Home Blog Page 110

हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त

हाथरस

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. विविध पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत आरोपींना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली.

फाशीच्या शिक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या या घटनेचा निषेध करीत या घटनेतील अरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले.

युवा सेनेतर्फे कॅण्डल मार्च
युवा सेनतर्फे जिल्हा सचिव धीरज फंदी यांच्या नेतृत्वात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, संदीप पटेल, शशिकांत ठाकरे, निलेश तिघरे, सलमान खान, सचिन डाखोरे, विक्रम राठोड़, यश जैन, आशिष बोकड़े, बंटी धुर्वे, गौरव गुप्ता, हर्षल सावरकर, आशिष देशमुख, प्रवीण धावड़े, नितीन लोखंडे, कौशिक येलणे, आकाश पांडे, सिद्धू कोमेजवर, शंकर वानखेडे, राजेश बांडेबुचे, सनी अग्रवाल, मनीष साखरकर, शुभम अग्रवाल, पावन सावरकर आदी सहभागी होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे गोळीबार चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनीषा वाल्मिकीची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात नुतन रेवतकर, मिलिंद मानापुरे, सौरभ मिश्रा, आशिष आवळे, संजय धापोडकर, संदीप मेंढे, स्वप्नील अहीरकर, राहुल कांबळे, अमित दुबे, शहनवाज खान, आकाश चौधरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपींना पाठीशी घालणारे योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करा, अशी मागणी केली.

नागपूर शहर महिला काँग्रेस
नागपूर शहर महिला काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढून सक्करदरा येथील गांधी पुतळ्याजवळ मृत पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, संगीता उपरीकर, अर्चना सिडाम, शालिनी सरोदे, बेबी गाडेकर, भारती कामडी, रेखा काटोले, प्रमिला धने, सुनीता मेहर, ज्योती धाके आदींसह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

मास्क न लावणा-या २४५ नागरिकांकडून दंड वसूली , आतापर्यंत ९०८६ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (३० सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ९०८६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २९,०२,०००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५६, धरमपेठ झोन अंतर्गत ५०, हनुमाननगर झोन अंतर्गत २०, धंतोली झोन अंतर्गत २२, नेहरुनगर झोन अंतर्गत १८, गांधीबाग झोन अंतर्गत १४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १७, लकडगंज झोन अंतर्गत १५, आशीनगर झोन अंतर्गत १४, मंगळवारी झोन अंतर्गत १४ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३६१६ बेजबाबदार नागरिकांकडून रु १८ लक्ष ८ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

SBI Zonal Office donates to OCHRI Covid Section

SBI

Orange City Hospital & Research Institute has been recognized as the trusted health care center of Central India. OCHRI is the only private hospital that is asked to keep Health emergency health assistance readiness officially by government during visit of any VVIPs to Nagpur.

OCHRI has always been asked by Government to help them during any calamity. Recently OCHRI was asked by Government to commission Covid unit wherein they had initiated Covid Division in one of their 3 buildings. More than 200 Covid patients have been treated at OCHRI till date. In OCHRI Covid Division; Dr. Nandu Kolwadkar leads team of Dr. Samir Choudhary, Dr. Santosh Dhole, Dr. Ravindra Sawarkar while Nursing team is led by Sr. Jessy Abraham and Sr. Rahel Patrange whereas Shri.Sawant Waghmare and Shri.Avinash Ganar lead the team of Paramedical staff. RMO team is led by Dr. Avez Hasan. Dr. Noorul Ameen is the Admission Coordinator while Dr. Deepak Dongre is the Spokesperson.

Recognizing the yeoman efforts of OCHRI, State Bank India recently donated 3 infrared thermometers to assist OCHRI ground duty staff. These 3 IR thermometers donated by Shri.Anup Ghonge on the behalf of Smt. Asha Agasty, AGM, SBI, Zonal office, Nagpur was accepted by Shri.Sunil Sure, Chief General Manager- OCHRI in presence of Shri.Sawant Waghmare, Executive (Vehicle, Security and Maintenance)- OCHRI.

Dr. Anup Marar-OCHRI Director thanked SBI Zonal office for their appreciation and conveyed that all Covid hospitals need volunteers. All interested healthy citizens should reach out to nearest Covid hospital and offer any feasible help to provide succor to admitted patients, he added. Many bedridden Covid patients need assistance of attendants. There is scarcity of health care workers and such volunteering by genuine NGOs is essential during this Pandemic period.

Adopt a healthier lifestyle during these difficult times, with a handful of almonds everyday!

Almond

30th September, 2020: As people across the world, and India in particular adapt to the new definition of normal amidst the Covid-19 pandemic, Almond Board of California, today, hosted a session around ‘The importance of ensuring family health and nutrition amidst a pandemic’. The discussion focused on the current health situation in the country and highlighted preventive measures families can include within their daily diets and lifestyles. Leading the session was well known Marathi actor, Urmila Kothare, along with Nutrition & Wellness Consultant, Sheela Krishnaswamy.

Through the discussion, Urmila and Sheela shared anecdotes and examples from their personal lives, prompting families across India to pay special attention to their lifestyles and dietary habits during the pandemic. This also included a special focus on dietary patters and lifestyle adjustments for children as most attend school from home during the lockdown, with minimal outdoor contact, and physical activities, leading to stressful and erratic schedules for both parents and the children. Besides these, the session also highlighted the importance of eating nutritious meals, exercising and inculcating conscious snacking habits for all family members – parents, children or the elderly. To address this, the guests suggested small changes that families can incorporate into their lifestyles to strengthen immunity, enhance safety and increase overall preparedness.

Commenting on the need to focus on immunity by consuming nutrients that enhance it, popular Marathi actor, Urmila Kothare, said, “While the world continues to work tirelessly to find a cure for Covid-19, I feel it’s also my responsibility to undertake preventive measures to help in ensuring my family’s safety and good health. As we learn to adjust to this new sense of normal, the most important thing we can do is pledge to lead a healthier lifestyle incorporating regular exercise and proper nutrition which includes immunity supporting foods like almonds. Almonds are a source of zinc, which plays an important role in growth, development, and the maintenance of immune function. I make sure my family and I eat a handful of almonds every day, and urge others to do so as well.”

Awareness around good food choices, and snacking habits is key to leading a healthy lifestyle, especially now when the world around us is adapting to these difficult times. But besides this, it’s also pertinent to stay fit by incorporating some form of physical exercise in the routine, and also maintain a positive attitude while adapting to these unprecedented times.

During the session, Nutrition & Wellness Consultant, Sheela Krishnaswamy said, “The current pandemic has highlighted more than ever, the need for proper nutrition amongst Indian families. Many Indians suffer from ailments such as blood pressure, cardiovascular disease (CVD), diabetes and obesity, and in many cases these existing co-morbidities have led to fatalities in Covid19 patients. Whether you are suffering from one of the aforementioned ailments, or are at risk, be sure to include nuts like almonds to your family and your daily diet as they are nutrient rich and add to the body’s overall health.

Additionally, almonds also contain copper, zinc, folate, iron and vitamin E, nutrients that are known to contribute in supporting the immune function. And years of scientific research has also established the benefits of daily almond consumption across heart health, diabetes and weight management. So, be sure to include almonds in your family’s and your diet every day, for longer term health benefits.”
As several families spend most of their times at home, it’s now more important than ever – to reevaluate the family’s nutrition and lifestyle choices, and make the necessary revisions that can add value to every member’s heath in the longer run. By making these dietary and lifestyle changes like incorporating nutritious foods like almonds and exercising regularly, families across India can make a healthy difference to their lives and strengthen their immunity while talking relevant precautions to keep themselves safe from the ongoing outbreak.

कोव्हिडमध्ये घ्या डोळ्यांची विशेष काळजी

कोव्हिड

नागपूर : कोव्हिड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोव्हिडचे एक लक्षण असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोव्हिडमुळे उद्भवलेले लॉकडाउन आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोव्हिडच्या या काळात नियमित मास्क लावा, याशिवाय डोळ्यांचीही काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक तथा ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तथा नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ.विरल शाह यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी बुधवारी (ता.३०) ‘कोव्हिड आणि डोळ्यांची निगा’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी शंकांचे निरसरनही केले.

कोव्हिड हा अत्यंत धोकादायक आजार आहे. त्यामुळे त्याला अगदी सहज घेउ नका, त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेउन काळजी घ्या, नियमांचे पालन करा. कोव्हिडमुळे ज्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते नेत्र शल्यचिकित्सक होते. त्यामुळे डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणा-या संसर्गा एवढाच घातक आहे. त्यामुळे डोळ्यांमुळे संसर्ग होउ नये यासाठी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा. अनेक जण ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावतात मात्र ते लावताना आधीपेक्षा जास्त सुरक्षा घेणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे कोव्हिड संसर्गाचा धोका निर्माण होतो. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ लावण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा, सॅनिटाजरचा वापर करून शक्यतो डोळ्यांना हात लावू नका. कोव्हिडच्या या संकटात शक्य असल्यास ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ टाळा आणि चष्मा वापरा. चष्मा डोळ्यांना थेट संपर्कापासून सुरक्षित ठेवतो. स्वत:च्या मताने डोळ्यांबाबत कुठलेही उपचार करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. दवाखान्यात जाणे शक्य नसल्यास फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी केले.

२०-२०-२०चे सूत्र अंगिकारा

आज कोव्हिडच्या काळात डोळ्यांच्या समस्या सुद्धा वाढल्या आहेत. डोळे लाल होणे, जळजळ होणे अशा अनेक तक्रारी रुग्णांच्या येत आहेत. लॉकडाउन, विलगीकरण किंवा ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये आपला जास्तीत जास्त संपर्क मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीसोबत येतो. एकटक मोबाईल, लॅपटॉप किंवा टिव्ही पाहत असल्याने डोळ्यांमध्ये ओलावा ठेवणारा अश्रुंचा थर कमीकमी होत जातो. त्यामुळे अनेक त्रास सुरू होतात. यावर उपाय म्हणून २०-२०-२०चे सूत्र अंगिकारा मोबाईल, लॅपटॉप किंवा टिव्ही पाहत असताना किंवा त्यावर काम करत असताना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घ्या, या ब्रेकमध्ये किमान २० मीटर दूर पर्यंत पाहा, आकाश, झाडे, खिडकीबाहेरचा परिसर पाहा, पापण्यांची उघडझाप करा, असेही त्यांनी सांगितले.

मास्क लावल्याने तोंड आणि नाकातून निघणारी वाफ डोळ्यात जाते त्यामुळे सुद्धा डोळे कोरडे होण्याची शक्यता असते. याशिवाय एसी मध्ये काम करताना, कमी प्रकाशात काम करतानाही ही समस्या उद्भवू शकते. यासाठी आवश्यक काळजी घ्या, एसीकडे तोंड करून बसू नका, काम करताना भरपूर प्रकाश असू द्या, रात्री मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही पाहत असताना दिवे सुरू ठेवा, काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असाही मोलाचा सल्ला यावेळी डॉ. राफत खान आणि डॉ.विरल शाह यांनी दिला.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ९८२ नवीन पॉझिटिव्ह, ३८ रुग्णांचा मृत्यू

रुग्ण

नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिह्यात ९८२ नवे संक्रमित रुग्ण आढळले, तर ३८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण संक्रमितांची संख्या ७८,०१२ झाली आहे, तर मृत्यूने २,५१० चा आकडा गाठला आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ७२२ तर ग्रामीणमधील २५८ रुग्णांचा समावेश आहे. यात जिह्याबाहेरील दोन व्यक्तींचा अंतर्भाव आहे. मृतांमध्ये शहरातील २६ आणि ग्रामीणमधील १०, तर जिल्ह्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे. एकूण संक्रमितांमध्ये शहरातील ६१,९६६, ग्रामीणमधील १५,६१९ तर जिल्ह्याबाहेरील ४२७ रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १,८२५, ग्रामीणमधील ४४० आणि जिल्ह्याबाहेरील २४५ रुग्णांचा समावेश आहे.

मागील २४तासात ६,६७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ५,२२४, ग्रामीणमधील १,४५३ नमुने तपासण्यात आले. ३,३८१ नमुन्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली तर ३,२६९ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट केली गेली.
आजवर एकूण ४,५१,६३९ नमुने तपासण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या ३,२६९ अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये २३१ नमूने पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये २६९ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय एम्सच्या लॅबमध्ये १०९, मेडिकलच्या लॅबमध्ये ९७, मेयोच्या लॅबमध्ये १५०, माफसूच्या लॅबमध्ये ५८, तर नीरीच्या लॅबमध्ये ४१ नमुने पॉझिटिव्ह आले.

१,३५२ रुग्ण झाले दुरुस्त
नागपूर जिल्ह्यात बुधवारी १,३५२ संक्रमित रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले आहेत. यात शहरातील १,०२०, ग्रामीण मधील ३३२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६२,४६७ संक्रमित दुरुस्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत १३,०३५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अ‍ॅक्टिव्ह १३,०३५
दुरुस्त ६२,४६७
मृत २,५१०

सीताबर्डीतील हॉकर्स अतिक्रमणावर भूमिका : मांडा हायकोर्टाचा आदेश

हॉकर्स

नागपूर : वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला.

या अधिकाऱ्यांमध्ये नवीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त झोन-२ विनीता शाहू, सीताबर्डी पोलीस निरीक्षक पी. एन. राजपूत, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांचा समावेश आहे. यासंदर्भात सीताबर्डी मर्चंट असोसिएशनची अवमानना याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. असोसिएशनने त्यात दुरुस्ती अर्ज सादर करून या अधिकाऱ्यांना प्रकरणात प्रतिवादी केले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सीताबर्डीतील परिस्थितीत समाधानकारक बदल झाला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले आहे. सीताबर्डीतील हॉकर्सचे अतिक्रमण आजही कायम आहे. महानगरपालिकेने अद्याप हॉकर्स झोन तयार केले नाहीत याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांवर अवमानना कारवाई करण्याची मागणी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन

मुख्यमंत्री

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष वसीम खान, मो फ़िरोज़ खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान देशात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप करण्यात आला. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुख्यमंत्री योगी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, युवक काँग्रेस महासचिव नवेद शेख, सरफ़राज़ खान, आदिल शेख, सुल्तान खान, पवन चांदपूरकर, संकेत जामगड़े, इसरत खान, समीर कुरेशी, तौफीक पटेल, शाहिद खान, रज़ा, सज्जू, शब्बू, सागर कोरती, अरशद अली आदी सहभागी झाले होते.

नागपुरात अवैध दारूविक्रीत दोन गटात मारहाण , चार जखमी

दारूविक्रीत

नागपूर : अवैध दारूविक्रीची तक्रार केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात दोन गटात हाणामारी झाली. यात चार लोक जखमी झाले. मंगळवारी रात्री कोतवालीतील भुतेश्वर नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. हा वाद पांडे व ठाकूर कुटुंबांमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पांडे पूर्वी दारूविक्री करायचा. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. नंतर त्याला मनपात सफाई कामगार म्हणून नोकरी लागली. पोलिसांचे म्हणणे आहे की, पांडेने दारूविक्री बंद केली होती. परंतु पांडेचे शेजारी शिवकुमार ठाकूर, लोकेश ठाकूर, सुजीत ऊर्फ मोनू ठाकूर आणि आशीष ठाकूर यांना पांडे दारूविक्री करीत असल्याचा संशय होता. असे सांगितले जाते की, ठाकूर यांनी याची पोलीस व अबकारी विभागात तक्रारही केली होती. कारवाई झाली नाही. उलट पांडे कुटुंबाला ठाकूर कुटुंबाने तक्रार केल्याचे माहीत झाले. यावरून वाद वाढला.

मंगळवारी रात्री वाद झाला. मोहन पांडे व त्याचा मुलगा राहुल पांडे हे सुजीत ठाकूर व त्याचा भाऊ शिवकुमार यांना ‘तूू समाजात आमची बदनामी करीत असल्याचे म्हणत शिवीगाळ करू लागला. मोहन पांडेने वस्तऱ्याने वार करून ठाकूर बंधूंना जखमी केले. यानंतर शिवकुमार, लोकेश, सुजीत व आशीष ठाकूरनेही तलवार व काठीने मोहन पांडे व त्याच्या मुलाला जखमी केले. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठाकू र कुटुंबांचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत पांडे व त्याच्या मुलाने हल्ला केला. त्यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. पोलिसांनीही अवैध दारू विक्री करीत असल्याची बाब नाकारली आहे. तेव्हा कोण खरे बोलत आहे, याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.

नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार

ठाणा

नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाकळखेडे २०१२ पासून ठाण्यात मालखाना प्रभारी होते. ते ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे त्यांचा कार्यभार सोपविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, टाकळखेडे यांच्याद्वारे मालखान्यात अपहार केल्याची माहिती पुढे आली. टाकळखेडेने जप्त केलेल्या दागिन्यांची हेराफेरी केली. मूळ दागिन्यांच्या बदली बनावट दागिने ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी टाकळखेडेला चांगलेच सुनावले. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने सक्करदरा ठाण्यात खळबळ माजली. ठाण्यातील मालखाने हे नेहमीच चर्चेत असतात.

Western India’s First Bilateral Hand Transplant Successfully Performed at Global Hospital, Mumbai

Hand Transplant

Mumbai: 24-year-old Monika More, who is a resident of Kurla, Mumbai, will get discharged today after spending over 4 weeks at Global Hospital, Mumbai. The patient, who underwent a 16-hour double hand transplant procedure successfully on August 28, has recovered very well and is excited to get a new lease of life and will attempt to become independent after a gap of almost 6 years.

Monika More, who was a teenager then, lost her both hands in 2014 after falling into a deadly platform gap at Ghatkopar Station. She tried to use prosthetic limbs for few months, but soon realised that they are practically useless and more of a burden.
Two years back, she was registered for Bilateral Hand Transplantation at Global Hospital, Mumbai. On several occasions, there were potential organ donors who could have donated hands for Monika. But she missed the opportunities, as the donor families did not agree for hand donation. Finally, a suitable donor was identified in Chennai. A young man was brain-dead and his family generously agreed for hand donation. The donor hands were flown in from Chennai to Mumbai by a chartered flight, and bilateral hand transplant surgery was successfully performed on August 28. Now, Monika is getting discharged today and wishes to live life the way she has always imagined.

Dr Nilesh G Satbhai, Consultant Plastic, Aesthetic, Hand & Reconstructive Microsurgeon, Global Hospitals, Mumbai, said, “After performing the complex procedure successfully, Monika was put on immunosuppressant medication. She was kept in the transplant ICU in a separate room, with a dedicated nurse as strict care and isolation was needed. Regular dressings were done for both the hands. The patient was able to sit up and walk with support for her arms on the 3rd day itself. She was given physiotherapy twice a day along with breathing and shoulder exercises. She initially had a plaster slab above the elbow till the hand to support the bones, and will need splints for more than a month.”

Dr Satbhai added, “In the next couple of weeks, she will be asked to move her elbow as well. Her hand and fingers are expected to start moving after 3-4 months as the nerve healing and recovery happens. The muscles, tendons and bones would also heal by then. The patient will need help with her day-to-day-activities till then. But, once the hands start functioning, and exercise and physiotherapy progress, she will be more independent. Her functional recovery will continue over the next year and half. After spending 4 weeks in the hospital (2 weeks in the TICU, 2 weeks in the HDU), Monika is now on oral medications only, and the immunosuppression doses have started tapering now. The patient has recovered smoothly and responded very well to the treatment. She will have to adhere to the follow-up instructions and continue exercising while at home.”

The movements of the patient’s mother and brother were restricted at the hospital. “The patient’s family was in touch with her via phone and video calls to minimize the chances of infection. Since the patient will be more prone to infections; she will have to stay isolated while at home for several months. No visitors will be allowed at home. The patient has been instructed to avoid all social events and gatherings, restrict stepping out of the house unnecessarily, and follow the COVID protocols and guidelines.”

Elated patient Monika More stated, “I became emotional after the transplant as I strongly believed that I will get new hands and can fulfil my dream. Earlier, I would avoid attending functions or weddings as I couldn’t apply mehndi on my hands. But, after my hands get functional, I will apply mehndi, paint, and do activities such as eating, bathing, combing hair, and cooking on my own. I always wanted to become independent and I am happy that I will be able to do so. I thank my late father, mother and brother, the family of the donor, who donated hands and other organs and the doctors from Global Hospital who gave me a fresh lease of life.”

“In the time of pandemic, a family in Chennai became a beacon of hope for the young girl by deciding to donate hands as this is very rare donation. We are glad that after a successful west India’s First Bilateral Hand Transplant, Monika would be able to lead a normal life post her recovery. The successful completion of the surgery and discharge of the patient is significant as this was never attempted before by any private hospital in India. Timely support by the authorities ensured safe and speedy transport of the organ from Chennai as keeping the transit time minimal was crucial. I hope that this successful surgery would bring hope to many other patients waiting for organs and create a drive towards organ donation especially of hands.,” concluded Dr Vivek Talaulikar, Chief Executive Officer, Global Hospital, Mumbai.
About Global Hospitals, Mumbai

Global Hospitals located at Lower Parel; Mumbai is the latest addition to the geographical footprint of Gleneagles Global Hospitals India. The 450-bed facility comprises of 17-stories, housing state-of-the-art infrastructure and advanced medical care facilities. The hospital offers end-to-end clinical, surgical and diagnostic services. The Hospital offers advanced Endoscopic procedures, Hepatobiliary and Liver Surgeries, Surgical and Medical Gastroenterology, Bariatric Surgery and Transplants. The hospital is a centre of excellence for Orthopaedics, Joint Replacement, Knee Replacement, Hip Replacement surgery. The hospital has round-the-clock services for Emergencies, Critical Care and Trauma.

Gleneagles Global Hospitals has multi-super speciality hospitals in Bengaluru, Hyderabad, Chennai and Mumbai. The brand is the most preferred hospital group for multi-organ transplants in Asia region. The parent entity of Gleneagles Global Hospitals is IHH Healthcare, a leading premium integrated healthcare provider with a network of 84 hospitals and more than 16,000 licensed beds. It is one of the largest healthcare groups in the world by market capitalisation and is listed in the Main Market of Bursa Malaysia and Main Board of SGX-ST. IHH is a leading player in the home markets of Malaysia, Singapore, Turkey and India, and in their key growth markets of China and Hong Kong.

Role Reversal: Honey Bunny set to host Kapil Sharma as a guest!

Kapil Sharma

They are goofy, gullible, yet so lovable. Yes! we are talking about the popular feline duo, Honey and Bunny, who enjoy an ever-increasing fandom amongst kids in the entire country. While they continue to make kids laugh through their own escapades, the cat duo is all set to welcome a new member to their gang – the comedy king Kapil Sharma. This is the first time that kids will be in for a treat as they get to see Kapil Sharma explore the world of Honey Bunny. With Honey-Bunny ruling the hearts of the kids and Kapil Sharma being ever-so-popular amongst the masses, Sony YAY! pairs them together to provide fans an unmatched experience of impeccable comic timing and hilarious camaraderie. The trio come together in a rib-tickling series in the newly-launched offering ‘The Honey Bunny Show with Kapil Sharma’ starting 12th October on Sony YAY!

The series of episodes will present a newly found friendship as Kapil showcases a never-before-seen avatar of him as he joins Honey-Bunny in their mischief-filled shenanigans. The young fans will not only get to see the camaraderie between the trio but will also witness the classic leg pulling between the three resulting in many “LOL” moments. It promises to be a carnival of comedy on the show as the popular TV show host will add to the Jholmaal on display with his wisecracks and humour. With an innate ability to make viewers roll with laughter, Kapil, in his comic avatars will be the star addition to the adventures of the popular YAY! toons. This marks a new chapter in the journey of Honey Bunny who are all set to surprise their fans by welcoming Kapil into their Jholmaal gang.
Along with this exciting collaboration, Honey-Bunny shall also feature 6 brand new movies and exciting fresh episodes. As the kids’ favourite toons Honey and Bunny gear up to wrestle with the comedy king of Indian television, do not miss out on all the fun and mischief as one can catch all the episodes of “The Honey-Bunny Show with Kapil Sharma” from 12th Oct onwards.

ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा; कॅटची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

ई-कॉमर्स

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले असून ते ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतींनी संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

भारतात ८ कोटींपेक्षा जास्त लहान व्यावसायिक आहेत. कोरोना महामारीमुळे १.५० कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांवर शोरूम वा दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातच मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या लोकांना जास्त सवलतीत वस्तू देत असल्याने त्याचेही संकट व्यापाऱ्यांवर आले आहे. ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव पाहता कॅटने व्यापाऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये ई-कॉमर्स पोर्टल भारत या ई-मार्केटला लॉन्च करण्याची तयारी केली आहे. याचा फायदा दुकानदारांना होणार आहे. कॅटने ई-कॉमर्स धोरणासह ई-कॉमर्स व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या अंतर्गत ई-कॉमर्स धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्याचे सुचविले आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना एफडीए धोरणात कोणतीही सूट देण्याची आवश्यकता नाही. एफडीए नियमांचे सक्तीने पालन करावे, असे बंधन या कंपन्यांवर टाकावे. ई-कॉमर्स पॉलिसी आली तर देशात सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा राहील.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, ई-कॉमर्स देशाचे भविष्य आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच नियमांचे पालन करण्यासाठी ई-कॉमर्स पॉलिसीची गरज आहे. कोरोना महामारीपूर्वी ई-कॉमर्सचा व्यवसाय ६ टक्के होता, तो सध्या २४ टक्क्यांवर गेला आहे. शहरी भागातील ४२ टक्के इंटरनेट उपयोगकर्ते आता ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करीत आहेत. अशा स्थितीतही देशातील दुकाने आपली भूमिका महत्त्वपूर्ण बजावत राहतील, पण त्यांना प्रोत्साहनपर धोरणांची गरज आहे. भारतात ई-कॉमर्स बाजार २०२६ पर्यंत २०० बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तो सध्या ४५ बिलियन डॉलर आहे. देशात इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे ६८७ दशलक्ष डिजिटल उपयोगकर्ते आहेत. त्यापैकी ७४ टक्के ई-कॉमर्स व्यवसायात सक्रिय आहेत. भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

जरीपटका सामूहिक बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना अटक

बलात्कार

नागपूर : मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.

तक्रार करणारी मुलगी १५ वर्षाची असून तिच्या घराजवळच आरोपी यश मेश्राम राहतो. त्याच्यासोबत तिची मैत्री आहे. २५ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३० च्या सुमारास यश आणि तक्रारदार मुलगी दुचाकीने फिरायला गेले. नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉन जवळ निर्जन ठिकाणी या दोघांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यांच्या मागावर असलेले आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर आरोपींनी तिला शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच तुला बदनाम करू आणि जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबून आरोपी देशभ्रतार, बोलके तसेच मोहरले या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. बदनामीच्या आणि जिवाच्या धाकाने मुलगी गप्प बसली.

म्हणून झाली तक्रार
सोमवारी सकाळी ती मुलगी दूध आणायला गेली असता आरोपी देशभ्रतारने तिला गाठले. मागच्यासारखेच आज करायचे आहे, तू आज तयार राहा. ठरल्या वेळेत तू आली नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घरी आली आणि रडत बसली. तिच्या आईने तिला कारण विचारले असता तिने झालेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने आपल्या नातेवाईकांना घरी बोलावून सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. ते सर्व पाण्याच्या टँकरवर काम करतात. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा १ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात असल्याचे जरीपटका पोलिसांनी सांगितले.

बाल्या बिनेकर हत्याकांड : आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

हत्याकांड

नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपुरातील बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळ आरोपी चेतन सुनील हजारे, रजत राजा तांबे, भारत राजेंद्र पंडित आणि आसीम विजय लुडेरकर तसेच त्यांच्या एका साथीदाराने
बाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर याची भीषण हत्या केली होती. या गुन्ह्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचा मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे (३०, रा. बारा सिग्नल, बोरकर नगर, इमामवाडा) तसेच रजत तांबे, आसीम लुडेरकर आणि भारत पंडित या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी रात्री सीताबर्डी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी आज दुपारी २ च्या सुमारास आरोपींना अत्यंत कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. गुन्ह्याच्या संबंधाने आरोपींकडून त्यांचे साथीदार आणि शस्त्रांसंबंधी माहिती घ्यायची आहे, असे सांगून पोलिसांनी पीसीआरची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य धरत आरोपींना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली.

न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त
आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे लोकभावना संतप्त आहेत. रविवारी बाल्याच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या भावना संतप्त होत्या. ते लक्षात घेत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने हे स्वत: न्यायालय परिसरातील बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. रस्त्यावरही गुन्हे शाखेतील पोलिस साध्या वेशात मोठ्या संख्येत हालचाली टिपत होते.

मुफ्त में गैस कनेक्शन लेने का आखिरी मौका! 30 सितंबर से पहले ऐसे करें अप्लाई

योजना

प्रधानमंत्री उज्जवला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY) के तहत आप भी मुफ्त में गैस कनेक्शन ले सकते हैं. हालांकि इसका लाभ उठाने के लिए आपको 30 सितंबर से पहले उज्जवला योजना (Ujjwala Yojana) की वेबसाइट Pmujjwalayojana.com पर जाकर मुफ्त गैस कनेक्शन के लिए जरूरी जानकारी देनी होगी. आप भी अंतिम डेट का इंतजार न करें और इस योजना का लाभ उठा लें.

आपको बता दें कि पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय के सहयोग से यह योजना चलाई जा रही है जो खासतौर पर गरीब महिलाओं के लिए है. यही नहीं इस योजना का उद्देश्य गरीब परिवारों को मुफ्त में गैस सिलेंडर कनेक्शन देना है. लेकिन, अब इस योजना के लिए केवल 2 दिन का समय बचा है. इस सरकारी योजना में रजिस्ट्रेशन कराना भी काफी आसान है.

बता दें कि कोरोना संक्रमण की वजह से पहले ही केंद्र सरकार ने पीएम उज्जवला योजना (PM Ujjwala Yojana) की तारीख को अप्रैल से सितंबर तक बढ़ा दिया था. अब अगर आपने अभी तक इस योजना का लाभ नहीं उठाया है तो जल्द से जल्द इसके लिए अप्लाई कर लें. Also Read – PM Ujjwala Yojana : मुफ्त में गैस सिलेंडर कनेक्शन चाहिए, मात्र नौ दिन बचे हैं, ऐसे करें अप्लाई

इस योजना के लिए रजिस्ट्रेशन करवाना बहुत ही आसान है. आइए आपको बताते हैं कि आप कैसे फ्री में LPG गैस सिलेंडर का लाभ उठा सकते हैं. आवेदन करने वाले को सबसे पहले Pradhan Mantri Ujjwala Yojana की आधिकारिक वेबसाइट pmujjwalayojana.com पर जाना होगा.

अब ऐसे करें अप्लाई 

-pmujjwalayojana.com वेबसाइट पर क्लिक करते ही सामने एक होम पेज खुल जाएगा. यहां डाउनलोड फॉर्म पर जाकर क्लिक करें.
-इसके बाद प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फॉर्म आ जाएगा.
– फॉर्म डाउनलोड कर लें.
–फॉर्म में मांगी जा रही सभी जानकारी भर दें और घर के पास वाले एलपीजी केंद्र में जमा करा दें.
-इसके साथ ही सभी डॉक्यूमेंट भी दें दें.
-अब डॉक्यूमेंट वेरिफाई होने के बाद आपको एलपीजी गैस कनेक्शन सरकार की ओर से उपलब्ध करा दिया जाएगा.

बता दें कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने PMUY, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना को 1 मई 2016 को शुरू किया था. इसके तहत बीपीएल परिवारों के लिए घरेलू रसोई गैस कनेक्शन दिया जा रहा है ताकि उन्हें भी चूल्हे की धुएं भरी जिंदगी से मुक्ति मिल सके. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय द्वारा 2011 की जनगणना में जो बीपीएल परिवार हैं उन्हें उज्ज्वला स्कीम का लाभ सरकार दे रही है. बता दें कि अब तक ऐसे करीब 8 करोड़ परिवारों को इसका लाभ पहुंचा है.

नागपुरात पोलिसांसाठी खास कोविड हॉस्पीटल सुरू

Private hospitals wish to stop treating Covid-19 patients...

नागपूर : पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरण्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटल ची निर्मिती करण्यात आली. २२ सप्टेंबरापासून सुरू झालेल्या या हॉस्पिटलमध्ये १६ बेडची व्यवस्था आहे. त्यातील आठ आयसीयू तर आठ बेड सेमी आयसीयू आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, डेफिब्रीलेटर मशीन प्रत्येक बेडसमोर टीव्ही आहे. पूर्णत: वातानुकूलित असलेले या हॉस्पिटल मध्ये प्रत्येक बेड सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. संपकर् ासाठी पीए सिस्टिम संपर्क सुविधा असून येथे रुग्णांसाठी योग टीचरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी मोटिवेट करण्याचीही व्यवस्था आहे.: पोलिसांच्या परिवारासाठी संपर्काची दैनंदिन व्यवस्था असून चार अ‍ॅम्ब्युलन्सची सोय आहे. त्यातील दोन अ‍ॅम्ब्युलन्समध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. रुग्णांसाठी तसेच तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत मेस सुविधा करण्यात आली आहे. ईसीजी मशीन, डिजिटल एक्स-रे, इको मशीन, अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, पॅथॉलॉजी लॅब, अ‍ॅडव्हान्स पल्स काउंटिंग मशीन आणि अत्याधुनिक केमिकल एनलायझर मशीनच ही या हॉस्पिटल मध्ये सुविधा आहे. येथे हॉस्पिटल चे प्रमुख म्हणून डॉ. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात सय्यद तारीक, डॉ. कुंतलेश्वर जांभुळकर आणि डॉ. प्रवीण गावंडे सेवारत आहेत. त्यांच्या मदतीला १६ परिचारिका, ६ वार्ड बॉय आणि चार स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुविधा आहे. या सर्वांसाठी परिसरातच निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच! अनेकांच्या रोजगारावर गंडांतर

नवरात्रोत्सव

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच साजरा होणार, अशी लक्षणे दिसत आहेत. त्याच अनुषंगाने शहरातील सर्व देवालयांमध्ये तयारी सुरू असून, महापालिकेकडून जारी होणाऱ्या निर्देशिकांची वाट बघितली जात आहे.
ज्या प्रमाणे महाराष्ट्रात श्रीगणेशोत्सवाचा जल्लोष असतो, त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाचा ज्वर असतो. नागपुरातही हा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना संसर्गाची धास्ती वाढल्याने या उत्सवावरही गंडांतर आले आहे. अद्यापही देवालये कुलूपबंदच आहेत. विशेष म्हणजे, नवरात्रोत्सव हा अनेकांगाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उत्सव असतो. त्यात नऊ दिवस ढोल-ताशे-नगारे, संदल, डीजे यांचा समावेश होत असतो. त्यात बऱ्यापैकी पुढच्या दोन ते तीन महिन्याचे आर्थिक गणित जुळविले जातात. मात्र, यंदा तशी स्थिती नाहीच.
डेकोरेशनशिवाय नवरात्रोत्सवाचा विचारच केला जात नाही. मंदिरांची सजावट, विस्तृत असे शामियाने, रात्रीला जगमगणारे प्रकाशदिवे यंदा नसणार आहेत. श्रीगणेशोत्सवात डेकोरेशनला यंदा वावच मिळाला नसल्याने, या व्यवसायावर निर्भर असणाऱ्यांनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक गोची झाली होती. त्यांना नवरात्रोत्सवात काम मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरत आहे.

त्यातच दररोज मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बेल, फूल, दुर्वा आणि पूजासाहित्य पुरविणाºयांनाही विनाकाम बसावे लागणार आहे. अद्याप देवालयेच सुरू करण्याची परवानगी नसल्याने नवरात्रोत्सवात भाविक देवळांमध्ये येतील तरच नवल. कारण, देवळांमध्ये गर्दी होताना दिसली तर त्यांच्यावर कारवाईचे भय असणार आहे. त्याचा परिणाम हार-फुले विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. शिवाय, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवळांची रंगरंगोटी केली जाते. मात्र, रोजगार कपातीच्या काळात भाविकांकडून तितकीशी वर्गणी गोळा होईल, याची शाश्वती राहिली नाही. त्याचा परिणाम रंगरंगोटी करणाऱ्या कारागिरांच्या रोजीरोटीवर होणार आहे.

घटस्थापनेची तयारी
यंदा नवरात्रोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होणार नसला तरी परंपरागत घटस्थापना नक्कीच होणार आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप यासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शिका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील देवळांमध्ये होणाऱ्या सामूहिक घटस्थापनेची तयारी सुरू झालेली आहे. किमान परंपरेला बगल नको म्हणून महापालिकेला घटस्थापनेची परवानगी दिली जावी, अशी विनवणी केली जात आहे.

कोरोना संक्रमणाच्या वेगाचा विचार करता यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने नवरात्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला गरबा नृत्य आयोजन रद्द करत आहोत. मात्र, घटस्थापनेची तयारी सुरू आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी जाणार आहोत.
राजू अडकिणे, अध्यक्ष – जय शीतला माता मंदिर पंचकमिटी, गोपाळकृष्णनगर.

नागपूर जिल्हा परिषद : विरोधकांना हाकलले सभापतींच्या कक्षातून

जिल्हा परिषद

नागपूर : जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही म्हणून पत्रपरिषद सुरू केली. पत्रपरिषद सुरू असतानाच सभापती आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरल्याने विरोधकांना जि.प.च्या वऱ्हांड्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.

विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्य राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, कैलास बरबटे, राधा अग्रवाल, व्यंकट कारेमोरे आदी उपस्थित होते. समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली असतानाच, त्या आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरला. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेत, जिल्हा परिषदेच्या वºहांड्यातच पत्रकारांना माहिती दिली. विरोधी सदस्यांना बसायलाही जागा नाही, अशी ओरड करीत, कुलूपबंद असलेल्या एका कक्षाचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे या पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेता यांच्यासोबत समाजकल्याण समिती सदस्यसुद्धा उपस्थित होते. सदस्यांचे म्हणणे आहे की, समाजकल्याण सभापतींचा कक्ष खाली होता. आम्ही त्यांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. कक्षात त्यांची कुठलीही बैठकही नव्हती. आम्हाला त्यांच्यापुढे माहिती देण्यास काही हरकतही नव्हती. पण लवकर आटोपा, असा आग्रह करीत त्यांनी सदस्यांचा अपमान केला आहे.

अध्यक्षांच्या कक्षातही झाला सदस्याचा अपमान
एका कामासाठी सदस्य राधा अग्रवाल या अध्यक्षांच्या कक्षात गेल्या. अध्यक्ष नव्हते, पण त्यांचे पती तेथे उपस्थित होते. ते काही लोकांसोबत चर्चा करीत होते. त्यांनी महत्त्वाची बैठक असल्याचे सांगून, तुम्ही बाहेर थांबा असे अग्रवाल यांना सांगितले. अध्यक्ष नसताना त्यांच्या कक्षात त्यांचे पती बैठका घेतात आणि सदस्यांना बाहेर उभे करतात, या घटनेचाही त्यांनी निषेध केला.
– आम्ही या घटनेचा निषेध करतो. सीईओंनी विरोधकांसाठी एक कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सीईओंकडे करणार आहे.
अनिल निधान, विरोधी पक्षनेता

कोरोना सर्वेक्षणाचे आशा वर्कर्सना ३०० रुपये द्या : आंदोलन

आंदोलन

नागपूर : कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना पुर्ण करण्याची जबाबदारी आशा वर्कर्सवर येऊन ठेपली आहे. आशा वर्करसोबत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेविका, स्वयंसेवक ठेवण्याची जबाबदारी आहे. आशा वर्करवर संपूर्ण कामाचा भार टाकण्यात येत आहे. शहरी भागात एएनएम, सुपरवायझर, महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना राजीनामा द्या किंवा काढून टाकण्याची अन्यथा मृत्यूनंतर ५० लाख मिळणार असल्याची भाषा वापरण्यात येत आहे. सोबतच सॅनिटायझर, मोजे, मास्क, कॅप, प्रिंटेड टी शर्ट, अ‍ॅप्रन कालावधी संपूनही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. २२ मार्चपासून कोरोनासाठी काम करणाऱ्या आशा वर्करला आणि डाटा एन्ट्री करणाऱ्या गटप्रवर्तकांना काम करूनही कोणताही मोबदला महापालिका किंवा जिल्हा परिषदेने दिला नाही. इतर जिल्ह्यात २०० ते ३५० रुपये प्रति रोज आशा वर्करला देण्यात येत आहेत. ५ ऑक्टोबरपासून योग्य निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रूपलता बोंबले, अंजू चोपडे, मनीषा बारस्कर, मंदा गंधारे उपस्थित होत्या.

एसटी ची आंतरराज्य बससेवा सुरू; वाढले उत्पन्न

एसटी

नागपूर : पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मालवाहतूक, खासगी गाड्यांचे टायर रिमोल्डिंग करणे सुरू केले. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. त्यानुसार मध्य प्रदेशात गणेशपेठ आगारातून खमारपाणी येथे सकाळी ११.१५ वाजता, रंगारी येथे सकाळी ७.१५. ९ वाजता आणि दुपारी २ वाजता, बिछवा येथे सकाळी ८ वाजता, दुपारी ४.३० वाजता, पचमढी येथे ८.१५ वाजता, पांढुर्णाला सकाळी ७.१५ व ८.५० वाजता, छिंदवाडाला सकाळी ७.३० व ९ वाजता, मोहगावला सकाळी १०.३० वाजता, सायंकाळी ६ वाजता, पिंपळा (नारायणवार) सकाळी ८.४५ वाजता, लोधीखेडाला सकाळी ८.१५ वाजता, रामाकोनाला दुपारी १ वाजता, बेरडीला सकाळी ६.४५ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, लालबर्रा येथे सकाळी ७.५० वाजता बसेस सोडण्यात येतील.

तेलंगणा राज्यात हैदराबादला सकाळी ६ वाजता, सायंकाळी ७.३० वाजता, आदिलाबादला सकाळी ९ वाजता, दुपारी १.३० वाजता, मंचेरियलला दुपारी १२ वाजता, छत्तीसगडमध्ये रायपूरला दुपारी २ वाजता आणि राजनांदगावला सकाळी ७ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत. आंतरराज्यात बसेस सुरू केल्यामुळे एसटीचे प्रवासी वाढले असून एसटीला चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती गणेशपेठचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली.

आंतरराज्य वाहतुकीला प्रतिसाद
पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचा एसटीला प्रतिसाद लाभत आहे. आंतरराज्यात जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यासाठी एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरू केले आहे. या बसेसलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.

राज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषीपंप आस्थापित होणार,ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांची मंजुरी

ऊर्जामंत्री

नागपूर – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७५०० नवीन सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषिपंपांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’ सुरु केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५,००० सौर कृषिपंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी ७५,००० सौर कृषिपंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत ७.५ अश्वशक्तीचे ७५०० सौर कृषिपंप आस्थापित करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे.

महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे ७.५ अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपाच्या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या गावांची सुरक्षीत पाणलोटक्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये ७.५ अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

सौर कृषिपंपामुळे दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता, दिवसा विनाव्यतय अखंडित वीजपुरवठा, वीज बिलापासून मुक्तता, डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य व पर्यावरणपुरक परिचलन आदी फायदे आहेत. अर्जासोबत ७/१२ उतारा प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी) आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने ए-1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. ऑनलाइन फॉर्म प्राप्त झाल्यानंतर व सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल आणि त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

या योजनेसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च २०१८ पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये २.५ लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे), ३१ मार्च २०१८ नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार, १ जानेवारी २०१९ पासून कृषीपंपासाठी सर्व नवीन अर्जदार, २.५ लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार पात्र राहतील. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी पात्र आहेत मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने       वीजजोडणी झालेली नसावी. याशिवाय विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे वीजजोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात वीजजोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी पात्र आहेत. तसेच अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी,वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी/विहिर/बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील. मात्र या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने यापूर्वी अटल सोलर योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा.

सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषिपंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३,३४,५५० असून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा म्हणून ३३,४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा म्हणून १६,७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम यंदा रद्द

दीक्षाभूमी

नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला असून यंदा नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. सध्या नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर कोट्यवधी लोकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत कोरोनासंबंधीच्या सूचनांचे पालन करणे अशक्य आहे. गर्दीत एखादा लक्षणेहीन कोरोनाबाधित आल्यास सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नाही. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दीक्षाभूमीवर होणारे यावर्षीचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी येत्या १४ आॅक्टोबर व अशोक विजयादशमीला २५ आॅक्टोबर २०२० रोजी सर्व नागरिकांनी आपापल्या घरीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करावे, असे आवाहनही या पत्रकाद्वारे केले आहे. स्मारक समितीचे पदाधिकारी शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून व योग्य ती दक्षता घेऊन बाबासाहेबांना यथोचित मानवंदना देतील, असेही डॉ. फुलझेले यांनी स्पष्ट केले आहे.

दुकानांनाही परवानगी नाही
दीक्षाभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे दुकानांनासुद्धा परवानगी देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही स्मारक समितीने जाहीर केले आहे.

तर कोरोना रुग्णांना कॅशलेस आरोग्य विम्याचा फायदा काय?

कॅशलेस

नागपूर : मनपाने नागपुरातील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. ज्या रुग्णांकडे कॅशलेस आरोग्य विमा आहे, त्यांनाही ३ लाखांपर्यंत रोख जमा करायला रुग्णालये सांगत आहेत. त्यानंतरच रुग्णालयाचे डॉक्टर्स कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याची बाब नागपुरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये उघडकीस आली आहे. त्यामुळे रोख रक्कम नसलेल्यांना मरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

कॅशलेस आरोग्य विमा नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे. उपचार तातडीने करायचा असल्याने रुग्णाचे नातेवाईक यावर उघडपणे बोलायला तयार नाहीत, पण ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे. कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसी असतानाही एका रुग्णालयाने रोख जमा केल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिला. दुसरीकडे रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. तर ३ लाखांपर्यंत रोख जमा केल्यास बेडही उपलब्ध होत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. यामुळे अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात धाव घेत आहेत, पण तिथेही बेड उपलब्ध नसल्याने अनेकांना उपचाराविना शहरात खासगी रुग्णालयाचे दरवाजे झिझवावे लागत आहेत. असा प्रसंग सध्या कोरोना रुग्णांवर ओढवत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागपुरात दररोज ३०० ते ४०० व्यक्ती कोरोना कवच योजनेंतर्गत आरोग्य विमा काढत आहेत. पण २ ते ३ लाखांपर्यंत रोख जमा करण्याच्या सक्तीमुळे खासगी रुग्णालये विमानधारकांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे. विमा कंपन्यांकडून संबंधित रुग्णालयांवर कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) अधिसूचना काढत देशातील विविध शासकीय व विमा कंपन्यांसोबत आरोग्य विमा संबंधित करार असलेल्या खासगी रुग्णालयांनी रोखरहित उपचार करण्याची सूचना केली आहे. पण या सूचनांचे कुणीही पालन करता दिसून येत नाही. अनेक रुग्णालये रोखीने उपचार करून नंतर विमा कंपनीकडे दावा करण्याच्या सूचना करीत आहेत. या प्रकारे विमा कवच योजनेत हजारो रुपये हप्ता भरूनही फायदा काय, असा प्रश्न विमाधारक उपस्थित करीत आहेत. रोख रक्कम दिल्यानंतरही रुग्णालये काय उपचार करतात, याची विस्तृत माहिती देत नसल्याने रुग्णालयाच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे.

डिस्चार्जच्या वेळी आरोग्य विमा कंपन्या शंका उपस्थित करतात आणि आधीच तणावात असलेल्या डॉक्टरांना उत्तर देणे कठीण असते. कंपनीकडून अंतिम मंजुरीसाठी काही तास लागतात आणि रुग्ण डिस्चार्जची वाट पाहतो. अशावेळी वाद होतो. त्यामुळे आरोग्य विमा लाभार्थ्यांनी आयआरडीएच्या नियमित दरांनुसार शुल्क द्यावे आणि त्यानंतर कंपनीकडे दावा करावा. त्यामुळे दुसऱ्याला लवकरच बेड उपलब्ध होईल. विमा कंपन्यांनी कोविड रुग्णालयांद्वारे बिल अपलोड केल्याच्या एक तासाच्या आत बिले निकाली काढण्यासाठी समर्पित फास्ट ट्रॅक सेल तयार करावा.
-डॉ. अनुप मरार, संयोजक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन.

नागपूरच्या मेडिकलमध्ये कोविडसाठी हजार खाटा करण्याचे निर्देश

मेडिकल

नागपूर : मेडिकलमध्ये १७०० खाटा असताना कोविड रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असणे योग्य नाही, यात आणखी ४०० खाटांची भर टाकून हजार खाटा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून मेडिकलमधील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी जीवावर उदार होऊन रात्रंदिवस कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. परंतु बैठकीत त्यांच्या कार्याचे कौतुक न करता मेडिकलमध्ये काहीच काम होत नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवल्याचे सूत्राने सांगितले.

कोविड रुग्णांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मेडिकलमध्ये बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आ. प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कु मार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आदी उपस्थित होते. प्राप्त माहितीनुसार, आरोग्यमंत्री टोपे यांनी आढावा बैठकीत सुरुवातीपासून मेडिकलमध्ये कोविडबाबत योग्य पद्धतीने काम होत नसल्याचा सूर आळवला. मुंबईमधील रुग्णसेवेची त्यांनी उदाहरणे दिली. शेवटी आहे त्या मनुष्यबळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी तातडीने खाटा वाढविण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

प्रशासनाच्या चुकांचे खापर मेडिकलच्या माथी
कोरोनाच्या सात महिन्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जम्बो कोविड हॉस्पिटल, मनपाचे कोविड हेल्थ सेंटर याच्या केवळ घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. आरोग्य विभाग केवळ आकडेवारी जमा करण्यापुरताच मर्यादित आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सोयी उभ्या करण्यास प्रशासनाला हवे ते यश आले नाही. यामुळे आपल्या चुकांचे खापर आढावा बैठकीत मेडिकलच्या माथी मारल्याची चर्चा दिवसभर मेडिकलमध्ये होती.

Toyota Kirloskar Motor launches its much-awaited compact SUV in India

SUV
  • All-new compact SUV is powered with new powerful K-Series 1.5 litre, four-cylinder Petrol Engine with choice of seamless Manual Transmission (MT)/Automatic Transmission (AT)
  • All AT variants equipped with Advanced Lithium-Ion Battery with Integrated Starter Generator (ISG)comprising Torque Assist Function, Idle Start Stop Function, Brake Energy Regeneration Function for enhanced fuel efficiency
  • Distinct and dynamic Two-Slat Wedge Cut Front Grille with Chrome Surrounds & Grey Finish with trapezoidal bold fog area and R16 Diamond Cut Alloy Wheels for a wide and strong SUV presence
  • An LED light package comprising dual-chamber LED Projector Headlamps with dual-function LED Daytime Running Lights (DRL) cum indicators, LED Fog Lamps, LED Rear Split Type Tail Lamps and LED High-mounted Stop Lamp to provide great looks and safer drive 
  • Dual Front Airbags, Anti-lock Braking System (ABS) with Electronic Brakeforce Distribution (EBD) and Advanced Body Structure for ensuring the utmost safety of passengers
  • Alluring and plush dual-tone Dark Brown Premium Interiors, ergonomically laid out and wide spacious cabin for added comfort
  • Complete entertainment and connected experience with Smart Playcast touchscreen audio with Android Auto/Apple Carplay and Smartphone-based Navigation and reverse parking camera
  • Rain Sensing Wipers, Cruise Control and Electrochromic Inside Rear View Mirror (IRVM) to add to amazing comfort and convenience
  • In addition to top-end features, smart entry with an engine push start and stop button and Auto AC are standard features across all variants
  • All-new Urban Cruiser available in exclusive to Toyota mono-tone colour of Rustic Brown and special dual-tone colours Rustic Brown with Sizzling Black Roof and Groovy Orange with Sunny White Roof
  • Also available in a range of other eye-catching mono-tone coloursSuave Silver, Groovy Orange, Iconic Grey, Spunky Blue and Sunny White and exciting dual-tone Spunky Blue with Sizzling Black Roof
  • SUV Price ranges from Rs. 840,000 to Rs. 11,30,000 (Ex-showroom, Delhi)
  • Dual Tone, available only in the premium variant of both MT & AT options, are priced at Rs. 998,000 and Rs. 11,55,000 respectively
  • The best-in-class Petrol fuel efficiency of 18.76 kmpl for the Automatic variant
  • The Urban Cruiser is backed by a superior warranty of 3 years or 1 lakh km, whichever comes earlier               
     

     

    MT AT
    GRADE Mid MT High MT Premium MT Mid AT High AT Premium AT
    PRICES Rs. 840,000 Rs. 915,000 Rs. 980,000 Rs. 980,000 Rs. 10,65,000 Rs. 11,30,000

Bangalore, September 23, 2020: Toyota Kirloskar Motor (TKM) today launched its youngest SUV, the all-new Toyota Urban Cruiser to fortify its offerings in the segment and further cater to its growing number of young customers. The Toyota Urban Cruiser is the second model to be launched in India under the global Toyota-Suzuki alliance following the emphatic success of the premium hatchback, the Toyota Glanza.

The #UrbanCruiser is designed for today’s young achievers who are aspirational and believe in the concept that #RespectStandsTall. The much-awaited compact SUV was launched in a stellar event today graced by TKM Managing Director Mr. Masakazu Yoshimura, Mr. Naveen Soni, Senior Vice President, Sales and Service and Mr. Tadashi Asazuma, Vice President, Sales and Marketing. The special guest of honour, youth icon and popular Indian superstar and singer Mr. Ayushmann Khurrana, also took part in the launch event and spoke about his inspiring journey from being a Radio Jockey to a successful actor.

The all-new Urban Cruiser will feature the new powerful K-Series 1.5 litre four-cylinder Petrol Engine and will be available in a choice of Manual Transmission (MT) and Automatic Transmission (AT) with a superior fuel efficiency of 17.03 kmpl and 18.76 kmpl respectively. The compact SUV offers all the high-end features that customers today seek in their cars. Moreover, it offers an early entry into the Toyota SUV family for the young and comes with Toyota’s famed global standards of sales and after-sales service. As always, safety is a top priority for Toyota – the Urban Cruiser offers Dual Front Airbags, ABS with EBD, Advanced Body Structure, Electrochromic IRVM, Hill Hold Control, Reverse Parking Camera with Display in Audio and ISOFIX Child Seat Restraint System.

Sharing his views on the launch of Toyota Urban Cruiser, Mr. Masakazu Yoshimura, Managing Director, TKM said, “Our entry into the compact SUV space comes at a time when the segment has gained much popularity due to its body type and superior road presence thereby garnering greater connect and appeal among today’s youth. At TKM, the focus is always on delivering the best products and services to our customers who have remained loyal to the brand over the years while looking for ways to welcome more customers, particularly the youth, to the Toyota family. The launch of the all-new Toyota Urban Cruiser is an important step in that direction. It is our ambition to enable more people to buy and experience a Toyota vehicle and our renowned after-sales service, which is a differentiator for us in this segment. We will continue to emphasize on introducing ever-better cars, better technologies and environment-friendly products and services. Our alliance with Suzuki allows us to surge ahead on that path while building a self-sustaining local ecosystem of suppliers and partners.”

Speaking on the new offering, Mr. Naveen Soni, Senior Vice President, Sales and Service, TKM, said, “We are truly humbled by the faith reposed by the customers who made the bookings without even knowing the price points and the full list of features. To demonstrate our gratitude and provide an early-movers advantage for customers who pre-booked the Urban Cruiser, we recently announced the ‘Respect Package’, no-cost periodic maintenance for up to two years (or 20,000 kms whichever is earlier), that our customers are appreciating. Further, we are confident that the all-new Toyota Urban Cruiser will exceed their expectations and delight them in every aspect, be it performance, comfort and convenience or safety. We are glad to bring our new offering in time for customers to make their festive season purchase decisions. We are anticipating increased demand for SUVs in the coming months and years ahead. The Toyota Urban Cruiser will play an important role in catering to this demand particularly from first-time Toyota buyers who are brand conscious and want to experience an international brand.”

Bookings for the Toyota Urban Cruiser are open. Customers can either book the car online (www.toyotabharat.com) or visit their nearest Toyota dealership.

कोरोना रुग्ण , मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले

रुग्ण

नागपूर : कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासूनच महाराष्टÑ सरकार संसर्गित रुग्ण आणि मृतांची संख्या लपवत राहिल्याने स्थिती अतिशय गंभीर बनली, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्याची व इस्पितळात खाटा वाढविण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरील प्रश्नांना मुद्देसूदपणे उत्तरे देत परखड मते मांडली.
विशेषत: कोविड-१९ ची साथ आणि महाराष्ट्रातील स्थितीवर बोलताना त्यांनी रोखठोकपणे सांगितले की, राज्य सरकारकडून १०० चुका झाल्या. कोरोनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या कमी कशी दाखविता येईल, याच खटाटोपात होते. त्यामुळेच चाचण्या (टेस्टिंग) कमी करण्यात आल्या. आज बिहारमध्ये दररोज दीड लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, तर महाराष्टÑात जवळपास ९० हजार चाचण्या होत आहेत. मागच्या २० दिवसांत महाराष्टÑात संसर्गाचा दर २५ टक्क्यांहून जास्त आहे.

मुंबईची लोकसंख्या दोन कोटी आहे; परंतु नागपूरएवढ्याच चाचण्या मुंबईत होतात. देशाच्या तुलनेत कोरोनामुळे महाराष्टÑात सर्वाधिक मृत्यू होत आहेत, हे दुर्दैव आहे. निश्चितच नियोजनात चूक झाली आहे. भीतीपोटी चाचण्या कमी करू नका. आवश्यक सुविधा वाढवून त्वरेने व्यवस्था केली तरच समस्यांवर मात करण्याची आशा बाळगू शकतो.

कोरोना बाधितांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स हवी…डायल करा १०२ किंवा १०८ क्रमांक

अ‍ॅम्ब्युलन्स

नागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भातील आज एक पत्रक जारी करत या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमधील खाटांच्या उपलब्धतेबाबतही प्रशासनाने संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर यासाठी संपर्क साधता येणार आहे. महानगरपालिकेनेदेखील रुग्णवाहिका, शववाहिका या संदर्भात प्रत्येक झोनसाठी दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर (२२४५०५३), धरमपेठ (२५६७०५६), हनुमाननगर (२७५५५८९), धंतोली (२४६५५९९), नेहरूनगर (२७०२१२६), गांधीबाग (२७३९८३२), सतरंजीपुरा (७०३०५७७६५०), लकडगंज (२७३७५९९), आशीनगर (२६५५६०५), मंगळवारी (२५९९९०५) या झोनमधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, गरजेनुसार घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क बांधून, शारीरिक अंतर ठेवून जागरूक असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा : महापौरांचे आवाहन

जनता कर्फ्यू

नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा रिकव्हरी रेट जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबाबदारीने उद्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
शहरातील कोविडचा धोका वाढत असतानाच संक्रमणाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. बेजबाबदारपणे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या काही लोकांमुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, नागरिकांनाही शिस्त लागावी यासाठी शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून संदीप जोशी यांनी १९ व २० सप्टेंबर आणि २६ व २७ सप्टेंबर रोजी जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. १९ व २० सप्टेंबर रोजी लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमध्ये शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र काही ठिकाणी बेजबाबदार वर्तनही दिसून आले. दुसरा जनता कर्फ्यू शनिवारी आणि रविवारी रोजी घोषित केला आहे.

नवेगाव-नागझिरामध्ये १ नोव्हेंबरपासून वन पर्यटन

पर्यटन

नागपूर : पेंच, ताडोबा आणि उमरेड कऱ्हांडलाच्या पाठोपाठ आता नवेगाव-नागझिरामधील वन पर्यटनदेखील सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून पावसाळ्यामुळे येथील पर्यटन एक महिना उशिराने सुरू होत आहे.
नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात २४ सप्टेंबरला एक पत्र प्रसृत करून १ नोव्हेंबरपासून नियमांसह येथील पर्यटन सुरू करण्याची घोषणा केली. देशभरात झालेल्या कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्वत्र ३१ मेपर्यंत लॉकडाऊन होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून जून महिन्यामध्ये वन पर्यटन सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. यादरम्यान पावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार ३० जूनपासून नवेगाव-नागझिरा येथील पर्यटन बंद करण्यात आले होते. आता पावसाळा संपल्याने हे पर्यटन पुनश्च सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एनटीसीएच्या दिशानिर्देशांचे पालन करूनच येथील पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे. १० वर्षाआतील आणि ६५ वर्षावरील नागरिकांना पर्यटनास बंदी असून आरोग्य तपासणी केल्यावरच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे. खुल्या जिप्सीमध्ये चालक व गाईड यांच्यासह फक्त चार पर्यटकांनाच अनुमती आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
24 ° C
24 °
24 °
38 %
1.5kmh
0 %
Sat
39 °
Sun
41 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...