Home Blog Page 114

Celebrate the 58th Convocation of IIT Bombay in a virtual manner

IIT Bombay

The 58th Convocation of IIT Bombay took place today in a virtual reality mode due to the current transition situation. The institute had organized such a virtual convocation ceremony to ensure the health of the students as well as not to deprive them of the success and pride of the degree of the leading engineering institute in the country. To each graduate, Director Prof. It was a digital incarnation of Subhashish Chaudhary personally receiving his degree certificate. The medalists also felt that their medals were received by the chief guests. The convocation ceremony was telecast live on DD Sahyadri channel and on YouTube and Facebook.

The consecration ceremony is usually the last chance for students to get together with friends and professors. This year the institute gave students the opportunity to be present in a virtual manner, to roam the virtual campus, to visit hostels and departments, to meet friends and teachers.

Prof. Duncan Haldane, 2016 Joint Nobel Laureate in Physics, Professor of Physics at Princeton University, was the Chief Guest at the event. Blackstone co-founder and CEO, world-class investor and philanthropist Stephen Schwarzman was the guest of honor.

While presenting the report of the organization for the year 2019-2020, Prof. Subhashish Chaudhary informed that most of the students tend to IIT Bombay for undergraduate and postgraduate courses. He said, “The main objective of IIT Bombay is to produce high quality graduates who are at the forefront of industry, research and education. The skills he acquired while studying at IIT Bombay, the work culture he nurtured are useful for success in his life. His contribution to the development of the country has attracted the attention of the entire country. He further said, “All faculty and staff, including high innovation, have made invaluable contributions in providing virtual reality experience for graduates. He did this for the students. We hope that this will make our graduates as well as other engineers in the country think big and innovative. ”

Chief Guest Prof. Haldane said the researchers have an architecture for everyone. Even if you are engaged in research motivated by a specific goal, take some time for unexpected curiosity. “Because the idea is that if you’re kicking a rock with your shoe, at the same time you might be reluctant to look for a rough diamond, and someone else will walk that path and see the diamond you found but didn’t notice.”

In his speech, Stephen Schwarzman said, “India has a special place in the world right now, especially in terms of technology, India has taken the global lead through talent. Unicorns has been founded by 72 engineers of Indian descent from around the world, half of whom are IIT students. IIT engineers are taking the place of global technology and new students are the future leaders who will take the campaign forward ”.

He further said that with a young, ambitious and technologically savvy population, a government of progressive thinking that supports entrepreneurship, and the world’s fourth largest start-up ecosystem, India could be a great hub for innovation.

This year’s graduate students include 381 Ph.D., 18 bachelor’s (M.Tech / M.Phil + Ph.D.) and 27 bachelor’s (M.Sc + P.H.D.). Of these, 39 researchers have been awarded the 2018-20 ‘Excellence in PhD Research’ award. In addition, 33 joint PhD holders, in collaboration with Monash University, have been appointed by the Vice Chancellor and President of Monash University, Prof. The Ph.D. was awarded by Margaret Gardner.

This year, one PhD was conducted under the joint supervision of the University of Washington, St. Louis in the United States, and two PhDs, [M.Tech + P.H.D. and M.Sc + P.H.D.] under the supervision of the University of Wollongong, Australia and the University of Quebec a Trois Revisions, Canada.

In addition, 11 MS (Research), 6 Bachelors (MSC + M Tech), 621 M Tech, 64 MDES, 20 M Phil, 110 MMGT, 225 Two year M.Sc, 2 Five year M.Sc, 342 B.Sc. B Tech + M Tech), 684 B Tech Degrees, 10 Interdisciplinary Diplomas (B Tech / BS + M Tech / MSC), 20 Diplomas (BDES + MDES), 6 Diplomas (BS + MSC), 16 BS, 15 BDES, and 16 PGDIIT, were awarded at the convocation.

This year, three students were awarded gold medals for outstanding performance. Sahil Hiral Shah (B.Tech.) Was awarded the ‘President of India’ Medal. The institute’s ‘Institute Gold Medal (2018-19)’ was awarded to Shashwat Shukla, Electronic Engineering, while ‘Dr Shankar Dayal Sharma Gold Medal’ was awarded to Prakash Singh Badal, Civil Engineering. In addition, silver medals were awarded to the students who came first from the department.

Prof. Margaret Gardner, President and Vice-Chancellor, Monash University, Australia, Board of Governors Member and many distinguished guests from home and abroad, graduate students and their parents attended the event online.

जागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ

वडा पाव

नागपूर : आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. कष्टकऱ्यांसाठी निर्मिलेला एक स्वस्त आणि मस्त पदार्थ.. रिक्शावाला ते कॉलेज स्टुडंट, नोकरीपेशा ते व्यावसायिक अशा सगळ्यांची भूक भागवणारा, खिशाला परवडणारा वडा पाव हा मुंबईत उदयास आला.
रात्रपाळीच्या किंवा दिवसपाळीच्या गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी दादर येथे १९६६ साली वडापावचे पहिले दुकान सुरू झाले. त्यावेळी त्याची किंमत होती अवघी २० पैसे.

१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो २० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.

वडापावाची राजदरबारी लागली वर्णी
यांत्रिकीकरणामुळे गिरण्या बंद झाल्यावर अनेक मराठी युवक वडापावाची गाडी लावू लागले. जागोजागी या गाड्या दिसू लागल्या. त्यावेळी मुंबईत शिवसेनेने या वडापावाला राजाश्रय दिला व त्याचा पाहता पाहता विस्तार वाढला. उत्तर वा मध्यप्रदेशी समोसा आणि दाक्षिणात्य इडली डोशाला टक्कर द्यायला वडापाव सिद्ध झाला. खायला सोपा, हातात धरायला सहज आणि खिशाला परवडणारा वडापाव मग मुंबईचा राजा बनला.

वडापावाची बदलती रुपे
काळानुरूप व बदलत्या पिढीनुसार वडापावाचे रंगरुपही बदलत गेले.. आज अनेक परदेशी कंपन्यांनी देशभरात वडापावचे जाळे विणलेले आहे.. कित्येक मराठी कुटुंबे वडापावाच्या भरवशावर संपन्न झाली आहेत.. केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे.

६६ वर्षांच्या आजी लय भारी! रेसिपी चॅनेलला तब्बल ३३ मिलियन व्ह्यूज; चार लाख सबस्क्रायबर्स

रेसिपी चॅनेल

नागपूर : ६६ वर्षीय ओमानाम्मा फारच संकोचून जातात जेव्हा लोक त्यांना विचारतात की, व्हिडिओमध्ये तुम्ही एवढ्या गंभीर का असता.. त्यावर त्यांचे एकच माफक उत्तर असते की, मला कुठलेही काम करताना विनाकारण हंसत राहणे आवडत नाही..
या आहेत, १८० व्हिडिओजमध्ये काम केलेल्या, केरळमधील पथ्थनमथिट्टा गावच्या ओमाना अम्मा.. यू ट्यूबवर सध्या सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या ‘व्हिलेज कुकींग-केरळ’ या चॅनेलच्या प्रमुख कलाकार..
केरळी पद्धतीची गुंडाळलेली लुंगी त्यावर ओढलेले एक वस्त्र किंवा नेसलेली दाक्षिणात्य साडी, केसांचा मागे बांधलेला लहानसा बुचडा, हातात लाकडी मुठीचा लोखंडी मोठा चाकू आणि चेहऱ्यावर कमालीचे गंभीर भाव.. अशा पेहरावातील ओमाना अम्मा जेव्हा पदार्थ बनवायला हाती घेतात तेव्हा त्या जणु एक अत्त्युच्च कलाकृती सादर करत असल्यासारख्याच भासतात.

जुने ते सोने या धर्तीवर पारंपारिक खाद्यपदार्थांवर अधिक भर देण्याचा ट्रेंड काही काळापासून सोशल मिडियावर अधिराज्य गाजवताना दिसतो आहे. आजी-पणजीच्या काळातील खाद्यसंस्कृतीचा शोध घेऊन तो पुढच्या पिढीच्या हाती सोपविला जातो आहे. यातच व्हिलेज कुकींग केरला या यू ट्यूब चॅनेलने अवघ्या तीन वर्षात जग पादाक्रांत केल्याने त्यात प्रमुख भूमिका असलेल्या ओमानाअम्मा जगप्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत.
१९१७ साली अमजित एस व अभिजित एस या दोन जुळ्या भावंडांनी या चॅनेलची सुरुवात केली. यातील अभिजित यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. केरळमधील पारंपारिक व ग्रामीण भागातील पदार्थांची जगाला ओळख करून देणे हा त्यामागचा हेतू.

केरळमधल्या रान्नी या शहरापासून १५ कि.मी. दूर असलेल्या पोथुपारा या लहानशा खेड्यात व्हिलेज कुकींग केरलाचे शूटींग होत असते. मातीच्या भांड्यात चुलीवर शिजवलेले पदार्थ पाहताना त्याविषयीची खात्री पाहणाऱ्याच्या मनात नकळतच तयार होत जाते.
ओमाना अम्मांविषयी बोलताना अमजित सांगतात, त्या आमच्या नात्यात आहेत. हे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना विचारले तेव्हा त्या फार अवघडल्या होत्या. बराच काळानंतर त्या आता व्हिडिओ शूटमध्ये सहजतेने वावरतात. त्यांना इतर निवेदकांसारखे हंसत हंसत व लांबलचक बोलायला आवडत नाही. त्यांना मनापासून काम करणे आवडते. त्यांचे तसे नैसर्गिक असणेच मग आम्ही कायम ठेवले आणि त्याचमुळे त्या जगभरात लोकप्रियही ठरल्या.

ओमाना अम्मांचा चाकू
ओमाना अम्मा यांच्या हातात असलेला चाकू हा त्यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या २४ वर्षांपासून तो त्यांच्याजवळ आहे. त्याची धार अजिबात कमी झालेली नाही वा तो खराबही झाला नाही असं त्या सांगतात. त्यांच्यासोबत ज्या इतर स्त्रियांनी तो घेतला त्या सर्वांचे चाकू आता खराब झालेत किंवा टाकून द्यावे लागले आहेत. ओमाना अम्मांचा चाकू मात्र जसाच्या तसाच आहे. त्या चाकूने त्या सोलणे, चिरणे अशी सर्वच कामे करू शकतात. त्यांच्या हातातून कुठलीही भाजी चिरताना पाहणे हा एक वेगळ्याच आनंदाचा भाग असतो. अतिशय कुशलतेने त्या भाजी चिरत असतात.

पारंपारिक केरळी खाद्यपदार्थांचा समावेश
डोसा इडली वा सांबार यापलिकडे असणारे, अतिशय चविष्ट असे अनेक केरळी पदार्थ आहेत. ज्यात थोरन, वेगवेगळ्या चटण्या, लोणची, भाज्या, तळणीचे पदार्थ, स्नॅक्स, गोड पदार्थ यांचा समावेश होतो. या चॅनेलवर हे सर्व पदार्थ पहाता येतील.

स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा

तुकाराम मुंढे

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट ही चिंता करण्याची स्थिती असून, नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.

जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यात नागपुरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण एकाएकी वाढले व मृत्यूदरही वाढता असण्यामागे काय कारणे आहेत व त्याचा प्रतिरोध कसा करावा याबाबत त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली.
सध्या नागपुरात १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत व ५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.
यामागे अनेक कारणे आहेत. यात नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न राखणे, गर्दी करणे, दवाखान्यात उशीरा जाणे, आजारपण लपवणे, खोकताना वा शिंकताना काळजी न घेणे अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली.

प्रशासन वा सरकार काही करत नाही, असं नागरिक म्हणतात. मात्र नागरिक काय करत आहेत हे ते पाहत नाहीत. सणावारांचे दिवस आहेत. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांनी बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे. घरातून निघताना व घरी परतल्यावर सर्व काळजीचे नियम पाळले पाहिजेत.

नागरिक बाहेर पडताना मास्क घालत नाहीत. समोर पोलीस दिसला की थोडा वेळ मास्क लावतात. नंतर काढून टाकतात. तसे करून ते स्वत:चा जीव तर धोक्यात घालताच पण इतरांचाही घालत असतात.

नागपुरात कोरोना वाढतोय यामागे काय कारणे आहेत, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची गरज आहे.
मार्च एप्रिलमध्ये नागपुरात तंबाखू, खर्रा खाण्याचे प्रमाण झपाटयाने कमी झाले होते. मात्र जुलै ऑगस्टमध्ये हे प्रमाण पुन्हा पूर्ववत झाल्याचे आढळून आले आहे. हीदेखील एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. या सोशल निवेदनात त्यांनी अनेक लहानसहान गोष्टींपासून ते मोठ्या बाबींपर्यंतच्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला.

जुन्या व्हिडिओला हेतूपुरस्सरपणे दाखवले जात आहे
मार्चमहिन्यात शासनाच्या निर्देशानुसार फक्त डॉक्टर व रुग्णांनी मास्क घालणे अनिवार्य होते. त्यावेळी मी काढलेला व्हिडिओ आता दाखवला जातो आहे. मात्र नंतर सरकारने बदलेल्या निर्देशानुसार आम्ही मास्क घालणे अनिवार्य केला आहे. त्याबाबत सतत माहिती देत आहोत व आवाहन करत आहोत. अशा काळात जुना व्हिडिओ दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांनी तसे करू नये. हा खोडसाळपणा बंद करावा.

संत्रा उत्पादकांना रेल्वे स्थानकावर मिळणार जागा

संत्रा उत्पादक

नागपूर : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नागपूर व विभागातील रेल्वे स्थानकावर संत्रा विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या संत्र्याच्या विक्रीसाठी जागा मिळावी, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली होती. त्यावर तात्काळ दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जागा देण्याचे मान्य केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार व रेल्वे अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी रामटेक मतदार संघातील मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध समस्या मांडल्या. नागपूर स्थानकावरून थेट दिल्लीसाठी रेल्वेगाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगून दिल्लीसह हावडा व गोरखपूर स्थानकापर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. नागपूर वर्धा तिसऱ्या लाईनसाठी जमीन अधिग्रहणसंदर्भात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात. बुटीबोरी रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, कळमेश्वरसह काटोल व नरखेड व मोवाड येथेही थांबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.

एमपीएससी परीक्षा केंद्र बदलण्याच्या मागणीवर भूमिका मांडा

परीक्षा केंद्र
Changes in MPSC syllabus, exams to be descriptive

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांना राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षेचे केंद्र स्वत:च्या सोयीनुसार बदलण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीसह दाखल याचिकेवर एका आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला.

स्टुडन्ट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने ही याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. आधी ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. कोरोना संक्रमणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेकरिता ३७ जिल्ह्यांतील केंद्रांचे पर्याय देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांचे हित लक्षात घेता परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली.

कोरोनामुळे उमेदवार आपापल्या घरी परत गेले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद आहे. परिणामी, दूरच्या परीक्षा केंद्रात जाणे शक्य नाही. करिता हा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला. परंतु, हा निर्णय घेताना समानतेचे तत्त्व पाळण्यात आले नाही. कोरोनाचा फटका केवळ पुणे जिल्हा नाही तर, संपूर्ण राज्यातील उमेदवारांना बसला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांची निवड केली आहे. या शहरात राहून परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सध्या आपापल्या घरी आहेत. त्यांनाही या काळात लांबच्या परीक्षा केंद्रात येणे शक्य नाही. शेकडो उमेदवार दुर्बल घटकातील आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचीही झपाट्याने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता संपूर्ण राज्यातील उमेदवारांना त्यांच्या सुविधेनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची अनुमती देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.

Ganesh Mahotsav; नागपुरातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी

नागपूरकरांनी

नागपूर : पर्यावरण संवर्धनाचा विचार करता यावर्षी नागपूर शहरातील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे.

महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. नागपूर शहरातील सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव या तलावात मूर्ती विसर्जनाला मागील काही वर्षांपासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. फक्त फुटाळा तलावात सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. परंतु यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती चार फुटाच्या असल्याने कृत्रिम तलावात या मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

नागपूर-इंदूर विमानसेवा २५ पासून सुरू होणार

विमानसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ ऑगस्टपासून नागपूर-इंदूर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्स या उड्डाणाचे संचालन एटीआर विमानाने करणार आहे. विमानाची प्रवासी क्षमता ७२ सिटची आहे.

२५ आॅगस्टला इंदूरहून पहिले उड्डाण ६ई ७२८९ सकाळी ११.३५ वाजता रवाना होईल आणि दुपारी १२.४० वाजता नागपुरात पोहोचेल. हे विमान नागपुरातून ६ई ८२९८ दुपारी १.०५ वाजता टेक आॅफ करून दुपारी २.१० वाजता इंदूर येथे उतरेल. हे उड्डाण दरदिवशी राहणार आहे. उल्लेखनीय असे की, लॉकडाऊनपूर्वी नागपूर-इंदूरकरिता विमानसेवा उपलब्ध होती. ही सेवा १८० सिटच्या विमानाने होती. हे विमान बंगळुरुहून नागपुरात येऊन इंदूरकडे रवाना व्हायचे आणि इंदूरहून मुंबई-दिल्ली आणि दिल्लीहून रांचीकडे जायचे. त्यावेळी नागपुरातून इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असतानाही या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानात बंगळुरूहून इंदूरकरिता प्रवासी राहायचे आणि नागपूरला पोहोचल्यानंतर येथून प्रवाशांना घेऊन विमान निघायचे. इंदूरकरिता कमी प्रवासी संख्या असल्याने सध्या कंपनी ७२ सिटचे एटीआर विमान चालवित आहे.

नागपुरातून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे उड्डाणे उपलब्ध आहेत, पण पूर्वेकडे आणि महत्त्वपूर्ण शहराच्या स्वरुपात कोलकाताकडे जाणारे विमान सध्या सुरू झालेले नाही. पश्चिम बंगाल शासनाकडून हिरवी झेंडी मिळाग्ल्यानंतरच या मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे.

देशात नागपूर १८ वे स्वच्छ शहर; राज्यात पाचवा क्रमांक

स्वच्छ

नागपूर: केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यात, इंदूर शहराने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. तर नागपूरने ५७ व्या स्थानावरुन झेप घेत १८ वा क्रमांक मिळविला तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावला.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २९ क्रमांकाने झेप घेतली आहे.
राज्यात नवी मुंबई प्रथम क्रमांकावर असून नाशिक दुसरा, ठाणे तिसरा तर पुणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे.

इंदूर शहराने देशात पहिला क्रमांक कायम ठेवला. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कें द्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे नागपूरसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता सर्व्हेक्षण करण्यात आले. केंद्रीय पथकाच्या पाहाणी नंतर केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे निकाल जाहीर करण्यात आला.

नागपुरात ‘भाजयुमो’ने काढला महाविकास आघाडी सरकारचा बडगा

बडगा

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या काळात लोक आर्थिक संकटातून जात असताना विजेच्या वाढीव बिलामुळे अधिकचा मार बसलेला आहे. पण हे सरकार पाझर न फुटणाऱ्या दगडाप्रमाणे ठप्प बसले आहे. म्हणून भाजपा युवा मोर्चाने कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत असलेला सरकाररुपी बडग्या बनवला, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रतापनगर चौक, दक्षिण नागपुरात छोटा ताजबाग चौक, पूर्व नागपुरातील छापरू नगर चौक, मध्य नागपुरातील बडकस चौक, पश्चिम नागपुरातील शंकरनगर चौक व उत्तर नागपुरातील कमाल चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांना आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ.मिलींद माने, किशोर पलांदुरकर, सुबोध आचार्य, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, सुनील हिरणवार, अमर बागडे, शिवानी दाणी, प्रसाद मुजुमदार, कमलेश पांडे, प्रणय पाटणे, यश सातपुते,सारंग कदम, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, आलोक पांडे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

बंदी असताना कसे निघाले बडगे?
‘भाजयुमो’तर्फे बडगे काढत असताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले नाही. शिवाय अनेक कार्यकर्ते बिना ‘मास्क’चे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीची परवानगी पोलीस आणि प्रशासनाने नाकारली होती. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात आदेशदेखील दिले होते. सोबतच शहरात बडग्यांच्या मिरवणुका निघू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण ‘भाजयुमो’चे कार्यकर्ते नियम तोडून बडग्यांची मिरवणूक काढत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर पोलिसांच्या डोळ्यादेखत बडगे काढण्यात आले.

कोरोनाला घेऊन जा गे मारबत…

मारबत

नागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सव यंदा कोरोनामुळे पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा झाला. मिरवणूक आणि धामधुमीत साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यावर निर्बंध घातले होते. त्यामुळे श्रद्धेय असलेल्या पिवळ्या मारबतीचे विसर्जन निवडक पदाधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत ही मिरवणूक नेहरू पुतळा, इतवारी, गांधीबाग, महाल, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, तांडापेठ या भागातून जायची. शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोक मारबत उत्सव बघायला रस्त्यावर उतरायचे. पण यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली. पण पिवळी आणि काळी मारबतीला श्रद्धेचे स्थान असल्याने दोन्ही मारबतींची निर्मिती करून स्थापना करण्यात आली.

पूजाअर्चा करून बुधवारी मारबतीचे विसर्जन करण्यात आले. पिवळ्या मारबतीचे विसर्जन जागनाथ बुधवारी परिसरातच पार पडले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही लोक मारबतीचे दर्शन घेण्यासाठी गल्लीबोळीत उभे होते. यावेळी उपस्थितांनी ‘कोरोनाला घेऊन जा गे मारबत…’ असे आवाहन केले. पूजाअर्चा करून विसर्जन झाले.

यंदा पिवळी-काळी मारबत भेटलीच नाही
नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत उत्सव समितीतर्फे काळ्या मारबतीची निर्मिती करण्यात येते. जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची नेहरू पुतळ्याजवळ भेट होते. कोरोनामुळे यंदा त्यांची भेट झाली नाही. काळी मारबत उत्सव समितीने मिरवणूक न काढता नेहरू पुतळ्याजवळ मारबतीचे विसर्जन केले.

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोविड हॉस्पिटल’

Maharashtra govt fixes Covid-19 treatment cost for private hospitals

नागपूर : शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड- १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून या सर्व रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली आहे. या संपूर्ण रुग्णालयांतील १८७६ एकूण बेड्स पैकी २५६ बेडस् अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेली ९९७ तर ६२३ ऑक्सिजन नसलेले बेड्स आहेत. संपूर्ण रुग्णालय मिळून एकूण ९० व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे.

असे आहेत कोविड हॉस्पिटल
कोविड हॉस्पिटल म्हणून म्हणून मान्यता मिळालेल्यात ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक (१५० बेड्स), सेव्हन स्टार हॉस्पिटल, (१०५), श्री भवानी मल्टी स्पेशालिटी जगनाडे चौक अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पुनापूर (११०), गंगा केअर हॉस्पिटल, रामदासपेठ (१०५), श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पूर्व वर्धमान नगर (१५०), लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी (१५०), कुणाल हॉस्पिटल, मानकापूर (१००), होप हॉस्पिटल, टेका नाका (१००), सेंट्रल हॉस्पिटल, रामदासपेठ (५०), वोक्हार्ट हॉस्पिटल, गांधीनगर (४५), रेडिअन्स हॉस्पिटल वर्धमाननगर (६५), वोक्हार्ट हॉस्पिटल, नॉर्थ अंबाझरी रोड (११८), किंग्जवे हॉस्पिटल, कस्तूरचंद पार्क जवळ (२२८), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि.,मानकापूर (२००), न्यू एरा हॉस्पिटल, टेलिफोन एक्स्चेंज चौक (१००), व्हिम्स हॉस्पिटल (१००) या रुग्णालयांचा समावेश आहे.

हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या काय?
कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे, त्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाप्रति काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अतिगंभीर असेल तर त्याला सर्वप्रथम उपचार देणे, आवश्यकता असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्या रुग्णाला स्टेबल करणे, हे त्या रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य राहील. ज्या रुग्णांकडे थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे. शासनाच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे.

केंद्रीय कॉल सेंटर
महापालिकेने आता कोविड कॉल सेंटरचा विस्तार करीत केंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित केले आहे. तुकाराम मुंढे यांनी बुधवारी या केंद्रीय कॉल सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते.

३४ कोविड चाचणी केंद्र
ज्या व्यक्तीला कोविड सदृश लक्षणे आहेत अथवा जे व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी तातडीने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी मनपाने ३४ कोविड चाचणी केंद्राची व्यवस्था केली आहे. ६ कोविड चाचणी केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचणी ज्या केंद्रांवर होते त्या केंद्रांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रवि भवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राज नगर या केंद्रांचा समावेश आहे. येथे सकाळी १० ते २ या वेळेत चाचणी सुरू राहील. अन्य २८ केंद्रांमध्ये मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

Best places to visit in nagpur

नागपूर: हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट ठरणार वरदान

The metro city NAGPUR is known as orange city , and also know for sweet called ” santra burfi “. Being a developing city in vidarbha nagpur also known for big shopping malls and lakes .

In last 10 years NAGPUR is one of fastest growing economy across maharashtra and plays a pivotal role in major commercial activities.

Due to fast growing economy nagpur has given rise to big shopping malls . Here is information about malls in nagpur ;

The metro city NAGPUR is known as orange city , and also know for sweet called ” santra burfi “. Being a developing city in vidarbha nagpur also known for big shopping malls and lakes .

In last 10 years NAGPUR is one of fastest growing economy across maharashtra and plays a pivotal role in major commercial activities.

Here are some list of places to visit nagpur :-

1. DEEKSHA BHOOMI :-

Its beautiful place to visit in Nagpur and famous place in Nagpur as well . Its a marvelous architectural body and can accommodate more than 5,000 people . It is built by using high quality special material like Dholpur sandstone, marbles & granites and is 120 feet in height.

deeksha bhoomi

It’s a kind religious for place for BUDDHIST who gather here on Ashoka Vijaya Dashmi and give tribute to DR. BABASAHEB AMBEDKAR .

2. AMBAZARI LAKE :-

This lake situated towards southwest border of the city . This lake is the point from where the Nag river originates and amongst 11 is the largest lake in the Nagpur .

ambazari lake

Beautiful place to visit in Nagpur , you can enjoy the peace of lake and crowded area of garden as well which is just beside the lake known as AMBAZARI GARDEN.

3. SWAMINARAYAN TEMPLE :-

Wonderful place for picnic with friends and family, and children can enjoy too in separate garden with childhood equipments for fun. It is build with beautiful architectural skill and design .

swaminarayan temple

You can enjoy the piece of goddess there and it has well fascinated food canteen for refreshment as well .

4. MAHARAJBAGH ZOO:-

Zoo situated in central heart of Nagpur with separate parking place . it is a small zoo where animals are kept in a cage. There is also an aquarium having a good collection of fishes .

maharaj bagh zoo

A good specious garden for fun makes the zoo more adventurous.

5. Futala lake :-

Lake is built in seminary hills, best place to chill out with friends and family. You can enjoy the peace of waves in lake and crowd of youngster as well . Many hawkers and street food stalls which increases the shine and chilling spot in nagpur .

futala lake

Giftadda festival offers

festival

Diwali the festival of light celebrate in india , usually lasting five days and celebrated during the Hindu Lunisolar month Kartika (between mid-October and mid-November). One of the most popular festivals of Hinduism, Diwali symbolizes the spiritual “victory light over darkness”, good over evil .

In india diwali is celebrated in joyful way , people use to clean and renovate their home , buy new products for home decor . This festival also known for laxmi devi so people use to buy gold on this special occasion . On this special occasion every house brightened by beautiful lights and diyas , people use to wear new clothes and burn crackers .

On this special occasion Giftadda started various offers and discount for customers. This begins on the month of september and ends on the month of october , so don’t think too much and download giftadda app from playstore and take benefit of those offers and discount .

Giftadda is Nagpur based online shopping app which is basically for citizens of Nagpur .
Giftadda makes the festival of diwali more special for your beloved by surprising them with some special things.

You can order gifts, handcrafts product , lightings for home ,unique vintage products , kitchen products , handlooms , and what not from a single Gifting mobile app on your phone.

We oversee every aspect of products we listed; You will find high quality products at reasonable prices. We also offer you perfect combo product at reasonable price .

Our gift will be designed and delivered by local Nagpur Vendors who have passed our high quality excellence standards for membership in our gift delivery network.

Online gift delivery in Nagpur is very easy now! .You just need to use giftadda app and select the item for gift to your beloved and rest of the co-ordination will handle giftadda .
We will take care of all your instructions like if you want to deliver your product in nicely packed way we will make arrangement for that , or if you want to convey any special message on this festival occasion to recepier etc…

After you placed order you will receive an sms on order confirmation. Please contact our helpdesk call 9764123405 if you are unsure. Delivery time may vary depending on your location and the ordered items. You can also track live delivery direct through giftadda app or you can call our helpdesk 9764123405 or our smile carrier for the same

जिम सुरू करण्याबाबत बुधवारी आंदोलन

जिम

नागपूर : महाराष्ट्रात सर्वत्र बंद असलेल्या जिम सुरू करण्याबाबत उद्या, बुधवारी (ता. १९) संपूर्ण नागपूर शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. कोव्हिडचा सामना करताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिम सुरू करणे आवश्यक आहे ही भूमिका घेऊन महापौर संदीप जोशी हे स्वतःसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बुधवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता सोशल डिस्टंनसिंगचे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे. संविधान चौकात होणाऱ्या प्रातिनिधिक आंदोलनात महापौर संदीप जोशी सहभागी होणार आहेत. शहरात विविध ठिकाणी जिम पुढे होणाऱ्या या आंदोलनात सर्व आमदारही सहभागी होणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

अनलॉकमध्ये संपूर्ण देशात जिम सुरू करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात जिम सुरू करण्याबाबत अजूनही कार्यवाही नाही. एकीकडे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करा, असे आवाहन करण्यात येते. परंतू महाराष्ट्रातील जिम मात्र सुरू करण्यात आले नाही. दारूची दुकाने दोन महिन्याआधीच उघडण्यात आली. या दुकानांत सोशल डिस्टंनसिंगचे उल्लंघन होत आहे. दुसरीकडे शॉपिंग मॉलही सुरू करण्यात आले तिथेही सोशल डिस्टंनसिंगचे पालन होत नाही. ही सद्यस्थिती आहे. जिम सुरू करण्याबाबत नागपूर शहरातील जिम असोसिएशन, बॉडी बिल्डर असोसिएशन आणि जिममधील प्रशिक्षकांनी भेट घेऊन जिम सुरू करण्याबाबत विनंती केली. जिम सुरू करण्याच्या मागणीला समर्थन दर्शवित राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पाठींबा देण्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार बुधवारी (ता.१९) शहरातील २२२ जिम समोर जिममध्ये वर्कआउट करणारे पाच जण सोशल डिस्टंनसिंग ठेवून निदर्शन करणार आहेत. या सर्वांचे प्रातिनिधिक निदर्शन संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला पाच बॉडी बिल्डर करतील. जिममध्ये नियमीत जाणारी व्यक्ती म्हणून आपण स्वतःही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या आंदोलनाच्या ठिकाणी फक्त चार लोकांनीच उभे राहावे, सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे तसेच आंदोलन कुठल्याही चौकात न करता आपल्या जिम खालीच करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी आंदोलनात होणार लोकप्रतिनिधी सहभागी

नागपूर शहरातील सर्व आमदार देखील शहरात ज्या ठिकाणी जिमचे आंदोलन असतील त्या ठिकाणी सहभागी होतील. प्रतापनगर चौकातील कोतवाल नगर येथील देशपांडे हेल्थ क्लब पुढे होणाऱ्या आंदोलनात खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार अनिल सोले सहभागी होणार आहेत. मानेवाडा रोडवरील केतन हेल्थ क्लब आणि अयोध्या नगर येथील जॉगर्स फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार मोहन मते सहभागी होतील. इंदोरा चौकातील पम्पिंग जिम समोर होणाऱ्या आंदोलनात माजी आमदार डॉ. मिलिंद माने, राम कुलर रोडवरील फिटनेस कोर्ड यार्ड समोर होणाऱ्या आंदोलनात मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अविज फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार कृष्णा खोपडे, बडकस चौकातील वेस्टर्न जिम समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार प्रवीण दटके, झेंडा चौक महाल येथील बजरंग फिटनेस समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार गिरीश व्यास आणि अग्रसेन चौकातील हार्ड कोर फिटनेस क्लब समोर होणाऱ्या आंदोलनात आमदार विकास कुंभारे सहभागी होणार आहेत.

PM Modi to announce results of ‘Swachh Survekshan 2020’ on August 20

Modi

Prime Minister Narendra Modi will announce the results of ‘Swachh Survekshan 2020’ on August 20. This is the fifth edition of the annual cleanliness survey of the country.

A total of 129 awards will be handed over to the top-performing cities and states in the programme, titled “Swachh Mahotsav”.

The Prime Minister will also be interacting with select beneficiaries, swachhagrahis, and SafaiKarmis under the Swachh Bharat Mission-Urban (SBM-U), from different parts of the country through video conference, according to the Prime Minister’s Office (PMO)

He shall launch the Swachh Survekshan 2020 results dashboard on the occasion, it added.

Swachh Survekshan 2020 is the world’s largest cleanliness survey which ranked a total of 4,242 cities, 62 Cantonment Boards, and 92 Ganga Towns and saw unprecedented participation of 1.87 crore citizens.

The event is being organised by the Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA), Government of India.

Swachh Survekshan was introduced by the government with the objective of generating large scale citizen participation in the Mission, along with inculcating a spirit of healthy competition among cities towards becoming India’s cleanest cities.

MoHUA had conducted Swachh Survekshan 2016 survey for rating 73 major cities in January 2016, followed by Swachh Survekshan 2017 conducted in January-February 2017 for ranking 434 cities. Swachh Survekshan 2018, which, ranked 4,203 cities followed by SS 2019 which not only covered 4,237 cities but was also the first-of-its-kind completely digital survey completed in a record time of 28 days.

In Swachh Survekshan 2020, in order to ensure continuous assessment and sustainability of on-ground performance of cities, the Government had also introduced Swachh Survekshan League, a quarterly cleanliness assessment of cities and towns conducted across three quarters, with 25 per cent weightage integrated into the final Swachh Survekshan results for this year.

Swachh Survekshan has caught the imagination of citizens and stakeholders alike and the increasing participation from citizens with every passing year is testimony to the way in which common citizenry has taken complete ownership of the Swachhata of its cities, PMO stated.

Swachh Survekshan has today made ‘Swachhata’ a thing of motivation and pride – something to look forward to and aspire for. While Mysore had won the award for the Cleanest City of India in the first edition of the survey, Indore has retained the top position for three consecutive years (2017,2018, 2019). The results to be announced on 20 August 2020 will bring the curtains down on the much-anticipated results for the 2020 edition which were delayed owing to the current COVID pandemic.

Another feature of the event will be the bringing together and felicitation of MoHUA’s partner organisations in the SBM-U journey, including the United States Agency for International Development (USAID), Bill & Melinda Gates Foundation (BMGF), Google, etc.

Hardeep Singh Puri, Minister of State (I/C), MoHUA Durga Shanker Mishra, Secretary, MoHUA will be participating in the event along with various Mayors, State Mission Directors, Municipal Commissioners and other stakeholders in the area of urban station and waste management.

मनपाच्या मनमानी विरोधात बुधवारी व्यापाऱ्यांचा बंद

व्यापाऱ्यांचा बंद

नागपूर : महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात सोमवारी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) व नागपूर शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि. (एनसीसीएल) ने आपापल्या कार्यालयात आपात्कालीन बैठक बोलाविली. बैठकीला शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही व्यापारी संस्थांनी १९ ऑगस्ट रोजी नागपूर बंदची घोषणा केली. बंदचा उद्देश पालकमंत्री, मनपा प्रशासन, महापौर, सत्तापक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचे व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून, त्या मंजूर करण्यासाठी दबाव बनविण्याचा प्रयत्न आहे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया व एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला लोकमतशी बोलताना म्हणाले की, लॉकडाऊन व अनलॉकमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था कमकुवत झाली आहे. अशातही प्रशासनाला कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करीत आहोत. तरीही मनपा प्रशासन दररोज नवीन आदेश व्यापाऱ्यांवर लादत आहे.

इतर शहरांमध्ये ऑड-ईव्हन डे पॅटर्नने बाजार सुरू करण्याचे आदेश निरस्त झाले आहेत. पण नागपुरात कायम आहे. त्याचबरोबर मनपा आयुक्तांनी शहरात व्यापार करण्यासाठी ट्रेड लायसन्स घेण्याचा आदेश जाही केला आहे. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल व व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्याचबरोबर व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य करण्याच्या आदेशामुळे अडचणी वाढणार आहे. आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेला व्यापारी दररोज नवीन आदेशाचा बोज सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात येणार आहे. आदेश रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.

महापौर व पालकमंत्र्यांना दिले निवेदन
एनव्हीसीसीच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. सोबतच आयुक्तांनी ट्रेड लायसन्स आदेश रद्द करण्याची विनंती केली. तर एनव्हीसीसी व एनसीसीएलच्या शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन मनपाच्या सभेत व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी विनंती केली.

काय आहेत मुख्य मागण्या
शहरात ऑड-ईव्हन डे पॅटर्न बंद करावा.
मनपा आयुक्तांनी काढलेला ट्रेड लायसन्सचा आदेश रद्द करावा.
व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टचा आदेश मागे घ्यावा.

मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब

मनपा

नागपूर : कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता ‘लर्निंग फ्रॉम होम’
संकल्पनेंतर्गत मनपा शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅन्ड्रॉईड टॅबलेट उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. या प्रकल्पाला एज्युकेशन टॅब बँक असे नाव दिले आहे.

या प्रकल्पांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. सध्या मनपा शाळात इयत्ता दहावीत १७२३ तर बारावीत २१५ विद्यार्थी आहेत. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षणाची नितांत गरज आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.

याबाबतचा प्रस्ताव तयार करून १९५० टॅब खरेदी करण्यात येईल. प्रति टॅब १०,९८८ रुपये याप्रमाणे मनपाला यावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च करावा लागेल. प्रति टॅब संचालित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना दर महिन्याला १५० रुपये खर्च करावा लागेल. यावर मनपाला ३५.१० लाख खर्च रुपये खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना दररोज १.५ जीबी डाटा उपलब्ध करावा लागेल. या प्रकल्पावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळते की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

ई-लर्निंग सॉफ्टवेअर उपलब्ध होणार
टॅबमध्ये केंद्र व राज्य सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या ई-लर्निंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात येईल. राज्य सरकारतर्फे दीक्षा व केंद्र सरकारतर्फे एमएचआरडी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ई-बालभारती, बोलकी बालभारती, आठवी ते दहावी विज्ञान, भूगोल, संस्कृतचे व्हिडिओ, बालभारती यूट्यूब चॅनल, किशोर मासिक आधी साहित्य उपलब्ध होईल.

वर्षाच्या खर्चासाठी तरतूद
प्रति टॅब दरवर्षी १५०० रुपये खर्चाचा अंदाज आहे. याचा विचार करता एका वर्षात त्यासाठी २९.२५ लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. देखभाल व नेट पॅक यावर वर्षाला खर्च होणारे ६४.३५ लाख रुपये शिक्षण विभागाच्या कॉम्प्युटर, प्रिंटर्स, झेरॉक्स व अन्य खरेदी, दुरुस्ती यातून तरतूद करण्याची मागणी स्थायी समितीकडे केली आहे.

नागपुरात पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी ३,५०० पोलीस सज्ज

Maharashtra Government to recruit 20,000 police constables
Maharashtra Government to recruit 20,000 police constables

नागपूर : पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.

मंगळवारी पोळा आणि बुधवारी तान्हा पोळा असे सलग दोन दिवस हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसून लाखमोलाचे पीक पदरात घालून देणाºया बैलाच्या उपकाराची जाणीव ठेवून शेतकरीबांधव पोळा साजरा करतात. दुसºया दिवशी बालगोपालांसाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस मद्यपी आणि जुगारी यांच्यासाठी पर्वणीचे असतात. ठिकठिकाणी जुगार अड्डे भरतात. अवैध दारू विक्रीलाही उधाण आलेले असते. त्यामुळे भांडणे होतात. अनेक गुंड वचपा काढण्याच्या तयारीत असतात. हे सर्व लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.

शहरातील ३२ ही पोलीस ठाण्यातील पोलीस आपापल्या भागात कडक बंदोबस्त ठेवणार आहेत. दोन्ही दिवस दिवसा आणि रात्री पोलिसांची गस्त राहणार असून झोपडपट्टी सर्चिंग मोहीम राबविली जाणार आहे. ठिकठिकाणी छापेमारीही केली जाणार आहे.

असा राहील बंदोबस्त
पोलीस उपायुक्त : ७
सहायक आयुक्त : ८
पोलीस निरीक्षक : ४०
पीएसआय आणि एपीआय : १५०
पोलीस कर्मचारी : २५००
आरसीपी पथक : ६
एसआरपीएफ : २ कंपनी
होमगार्ड : ५५०

SHOPPING MALLS IN NAGPUR

राज्यातील हॉटेल (Hotel) , रेस्तराँ, मॉल्स

The metro city NAGPUR is known as orange city , and also know for sweet called ” santra burfi “. Being a developing city in vidarbha nagpur also known for big shopping malls and lakes .

In last 10 years NAGPUR is one of fastest growing economy across maharashtra and plays a pivotal role in major commercial activities.

Due to fast growing economy nagpur has given rise to big shopping malls . Here is information about malls in nagpur ;

  1. EMPRESS MALL : –

            Being a biggest shopping mall in nagpur it also known for national and international brand shop . International brand like Tommy Hilfiger, Gucci, Versace, etc and national brand like pantaloon , reliance , lifestyle , bigbazaar , etc. You can find here kids shops , electronic shops , home accessories , food court and what not . It has a big spacious parking area for two wheeler and four wheeler as well . This mall also give a facility of PVR cinemas and play zone for kids . The mall is constructed in cotton market near gandhi sagar lake .

  2. CENTRAL MALL : –

             Central mall in nagpur is know for his high quality brand and offers . Central mall offers various types of discount in their products which attracts customer towards this mall . Central is a renowned retail shopping chain pan India. This chain has its outlets in almost all cities of India . This mall is constructed in Ramdaspeth .

  3. ETERNITY MALL : –

             Eternity mall is known for its maintenance in nagpur . It has national as well as international brands and apart from this shopping mall provides quality PVR cinemas and CINEMAX . The mall is also known for its fantastic food court with variety of food items . Eternity mall is constructed in Variety Square, Sitabuldi .

  4. TRILLIUM MALL :-

            Trillium mall is known for its latest construction in nagpur and also know for national brands like Manyavar Mohey, Forest Essentials, Lifestyle & international brand like H&M, Nautica, Van Heusen and more . Trillium mall is constructed in medical square .

 

 

 

 

 

नागपुरातील मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका

मूर्तिकार

नागपूर : यावर्षी गणेश मंडळाला ४ फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याचे नियम प्रशासनाने घालून दिल्याचा फटका मूर्तिकारांना बसला असून उलाढाल कमी झाली आहे. विविध सणांमध्ये नागपूर जिल्ह्यात सहा महिन्यात अर्थात मेपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत जवळपास ५०० मूर्तिकारांचा एकत्रित व्यवसाय ५० कोटींचा असतो. पण यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले.

हिंदू धर्मात मूर्तीपूजेला महत्त्व आहे. सणांमध्ये मूर्ती घरी बसवून मनोभावे पूजा करण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. गेल्यावर्षीपर्यंत मूर्तीची उंची किती असावी, याचे बंधन नव्हते. पण यावर्षी कोरोनामुळे धार्मिक उत्सव थोडक्यात आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरे करण्याचे बंधन आले आहे. एकूण उलाढालीपैकी ७० टक्के व्यवसाय गणेशोत्सवात होतो. याकरिता मूर्तिकार मेच्या पहिल्या आठवड्यापासून तयारी करतात. पण यावर्षी मनपाचे दिशानिर्देश पूर्वी न आल्याने सर्व गणेश मंडळांनी मूर्तींचे ऑर्डर दिले नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनच्या अखेरीस मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. नागपुरात जवळपास १५० ते २०० मोठे मंडळ ८ ते १० फूट उंच मूर्ती बसवितात. पण यावर्षी उंचीच्या बंधनाने अनेकांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहेत. याशिवाय सार्वजनिक, सोसायट्यांमध्ये आणि घरी साजरा करणाऱ्या उत्सवातही गणेश मूर्तीची उंची कमी झाली आहे. यासोबत मूर्तिकारांना होणाºया मिळकतीवर ७० टक्के विपरीत परिणाम झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

रामनवमी, झुलेलाल शोभायात्रा आणि विविध समाजाच्या निघणाºया शोभायात्रांसाठी सजावटीची कामे मूर्तिकारांतर्फे करण्यात येतात. यंदा शोभायात्रा निघाल्याच नाहीच. तसेच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शारदोत्सवात अर्ध्या फूटापासून १० ते १२ फूट उंच मूर्ती होतात. उंचीनुसार किंमत असते. या व्यवसायावर जवळपास कारागीर आणि हेल्पर असे एकूण ५ हजार जण अवलंबून आहेत. पण यंदा व्यवसायच नसल्याने मूर्तिकारांच्या अनेक मदतनिसांनी अन्य व्यवसाय निवडला आहे. गणेश विसर्जनातच कोरोनाचे विसर्जन होऊन मूर्तिकारांच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस यावेत, अशी अपेक्षा मूर्तिकारांनी व्यक्त केली.

CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण

कोव्हॅक्सिन

नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा डोस नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतीय औषध महानियंत्रकाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत १२ सेंटरवर मानवी चाचणी सुरू झाली आहे.

नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू

तंबाखू

नागपूर : नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, खर्रा, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यास एक हजार तर निर्मिती, वितरण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार शहरी भागात आयुक्त महापालिका यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी खर्रा खाऊन थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थांची निर्मिती साठवण व विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल.

यांना आहेत कारवाईचे अधिकार
तंबाखू, खर्रा, सुगंधित सुपारी, गुटखा पान मसाला, मावा व तत्सम पदार्थ खाऊन थुंकणे व विक्री करणऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी संबंधित झोनचे सहायक आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

नागपुरात केबल मुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार

केबल

नागपूर : शहरात स्मार्ट सिटी मिशनचे सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोट्यवधीचा खर्च करून ऑप्टिकल केबलचे जाळे टाकण्यात आले आहे. आता हे केबलचे नेटवर्क शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा देणाºया कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी महाव्यवस्थापक (ई-गव्हर्नन्स) शील घुले आणि नागपुरातील प्रमुख केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.

शहरातील केबल ऑपरेटर्स केबल टाकताना पथदिव्यांचे पोल, टेलिफोनचे पोल, झाडावरून व घरावरून केबल नेतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच वादळ व पावसामुळे केबल तुटून धोका होण्याचा संभव असतो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सर्वत्र भूमिगत केबल टाकण्यात आले आहेत. या अंतर्गत एकंदर ७०० जंक्शन बॉक्सेस आहेत. या जंक्शन बॉक्समधून केबल ऑपरेटर लोकांच्या घरापर्यंत भूमिगत केबल टाकून उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना देऊ शकतील.

एनएसएससीडीसीएल चे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारित शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा विस्तृत प्रस्ताव एनएसएससीडीसीएलचे आगामी संचालक मंडळाचे बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरोणे यांनी दिली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेणारी नागपूर ही देशातील प्रथम स्मार्ट सिटी ठरणार आहे.
नागपूर स्मार्ट सिटीच्या ऑप्टिकल केबल नेटवर्कचे वर्गीकरण झोन स्तरावर, वॉर्ड स्तरावर करण्यात आले आहे अशी माहिती अर्नेस्ट अ‍ॅन्ड यंगचे विशाल नंदे यांनी दिली.

शुल्क निर्धारणासाठी कमिटी
महेश मोरोणे यांनी लीज शुल्क निर्धारित करण्यासाठी घुले व केबल ऑपरेटर यांची एक कमिटी गठित केली आहे. ही कमिटी पुढच्या आठवडयात निर्णय घेईल. कमिटीच्या अहवालावर केबल ऑपरेटर यांच्या पुढील बैठकीत चर्चा करून अंतिम प्रस्ताव संचालक मंडळच्या पुढे निर्णयासाठी ठेवण्यात येईल.

शासनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करू नये – तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

नागपूर : काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे.

समाजातील सर्वच घटकांनी समाजाप्रती असलेलं देणं फेडण्याची ही वेळ आहे. प्रत्येकाने संवेदना जपण्याची ही वेळ आहे. मात्र या संकटकाळातही लोकांच्या असहायतेचा फायदा घेणे योग्य नाही. नेमकं नागपुरातील रुग्णालयात हा प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याकरिता तयार करण्यात आलेल्या समितीने अशा रुग्णालयांना चाप दिला.

अशा काळात नागरिकांच्या गरजेचा जो-जो गैरफायदा घेईल किंवा शाषणाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करेल अशा सर्व व्यक्ती, संस्था, रुग्णालये आदींविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. ती आता अधिक तीव्र करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही कायदा आणि शासनाच्या दिशानिदेर्शांचे उल्लंघन करण्याचे धारिष्ट्य करु नये.

तुकाराम मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे

तुकाराम मुंढे

नागपूर : कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.

२०१२ मध्ये महापालिका सभागृहात पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही दरवाढ केली जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी. आमदार प्रवीण दटके सत्तापक्ष नेते संदीप जाधव ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदींनी यावेळी केली. आंदोलनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० नगरसेवक सहभागी झाले होते.

आंदोलनाबाबत नगरसेवकांत संभ्रम
करण्यात आलेली पाच टक्के पाणी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तरच दरवाढ मागे घेता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वीच आंदोलन केल्याने काही नगरसेवक संभ्रमात होते.

Independence Day 2020: Schools to have flag-hoisting ceremony with strict COVID-19 protocols

flag hoisting

On the wake of the ongoing COVID-19 pandemic special guidelines  have been issued for schools to ensure that no institute skips the celebration. Schools have been advised to hold flag-hoisting on campus with just staff, with social distancing norms. Students are advised to join online later. Patriotic songs will be sung along with speech videos related to the Independence movement. Schools have also been advised to hold different activities digitally such as patriotic poetry and debate competitions, etc. and to create awareness about Atma Nirbhar Bharat.

“The specifically designed guidelines have put an end to schools’ confusion over the Independence Day celebration. Flag-hoisting with limited staff has been allowed under these guidelines. Schools’ heads were looking for clarity on it,” said Prashant Redij, spokesperson for the Maharashtra Schools Principals’ Association. Schools are working on creating videos of patriotic songs, speeches by principals and other activities. “On Independence Day, we will gather through the digital platform to listen to what the principal has to say, following which each class will have specially designed programmes held online,” said Uday Nare, a teacher from Hansraj Morarji School.

मालमत्ता कर व पाणी बिल ५० टक्के माफ करा

बिल

नागपूर : कोविडमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असल्याने मालमत्ता कर आणि पाणी बिल सरसकट ५० टक्के माफ करावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधीची आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात यावा. तसेच मनपा कायद्यानुसार शास्ती माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यांनी मालमत्ता कर व पाणीबिलावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले.

मालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील सभागृहात शहरातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. आ. कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, नागो गाणार, मोहन मते, प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.

कृष्णा खोपडे म्हणाले, सध्याच्या काळात नागरिक संकटात आहे. ५० टक्के कर माफ केल्यास जनतेला दिलासा मिळेल. प्रवीण दटके म्हणाले, लोकांना दर महिन्याला कोणतेही बिल दिले जात नाही. पाण्याच्या संदर्भात ओसीडब्ल्यूच्या कंत्राटात तसे नमूद आहे. दर महिन्याला वेळेवर बिल दिले जावे. ते न दिल्यास जनतेसह आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मोहन मते यांनी प्रत्येक महिन्याला नागरिकांना पाण्याचे बिल दिले जात नसल्याने थकबाकीची समस्या वाढत असल्याला दुजोरा दिला. जनतेच्या हितासाठी ५० टक्के कर कपात करण्याची त्यांनी सूचना केली.

गिरीश व्यास यांनीही अशीच भूमिका मांडली. सभागृहात यासंबंधी निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना केली. संदीप जाधव यांनी शास्ती सरसकट माफ करण्याची मागणी करून ‘वन टाइम सेटलमेंट’ची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. तानाजी वनवे यांनीही अशीच भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींची भूमिका लक्षात घेता संदीप जोशी यांनी एप्रिल ते सप्टेंबर या टप्प्यातील मालमत्ता कर व पाण्याचे बिल ५० टक्के करावे. यासंबंधी प्रस्ताव सभागृहात पाठविण्यात यावा व आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात शास्ती माफ करावी, असे निर्देश दिले.

आयुक्तांचे अनुपस्थित राहणे अयोग्य
जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा रोष ते जनप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. यासंबंधी लोकप्रतिनिधी मनपामध्ये बैठका घेतात. अशा बैठकांना मनपा आयुक्तांनी उपस्थित रहाणे अपेक्षित आहे. ३१ जुलैच्य बैठकीला ते उपस्थित नव्हते. बुधवारीही अनुपस्थित राहिले. असे अनुपस्थित राहणे योग्य नाही, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

नागपुरात डॉक्टरसह तिघांची १० लाखांनी फसवणूक

सोयाबीन

नागपूर : खासगी फायनान्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून डॉक्टरसह तिघांना १०.६५ लाख रुपयांनी गंडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्या अमरावतीच्या अनुज नरेंद्र भुयार (३७) नामक तरुणाला बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनुज खाजगी फायनान्स कंपनीत मॅनेजर होता. घोटाळा करण्याच्या आरोपात कंपनीने त्याला कामावरून काढले होते. त्यानंतर तो लोकांना जाळ्यात ओढत होता. त्याला कंपनीशी जुळलेल्या लोकांची माहिती होती. तो लोकांना गुंतवणूक केल्यास अधिक व्याज देण्याचे व विमा काढण्याचे आमिष दाखवत होता. त्याने अमरावतीचे डॉ. योगेश बोंडे, डॉ. चैतन्य कायंदे व प्रेमानंद टकोरे यांच्याकडून १०.६५ लाख रुपये वसूल केले. काही दिवसानंतर लोकांना अनुजचे सत्य लक्षात आले. त्यातील प्रेमानंद टकोरे यांनी बजाजनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचे प्रकरण दाखल करीत आरोपी अनुजला अटक केली.

नागपुरातील नरेंद्र हिवरे यांना गृहमंत्री पदक

नरेंद्र हिवरे

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांना २०२० चे केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले आहे. राज्यातील १० अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे. यात हिवरे हे विदर्भातील एकमेव अधिकारी आहेत. २०१९ मध्ये गांधीसागर तलावात एका युवकाचा मृतदेह सापडला होता. दोन पोत्यांमध्ये सात तुकडे केलेला मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. त्यावेळी हिवरे हे गुन्हे शाखेत तैनात होते. डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात हिवरे यांनी तपास सुरू केला. त्यांच्या पथकाने ५०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. २८ दिवसाच्या तपासानंतर मृत हा सुधाकर रंगारी असल्याची ओळख पटवण्यात आली. त्याचा खून करणारे राहुल भोतमांगे आणि राहुल रंगारी यांनाही अटक करण्यात आली. सप्टेंबर २०१९ मध्ये डीजीपीने या प्रकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करून हिवरे यांना १० हजार रुपयांचे बक्षीसही दिले होते. पदक मिळाल्यावर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही त्यांना ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
37 ° C
37 °
37 °
14 %
0kmh
0 %
Sun
37 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
43 °
Thu
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...