नागपूर : ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.
सोमवारी १,२२७ नव्या रुग्णांची व ३४ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २९,५५५ तर मृतांची संख्या १,०४५ झाली आहे. आज १,२२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९६४ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १,५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. ऑगस्ट महिन्यात भयावह पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ झाली. यामुळे या महिन्यात रुग्णसंख्या वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जे प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करू शकतील तेच कोरोनाला दूर ठेवू शकतील, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.
रॅपिड अॅन्टिजन चाचणीत ६४५ पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात आज १,९३० रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १,८९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात ५८२ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. एम्समध्ये ७८, मेडिकलमध्ये ७४, मेयोमध्ये ५०, माफसूमध्ये ७३, नीरीमध्ये ५१ तर खासगी प्रयोगशाळेतून २५६ पॉझिटिव्ह आले. ९,२६६ रुग्ण उपचाराखाली असून आतापर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०१५, ग्रामीण भागातील २११ तर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे.
३१ दिवसांत ९१९ मृत्यू
जुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले तर मागील महिन्याच्या ३१ दिवसात ९१९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात दोन मृत्यूची नोंद होती. परंतु त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले. जुने व नियंत्रणात नसलेले आजार, वाढलेले वय व उपचारात झालेला उशीर हे बहुसंख्य रुग्णांमध्ये मृत्यूचे कारण ठरले आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ३,८२३
बाधित रुग्ण : २९,५५५
बरे झालेले : १९,२४४
उपचार घेत असलेले रुग्ण : ९,२६६
मृत्यू : १,०४५
नागपूर : नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकेंद्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही कामे करण्यात आली.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी ) सुहास रंगारी यांच्या हस्ते सेमिनरी हिल्स उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, प्रादेशिक कार्यालयातील अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अविनाश सहारे, खोब्रागडे नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते आदी अधिकारी उपस्थित होते. या नवीन रोहित्रामुळे परिसरातील हजारीपहाड,आकारनगर, जागृती कॉलनी, गौरखेडे कॉम्प्लेक्स, वायुसेना नगर, नर्मदा कॉलनी, सुरेंद्रगड, भीमटेकडी, म्हाडा कॉलनी येथील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
अजनी येथेही १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे अजनी, प्रशांत नगर, समर्थ नगर व परिसरातील हजारो ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी अजनी केवळ स्विचिंग स्टेशन होते तेथे रोहित्र बसविण्यात आल्याने ते उपकेंद्र झाले आहे.
नागपूर : पुरात अडकलेल्या मौदा तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर महापालिकेच्या अग्निशमन पथकाने बचाव कार्य राबवून ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. मनपाच्या सक्करदरा व लकडगंज अग्निशमन स्थानकातील पथकाद्वारे संयुक्तरीत्या हे बचाव कार्य करण्यात आले.
रविवारी मौदा येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याकरिता मौदा तहसील कार्यालयाद्वारे मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी बोट व सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य पथकातील अग्निशमन विमोचक शिर्के, एस. घुमडे, पालवे, आर.चवरे, यंत्र चालक एस.देशमुख, यंत्र चालक जी. बावणे व एन. यडवे यांनी वळणा व कोट या दोन्ही गावातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. मनपाच्या अग्निशमन पथकाच्या या कामगिरीबद्दल महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.
१६०० जनावरांचा मृत्यू : साडेसात हजार घरे पडली
पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले. सुदैवाने जीवहानी झाली नसली तरी आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. पुरामुळे १६०२ जनावरांचा मृत्यू झाला, तर ७,७६५ घरे पडल्याची माहिती आहे.
पुराचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मौदा,कामठी,पारशिवनी,कुही, सावनेर या तालुक्याला बसला आहे. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात झाले. पुराच्या पाण्यात तालुक्यातील १५९१ जनावरे वाहून गेली तर १४६३ घरे पडली. कामठी तालुक्यातील २ जनावरे वाहून गेली तर १७१५ घरे पडली. काटोल तालुक्यातील १ जनावर वाहून गेले आणि १२१ घरे पडली. सावनेर तालुक्यात ३ जनावरे वाहून गेली तर ३४८ घरे पडली. रामटेक तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन जनावरांचा मृत्यू झाला आणि २६३ घरे पडली. भिवापूर तालुक्यातील २ जनावरे वाहून गेली तर १० घरे पडली. कुही तालुक्यात ९० घरांचे नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यात ३,५०० घरांचे नुकसान झाले.
New Delhi, August , 2020: PepsiCo India today unveiled a new look for its leading juice brand Tropicana. Tropicana’s tasty and refreshing juices will now be available in a cool new PET bottle which is affordable, attractive and provides a convenient solution to consumers on-the-go. In addition, Tropicana also introduced a new campaign ‘Hawabaazi Gone, Asli On’ which intends to bring alive the persona of the Tropicana drinker by showing a comparison of two different personalities – the frivolous and show off ‘Hawabaaz’ and the ‘Authentic Cool Doers’ which demonstrate the Tropicana consumer. The campaign TVC builds on the need for authenticity by today’s youth vs show-off or false pretenses and intends to celebrate the spirit of people who are genuine and perform in life.
The new PET bottle is a reiteration of the brand’s commitment towards pioneering new innovations and has been developed basis extensive consumer feedback. Available in 200ml and 500ml variants across all flavors, the new vibrant, transparent bottles give consumers a cool new way to enjoy refreshing goodness on-the-go.
The material (PET) used for Tropicana Aseptic PET is 100% recyclable and contributes to preserving the environment for good. The product in PET is made using the aseptic technology, which involves procedures that prevent microbial contamination with no addition of preservatives keeping Tropicana safe for consumers.
Commenting on the launch, Vineet Sharma, Director, Juices, PepsiCo India, said, “Tropicana is one of the leading players in the Indian juice and juice drinks market, and we are all set to unlock additional growth not only for the brand but also the category. Tropicana’s new attractive PET packaging and revamped positioning are aimed to accelerating its growth by expanding availability.”
“We are very excited to launch the ‘Hawabaazi Gone, Asli On’ campaign targeting the youth. The campaign brings about a clear distinction between doers vs people who just talk, thereby celebrating the genuineness of the young generation. The campaign has been developed basis extensive consumer research and builds on the codes of authenticity, which are very important to consumers today. Today’s youth believes in working hard and making it big on their own and that is the core messaging of the new campaign. We are confident the new positioning and campaign will help Tropicana strengthen connect with them.” he further added
Commenting on the campaign, Reshma Banerjee Senior Creative Director, Wunderman Thompson also said, Tropicana as a brand has been an obvious choice for many of today’s generation who believe in being authentic and play by actions to prove themselves in comparison to those who are all talk and no show. The campaign encapsulates this thought throwing light on the fact that the show off [hawabaaz] bubble of confidence bursts when faced with a situation but the Asli guy, filled with the inherent goodness not just wins the day, but also goes a long way. This inspires the youth to not get stuck in the fake garb of being a hawabaaz but to be genuine, authentic, and hence Asli. In a nutshell, with Tropicana, Hawabaazi Gone, Asli On!
Treeview has partnered with QThree Ventures to introduce its products into India, Middle East and African countries.
The company has introduced an entire line-up of Smart TVs in India Bollywood actor and style icon Hrithik Roshan will be the brand ambassador for Treeview in India
India, 2020:Treeview Co. Ltd., Thailand’s leading LED TV& appliances manufacturer,today announced its India entry with the launch of a range of Smart Android Full HD TV models. The company has entered into a global partnership with QThree Ventures to introduce its products in India, Middle East, European and select African countries. The TV units will be available widely across India at partner consumer electronics stores. Bollywood actor and style icon Hrithik Roshan will be the brand ambassador for Treeview in India.
Established in 2001, Treeview Co. Ltd. has redefined the world of digital entertainment by offering cutting-edge products at affordable prices. The brand has grown to become the largest manufacturer of LED TVs in Thailand, exporting high-quality lifestyle products to over 30 countries across the world.
QThree Ventures is a leading Indian Electronics trading company that has revolutionised the distribution and retail of electronics in India. Established in 2014, QThree has previously partnered with several leading consumer electronic brands to implement the go-to-market strategy and provide holistic solutions to multi-national electronic brands entering India. The company offers a full spectrum of services, from logistics, finance,marketing, service support, channel partner management and more,leading to customer value creation and brand growth.
QThree Ventures plans to get into production of electronic appliances and has recently entered into a JV with ABAJ TECHPARK in Gujarat to manufacture Treeview TVs in India. ABAJ TECHPARK is a leading Indian electronics manufacturing company. Together, QThree Ventures and ABAJ will be strengthening their manufacturing capabilities, creating employment opportunities in the country.
Treeview has introduced a series of smart televisions ranging from 24 inch to 65 inches. The company will soon be expanding its range of televisions to include exclusive frameless televisions up to 96 inches. Along with QThree Ventures, Treeview will also be launching laser TVs for the first time in India, which is scalable between 100 inch to 300 inches; all these at very competitive prices.
Celebrated actor Hrithik Roshan will be endorsing the brand in India. A superstar and a trendsetter –
Hrithik Roshan is known as the Millennial Superstar for his global influence amongst the youth. He perfectly embodies the spirit of Treeview – a brand that is powered by honesty, is accessible, affordable, and authentic. Treeview builds a bond with its consumers by being honest in its promise, pricing and post-purchase experience; and there is no one better than Hrithik Roshan to take this message to the consumers.
Speaking on the partnership Chutintorn Sam Gongsakdi, Ambassador of Thailand to India, said, “I am delighted to see that Thailand’s homegrown companies are making a mark globally. Treeview has partnered with QThree Ventures, a leading Indian Electronics trading company, to enter the Indian market. Such alliances help strengthen the India-Thailand economic relationship. I wish Treeview and QThree Ventures all the very best for this partnership.”
Jubin Peter, Founder and Chairman, QThree Ventures Said, “We are delighted to be the global strategic partners for Treeview in India, Middle East, Europe and Africa. Given our expertise and experience in the Indian consumer electronics market, we understand that Treeview has packed in a host of features that provides consumers with the latest technology at extremely competitive prices. Our aim is to target every family residing in metros, tier 2, 3 and 4 cities with Treeview’s exciting line-up of products.”
He further added “In metro cities, we see people opting for bigger TVs. And in tier 2, 3 and 4 cities – they are making a shift to smarter TVs with rich features. With Treeview, we truly believe that we will be able to redefine the digital entertainment and experience for every Indian.”
Speaking on future plans for brand he said,“In an environment where consumption of affordable technology is on a rise, we will invest in developing the brand’s appliance range in our Joint Venture Factory. Whilst the demand for big screen is on an increase due to consumption of internet-based content, we would launch theatre sized Laser TVs which will give a theatre experience to a consumer at home.”
Speaking on the association with Hrithik Roshan, Jubin said “Hrithik Roshan is a youth icon who stands for his belief in hard work, persistence and commitment. He truly personifies the brands’ beliefs and is the perfect fit for taking the Treeview name to every household in India.”
Treeview’s entire range will be available across India starting today.
नागपूर : ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच…’ बालपणी आवडणाऱ्या या कवितेतील आंब्याचे वन आता दिसणार नाही पण पिसारा फुलवून नाचत कुणाचेही लक्ष वेधणाऱ्या मोरांची संख्या मात्र नागपूर शहरात वाढली आहे. होय, अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे.
नागपूरकरांसाठी ही आनंददायक आणि अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल. शहर आणि आसपासचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अशातच गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांच्या संवर्धनाबत केलेले उपाय आणि वाढलेली जागृती महत्त्वाची ठरली असून अनेक प्राण्यांसाठी ही स्थिती पोषक ठरली आहे. तसे मोरांसाठीही हा परिसर पोषक ठरला आहे.
पक्षिप्रेमी संस्थांच्या पहाणीनुसार नागपूर शहर आणि परिसरात मोरांचे अस्तित्व दिसून येत असून ही संख्या १० हजाराच्यावर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मानद वन्यजीव संरक्षक व महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे. अंबाझरी परिसरात ७५० हेक्टरमध्ये २००० हजाराच्या जवळपास मोर आहेत. तसेच गोरेवाडा वन परिसरात २०००, राजभवन व सेमिनरी हिल्स भागात ५००+, नारा नारी भागात ३००-३५०, अमरावती रोडवर कृषी विद्यापीठाच्या परिसर, दिघोरी, पारडी, व्हीएनआयटी, सोनेगाव, सोमलवाडा, मिहान अशा सर्व भागात मोरांचे अस्तित्व आहे.
सर्वेक्षण झाले तर संवर्धन होईल
शहराच्या परिसरात मोठ्या संख्येने मोर आहेत पण त्याचे योग्य सर्वेक्षण होण्याची गरज आहे. वनविभाग, विविध एजन्सी व एनजीओ यांच्या मदतीने सर्वेक्षण झाले तर राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याचे संरक्षण व संवर्धनास मदत होईल, असे मत कुंदन हाते यांनी व्यक्त केले.
पिकॉक डिस्ट्रिक्ट म्हणून मान्यता मिळावी
नागपूर शहराच्या कुठल्याही दिशेला गेल्यास मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. लॉकडाऊनच्या काळात हे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले, हे विशेष. याबाबत बर्डस ऑफ विदर्भ या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. राज्यातील कोणत्याही शहराच्या परिसरात एवढ्या मोठ्या संख्येत मोर नाहीत. त्यामुळे शहराला पिकॉक सिटी म्हणून ओळख मिळावी म्हणून आम्ही प्रस्ताव तयार करीत आहोत.
– अविनाश लोंढे,
पक्षी अभ्यासक
नागपूर : सर्वसामान्यांचा कळीचा विषय असलेले पेट्रोल चे भाव दरदिवशी वाढतच आहे. १५ दिवसात लिटरमागे १.४० रुपयांची वाढ झाली असून दरदिवशी दरात २० ते ३० पैशांची भर पडत आहे. रविवारी पेट्रोल ८९.२३ रुपये होते. पेट्रोलची नव्वदीकडे वाटचाल सुरू असून चार महिन्यात जवळपास १२ रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारात पेट्रोलच्या किमतीत चढउतार होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी रात्री १२ वाजता बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी आणि राज्यांतर्गत व्हॅटची जास्त आकारणी होत असल्याने उत्पादन किमतीपेक्षा दुप्पट किंमत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सरकार कराच्या स्वरुपात सामान्यांच्या खिशातून पैसे काढत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रति लिटर ६७ रुपयांवर असलेल्या डिझेलची रविवारी प्रति लिटर ८०.७१ रुपये दराने विक्री झाली.
लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने अबकारी कर वाढविल्यानंतर राज्य शासनाने जून महिन्यात पेट्रोलवर २ रुपये सेस आकारला. विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भंडारा/नागपूर : संततधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी तर गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यातील नदी तीरावरील अनेक गावांतील घरात पुरा चे पाणी शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशय, इटियाडोह धरण तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्यांवर गेला आहे.
गोसेखुर्दच्या विसर्गामुळे गडचिरोलीत पूर
गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे वैनगंगेच्या उपनद्यांना दाब निर्माण होऊन अनेक मार्ग बंद पडले आहेत. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गडचिरोलीपासून ७ किलोमीटरवर असलेल्या पाल नदीच्या पुराचे पाणी आल्याने गडचिरोली-आरमोरी तसेच गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद पडला आहे. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथील अनेक शेतांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले आहे. पिंपळगाव व चिखलगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्याला पुराचा वेढा
नागपूर जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कन्हान नदीसह जिल्ह्यातील पेंच, कोलार, जाम व वर्धा या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला होता. तर खापा शहरासह काही गावांमध्ये कन्हान व पेंच नदीचे पाणी शिरल्याने एसडीआरएफच्या (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) जवानांची मदत घेण्यात आली. नागपूरजवळील कट्टा येथे घर कोसळून बाजीराव उईके (६०) यांचा मृत्यू झाला. तर अमरावतीमधील झटामझिरी (ता. वरुड) येथे हा युवक तलावात बुडून मृत्युमुखी पडला.
नागपूर/भंडारा/गोंदिया : मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसानंतर संजय सरोवरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पूर्वविदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढून पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा बसला आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असून वैनगंगा नदीला महापूर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील २० गावे अद्याप पाण्याखाली आहेत.
मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात शनिवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी आणि पवनी तालुक्यातील गावांना पुराचा विळखा पडला. अर्धे भंडारा शहर जलमय झाले आहे. मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यात काहींनी घरांच्या छतावर आश्रय घेतला होता. या गावांतील १,२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोंदिया तालुक्यातील ४० आणि तिरोडा तालुक्यातील १० गावांना पुराचा फटका बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीसह उपनद्यांना पूर आला आहे. देसाईगंजसह काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. सावंगी, धरमपुरी येथील ५२ कुटुंबाना स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. जिल्हयातील पाच प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कुलगावात पाणी शिरले.
कोयना १०० टीएमसी पार
सातारा : कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
नाशिकला गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
नाशिक : गंगापूर धरणातील जलसाठा ९४ टक्के झाला असून रविवारी दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूर मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. –
राज्यात १७ टक्के अधिकचा पाऊस
मुंबई : महाराष्टÑात तीन महिन्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १७ टक्के अधिक तर मुंबई शहरात ६७ आणि उपनगरात ६५ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. सर्वच जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला.
राज्यात या काळात सर्वसाधारणपणे ८०८.२ मिमी पावसाची नोंद होते. यावेळी ९४४.२ मिमी पाऊस झाला.
नागपूर । ३६ गावांमध्ये बचावकार्य
पेंच व तोतलाडोह जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे. एनडीआरएफने ३६ गावांमधील १४,२३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. कामठी कनान भागात पूरस्थिती कायम आहे. नागपूर जिल्ह्यात कामठी, पारशिवणी (कन्हान), कुही आणि मौदा तालुक्यांना पुराचा फटका बसला.
पूरपरिस्थितीचा मी सातत्याने आढावा घेत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आहेत.
– बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
चंद्रपूर । ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यातील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.
पाच राज्यांत स्थिती गंभीर
मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्येही सतत पाऊस पडत असल्याने तेथील नद्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांतून विसर्ग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शहरे व गावांत पाणी शिरले आहे.
मध्य प्रदेशातील आठ धरणे १०० टक्के भरली आहेत. नर्मदेला पूर आला असून, त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरातमध्ये स्थिती बिकट आहे. नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्येही पावसाचा जोर सुरू आहे.
नागपूर :सणासुदीत आणि कोरोनाच्या काळात कापूर ची मागणी दुप्पट झाली आहे. कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कच्च्या मालाची आवक कमी असल्याने उत्पादनाची किंमत वाढली आहे. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नसून दिवाळीनंतर कमी होणार असल्याचे मत उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
देशात कापूर उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा ५० टक्के चआहे. याशिवाय चीनमधून होणारी आयात थांबली आहे. त्यामुळे निर्मिती खर्च वाढला आहे. सध्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. याशिवाय कोरोना काळात सोशल मीडियावर कापराच्या होणाºया प्रचारामुळे प्रत्येक जण खरेदी करीत आहे. याशिवाय गणेशोत्सवामुळे मागणी वाढली आहे. तीन महिन्यांपासून साधा किंवा कापºयाच्या वड्यांची (पॅकिंग टॅबलेट) किंमत ठोकमध्ये प्रति किलो ८०० ते ९०० रुपये होती. आता भाव १२०० ते १३०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळमध्ये १७०० ते १८०० हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या किंवा वड्याच्या कापराची पॅकिंगमध्ये विक्री होते.
भीमसेनी किंवा दगड्या कापराच्या किमतीत प्रचंड वाढ
विदर्भात दगड्या (देशी) आणि पश्चिम महाराष्ट्रात भीमसेनी नावाने प्रचलित कापराची किंमत चार महिन्यात ४०० रुपयांनी वाढली असून ठोक बाजारात प्रति किलो १३५० ते १४०० रुपये दर आहेत. किरकोळमध्ये २ हजार रुपयांत विक्री सुरू आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी उत्तम आणि सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून या कापराला मागणी आहे. याशिवाय घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा कापूर जाळला जात आहे. या कापराची विक्री वाढल्याने दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले.
व्यापारी म्हणाले, नागपुरात १३ ते १४ कापूर उत्पादक आहेत. येथून छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, मराठवाडा या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. छत्तीसगड व मध्य प्रदेशात देवी-देवतांची आरती कापूर जाळून केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते. गणेशोत्सव आणि नवरात्रात कापराची मागणी राहणार आहे.
का वाढताहेत दर :
– मागणीच्या तुलनेत कच्च्या मालाचा कमी पुरवठा
– उत्पादन कमी, मागणी जास्त
– कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणून मागणीत वाढ
कच्च्या मालाची किंमत वाढल्याने गेल्या तीन वर्षांपासून कापराचे दर वाढतच आहेत. मागणी वाढल्याने सध्या भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्त भाव चुकते करूनच खरेदी करावी लागत आहे. नवरात्रोत्सवात मागणी वाढणार आहे. दिवाळीनंतर भाव कमी होतील.
-नीलेश सूचक, कापूर उत्पादक़
नागपूर :तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर उपराजधानीतील नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ शहरात निदर्शने झाली. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानादेखील नागपुरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याची बातमी एखाद्या वणव्यासारखी नागपूरकरांमध्ये पसरली आणि नागरिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आम आदमी पक्षासह युवासेनेचे पदाधिकारीही मुंढे यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
‘आप’चे कार्यकर्ते पावसातदेखील आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर युवासेनेतर्फे चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून जर तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झाली नाही तर जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुंढे यांची बदली झाल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी संघाच्या स्वयंसेवकांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घाणेरड्या राजकारणातूनच मुंढे यांची बदली झाल्याची भावना अनेक संघ स्वयंसेवकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून बोलून दाखविली आहे.
मुंढे यांनी नागपुरात खरोखरच चांगले कार्य केले. ‘कोरोना’च्या काळात त्यांनी केलेले नियोजन हे दूरदृष्टी दाखविणारे होते. त्यांची अचानक झालेली बदली ही नागपूरसाठीदेखील नकारात्मक बाब आहे, असे मत संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
‘सोशल मीडिया’वर निघतेय ‘भडास’
‘सोशल मीडिया’वर मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहीमच सुरू झाली. ‘फेबुक’वर ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ यासारखे विविध ‘पेजेस’ तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. काही नागरिकांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहीमदेखील राबविली आहे.
नागपूर : खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्यासाठी जारी अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
ही याचिका धंतोली नागरिक मंडळाने दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी वादग्रस्त अधिसूचनेच्या आधारावर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित केले आहे. कायद्यानुसार मनपा आयुक्त असे आदेश जारी करू शकत नाहीत. धंतोली परिसरात मोठ्या संख्येत खासगी रुग्णालये आहेत. तिथे रोज हजारो रुग्ण व त्यांचे नातलग येतात. त्यामुळे परिसरात सतत गर्दी असते. तसेच, या परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिस्थितीत येथील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले गेल्यास परिसरातील नागरिकांना संक्रणाचा धोका होईल. परिणामी, धंतोलीतील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालय घोषित करण्याचे आदेश रद्द करण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आशुतोष धर्माधिकारी व अॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
दुबई :
सप्टेंबरच्या १९ तारखेपासुन आयपीएलला सुरूवात होत आहे. त्यामुळे आयपीएल संघ दुबईसाठी रवाना होत आहेत. संघाना सहा दिवसांच्या विलगीकरणानंतर सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज मधील बॉलरसह सपोर्ट स्टाफमधील तब्बल १२ जणांना कोरोना लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संघासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. चेन्नई संघातील सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबईमध्ये प्रवेश केल्यानंतर संघातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. दरम्यान, सीएसकेला आणखी एक आठवड्यासाठी विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. चेन्नईचा संघ २१ ऑगस्टला दुबईत दाखल झाला. युएईच्या नियमानुसार त्यांनी सहा दिवस विलगीकरण कक्षात राहण्याचा कालावधी पूर्ण केला होता.
दरम्यान संघातील सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांसह पूर्ण संघाच्या चार कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार होत्या. बीसीसीआयच्या नियमनुसार संघाच्या तीन चाचण्या घेण्यात येतील त्यानंतर संघाला सरावासाठी मैदानात उतरण्याची परवानगी देण्यात येणार होती. दरम्यान संघाच्या दोन चाचण्या पार पडल्या आहेत तिसऱ्या चाचणीचा अहवाल उद्या (दि.२९) येणार आहे.
August 27, 2020: Every year, we celebrate National Day of Sports to honour and commemorate the spirit of legendary sportsperson, Major Dhyan Chand who is regarded as the nation’s greatest hockey player ever. The day was instituted to educate India’s youth on the importance of being fit and healthy, by practicing sports and other physical activities.
Along with a focused approach towards one’s fitness levels, it is equally important to supplement this routine with good nutrition, a balanced diet, and healthy snacking. Good nutrition paves the way to a healthy lifestyle, and is a small investment towards long-term health. This can be achieved, by simply making small, yet relevant and impactful changes to the diet like adding a handful of almonds.
Stressing on the need to eat right to complement one’s sports schedule, Ritika Samaddar, Regional Head – Dietetics, Max Healthcare – Delhi, said, “The amount, composition and choice of food intake can profoundly affect a sports performance. Balancing nutritional needs while practicing a sport or form of exercise is very important as it helps build the foundation for success. A handful of almonds make for the perfect post-workout sport snack, as they provide energy and are known to have satiating properties. Additionally, Almonds also contain healthy fats which are required by the body, and are a good source of protein, which will help enable your sports routine.”
According to Madhuri Ruia, Pilates Expert and Diet & Nutrition Consultant, “Sports and physical exercise are very important for the body’s overall growth and development.But, to optimize your physical training it’s essential to consume balanced and nutritious diets including healthy snacks. Fuel your routine with a handful of almonds, which along with being nutritious also promote heart health. According to a recent research from King’s College London, snacking on almonds everyday improved endothelial function of the arteries and also lowered “bad” LDL-cholesterol – both key indicators of heart health .”
Highlighting the need to snack right while engaging in physical activities, Sheela Krishnaswamy, Nutrition and Wellness Consultant, said, “said, “People in India are increasingly understanding the significance of sports and regular physical activity. More so now, as there is a greater interest around immunity especially with regard to foods and practices that can help strengthen it. Research has also suggested that regular moderate intensity exercise can also strengthen immunity[1]. This is important more so for children, as they continue to attend online classes at home without much physical activity. Parents must ensure that they setup a routine, so that the child engages in some sort of sport/physical activity every day. Also, be sure to augment this routine by adding snacks like almonds to the child’s diet. Almonds are a source of zinc, folate and iron, all nutrients that are known to contribute to a normal function of the immune system.”
नागपूर : कोरोना संसर्गाबाबत मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. राजनगर निवासी ३५ वर्षीय एक व्यक्ती ५ ऑगस्टला कोरोना संक्रमित झाले आणि आता ते पूर्णत: दुरुस्त झाले आहे. मात्र, संक्रमणाच्या २० दिवसानंतर मनपाला संबंधित व्यक्तीचे घर प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे सुचले. त्या व्यक्तीच्या घरापुढे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर टांगण्यात आले. मनपा मंगळवारी झोनला याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार कृत्याने संबंधित व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत व्हावे लागले. बॅनर लागताच शेजारपाजारच्या लोकांमध्ये त्यांच्याविषयीची वागणूकही बदलली आहे. दूध, भाजीपाला, फळवाले त्यांच्या घराजवळ भटकतही नाहीत. मनपामुळे त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तणावाचा सामना करावा लागत आहे. ही भरपाई कोण करेल, हा प्रश्न आहे.
मनपा प्रशासनाच्या बेजबाबदारीची अनेक प्रकरणे सातत्याने पुढे येत असतात. त्याच शृंखलेत आता या प्रकरणाने कोरोना संदर्भात मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे.
राजनगर येथील एका इमारतीत राहणाºया ३५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट ५ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. मनपाद्वारे त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यात कोणतीच लक्षणे आढळून न आल्याने, त्यांना एक दिवसानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले. दुसºया दिवशी त्यांच्या कुटुंबीयांचेही नमुने तपासण्यात आले. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नियमानुसार दहा दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णाला स्वस्थ घोषित करण्याचे आयसीएमआरने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या रुग्णांला दहा दिवसानंतर तपासण्यास मनपाकडून कुणीच आले नाही. सजगता म्हणून त्यांनी स्वत:च तपासणी करवून घेतली. यावेळी त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांच्या जिवात जीव आला. मात्र, मनपाच्या या बेजबाबदार धोरणामुळे मनपाचे कोरोना संदर्भातील कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संक्रमिताचा कुणीच नाही विचारला हालहवाल
होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आरोग्याची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी मनपाची एक टीम आहे. मात्र, राजनगरमधील या संक्रमित व्यक्तीला बघण्यासाठी मनपाकडून कुणीच आले नाही. विना तपासणी सात दिवसानंतर संबंधित रुग्ण स्वस्थ झाल्याचे मनपाकडून घोषितही करण्यात आले.
घोळ कुठे झाला, याची चौकशी करतो – राऊत
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना प्रतिबंध लावणे व काढण्याचे अधिकार दिले आहेत. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत आहेत. या संदर्भात त्यांना ‘लोकमत’ने विचारणा केली असता, त्यांनी इंजिनिअर्सच्या बदल्या होत असल्याचे सांगितले. त्यामुळेच, यादी उशिरा मिळाली असल्याने हा घोळ झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले. चूक नक्कीच झाली. मात्र, घोळ कुठे झाला याची चौकशी करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा हेच तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यामागील एक मोठे कारण ठरले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर ज्या पद्धतीने मुंढे यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावरून ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी खूप नाराज होते. हीच नाराजी मुंढे यांना भारी पडली आणि त्यांना नागपुरातून जावे लागले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून नागपूर महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासूनच ते इतर दुसऱ्या अधिकाऱ्यांनाच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही काही मोजत नव्हते. त्यांनीअसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की, सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत आणि ते स्वत: जनतेच्या हिताचे काम करीत आहेत. महापालिकेत जो भ्रष्टाचार पसरला आहे तो संपवण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या हेकेखोरपणामुळे अधिकारीही आश्चर्यचकित होते. इतकेच नव्हे तर विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची बैठकही ते मध्येच सोडून निघून जायचे. बैठकीत जी काही चर्चा व्हायची, त्याबाबतच ते लगेच मुंबईला कळवायचे. यावरून ते असे दाखवण्याचा प्रयत्न करायचे की, जे काही होत आहे ते स्वत:च करीत आहेत. इतर अधिकारी काहीही करीत नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सहकार्याचे वातावरण राहिले नाही.
सूत्रानुसार, मुंढे यांनी पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांच्याबाबत षड्यंत्र रचले आणि मुख्यमंत्र्यांचे असे कान भरले की ते निवडणुकीत भाजपचे उमेदवार होऊ शकतात. यानंतर पोलीस आयुक्तांच्या बदलीचे वृत्त झपाट्याने पसरले. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हस्तक्षेप केला. मला न कळवता पोलीस आयुक्तांची बदली कशी होऊ शकते, नागपूरची परिस्थिती मला चांगली ठाऊक आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपाध्याय यांच्या बदलीचे प्रकरण शांत झाले.
असे म्हटले जाते की, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्रास देण्यासाठी मुंढे यांना नागपूरला पाठविण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले महापौर संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे उघड युद्ध सुरू होते. नागनदीसाठी गडकरी यांनी निधी आणला होता. मोहम्मद इजराईल या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात हे काम सुरू होते त्यांनाच मुंढे यांना हटवले. इजराईल हे सेवानिवृत्त झाले होते. मात्र, त्यांची क्षमता पाहून त्यांना मानधनावर या प्रकल्पाचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, मुंढे यांनी गडकरींचेही ऐकले नाही व त्यांना हटवले. शहरातील बऱ्याच मुद्यांवर त्यांनी गडकरी यांना विश्वासात घेतले नाही. यामुळे गडकरी नाराज होते.
दुसरीकडे मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पावर पकड मिळवली. ते स्वत:च सीईओ बनले व तेथून ४० कोटींचा निधी जो कचरा ट्रान्सफर स्टेशनसाठी मिळाला होता त्याला बायो मायनिंग प्रोजेक्टमध्ये हस्तांतरित केला. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या इतर कामांनाही त्यांनी कात्री लावली. एकतर मुंढे यांना गडकरी यांची भेट घेण्याची काहीच गरज वाटली नाही. ते एकदाही गडकरींना भेटायला गेले नाही. त्यामुळे शहरात असा संदेश गेला की मुंढे हे गडकरींना देखील महत्त्व देत नाहीत. या सर्व बाबींमुळे यामुळे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी खूप नाराज होते.
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प ही गडकरींचीच देण आहे. त्यांनीच हा प्रकल्प आणला. मात्र या प्रकल्पाच्या सीईओपदी मुंढे विराजमान झाले व प्रकल्पात अडथळे आणणे सुरू केले. याची गंभीर दखल घेत गडकरी यांनी नागरी विकास मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याशी चर्चाही केली. यानंतर दिल्लीहून चौकशीसाठी एक समिती आली व त्या समितीने मुंढे यांचे सीईओपद बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर मुंढे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या कामाची चौकशी सुरू झाली. यानंतर मुंबईच्या सूचनेनुसार मुंढे यांनी गडकरी यांची भेट घेत आपली बाजू मांडली. गडकरींच्या नाराजीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली असता त्यांनी गडकरी यांना फोन केला व त्यांना त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे व गडकरी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, गडकरी यांनी त्यांच्याकडे आपली नाराजी स्पष्टपणे मांडली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीदेखील गडकरी यांना फोन केला व मुंढे यांच्याप्रति असलेली नाराजी दूर करून कोणतीही कडक कारवाई न करण्याची विनंती केली. सूत्रांच्या मते, यानंतर एक अदृश्य करार झाला की मुंढे यांना तात्काळ नागपूरहून बदलविण्यात यावे. यामुळे गडकरींची वजनदार प्रतिमा कायम राहील. अशाप्रकारे मुंढे यांची रवानगी झाली.
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन येत्या २ सप्टेंबरपर्यंत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. कार्यालयात नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.
यासंदर्भात पोलीस माहिती कक्षातर्फे पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक कार्यालयात, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामासंदर्भात कार्यालयात न येता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली समस्या सांगावी. यासाठी हेल्पलाइन नंबर १०० किंवा टेलिफोन नंबर ०७१२- २५६०२००, २५६०७७९ यावर संपर्क साधावा.
नागपूर : अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. ११० वर्षांच्या वर या पुलाचे आयुष्य झाले आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली. परंतु अद्यापही दुसरा पूल तयार न केल्यामुळे या पुलावर कधी अपघात होईल याची शाश्वती नाही.
अजनी रेल्वे पूल हा पूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा पूल होता. परंतु मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर परिसरात नागरिकांची संख्या वाढल्यामुळे या पुलावरून जाणाºया वाहनांमध्ये वाढ झाली. पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र लिहून त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. परंतु रेल्वे तसेच महानगरपालिकेच्या वतीने तात्पुरती डागडुजी करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती अनेकांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. पुलाच्या खालील भागाची डागडुजी रेल्वेच्या वतीने तर वरील भागाची काळजी महानगरपालिकेतर्फे घेण्यात येते. तात्पुरती काळजी घेतल्यामुळे प्रश्न सुटणार नसून नवा पूल तयार करण्याची मागणी होत आहे.
अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. वरील भागाची काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आम्ही पुलाची काळजी घेत आहोत.
लीना उपाध्ये, मुख्य अभियंता महापालिका
अजनी रेल्वे पुलावर कधीही अपघात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडू शकते. रेल्वेने पाठपुरावा करून महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने कारवाई करण्याची गरज आहे.
हबीब खान, कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
अजनी रेल्वे पुलाची रेल्वेच्या वतीने नियमित देखभाल करण्यात येते. सध्या पुलाची परिस्थिती चांगली आहे. गरज भासल्यास आम्ही पुलाची डागडुजी करतो.
एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
मुंबई :नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाग्रस्त असतानाच राज्य शासनाने बुधवारी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी राधाकृष्णन हे नागपुरात नवे महापालिका आयुक्त असतील.
मुंढे यांना जानेवारी २०२० मध्ये महापालिका आयुक्त म्हणून नागपुरात पाठविण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवसापासून महापौर संदीप जोशी आणि मुंढे यांच्यात खटके उडाले. पुढे सर्वपक्षीय नगरसेवक मुंढे यांच्याविरोधात एकवटले होते. मुंढे यांच्या कोरोनाकाळातील निर्णयांवरून टीका-समर्थनाचे सूर उमटले होते.
तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत. मुंढे यांना कोरोना झालेला असताना त्यांची बदली करण्यात आल्याने टीका होत आहे.
मुंढे यांची कारकीर्द : आदिवासी प्रकल्प अधिकारी धारणी, सहायक जिल्हाधिकारी; देगलूर (जि.नांदेड), मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा परिषद, अतिरिक्त आदिवासी आयुक्त; नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम जिल्हा परिषद, खादी व ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी, विक्रीकर सहआयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुणे पिंपरी-चिंचवड परिवहन सेवा आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, सहसचिव मंत्रालय, एड्स नियंत्रण सोसायटी प्रकल्प संचालक, नागपूर महापालिका आयुक्त आणि आता सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
India, 2020: Continuing its focus on the Indian market, Motorola today announced the next generation of its immensely popular g franchise – moto g9, globally first in India! Designed basis consumer research to cater to the needs of Indian consumers, it is truly a Made for India product that is also Made in India.
The moto g9 is a powerful leap in performance, camera, battery and more. Designed to deliver power across the board, the new moto g device takes the user experience to a next level by combining all they wanted in one product. The all new moto g9 has the best overall experience in its category, a super-responsive, latest Qualcomm® Snapdragon™ 662 processor that won’t slow you down, a triple camera system – which includes a 48MP main sensor¹ with class leading f/1.7 aperture and two days of power with a massive 5000mAh battery plus 20W TurboPower™ charging .
Unbelievable performance
Motorola g9 is one of the first smartphones in the world to have the super responsive Qualcomm® Snapdragon™ 662 Mobile Platform. With astonishing AI performance and dynamic camera capabilities, users will capture and connect in brand new ways. You will also enjoy games and videos with smooth and vivid graphics. The Snapdragon 662 is also built with increased speeds and robust on-device performance, so you can multitask seamlessly with less lag. Plus, feel your phone respond instantly to every touch, tap, and swipe, and switch between multiple open apps without missing a beat thanks to 4 GB of RAM.
Stunning cameras
Thanks to the 48 MP triple camera system on moto g9 you can easily capture amazing pictures in any light or setting with the main camera, depth sensor and Macro Vision camera.The 48 MP main camera sensor comes complete with Quad Pixel technology¹ with 4x light sensitivity, Night Vision mode and a class leading, large f/1.7 aperture, so you get bright photos even in the low light. The depth sensor works with the main camera to blur the background automatically, enhancing your everyday photos into beautiful portraits with accurate edges. From the wings on a bumblebee to the crystals on a snowflake, there’s a world waiting to be captured with the Macro Vision camera, which lets you get 4X closer to your subject than a standard lens while keeping the smallest details in focus.
Massive battery with fast charging
No matter if you use your phone for entertainment, work or just to stay connected with the world, with the Motorola g9 there is no need to worry about battery life. A massive 5000mAh battery gives you over two days of power on a single charge, making it possible to stream music for 83 hours, stream videos for 16 hours, or browse your favorite websites for 13 hours. And when you do need a quick energy boost, a 20W TurboPower™ charger gives you hours of power in just minutes of charging.
Ultra-immersive, Ultra-wide display
Bring your photos, movies, games, and video chats to life on an ultra-wide screen. The 6.5″ Max Vision HD+ display gives you maximum viewing thanks to a20:9 aspect ratio. With a bigger screen to body proportion, nothing gets in the way of your favorite entertainment.
Extensive storage
moto g9 has 64 GB of built-in storage, so you have room to download more photos, songs, movies, and games. You can even add up to 512 GB more using the microSD card slot.
Operating system and software
Motorola g9 continues our ongoing commitment to provide consumers with the purest version of Android OS. There are no clunky software skins, no duplicate apps – just near-stock Android™ 10 that we know consumers love. It also comes with a promise of 1 minimum OS upgrade and 2 years of security updates.That is not all, the moto g9 also comes with all your favorite moto actions and gestures!
Class Leading Device Experience Dedicated Google assistant:
We know how valuable it is for our consumers to have quick and easy access to Google Assistant. That is why we’ve simplified how you activate the integration on Motorola g9 with a dedicated Google Assistant Button located on the side of your phone – so your personal helper is always within reach. By pressing the button, you can enable voice control, and ask the Google Assistant for answers – no need to type, tap, or swipe. Perfect for when you are on the go or need an answer fast.
Class leading NFC support:
Make contact-less payments with ease with class leading NFC Support.
Dual-band WiFi:
Work from home with ease with best in class, dual band WiFi support!
Your face & fingerprint is your password
With face recognition & fingerprint reader, unlock your phone instantly. No passcodes. No worries. The fingerprint reader is discreetly located within the “batwing” logo on the back on the phone, so you hardly know its there
Availability & Pricing
The stunning Motorola g9 will be available in two beautiful colors – deep Sapphire Blue and natural Forest Green, starting 31st August, 12PM on Flipkart. The moto g9 is available at an unbelievable price of just INR11,499/-
Nagpur : After treating around 200 COVID-19 cases in the city since its beginning, Wockhardt Hospital Covid unit stands further determined in its fight against this global pandemic. In a short span of one month and few days, Wockhardt Hospital Nagpur’s COVID unit has successfully treated several cases.
What makes this a landmark is that none of the staff members, fighting in the frontline have been tested positive. Due to the strict safety measures ensured for staff as well as patients, there has not been a single positive case among the staff members including Consultants, Nursing, RMOs, technicians etc.
It has been a month and few days since Wockhardt Hospital Nagpur roped in for treatment of COVID-19 patients and since then, patient satisfaction, proper care of patients, clear bifurcation of infected and non infected areas with very minimised amalgamation of these have been the key focus for ensuring victory in this battle. “We have dedicated isolation areas, clear guidelines for screening of visitors as well as staff, formulated policies for admission and screening of OPD patients to ensure that not just the staff but also the other patients coming for regular check ups are not infected in our Non-Covid Hospital”, said Ms. K. Sujatha, Centre Head. “In the dedicated Covid hospital, we take all the necessary measures for staff safety and make sure that patients receive proper care and treatment”, she added.
For prevention of infections the use of appropriate infection prevention and control measures by all health workers, with a special focus on the adherence to hand hygiene and personal protective equipment when caring for COVID-19 patients, as well as a combination of environmental and administrative controls have been ensured.
The hospital has strict Infection Control guidelines which are followed with extreme caution. A dedicated donning room, a room or area where a healthcare worker puts on PPEs step-by-step and Doffing area, where a healthcare worker takes off the PPEs have been created inside the hospital. A step wise process for both has also been put in these rooms to ensure maximum accuracy and no mistakes. Donning and Doffing are the two processes which make certain that a healthcare worker is not infected. As an add on, the procedures are monitored by the infection control team. Before the hospital stared a rigorous training for the same was provided to all the team members.
Wockhardt hospitals commend the risk health care workers have put in fight against COVID-19 worldwide and hope that we all come out of this soon.
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अद्यापही ‘अपडेट’ झालेला नाही. ‘एआयसीटीई’च्या निर्देशानुसार विद्यापीठाने दोन वर्षांअगोदरच ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र अद्यापही अभ्यासक्रम बदलाच्या प्रस्तावाला विद्वत् परिषदेत मांडण्यात आलेले नाही. त्यातच तयार केलेला प्रस्ताव नवीन शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत कितपत बसेल यावरदेखील विचारमंथन झालेले नाही. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तीन वर्षांअगोदर ‘एआयसीटीई’ने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम ‘अपडेट’ करणे आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल घडविण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा प्रमुख अभियांत्रिकी शाखांसाठी देशातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांची समिती गठित केली होती. त्यानुसार नागपूर विद्यापीठातदेखील अभियांत्रिकीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात पावले उचलण्यात आली होती. आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या विद्वत् परिषदेत या मुद्यावर विचारणादेखील झाली होती. यासाठी नियमावलीदेखील तयार करण्यात येत आहे. अभ्यास मंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल व २०१९ च्या शैक्षणिक सत्रापासून ‘मॉडेल’ अभ्यासक्रम लागू करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केली होती.
मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटून गेल्यावरदेखील विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम लागू झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार झाले आहे. अभ्यास मंडळांच्या बैठकीत त्यावर चर्चादेखील झाली आहे. मात्र यासंदर्भातील प्रस्ताव अद्यापही विद्वत् परिषदेसमोर मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या सत्रापासूनदेखील नवीन अभ्यासक्रम लागू करणे ही कठीणच बाब दिसून येत असल्याची माहिती विद्यापीठातील एका ज्येष्ठ प्राधिकरण सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
नवीन शैक्षणिक धोरणाचे काय?
अभियांत्रिकीच्या नवीन अभ्यासक्रमाला विद्वत् परिषदेत मान्यता मिळाली तरी व्यवस्थापन परिषदेचीदेखील मंजुरी घ्यावी लागणार आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्यातील तरतुदीनुसार अभियांत्रिकीचा अभ्यासक्रमदेखील ‘मल्टिडिसिप्लिनरी’ राहणार आहे. विद्यापीठाला त्या अनुषंगानेदेखील विचार करावा लागणार आहे. शिवाय नवीन तरतुदींच्या धोरणांचा विचार न करता प्रस्ताव मंजूर केला तर पुढील तीन ते चार वर्ष परीक्षेची नवीन ‘स्कीम’ बदलता येणार नाही. तसेच अभ्यासक्रमातदेखील मोठे बदल करता येणार नाही.
नागपूर : राज्यात मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरात सिटी बसेसचे संचालन सुरू झाले आहे. एसटी महामंडळानेही १८ हजार बसेस रस्त्यावर आणल्या आहेत. परंतु नागपूर शहर बससेवा सुरू करण्याची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की उभ्या असलेल्या ६० टक्के बसेसचे टायर व बॅटरी खराब झाली आहे. वेळीच बससेवा सुरू झाली नाही तर सिटी बसेस भंगार झाल्याशिवाय राहणार नाही.
नागरिकांच्या हितासाठी शहर बससेवा सुरू होणे गरजेचे आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, इतर शहरात बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत एसटी बसेस धावू लागल्या आहेत, तर नागपूर शहरात बससेवा सुरू करण्यास अडचण कसली. मनपातील काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण शहर अडचणीत आले आहे. राज्य सरकारला आता यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. राज्य सरकारने जेव्हा अधिकार दिले, तेव्हा बस संचालनाचे निर्देशसुद्धा देऊ शकतात. परंतु मनपाचे अधिकारी स्वत:ला राज्य सरकारच्या वर मानत आहे. शहर बससेवेत ४३२ रेड बस, ५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. आणखी ४० इलेक्ट्रिक बसेस सहा महिन्यात मनपाला मिळणार आहेत. शहर बससेवेत कार्यरत तीन हजार कर्मचारी सहा महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. महिनाभरात बससेवा सुरू न झाल्यास शहर बससेवेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
– एसटी सुरू झाली, सिटी बस का नाही?
राज्यात जिल्ह्यांतर्गत एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवासीदेखील उपलब्ध होत आहेत. सुरक्षा नियमाकडे लक्ष ठेवून आवागमन सुरू झाले आहे. राज्यात १८ हजार एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. दिल्लीत १५ हजार सिटी बसेस धावत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक शहर जेव्हा संक्रमण वाढत होते, तेव्हाही बसेसचे संचालन सुरू होते. सध्या मुंबईत संक्रमण कमी होत आहे. नागपूर शहरात बससेवा सुरू होत नसल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना त्रास होत आहे.
• Recruitment Drive in Nagpur on August 29 and 30, 2020. Last year,we organized a similar drive, which received an overwhelming response. This year, we are offering over 800 s Job opportunities for Experience Professionals at HCL Technologies Campus in MIHAN, Nagpur.
• It Will be a great opportunity for working professionals with the desired skills and experience to apply for the Virtual Mega Recruitment Drive and the program also seeks to invite those from HCL Technologies, a leading global technology company,is organizing a Virtual Mega Nagpur who are working elsewhere to return to their hometown and continue their career with the global IT company, HCL Technologies.
• Considering this is an online drive, candidates can apply from the comfort of their homes.
• Post receipt of applications, our recruitment team will screen the profiles, and eligible candidates will be provided details of a Virtual Drive Session that will be organized on August 29 and 30, 2020
• During the session,an expert panel will explain the skill requirements for the profiles and provide an overview of the selection process.
• Post-session, eligible candidates will be invited to participate in Virtual Interviews which will be a combination of both Technical As well as HR rounds.
• Post the completion of selection process, offer letters will be released to the candidates who clear both the technical and HR interview rounds and then the selected candidates will be required to submit necessary documents to take their candidature forward.
• Selection of candidates is subject to them meeting the eligibility criteria and clearing the selection process.
• HCL Technologies will be separately announcing a virtual recruitment drive for Fresher Candidate through the First Careers Program.
• For more information, aspiring candidates can register themselves
• Interested candidates, who cannot attend in person can send their profile to [email protected]
Quote from Mr Sanjay Gupta, Corporate Vice President, HCL Technologies:
“After receiving an overwhelming response last year, we are again conducting HCL’s Mega Recruitment Drive in Nagpur to bring in global career opportunities for the experienced IT professionals of the region. However, in the present situation keeping in mind the safety and well-being of the candidates, we have chosen a virtual platform for conducting this drive. Nagpur has always been a strategic development centre for HCL Technologies and we, at HCL, have always endeavoured to reach out to the best talent across the country guided by our philosophy of ComeBackHome. Through this drive, we want to invite IT professionals, with relevant experiences to explore rewarding career opportunities with HCL Nagpur”.
Nagpur : IndianOil’s Maharashtra State Office (MSO) has commissioned six Mobile Fuel Dispensers (MFD) in the state of Maharashtra at Pune,Raigad,Nagpur and Aurangabad till date and is in process of commissioning another ten mobile fuel dispensers in the state of Maharashtra & Goa by the end of 2020. Out of these one MFD has been commissioned in the city of Nagpur. Mr. Amitabh Akhauri, Executive Director and State Head, Maharashtra& Goa State Office While addressing the media today said,“this is another milestone in IOC’s efforts towards making its fuel delivery systems and processes customer oriented. The doorstep delivery of diesel for equipment’s which cannot come to petrol pumps due to their heavy/stationary nature, will immensely help the customers who were earlier struggling for getting diesel for their equipment’s in a safe and professional manner.” In Maharashtra, 229 fuel stations have been firmed up for MFD with a target of 67 dealers and 19 Start Ups, added Mr. Akhauri.
There is a considerable demand of HSD for stationary equipment like generator sets, earth moving equipment, heavy machineries used in construction sites, mobile towers, etc. There is a demand from customers using this equipment for delivering HSD at their doorsteps in view of the practical difficulties involved in bringing this equipment to Petrol pumps.
IndianOil under the guidance of Government of India, has also released an Expression of Interest for doorstep delivery of diesel (DDD) by which it would be enrolling start-ups for this initiative. Under this initiative, any start up can get itself registered with Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT), Ministry of Commerce & Industry (MoC&I) as DDD resellers and can become FuelEnts (Fuel + Entrepreneurs) of IndianOil. It is expected that this initiative will promote entrepreneurship and improve customer service in diesel sales. However, the scheme for DDD is purely a business proposition wherein the Start-ups are expected to themselves assess the business potential and benefits of the scheme prior to making decision for any investment.
Ministry of Petroleum & Natural Gas (MoPNG) vide G.S.R. 384(E) dated 29 May 2019 amended Petroleum Rules 2002 and allowed site refuelling of heavy vehicles/machineries and stationery equipment. MoPNG vide G.S.R. 903(E) dated 10 December 2019 and GSR 78(E) dated 3 Feb 2020 amended Motor Spirit and High Speed Diesel (Regulation of Supply, Distribution and Prevention of Malpractices) Order 2005 paving way for door to door delivery of HSD by any person duly authorised by oil companies to market transportation fuels in the country i.e. PSU OMCs as well as Private Oil companies like Reliance, Nayara, Shell etc. Petroleum and Explosives Safety Organisation (PESO) has framed Standard Operating Procedure (SOPs) for filling and dispensing the product through Mobile bowsers.
On project front , since the easing of the lockdown, at pan India level , IndianOil has commenced works on 336 projects that have investment of more than Rs 1 Crore in each project, at an anticipated project cost totalling to Rs 1.04 Lac Crores (Rs 1.04 Trillion). IndianOil has targeted a CAPEX of Rs 26,143 Crores during FY 20-21 and in the first quarter achieved an approx. expenditure of Rs 2,674 Crores, overcoming various issues faced on-ground due to the Coronavirus pandemic.
In Maharashtra, total Investment planned during FY 20-21 is about Rs.855 Cr. New LPG plant coming up at Nagpur will increase bottling capacity by 16% (60 TMT/year against existing 360 TMT/year).This plant will cater to about 7.61 lakh Indane customers from Nagpur, Wardha, Chandrapur Gadchiroli Gondia Market. Under free LPG scheme announced by Government of India, in Maharashtra, IOC has supplied about 17 Lakh refills to Ujjwala beneficiaries from April 2020 till date out of which 6.87 lakh refills have been supplied in Nagpur region.
IndianOil’s biggest accomplishment for the year was the seamless pan-India transition from BS-IV directly to BS-VI grade transport fuels by 16th March 2020, a full fortnight ahead of the 1st April 2020 deadline. This involved implementation of about Rs. 17,000 crore fuel quality upgradation programme at its nine refineries.
The Corporation has achieved 100% automation of day-to-day operations in nearly 25,000 fuel stations at the end of FY 19-20, complete with V-SAT connectivity to a central hub for real-time data exchange. In Maharashtra &Goa, 100% automation of fuel stations achieved.
In the state of Maharashtra, IndianOil has spent about Rs. 37 Crore under CSR fund for helping society during pandemic.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ही निवडणूक तातडीने घेण्यात यावी याकरिता अहमदभाई करीमभाई शेख यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने कोरोना संक्रमणामुळे ही निवडणूक तातडीने घेणे शक्य नसल्याची भूमिका मांडली. तसेच, निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारची विनंती मान्य केली. तसेच, ही निवडणूक लवकर व्हावी याकरिता शेख यांनी ७ जानेवारी २०२० रोजी सादर केलेल्या निवेदनावर सहा आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. हा निर्णय घेताना सदर आदेशामुळे प्रभावित होऊ नये असेदेखील सरकारला सांगितले.
ही निवडणूक २०१८ पासून सतत लांबत आहे. उच्च न्यायालयाने प्रथम १६ जानेवारी २०१८ रोजी समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर निवडणूक घेण्यासाठी सरकारच्या विनंतीवरून २७ सप्टेंबर २०१९ रोजी तीन महिने तर, २४ जानेवारी २०२० रोजी सहा महिने वेळ वाढवून देण्यात आला. आता परत निवडणूक घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
नागपूर :रुग्णालयाचे बिल थकीत असल्याने एका वृद्धाला रुग्णालय प्रशासनाने बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित वृद्धाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतरही कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या वृद्धाने आत्महत्येचा इशारा दिला आहे.
गोळीबार चौक येथील ६२ वर्षीय सुरेश भरडभुंजे १० ऑगस्ट रोजी कोरोना संक्रमणामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका मोठ्या रुग्णालयात भरती झाले. भरडभुंजे यांना मनपाच्या नियमानुसार उपचाराचा खर्च घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यांनी भरती होतानाच लाख रुपये जमा केले होते. रुग्णालयाचा खर्च अधिक असल्याने व प्रकृतीतही सुधारणा झाल्याने भरडभुंजे १० दिवसापासून सुटी मागत होते. त्यानंतरही डॉक्टरांनी दोन लाख रुपये जमा करण्यास सांगितले. भरडभुंजे यांनी रुग्णालयने केलेले उपचार व औषधासंबंधित माहिती घेतल्यावर रुग्णालयाने विनाकारण मनमानी वसुली केल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे जमा करण्यास नकार दिला. भरडभुंजे यांनी आपल्या संपर्काच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केली. त्यांनी पोलिसांना फोन करून स्वत:च्या जीवाला हानी पोहचविण्याचा इशारा दिला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांना सुटी देण्यात आली असे सांगण्यात आले. तात्काळ ६५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. सुटी मिळेल या अपेक्षेने भरडभुंजे यांनी रक्कमही जमा केली. १.६५ लाख रुपये जमा केल्यानंतरही त्यांना १.६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रुग्णालयाकडून होत असलेल्या मनमानीमुळे भरडभुंजे यांनी बजाजनगर पोलीस व नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. मंगळवारी सकाळी भरडभुंजे यांनी बजाजनगर ठाण्यात फोन केल्यानंतर तायडे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालय सांगते हे ते ऐकून घ्या, असा सल्ला दिला. १.६० लाख न देता १ लाख रुपयात प्रकरण संपवून टाका असाही सल्ला दिला. सुटीसाठी दबाव बनवित असाल तर महामारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे भरडभुंजे दहशतीत आले. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की मी बेरोजगार आहे. दहा दिवसांपासून सुटी मागत आहे. पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नाही.
एका दिवसाचा चार्ज ४५ हजार
अशाच प्रकारे नंदनवन येथील एका खासगी रुग्णालयाने कोरोना संक्रमित एका परिवाराकडून प्रति व्यक्ती ४५ हजार रुपये एका दिवसाचे वसूल केले. एकाच रुममध्ये दोन लोकांना ठेवून ४५ हजार रुपये शुल्क आकारले. या कुटुंबातील सात ते आठ लोक संक्रमित होते. त्यांनी दोन ते पाच दिवस रुग्णालयात घालविले. हे रुग्णालय काही दिवसापासून चर्चेत आहे.
नागपूर :महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्यांनी गृहविलगीकरणात जाण्याचा निर्णय घेऊन तसे केलेही आहे. नागरिकांना वेळोवेळी केलेल्या निवेदनात त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन सातत्त्याने असते. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर नागरिकांसाठी खालील निवेदन केले आहे.
कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह‘ आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त आहे. मागील 14 दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वत:ची चाचणी अवश्य करून घ्यावी.
मागील साडेपाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. यासाडेपाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे.
प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वत: वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्रीनंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली.
मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाचे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वत: पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो.
नागपूर : आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.
महेश कॉलनी चंदननगर येथे राहणारे पोलीस शिपाई सुनील शेषराव भोयर (वय ५३) हे अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात होती. आजारपणामुळे ते कर्तव्यावरही जाऊ शकत नव्हते. १४ ऑगस्टला अंघोळीला जाताना गरम पाणी अंगावर पडल्याने ते होरपळले. त्यामुळे त्यांच्या वेदना आणखीच वाढल्या. वारंवार उपचार करूनही आजारपणाला फायदा होत नसल्यामुळे ते वैतागले होते. या अवस्थेत त्यांनी सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, यावेळी पत्नी आणि मुलगा घरीच वरच्या माळ्यावर होते. मुलाला त्याचे मित्र भेटायला आले तेव्हा खालच्या माळ्यावर त्यांना भोयर गळफास लावून दिसले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यांचा मुलगा सुमित सुनील भोयर याने पोलिसांना ही माहिती कळविली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
गळफास लावून आत्महत्या करण्याची दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली. सागर हरिश्चंद्र डेहुनिया (वय २५) यांनी गळफास लावून घेतला. घरच्यांनी त्यांना डॉक्टरला दाखविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंदा हरिश्चंद्र डेहुनिया (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे पाचपावलीच्या वैशालीनगरात राहणारे संजय मारोतराव कैकाडे (वय ३५) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजीव मारोतराव कैकाडे यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेलाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. मार्चपासून या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. परिणामी, शेकडो रुग्णांच्या मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत जाऊन कायमची नजर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्याक्रमांतर्गत आरोग्य विभागाकडे आतापर्यंत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूर जिल्ह्यातील ४१३ रुग्णांची नोंद झाली असून या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा आहे. धक्कादायक म्हणजे, मेयो व आरोग्य विभागात शस्त्रक्रिया बंद आहेत. केवळ मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया सुरू आहेत.
बुबुळासंबंधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठाही केला जातो. परंतु एप्रिल महिन्यापासून हा कार्यक्रमच बंद पडला आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्यास तयार नाहीत, खासगी हॉस्पिटलमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करावे लागत असल्याने या शस्त्रक्रियेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. हा खर्च सामान्यांना परडवणारा नाही. यामुळे अनेक रुग्ण हा आजार घेऊन जगत असल्याने धोका वाढत चालला आहे.
-गेल्या वर्षी मोतीबिंदूच्या ६,२११ वर शस्त्रक्रिया
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लक्ष्य दिले होते. यात नागपूर जिल्ह्याला ६,२११ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्यापेक्षा जास्त १४८ टक्के शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत १०४ टक्के नागपूर जिल्ह्याने पूर्ण के ल्या आहेत. मार्च महिन्यापासून कोविडच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने हे लक्ष्य काहीसे कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-कन्टेन्मेंट झोनमध्ये असल्याने डागात शस्त्रक्रिया बंद
जिल्हा अंधत्व निवारण समितीकडून डागा रुग्णालयात मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे. परंतु हे रुग्णालय कन्टेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने शस्त्रक्रिया बंद आहेत. केवळ बाह्यरुग्ण विभागात रुग्णाला तपासले जात आहे.
– मेयोतील नेत्र विभाग कोविड हॉस्पिटलमध्ये
मेयोचा नेत्र विभाग हा सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत होता. परंतु या कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केल्याने शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. बाह्यरुग्ण विभाग सुरू असून दुसºया शस्त्रक्रिया गृहात किरकोळ शस्त्रक्रिया होत आहेत.
-कोरोनाच्या चाचणीनंतरच मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया
जिल्ह्यात केवळ एकट्या मेडिकलमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी ४८ ते ७२ तासांमधील कोविड चाचणीचा अहवाल असणे आवश्यक आहे. परंतु चाचणीच्या नावावर अनेक रुग्ण शस्त्रक्रिया करीत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, रोज तीन ते पाच शस्त्रक्रिया होत आहेत.
-ज्यांना धोका आहे त्यांना मेडिकलमध्ये रेफर
डागा रुग्णालयाच्या नेत्र विभागातील ओपीडी सुरू आहे. कोरोनामुळे फार कमी रुग्ण येत आहेत. यातही ज्या रुग्णांचे मोतीबिंदू पिकले आहेत, त्यांना मेडिकलमध्ये ‘रेफर’ म्हणजे, पाठविले जात आहे. सध्या शस्त्रक्रियेसाठी ४१३ रुग्णांची यादी असून, कोरोनाचा प्रभाव संपताच महिनाभरात या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जातील.
-डॉ. नयना धुमाळे
वैद्यकीय अधिकारी, नेत्रविभाग डागा
-मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया आवश्यक
मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत होऊनच नजर जाण्याचा धोका निर्माण होतो. मेडिकलमध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. परंतु संबंधित रुग्णांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे.
-डॉ. अशोक मदान
विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...