायंकाळी ५.३० वाजता श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोना रुग्णासाठी आरक्षित सर्व बेडवर रुग्ण असल्यामुळे श्रीवास्तव यांना बेड उपलब्ध करणे शक्य नव्हते. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत शहरातील ९ व ग्रामीण पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नागपूर : माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी नोंदवले.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीचे टेंडर उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्या निर्णयात न्यायालयाने हिरवळीच्या महत्त्वावर भूमिका मांडली. नागरिक मोठ्या संख्येत शहरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहरे सतत फुगत आहेत. त्यांचे झपाट्याने सिमेंटच्या जंगलांमध्ये परिवर्तन होत आहेत. आधी हिरवेगार असणारे परिसर नाहिसे होत चालले आहेत. सध्या नागरिकांना शरीर व मनावरचा ताण हलका करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागत आहे. याशिवाय लोकसंख्या वेगात वाढत आहे. लोकसंख्येसोबत वाहने वाढत आहे आणि वाहनांसोबत प्रदूषणामध्ये भर पडत आहे. आधी मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होती. आता मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी मैदाने नाहीत. नागरिक जास्तीतजास्त वेळ घरात व कामाच्या ठिकाणी राहतात. त्यानंतर त्यांना काही क्षणाकरिता मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, फिरण्यासाठी, एकत्र होण्यासाठी, मन ताजे करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असते. त्यामुळे पार्क व उद्यानांचे संरक्षण अत्यंत आवश्यक झाले आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
अन्य महत्त्वाचे मुद्दे
१ – पार्क व उद्याने मानवी वस्तीची फुफ्फुसे असतात. ती सुदृढ आरोग्य प्रदान करतात. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवतात. शहराला सौंदर्य प्रदान करतात.
२ – नैसर्गिक साधने देशाची संपत्ती असतात. ही संपत्ती नवीन पिढीला कमी करून नाही तर, वाढवून दिली गेली पाहिजे. ही संपत्ती सर्वात मौल्यवान आहे.
With more than 50 years in Ayurvedic skin care, Medimix has recently introduced their new range of Ayurvedic Hand Wash and Hand Sanitizers. The range of Hand Wash provides 99.9% germ protection through natural ingredients.
Over time, Medimix has grown synonymous with ‘skin care, the natural way’ and has gained immense trust from conscientious consumers who are keen on using natural skincare products. Backed by the goodness of Ayurveda, Medimix now extends its portfolio in the hand wash and hand sanitizers owing to the rising demand.
The Medimix hand wash and hand sanitizers range uses innovative combinations of natural ingredients like Lemon, Tulsi, Aloe Vera, Neem and Turmeric to create invigorating blends that provide 99.9% germ protection and also ensures that they are gentle and soft on the skin, leaving the hand smelling fresh, soft and clean.
The new Medimix Ayurvedic Hand Wash includes three variants Nature Fresh (with Lemon, Tulsi, Aloe Vera), Nature Soft (with Neem, Turmeric, Aloe Vera) and Nature Care (with Neem, Tulsi, Aloe Vera). They are priced at Rs. 85 for 190 ml, Rs. 90 for 175 ml pack of two refills and Rs.110 for 750 ml mega pack.
The new Medimix Ayurveda Hand Sanitizer and hand wash includes two variants: Neem, Tulsi, Aloe Vera and Lemon, Tulsi, Aloe Vera. They are priced at Rs. 50 for 100 ml, Rs. 100 for 200 ml, Rs. 250 for 500 ml and Rs. 2500 for 5 litres. In line with recommendations from the World Health Organization, it helps in reducing the spread of the virus by killing 99.9 per cent of germs and bacteria without water.The newly launched products are available at all major retail outlets and ecommerce platforms.
Mr. Pradeep Cholayil, Chairman & Managing Director, Cholayil Private Limited said, “Right from our advent, we empower and enrich people’s lives naturally with world class personal and skincare products & services. Currently, hand washes and sanitizers have become an integral part of everyone’s life. Medimix, which drives itself with the authentic Fast-Acting Ayurveda is happy to introduce the new range of Hand wash and hand sanitizers, reiterating the goodness of Ayurveda. It gives us immense pride to diversify and expand our product range to meet the needs of the customers the natural way. The innovative blends in the new product range have been brought about after in-depth research by our team of experts to bring out the goodness of Ayurveda. Our Hand Wash range has the unique power of 3 herbal actives which protects from 99.9% germs. The germ kill space using natural ingredient is the need of the hour and fits really well with Medimix’s overall positioning of ‘getting Skin Fit with Fast acting Ayurveda’. We also feel that our on the go product like Hand sanitizer would also get appreciated by consumers.
Mr. Ashish Ohlyan, Head of Marketing, Cholayil Private Limited said “The consumption of Hand Wash and Hand Sanitizers has increased many folds due to Covid. People prefer to use these products frequently to avoid the infection but at the same time people are also looking for products which are safe & natural and can be used frequently without affecting their skin. This was an opportunity for us, being one of the leading brands in Ayurvedic Skin Care space with the expertise of 50 years; it was a seamless connect with the product category and brand credentials. The core USP of our Hand Wash is 99.9% germ protection through the natural ingredients which is not offered by most brands. The extension of Medimix brand in Hand Wash and Hand Sanitizers is going to give yet another impetus to overall brand portfolio and we will be cater to our consumers in a much larger manner.”
नागपूर : मेयो व मेडिकल व खासगी कोविड हॉस्पिटल मिळून साधारण २,७००वर खाटा आहेत. त्या तुलनेत २९१ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. परंतु मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर मदत मागितल्यावर व्हेंटिलेटर असलेली एकही खाट उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. विशेष म्हणजे, रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. परंतु व्हेंटिलेटरची उपलब्धता, त्यातील तज्ज्ञ यावर चर्चा के ली नसल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनाच्या मध्यम व गंभीर रुग्णांसाठी अपुऱ्या खाटा, सोयीसुविधा आणि आता व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्यात मेयो व मेडिकल मिळून १,२०० खाटांचे कोविड हॉस्पिटल आहेत. यात प्रत्येकी २०० खाटा आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभागाच्या आहेत. मेडिकलमध्ये ८७ तर मेयोमध्ये ८५ व्हेंटिलेटर आहेत. महापालिका प्रशासन शहरात ३० वर खासगी कोविड हॉस्पिटल सुरू असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात २२ हॉस्पिटलच रुग्णसेवेत आहेत. येथे किती खाटा आहेत, हा संशोधनाचा भाग आहे. सर्व खासगी हॉस्पिटल मिळून सुमारे ११९ व्हेंटिलेटर आहेत. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महापालिके च्या हेल्पलाईन नंबरवर संपर्कसाधला असता, व्हेंटिलेटर कुठेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी हेही सांगितले, खासगी रुग्णालयात त्यांचे स्वत:चेच रुग्ण गंभीर असतात. एखाद-दोन व्हेंटिलेटर रिकामे असले तरी ऐनवेळी त्यांच्याच रुग्णांना त्याची गरज पडत असल्याने त्यांना विचारणा के ल्यावर ते नकार देत असल्याचेही, त्यांनी सांगितले.
मेयो, मेडिकलमधील काही व्हेंटिलेटर नादुरुस्त मनपाच्या डॅशबोर्डवर मेयोमध्ये ८५ तर मेडिकलमध्ये ८७ व्हेंटिलेटर असल्याचे दाखवीत असले तरी किती दुरुस्त आणि किती नादुरुस्त याची नोंद नाही. सूत्रानुसार, या दोन्ही रुग्णालयांतील यातील १० ते १५ व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. धक्कादायक म्हणजे, व्हेंटिलेटर लावण्यासाठी तज्ज्ञाची गरज असते. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक वेळा व्हेंटिलेटर लावण्यासाठी रुग्णांवर जीवघेण्या प्रतीक्षेची वेळ येत असल्याची माहिती आहे.
रात्री ७ वाजताच खासगी हॉस्पिटल होतात बंद
जिल्हा माहिती कक्षानुसार ६,३३९ रुग्ण होम आयसोलेशन म्हणजे, गृह अलगीकरण कक्षात आहेत, तर कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे १५०० वर रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना कधीही आॅक्सिजन बेडची गरज पडू शकते. परंतु शहरात रात्री ७ वाजल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णच घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही हॉस्पिटलला याबाबत विचारले असता, रात्री तज्ज्ञ डॉक्टर राहत नसल्याने रुग्ण घेत नसल्याचे सांगितले.
संपूर्ण देशात कोरोना महारोगराईमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा नागरिकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचीही ओरड सर्वत्र केली जात आहे. अशात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने यंदा १४ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. बॅंकेकडून यासाठी खास योजना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
वेगवेगळ्या राज्यात विविध पदांसाठी ही नोकरभरती केली जाईल. बॅंक सेवेचा अधिकाधिक प्रमाणात विस्तार केला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे बॅंकेकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना आणली जाणार आहे, तर दुसरीकडे नोकर भरतीची तयारी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसबीआयकडून ३०,००० कर्मचाऱ्यांना वेळे आधी सेवा निवृत्ती (व्हीआरएस) घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेने व्हीआरएस योजना सुरू करण्याचा निर्णय त्यामुळे घेतला आहे. योजनेत ३०,१९० कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असेल. मार्च २०२० मध्ये बँकेचे एकूण २.४९ लाख कर्मचारी होते तर, मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख होते.
सूत्रांच्या माहितीनुसार व्हीआरएसचा मसुदा बँकेने तयार केला असून, मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल. बँकेने या योजनेला सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस-२०२० असे नाव दिले आहे. योजनेद्वारे बॅंकेच्या २५ वर्ष सेवेत असलेल्या वा ५५ वय पूर्ण झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ही योजना खुली ठेवण्यात येईल.
कर्मचाऱ्यांना योजनेचा अधिक फायदा होईल. योजनेच्या माध्यमातून बँक २००० कोटींपेक्षा जास्त बचत होईल. योजनेंतर्गत जर का ३० टक्के लोकांनी व्हीआरएस घेतला तर,जुलै २०२० च्या पगाराच्या अंदाजानुसार बँक जवळपास १,६६२.८६ कोटी रुपयांची बचत करेल, असा दावा बॅंकेकडून करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हीआरएस नंतर नवीन कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग ही मोकळा होणार आहे.
नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे. आतापर्यंत ४७,८७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ६३.७१ टक्केरुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २०,४९७ रुग्ण उपचाराखाली आहेत.
नागपूर जिल्ह्यात १,५५० रुग्ण पॉझिटिव्ह तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून हीच स्थिती आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१,०३२ तर मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८,६३८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ४,०५५ तर मृतांची संख्या ४८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १५० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ३,९९५ झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात १३९ रुग्णांची नोंद झाली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ४,३९२ झाली असून मृतांची संख्या १२४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २,१०६ झाली आहे. जिल्ह्यात दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे.
अमरावती जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ७,०८७ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,२४४ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रुग्णसंख्येत किंचीत घट आली. ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूचे सत्र सुरूच आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात ५७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,७७५ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १,३०१ झाली आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (७ सप्टेंबर) ला मास्क न लावणा-या ५०१ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. मागील चार दिवसात शोध पथकांनी ११३६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २,२७,२००/- चा दंड वसूल केला आहे.
नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृतांची संख्यासुध्दा झपाटयाने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना महापौर श्री.संदीप जोशी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी वारंवार केली आहे. तरीपण नागरिकांनी त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे जवानांनी कारवाई करुन दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६, धरमपेठ झोन अंतर्गत १०२, हनुमाननगर झोन अंतर्गत ४३, धंतोली झोन अंतर्गत ५२, नेहरुनगर झोन अंतर्गत ४०, गांधीबाग झोन अंतर्गत ३८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १८, लकडगंज झोन अंतर्गत ५०, आशीनगर झोन अंतर्गत ६२, मंगळवारी झोन अंतर्गत ६३ आणि मनपा मुख्यालयात ७ जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
नागपूर : त्याचे वय शाळेत जाण्याचे आहे, खेळण्या बागडण्याचे आहे. मात्र परिस्थिती त्याला तशी परवानगी देत नाही. नियतीने शाळेच्या दप्तराऐवजी त्याच्या हातात समोसाचा पिंप दिला आहे. त्यामुळे पायी अथवा सायकलने दिवसभर इकडे तिकडे फिरून तो समोसे विकतो आणि कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी निराधार आईला मदत करतो. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कोणतीही शासकीय सवलत मिळत नाही. कथित समाजसेवक डोळ्यावर झापड ओढून असल्यामुळे त्यांना मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे या निरागस जिवाला रात्री उशिरापर्यंत जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समाजसेवेचा आव आणणाऱ्या मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही करुण कहाणी नागपुरातील प्रियांशू झा या ११ वर्षाच्या निरागस मुलाची आहे.
प्रियांशू गुड्डू झा त्याची आई चुनमुन, १७ वर्षीय बहीण अनामिका आणि १४ वर्षाच्या पंकज नामक भावासोबत लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशपांडे लेआउट मध्ये राहतो. २० वर्षांपूर्वी बिहारमधून रोजगाराच्या शोधात गुड्डू झा पत्नी चुनमूनसह नागपुरात आला. रस्त्यावर समोसे विकून त्याने आपली उपजीविका सुरू केली. पहाता पहाता त्यांना तीन मुले झाली. भाड्याच्या खोलीत राहून आपला संसार चालविणारे गुड्डू कुणाच्या घेण्यादेण्यात राहत नव्हते. आपल्या हक्काचे पैसे मागितले म्हणून वर्षभरापूर्वी ते गुंडांच्या क्रौयार्ला बळी पडले. रस्त्यावर समोसे विकणाऱ्या गुड्डू झा यांची हत्या झाली अन झटक्यात त्यांचे कुटुंब निराधार झाले.
प्रियांशूच्या आईने डोक्यावरचा पदर ओढून कंबरेला खोचला
पतीच्या हत्येमुळे जगायचं कस, असा प्रश्न प्रियांशूच्या आईसमोर उभा ठाकला.
सातवी पर्यंत शिकलेल्या चुनमून यांना तीन मुले सांभाळायची होती. स्वत: सोबत मुलांना जगवायचे होते. आप्तस्वकीय बिहारमध्ये राहतात. तेथे जाऊन करणार काय, असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी डोक्यावरचा पदर ओढून कंबरेला खोचला आणि घरोघरी जाऊन स्वयंपाक करू लागल्या. तुटपुंज्या मिळकतीतून त्या मुलांचे पालन-पोषण करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि रोजच्या खाण्याघेण्याचा खर्च त्यातून भागण्याचा प्रश्नच नव्हता. अशात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांप्रमाणे त्यांच्याही हातचे काम सुटले. खाऊ कसे आणि मुलांना खाऊ घालावे कसे असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांनी घरीच समोसे बनविणे सुरू केले. रोज ५० ते ६० समोसे बनवायचे. पिंपात भरून ते कधी पंकज तर कधी प्रियांशूच्या डोक्यावर द्यायचे. हे दोघे कधी पायदळ तर कधी सायकलने पायपीट करत रात्री ९ वाजेपर्यंत समोसे विकतात. दस रुपये प्लेट समोसे लेलो सहाब, असे म्हणून रस्त्यावर बसलेल्यांच्या पुढे जातात. अवघ्या दहा रुपयात दोन समोसे मिळत असल्यामुळे काही जण ते आनंदाने घेतात. मात्र दारुडे, उपद्रवी समोसे घेऊनही पैसे देण्यास मागेपुढे पाहतात. मुलगा लहान दिसतो म्हणून त्यांना पिटातात. प्रसंगी शिवीगाळही करतात. पंकजला हे सहन होत नाही. चिमुकला प्रियांशू हे सर्व मुकाटपणे सहन करत, रोज दोनशे ते तीनशे रुपये आपल्या आईच्या हातात ठेवतो. रात्री स्वत: स्वत:चे दुखरे पायही चोळून घेतो. त्याची ही कर्मकथा मोहल्ल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र, सेल्फी छाप मदतकर्ते डोळ्यावर झापड घालून आहेत. कोणत्याही कथित समाजसेवकाने या गरीब निराधार कुटुंबाला व्यक्तिगत मदत सोडा, शासकीय सोयी सवलती मिळवून देण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. चुणचुणीत प्रियांशूला तशी अपेक्षाही नाही. १० रुपये प्लेट समोसा विकून भागत नाही, असे तो सांगतो. सर, कोई अच्छे पैसे दिलानेवाली नोकरी मिलेनगी क्या, असा त्याचा निरागस तेवढाच स्वाभिमानी सवाल आहे. आत्मनिर्भरतेचा ढोल बडविणाऱ्या मंडळींसाठी प्रियांशू मॉडल ठरावा.
पंकजची शाळा सुटली
रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे पंकजची शाळा सुटली आहे. दहावीचा विद्यार्थी असलेल्या पंकजने गेल्या सत्रापासून शाळेत जाणे बंद केले आहे. स्वत:च्या शिक्षणाऐवजी हे दोघे भाऊ आपल्या बहिणीच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत, हे आणखी एक विशेष!
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्प्याची वाटचाल पूर्णत्वाकडे सुरू आहे. ही लस इंट्रा व्हॅस्कुलर म्हणजे धमनीमध्ये दिली जाणारी आहे. आता याच लसीचा इंट्राडर्मल म्हणजे त्वचेत दिल्या जाणाºया लसीची मानवी चाचणी होणार आहे. यासाठी राज्यात नागपुरातील रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे.
भारत बायोटेक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखेत इंट्रा व्हॅस्कुलर कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणीला सुरुवात झाली. राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५५ व्यक्तींना पहिला व दुसरा डोज देण्यात आला. १४ व २८ दिवसानंतर या सर्वांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यातही आले. ४२ व्या दिवशी पुन्हा रक्ताचे नमुने घेऊन त्यानंतर लसीच्या प्रभावाचा निष्कर्ष काढला जाणार आहे. दरम्यान, याच कंपनीचे इंट्रा डर्मल दिले जाणारे कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. देशात १२ ठिकाणी चाचणी होणार आहे
नागपुरात सुरुवातीला २० लोकांवर ही लस दिली जाणार आहे. साधारण सोमवार-मंगळवारपासून याची नोंदणी सुरू होईल. ही लस त्वचेत दिली जाणारी असल्याने फार कमी डोस लागतो. यामुळे जास्तीत जास्त लोकांना देणे शक्य होणार आहे. याची किमतही इंट्रा व्हॅस्कुलरच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.
नागपूर : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. २४ ऑगस्ट रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती मुंढे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हवर दिली.
नागपूर महापालिकेच्या सात महिन्याच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील साडेपाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले.
नागपूर : प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरू (शिक्षक) हा महत्वाचा दुवा असतो. या शिक्षकचा दरवर्षी शासनातर्फे सत्कार करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने, शासनाने यंदा समाजातील प्रत्येकाला शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनाला’ ‘थँक्यू टिचर’ म्हणण्याचे आवाहन केले आहे.
भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शिक्षक दिनाला शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा राज्यपालांच्याहस्ते गौरव करण्यात येतो. कोरनामुळे यावर्षी शिक्षक दिन नेहमीप्रमाण साजरा करणे शक्य नाही. शासनातर्फे यंदा शिक्षकांचा गौरव करणे शक्य नसल्यामुळे शासनाने शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स टीचर’ हे अभियान राबविले आहे. यासाठी शासनाने सोशल मीडियाचा वापर केला आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदीवर ही मोहिम राबविण्यात येत असून, यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान ५ ते १० सप्टेेंबरपर्यंत राबवायचे आहे. या उपक्रमाचे शाळानिहाय आयोजन करून शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून एकत्रित करून अहवाल सादर करायचा आहे.
– कृती कार्यक्रमाचेही आयोजन
१) शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम यशोगाथेचे सादरीकरण केंद्रस्तर, तालुकास्तर जिल्हास्तरावरून करण्यात यावे.
२) कोरना कोळात शाळा बंद असल्या तरी वाडी, वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे स्वयंस्फुर्तीने काम करीत आहे. अशा व्यक्तींचा वेबीनार आयोजित करून त्यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा समावेश करावा.
३) शिक्षक दिनाच्या अनुषंगाने वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य, पोस्टर, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन आदी विषयावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन.
४) कोविड योद्धा शिक्षकांचे अनुभव कथन व कौतुक करण्यात यावे.
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पाच डेडिकेटेड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु डॉक्टर व मनुष्यबळ नसल्याने त्याचे संचालन होत नव्हते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित हेल्थकेअर सेंटरच्या मनुष्यबळाची व्यवस्था सुरू केली आहे.. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय आदी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. कंत्राटी पद्धत, करार आधारावर मानधन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यासाठी ९७.९८ लाख रुपये मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत अहे.
प्रस्तावांतर्गत फिजिशियन व इन्टेंसिव्ह केअर तज्ज्ञांना ७५ हजार रुपये फिक्स मानधन व इन्सेंटिव्ह १.२५ लाख रुपयापर्यंत दिले जाईल. तज्ज्ञ डॉक्टर च्या ११ पदांना मंजुरी देण्यात येईल. यात फिजिश्यिन, इन्सेंटिव्ह केअर, अॅनेस्थेशिया तज्ज्ञ आदींचा समावेश राहील. त्याचप्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीयूमध्ये पीपीई किट घालून राहावे लागेल. अशा परिस्थितीत एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीयूएमएस डॉक्टरांना १० हजार रुपये, स्टाफ नर्सला ७ हजार रुपये व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत वॉर्ड बॉयला ३ हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. दर महिन्याला वेतनावर ३२.६६ लाख रुपये खर्च होईल. आरोग्य विभागाच्या आस्थापना खर्चातून संबंधित निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
नागपूर : मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी कोरोना संदर्भातील अॅन्टिजन टेस्ट वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अॅन्टिजन टेस्ट रिपोर्टवर कोणतीच शंका नाही. मात्र, जे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ते चूक असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
मुंबईहून नागपूरला आलेल्या तज्ज्ञ चमूचे सदस्य असलेल्या चहल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीदेखील रुग्णामध्ये लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्याने आरटी-पीसीआर टेस्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. निगेटिव्ह रिपोर्टसंदर्भात ही टेस्ट तेवढीशी कारगर नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये कोणतीच समस्या नाही. टेस्टची संख्या वाढविण्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक जोर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मृत्यूदर कमी करण्यावर सर्वाधिक जोर देण्याचीही आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
बैठकीमध्ये चहल यांनी आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्यावर भर देत, अॅन्टिजन टेस्टचा उपयोग केवळ गंभीर स्वरूपात आजारी संशयित रुग्णासाठीच करण्यावर मत मांडले. यावेळी त्यांनी शासकीय व खासगी हॉस्पिटल्समध्ये वॉररूम तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच तक्रारींचा निपटारा करण्यासाठी, सीसीटीव्ही लावूनच उपचार करण्याचे आवाहन केले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवर्तमान पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
मुंबईतल्या परिस्थितीची हाताळणी
बैठकीत चमूने आपले अनुभव व्यक्त करताना धारावी आणि मुंबईच्या अन्य भागांमध्ये समन्वयाने काम पार पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: झोपडपट्टीमध्ये जाऊन स्थितीचा अंदाज घेतला. त्यामुळे, परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत मिळाली. नागपुरातही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची गरज आहे. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे वेगळे स्वच्छतागृह नाही किंवा कमी जागा आहे, त्यांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाईन करावे लागेल.
नागपूर : कोरोनामुळे एसटी ची चाके ठप्प झाली होती. २० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. परंतु गरज नसताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. दररोज हजारावर रुग्ण आढळत आहेत. शासकीय कार्यालयात कमीत कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याचे आदेश आहेत. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. नियमानुसार ३० कर्मचारी किंवा ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याची गरज आहे. परंतु विभाग नियंत्रक कार्यालय तसेच विभागीय कार्यशाळेत १०० टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास इतरांना धोका होण्याची शक्यता आहे. याशिवाय गर्भवती महिला तसेच अपंग कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करण्यात येत आहे. अन्यथा त्यांना सुट्या कापण्यासाठी भाग पाडण्यात येत आहे. त्यामुळे गरज नसताना कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येऊ नये, अशी ओरड कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना बोलवावे
नागपुरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविल्यास धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे.
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एस. टी. कामगार संघटना.
आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना बोलावीत आहोत
एसटी अत्यावश्यक सेवा आहे. एसटी बसेस सुरू झाल्यामुळे आवश्यकतेनुसार कर्मचारी बोलाविण्याची सूचना आहे. चालक-वाहकांना रोटेशननुसार बोलाविण्यात येत आहे. वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात कामे वाढली आहेत. त्यामुळे १०० टक्के कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येत आहे.
नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
New Delhi_ Nissan India revealed the design approach taken to create its latest B-SUV, the Nissan Magnite Concept, along with the newer design elements of its interiors and exteriors. The newest offering in the Nissan family that will take its global SUV legacy into the future is designed for India and for export countries.
The interiors of the Nissan Magnite Concept are wide and spacious due to the horizontal instrument panel, followed by the air ventilators that have a distinctive shape and cliff section, which makes it look sporty and enhances the SUV feel. It also includes a sporty mono-form shape seat which enhances comfort and the rear seats offer robust pattern and rich cushioning adding to the premium-ness of the car.
Takumi Yoneyama, Design Manager, Nissan Motor Corporation, said, “The Nissan Magnite Concept embodies Nissan’s spirit in every way. Our design approach was based on the art of sculpting and not just drawing lines on paper. We sculpted a solid and dynamic feel by carving shape from a big, overhanging body. We followed the core of Japanese sense and aesthetic by extracting pure dynamism and shedding the unnecessary. We are proud to introduce our newest creation and we hope that our customers in India will love it.”
Rakesh Srivastava, Managing Director, Nissan Motor India, said, “The Nissan Magnite Concept is designed in Japan while keeping in mind the requirements and aspirations of the Indian customers. The front section and the grill frame feature a vertical motion to enhance rigidness. In contrast, very sleek and sharp LED Head lamps and L-shape Daytime running light create a strong impression. This dynamic combination gives the car a confident and bold look; special tinted red color adds further depth and makes it look solid and vibrant.”
Overall, due to its bold design and color, the Nissan Magnite Concept will be an eye-catcher and is certain to stand out in the crowd of vehicles on Indian roads. The Magnite Concept is an evolutionary leap in Nissan’s SUV history and is designed for the Indian market.
नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे, या दृष्टीने महापालिकेतर्फे नवीन १६ कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या नवीन केंद्रासह नागपूर शहरात आता कोरोना चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.
शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व ५० चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटीजेन’ चाचणी केली जात आहे. ‘अँटीजेन’ चाचणीचा अहवाल ३० मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो. ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
शहरात सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची ६ केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे. सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची लोक प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.
कोरोना चाचणी पॉझीटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२ – २५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा. कोरोना संदर्भातील इतर मार्गदर्शनासाठी ०७१२-२५५१८६६, ०७१२-२५३२४७४, टोल फ्री नं. १८००२३३३७६४ या क्रमांकावर संपर्क करावे.
– झोन निहाय नवीन कोरोना चाचणी केंद्र
आरटीपीसीआर चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केंद्र (आरपीटीएस)
धरमपेठ झोन अंतर्गत लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह
आसीनगर झोन अंतर्गत पाचपावली पोलीस वसाहत
मंगळवारी झोन अंतर्गर प्रभाग क्रमांक १० राजनगर
अँटीजन चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोन : जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धरमपेठ झोन : के.टी.नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय, डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना.
हनुमाननगर : हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केदं्र , मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धंतोली झोन : कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र
नेहरूनगर झोन : नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी हेल्थपोस्ट, बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबाग गांधीबाग : मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आमि नेताजी दवाखाना, डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, दाजी दवाखाना.
सतरंजीपुरा झोन : मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना.
लकडगंज झोन : चकोले दवाखाना, डिप्टी सिंग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्र
आशीनगर झोन : कपिलनगर आणि शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, गरीब नवाजनगर, कुंदनलाल गुप्तानगर, बंदे नवाजनगर मंगळवारी झोन : नारा प्राथमिक आरोग्य कें द्र आणि जरीपटका दवाखाना, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी आणि गोरोवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर रोगनिदान केंद्र.
नागपूर : मानकापूर चौकातील अॅलेक्सिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवरील कारवाई रद्द करण्याच्या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका ऐकल्यानंतर पुढील निर्देशापर्यंत या प्रकरणात वर्तमान परिस्थिती कायम ठेवण्यास सांगितले. तसेच, अॅलेक्सिस हॉस्पिटलला नोटीस बजावून सहा आठवड्यात उत्तर मागितले.
याचिकेवर न्या. रोहिंटन फली नरिमन, न्या. नवीन सिन्हा व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिकेने अॅलेक्सिस हॉस्पिटलमधील जेनेटिक क्लिनिकची नोंदणी रद्द करून तेथील ८ वैद्यकीय यंत्रे जप्त केली होती. त्याविरुद्ध अॅलेक्सिस हॉस्पिटलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. गेल्या २४ जुलै रोजी उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून अॅलेक्सिस हॉस्पिटलवरील संपूर्ण कारवाई रद्द केली आणि जेनेटिक क्लिनिकची नोंदणी कायम ठेवून जप्तीमधील सर्व वैद्यकीय उपकरणे तातडीने मुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच, सदर आदेशाचे त्याच दिवशी पालन करण्यात अपयश आल्यास पुढील प्रत्येक दिवशी रोज ५० हजार रुपये खर्च द्यावा लागेल असे मनपाला बजावले. याशिवाय महानगरपालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार व तज्ज्ञांच्या सल्लागार समितीवर तीक्ष्ण ताशेरे ओढले. कारवाईत कुठेही पारदर्शकता ठेवण्यात आली नाही व कायद्याचे पालन करण्यात आले नाही असे निरीक्षण नोंदवले. मनपाचा त्यावर आक्षेप आहे.
असा आहे घटनाक्रम
२० जून २०२० रोजी हेमवती तिवारी या महिलेने अॅलेक्सिस हॉस्पिटलच्या जेनेटिक क्लिनिकमध्ये गैरप्रकार होत असल्याची डॉ. गंटावार यांच्याकडे तक्रार केली. २२ जून २०२० रोजी हेमवती तिवारी यांना २डी इको कार्डिओग्राम चाचणी करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर डॉ. गंटावार यांनी लगेच रुग्णालयात पोहचून तिवारी यांची अपात्र डॉक्टरद्वारे तपासणी करण्यात आल्याचा आरोप केला. ४ जुलै २०२० रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली. ७ जुलै २०२० रोजी हॉस्पिटलने कारणे दाखवा नोटीसला उत्तर देऊन कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसाचा वेळ मागितला. ८ जुलै २०२० रोजी हॉस्पिटलवर संबंधित कारवाई करण्यात आली.
नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मागील काही महिन्यापासून नागपूर शहरात व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलेला ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील व्यापारी ऑड – ईवन समाप्त करण्याची मागणी करीत होते.
रस्ता दुभाजक असलेल्या सर्व मार्गावरील ऑड- ईवन समाप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील दुकाने सायंकाळी ७ ऐवजी रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येतील. मात्र ऑड- ईवन समाप्त करताना ठेवण्यात आलेल्या अटी व शर्ती मुळे या घोषणेचा लाभ सरसकट सर्व व्यापाऱ्यांना मिळालेला नाही. महाल इतवारी व सीताबर्डी यासारख्या बाजारपेठात प्रमुख रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने व रस्ते अरुंद असल्याने या भागात ऑड- ईवन कायम राहणार आहे.
ज्या मार्गावर रस्ता दुभाजक आहे. रस्ते रुंद आहेत, अशाच मार्गावरून व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने वर्धा मार्ग, गोकुळ पेठ,सदर, मानेवाडा रोड, सक्करदरा, भंडारा मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू मार्ग, मेडिकल चौक परिसर, कामठी रोड यासह रस्ता दुभाजक असलेल्या मोठ्या रस्त्यांवरील व्यावसायिकांचा समावेश आहे..
इतवारी व महाल भागातील व्यापाऱ्यांना लाभ नाही
शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारी व महाल परिसरातील रस्ते अरुंद असल्याने येथील व्यापाऱ्यांना ऑड- ईवन समाप्त करण्याचा त्याचा लाभ होणार नाही. अशीच परिस्थिती अरुंद रस्ते असलेल्या भागातील आहे.
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, महापौर श्री संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्या या आवाहनाला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तसेच ६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात आली. मागील वर्षी दहा झोनच्या २७६ कृत्रिम तलावात दोन लाख ९२ हजार ७०२ श्रीं चे विसर्जन करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाख ८९ हजार ९२० गणपतींचे विसर्जन कमी झाले. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे व उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
यावर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्याकरीता नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व झोन मध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याकरीता फायबर टॅंक, जमिनीत खड्डे, सेंन्ट्रींगची टॅंक असे एकुण १८४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
श्री चे विसर्जन पर्यावरण पुरक व्हावे या करीता सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली. निर्माल्य गोळा करुन निर्माल्य कलशामध्ये टाकण्याकरीता तसेच श्रीं चे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याकरीता स्थानिक सेवाभावी संस्थेच्या मदतीने व्यापक प्रचार व प्रसार करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील गणपती विसर्जनाकरीता सतत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी पुढील प्रमाणे कार्यरत होते. पाच नियंत्रण अधिकारी, १० स्वच्छता अधिकारी, ५६ स्वास्थ निरीक्षक, १५१ जमादार ‘श्री’ च्या विसर्जनाकरीता कार्यरत होते. व गोळा केलेले निर्माल्य वाहून नेण्याकरीता झोन क्रं. १ ते ५ करीता मे. ए.जी. इनव्हायरो व झोन क्र. ६ ते १० करीता मे. बी.व्ही.जी. इंडिया. लि. या दोन्ही एजन्सीद्वारे २६२ कर्मचारी व ११० वाहने उपलब्ध करुन देण्यात आले होते. फुटाळा तलावावर व कृत्रिम तलावाच्या लगत निर्माल्य गोळा करण्याकरीता निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती व गणपतीच्या विसर्जनाकरीता म.न.पा चे ५९० कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक/कर्मचारी कार्यरत होते. महानगरपालिकेच्या पर्यावरण पुरक श्रीं च्या विसर्जनाला मोठया संख्येने नागरीकांकडून प्रतिसाद मिळाला असून कृत्रिम तलावांमध्ये एक लाख दोन हजार ७२२ गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तसेच ६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात आले असून झोन निहाय विसर्जना बाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
यावेळी गणपती विसर्जनाकरीता स्थानिक सेवाभावी संस्थां ग्रीन व्हिजील फाउंडेशन आणि मर्चंट नेव्ही ऑफीसर्स वेलफेअर असोसिएशनच्या स्वयंसेवकांकडूनही मोलाचे सहकार्य महानगरपालिकेला मिळाले असून नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे यावर्षी श्री चे विसर्जन मोठया प्रमाणात घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावात करण्यात आलेले आहे.
नागपूर : खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग असलेल्या नारळ चा आज दिवस. केवळ खाद्य व अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाविषयी जाणून घेऊ या काही विशेष व मजेशीर बाबी
कोकोनट हा नट नाही.. तो स्टोन फ्रूट आहे..
नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते..
नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो.
नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांनी तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या शतकात जेव्हा या नावाड्यांनी हे फळ समुद्रकिनारी पाहिले तेव्हा त्याचे तीन डोळे त्यांना माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटले. शिवाय ते हंसऱ्या चेहऱ्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला कोको, म्हणजे हंसरा चेहरा असे संबोधू लागले. पुढे या नारळाचा प्रवेश इंग्लंडमध्ये झाला तेव्हा कोकोपुढे नट हा शब्द जोडला जाऊ लागला..
काही देशांमध्ये नारळं तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षित केले जाते. ही माकडे नारळाच्या झाडावर चढून नारळे तोडून खाली टाकतात.
नारळाच्या पाण्याचा मनुष्याच्या रक्तातील प्लाझ्मासारखा काही काळ उपयोग वैद्यक क्षेत्रात केला जाऊ शकतो.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...