Home Blog Page 271

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज अंत्यसंस्कार, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

अटलबिहारी वाजपेयी , ATAL BIHARI VAJPAYEE

राजकीय विचारधारांची लढाई केवळ विचारांनीच नव्हे, तर सभ्य, शालीन, सौहार्दशील व विवेकी विचारांनी लढणारे स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील उत्तुंग व सर्वमान्य नेतृत्व, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी देहावसान झाले.

राजकीय-सामाजिक विचारांच्या कल्लोळात, आपापल्या स्वतंत्र कोषात बंदिस्त करून घेतलेल्या परस्परविरोधी विचारधारांना एकत्र बांधण्याचे अफाट सामर्थ्य असलेल्या या जननायकाच्या निधनानंतर भारत देशातील उजवी-डावी-मध्य अशा सर्व दिशांतील तसेच विभिन्न रंगांतील विचारधारांनी एकसूरात शोक व्यक्त केला. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुमारे एक तपापूर्वी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्वीकारलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ११ जून रोजी ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर गुरुवारी रात्री वाजपेयी यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनियामुळे वाजपेयी यांच्या दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. याशिवाय दोन्ही किडन्या अशक्त झाल्या होत्या. परिणामी किडनीसह अनेक अवयव निकामी झाल्याने वाजपेयी यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, असे ‘एम्स’ने जाहीर केले आणि अवघा देश शोकसागरात बुडाला.

वाजपेयी यांचे पार्थिव नवी दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अविवाहित असलेल्या वाजपेयी यांच्या मागे त्यांची मानसकन्या नमिता कौल भट्टाचार्य आहेत.

आज दुपारी अंत्यसंस्कार

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे अंत्यसंस्कार होतील. सकाळी साडेसात ते साडेआठपर्यंत वाजपेयी यांचे पार्थिव दिल्लीच्या कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी ९च्या सुमारास त्यांचे पार्थिव दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात नेण्यात येईल. दुपारी १ वाजता मुख्यालयातून वाजपेयी यांचे पार्थिव स्मृतीस्थळ येथे आणण्यात येईल. राष्ट्रीय दुखवट्याचा भाग म्हणून तिरंगा अर्ध्यावर आणण्यात येणार आहे. याशिवाय आजच्या अंत्यसंस्कारानिमित्त केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात येणार आहे.

अधिक वाचा : Former Prime Minister Atal Bihari Vajpayee passes away at 93

अग्निशमन नियमांचे पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई करा – आयुक्त वीरेंद्र सिंह यांचे निर्देश

वीरेंद्र सिंह

नागपुर :- महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई करून अशा इमारतींमधील पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा खंडित करा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

गुरूवारी मनपा आयुक्त कार्यालयात सर्व विभागांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

अग्निशमन व आणीबाणी विभागातर्फे शहरातील ७८२ इमारतधारक व भोगवटदारांना इमारतीमधून दूर निघून जाण्यास नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र त्यापैकी ३७२ इमारतींनी अद्यापही काही उपाययोजना न केल्याने अशा इमारतीमधील पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी जलप्रदाय विभाग, ओसीडब्ल्यू व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, एसएनडीएल च्या अधिकाऱ्यांना दिले.

रस्त्यांवरील खोदकाम शनिवारपर्यंत निकाली काढा

महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खोदकाम करताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मनपाच्या परवानगीशिवाय रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या विभागांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही यावेळी आयुक्त श्री. सिंह यांनी निर्देशित केले. रस्ते खोदकामासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासची सुद्धा परवानगी घेऊन त्या संबंधी रितसर पत्र सादर करण्यात यावे. याशिवाय रस्ते खोदकामासंर्भातील संपूर्ण प्रकरण येत्या शनिवारपर्यंत निकाली काढण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कळमना परिसरातील रेल्वेची सुरक्षा भिंत तुटल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे बांधकाम व ट्रॅकवरील स्वच्छतेबाबत त्वरित कारवाई करण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. रहिवाश्यांनी ये-जा करण्यासाठी कळमना ते नागपूर ट्रॅक लगतच्या भिंतीला भगदाड पाडले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ४५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यासंबंधीच्या अंदाजपत्रकाची प्रत मनपा आयुक्त कार्यालयाकडे पाठवून त्वरित कामाला सुरूवात करावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निर्देशित केले.

प्रत्येक महिन्याला होणारी ही समन्वय बैठक विकास कामांच्या दृष्टीने आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व विभागप्रमुखांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.

अधिक वाचा : स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee passes away at 93

Atal Bihari Vajpayee

NEW DELHI: Former prime minister Atal Bihari Vajpayee has passed away aged 93 at AIIMS in Delhi. In a medical bulletin, the hospital said the Bharat Ratna breathed his last at 5.05pm on Thursday. “Unfortunately, his condition deteriorated over the last 36 hours and he was put on life support systems. Despite the best of efforts, we lost him today,” AIIMS said in a press release.

The Bharatiya Janata Party stalwart was admitted to the All India Institute of Medical Sciences (AIIMS) in New Delhi on June 11 with a kidney tract infection, urinary tract infection, low urine output and chest congestion. Last night, Vajpayee’s condition had worsened and he was put on life-support system. Prime Minister Narendra Modi, BJP chief Amit Shah, party veteran LK Advani, Delhi CM Arvind Kejriwal, several Union Ministers and CMs paid a visit to Vajpayee this morning.

A large crowd of mediapersons and others has gathered outside AIIMS, affecting movement of traffic on the road. Traffic Policemen have been deployed to manage the crowd and traffic outside the hospital. The roads leading to Krishna Menon Marg have been blocked. Roads leading to Atal Bihari Vajpayee’s home have also been sealed.

सामाजिक कार्यकर्ताओ द्वारा पूर्व प्रधानमंत्री वाजपेयीजी के जल्द स्वस्थ होने के लिए शिवजी का रूद्र अभिषेक

अटल बिहारी वाजपेयी

नागपुर :- नागपुर में सामाजिक कार्यकर्ताओ द्वारा पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी के जल्द स्वस्थ की कामना के लिए खामला स्थित शीतला माता मंदिर में सामाजिक कार्यकर्ता पंजू तोतवानी और अन्य नागरिक तथा पूजारियो द्वारा मंदिर के शिव लिंग पर पूजा अर्चना एव रूद्र अभिषेक किया गया | पता हो की पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी की हालत नाजुक बनी हुई है और वह कल से जीवन रक्षक प्रणाली पर है।

भारतीय जनता पार्टी के 93 वर्षीय दिग्गज नेता को किडनी ट्रैक्ट इंफेक्शन, यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन, पेशाब आने में दिक्कत और सीने में जकड़न की शिकायत के बाद 11 जून को अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, दिल्ली (एम्स) में भर्ती कराया गया था।

एम्स ने कल रात एक बयान में कहा, ‘दुर्भाग्यवश, उनकी हालत बिगड़ गई है। उनकी हालत गंभीर बनी हुई है और उन्हें जीवन रक्षक प्रणाली पर रखा गया है।’ एम्स की तरफ से जारी मेडिकल बुलेटिन के अनुसार बीते 24 घंटे में उनकी हालात और बिगड़ी है।

और पडे : त्रिपुराच्या राज्यपालांनी केली ‘ही’ चूक वाजपेयींना ट्विटरवर दिली श्रद्धांजली

नौकरी दिलाने के नाम लोगों को ठगने वाला फरार आरोपी गिरफ्तार

नौकरी दिलाने के नाम लोगों को ठगने वाला फरार आरोपी गिरफ्तार

नागपुर :- हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत एक फरार ठग को पुलिस ने गिरफ्तार किया है। अदालत में पेश कर उसे पीसीआर में लिया गया है। आरोपी ने लोगो को नौकरी लगाने का झांसा देकर लाखों रुपए से ठगी की है।

प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी का नाम विनय ज्ञानेश्वर वालदे (23) है। वह एक धार्मिक समुदाय से जुड़ा है, विनय ने खुद की ऊपर तक पहुंच होने का झांसा देकर अपने ही समुदाय और रिश्तेदारों को नौकरी लगाकर देने का झांसा दिया और उनसे लाखों रुपए ले लिए। इतनाही नहीं ठगी में मास्टर विनय लोगो को फर्जी नियुक्ति पत्र देने से भी नहीं चूका। जब लोग संबंधित विभाग में नियुक्ति पत्र लेकर गए तभी नौकरी के इस फर्जीवाड़े का पर्दाफाश हुआ । १ जनवरी २०१७ को १३ पीड़ितों ने शांति नगर थाने में प्रकरण दर्ज कराया था। उनसे ११ लाख ९५ हजार रुपए से ठगने के बाद से विनय फरार था।

इस बीच संबंधित थाने के दल को गुप्त सूचना मिली थी कि फरार विनय हुड़केश्वर क्षेत्र में छुपा हुआ है। पुलिस ने जाल बिछाकर उसे गिरफ्तार किया। पूछताछ के दौरान विनय ने पुलिस को बताया है कि एक नेट कैफे से उसने फर्जी नियुक्ति पत्र तैयार किए थे। नेट कैफे से प्रिंटर, कंप्यूटर, हार्ड डिस्क जब्त किए गए हैं। लोगों के रुपए से विनय ने १८ कीमती पैंट, ३४ शर्ट टी-शर्ट खरीदी, सोने की माला और एक दोपहिया वाहन भी एक्सचेंज कर खरीदा था। पुलिस ने उसके पास से सभी माल और सामग्री जब्त की है।

और पडे : स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

त्रिपुराच्या राज्यपालांनी केली ‘ही’ चूक वाजपेयींना ट्विटरवर दिली श्रद्धांजली

त्रिपुराच्या राज्यपालांनी केली 'ही' चूक वाजपेयींना ट्विटरवर दिली श्रद्धांजली

दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशात प्रार्थना सुरू आहेत. तर, दुसरीकडे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी वाजपेयींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहली असल्याचा प्रकार समोर आला. चूक लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट करण्यात आले.

भारताचे माजी पंतप्रधान, उत्कृष्ट वक्ता आणि सहा दशके देशाच्या राजकारणावर छाप सोडणारे, विनम्र अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले असे आशयाचे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले.

या ट्विटनंतर तथागत रॉय यांना ट्रोल करण्यात आले. अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींविषयी, यामुळे दाखवली चुकीची बातमी

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. अटलजींची प्रकृती सुधारावी, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी आपल्या उतावीळपणाचं प्रदर्शन करत, अटल बिहारी वाजपेयी यांच्या यांच्याविषयी चुकीचं वृत्त चालवलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत. अटलजींच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी, मेडिकल बुलेटीन माहिती दिली जात आहे.

सायंकाळी ५ नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीबद्दलचे बुलेटिन एम्स प्रसिद्ध करणार आहे.

काय झाला हा प्रकार….
वाजेपयींच्या प्रकृतीविषयीचं अपडेट देण्यासाठी देशभरातील मीडिया, डोळा लावून बसला आहे. यात भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांची एक प्रतिक्रिया एएनआय या न्यूज एजन्सीला दिली. आधीच भांबावलेल्या लोकांनी राजनाथ यांची प्रतिक्रिया अर्धवट ऐकली, अन्यथा नीट ऐकली नाही.

राजनाथसिंह नेमके काय म्हणाले…
राजनाथ सिंह आपल्या प्रतिक्रियेत म्हणत होते. बलराम दास टंडन जनसंघाचे संस्थापक सदस्य होते, भाजपा उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आणीबाणीत त्यांनी जेल देखील भोगली होती. छत्तीसगडचे राज्यपाल बलराम दास टंडन यांचं, १४ ऑगस्ट रोजी छत्तीगडमधील रायपूरमध्ये हृदय विकाराने निधन झालं. राजनाथ सिंह हे बलराम दास टंडन यांच्याविषयी बोलत होते.

वाजपेयी यांच्याविषयी बोलत असल्याचा समज
पण हा व्हिडीओ अर्धाच दिसला आणि त्यातही राजनाथ यांनी एकदाच टंडन यांचं नाव घेतल्याने, राजनाथ सिंह अटलबिहारी यांच्याविषयी बोलत असल्याचा समज झाल्याने, काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींविषयी चुकीची बातमी चालवली.

Leaders across party lines pray for recovery of former PM Vajpayee

New Delhi: A number of leaders cutting across party lines today prayed for the recovery of former prime minister Atal Bihari Vajayee, who has been admitted to AIIMS and is in a “critical” condition. They said he was a leader who wanted to take India to heights that were unmatched by any other country in the world and was a source of inspiration. Senior BJP leaders L K Advani, Vice President Venkaiah Naidu, Rajnath Singh, JP Nadda, party president Amit Shah, Shahnawaj Hussain, Manoj Tiwari, Anurag Thakur, Vijay Goyal, Udit Rai, Prakash Javedkar, Harsh Vardhan visited him at the hospital. Leaders from other political parties, including Congress’s Ghulam Nabi Azad, Ram Vilas Paswan from Lok Janshakti Party (LJP), NC’s Farooq Abdullah, Delhi Chief Minister Arvind Kejriwal and his deputy Manish Sisodia, visited the premier health institute.

Former Jammu and Kashmir chief minister Farooq Abdullah after visiting the hospital said,”We should not forget he is one Indian leader who wanted to strengthen the country.” “He wanted to take India to such heights that were unmatched by any other country in the world. He has friendship and love for everyone. He wanted peace not only in the country but also in the entire world,” he said. Paswan said,” We enquired about his health condition and are in touch with his family.” BJP MP Udit Raj’s maintained that his condition remains the same. “We pray for his fast recovery. Atalji is a very big personality. He respects every section of society,” he said. Vajpayee is battling for life and remains on advanced life support at the All India Institute of Medical Sciences for the second day.

A health bulletin from the hospital said Vajpayee’s “condition continues to be the same. He is critical and on life-support system”. Meanwhile, a source said, “His lungs are not in good condition because of pneumonia on both sides and kidneys are also weak. He is critical.” BJP leader Arjun Ram Meghwal said, “Let’s pray for his good health.” Kejriwal tweeted,”Myself and Manish Sisodia ji visited Atal ji in the hospital. We pray for his health and fast recovery,” he tweeted.

The media advisor to the chief minister, Nagender Sharma, later said Kejriwal has requested party volunteers and well wishers to avoid his birthday celebration and refrain from paying a visit to his residence for it. Senior BJP leader Shahnawaz Hussain also tweeted,”Atal Bihari Vajpayee’s health condition remains critical. More than medicines, Vajpayee, who is admitted in AIIMS, now needs prayers of everybody. Pray along with me so that some miracle happens.” Reactions also poured in from across the country for the former prime minister.

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan said Vajpayee was his ideal and source of inspiration. Vajpayee’s presence boosts people’s morale and inspired them to do the good work, he said. Chhattisgarh Chief Minister Raman Singh said the former prime minister had a long association with the state and his memories are incredible. “He embraced all without any discrimination. As a leader he is unmatched by another leader in the country as well as abroad,” he said. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath said, “We pray for his health and hope his guidance is available to the party and society,” he said. BJP leader Kailash Vijayvargiya said the whole country was concerned and people are praying for him.

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरंभ

युवा माहिती दूत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा आरंभ स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. युनिसेफच्या सहकार्याने आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या विविध ठिकाणी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्येष्ठ नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी शासन राबवित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य म्हणून संबंधित कुटुंबांना द्यावी अशी ही योजना आहे. माता-बाल संगोपन, आरोग्य, लसीकरण, शिक्षण, स्वच्छता यासंदर्भातही युवकांनी जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही ऐच्छिक योजना आहे. या करिता ‘युवा माहिती दूत’ या प्ले स्टोअरवरील अ‍ॅप्लिकेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी करावयाची आहे. युवा माहिती दूत झालेल्या युवकाने सहा महिन्यात 50 घरी जाऊन त्या कुटुंबाला लागू पडतील अशा योजनांची माहिती द्यावयाची आहे आणि त्याचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा, याबद्दल माहिती द्यावयाची आहे. राज्यातील सुमारे 1 लाख विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना शासनाचे माहिती दूत म्हणून ओळखपत्र मिळेल आणि प्रमाणपत्र मिळेल.

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे एका विशेष समारंभात या योजनेच्या संकल्पनेचे स्वागत केले. तरूणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद युवा वर्गामध्ये आहे.महाविद्यालयांनी शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांना देण्यासाठी आठवड्यातून एक तास ठेवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत औरंगाबादेत या उपक्रमाचा शुभारंभ केला.शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून केला जातो. मात्र आता माहिती दूत या उपक्रमामुळे जनतेशी थेट संवाद साधता येणार आहे, असे प्रशंसोद्गार वर्धा यथे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी काढले. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी नांदेड येथे या योजनेचा आरंभ केला.

पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले, आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या या उपक्रमामुळे आदिवासी समाजाला त्यांच्यासाठीच्या योजनांची थेट माहिती मिळेल.

या उपक्रमाची माहिती देताना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाअंतर्गत किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या युवकांमार्फत किमान 50 लाख लाभार्थ्यांशी म्हणजेच किमान अडीच कोटी व्यक्तिंशी शासन जोडले जाईल. युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसारासाठीही याचा लाभ होईल.

ठाणे येथेही काही पदवीधर विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मोबाईलवर नोंदणी करुन युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या माध्यमाद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. शासन राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या कुटुंबाना युवकांनी दिलेल्या माहितीचा उपयोग होईल, असे जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन यामधील दुवा ठरतील, असा विश्वास भंडारा येथे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

अलिबाग येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी युवा माहिती दूत या उपक्रमाचे स्वागत करुन लोगोचे अनावरण तसेच पुस्तिकेचे विमोचन केले. यावेळी त्यांनी विविध शासकीय योजना पोहोचविण्यासाठी युवा माहिती दुतांनी सज्ज व्हावे, असे सांगितले.

परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, युवकांची शक्ती ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरु शकते. युवकांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारुन शासनाच्या योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

शासकीय योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम युवा माहिती दूत करणार असल्याने शासन करीत असलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना कळू शकणार आहे. त्याचबरोबर अनेक योजनांचा लाभही त्यांना घेता येईल, असे सोलापूरचे पालकमंत्री विजयदेशमुख यांनी सांगितले. तर, युवा माहिती दुतामुळे शासनाना जनतेतील संवाद अधिक गतीने वाढेल, असा विश्वास धुळ्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

Gold Vs Satyameva Jayate Box Office Collection Day 1: अक्षय कुमार की ‘गोल्ड’ कमाई में जॉन अब्राहम की फिल्म ‘सत्यमेव जयते’ से आगे निकली

अक्षय कुमार की 'गोल्ड' कमाई में जॉन अब्राहम की फिल्म 'सत्यमेव जयते' से आगे निकली

नई दिल्ली: स्वतंत्रता दिवस के मौके पर 15 अगस्त, 2018 को दो बॉलीवुड फिल्में रिलीज हुई. अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड (Gold)’ की टक्कर बॉक्स ऑफिस पर जॉन अब्राहम की फिल्म ‘सत्यमेव जयते (Satyameva Jayate)’ से हुई और कमाई के मामले में खिलाड़ी अक्षय कुमार ने बाजी मार ली. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श के अनुसार, ‘सत्यमेव जयते’ ने ‘गोल्ड’ से तकरीबन 5 करोड़ रुपये कम कमाए. जबकि ‘गोल्ड’ अक्षय कुमार की अब तक की सबसे ज्यादा ओपनिंग कलेक्शन करने वाली फिल्म बनी है. इतना ही नहीं ‘गोल्ड’ साल 2018 की तीसरी सबसे ज्यादा ओपनिंग कलेक्शन करने वाली.

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श के ट्वीट के अनुसार, ‘गोल्ड’ ने पहले दिन 25.25 करोड़ रुपये का कलेक्शन किया. ‘गोल्ड’ के जरिए अक्षय कुमार को अब तक की सबसे बड़ी ओपनिंग मिली है. वहीं, ‘सत्यमेव जयते’ ने पहले दिन 20.52 करोड़ रुपये बटोरे. यह जॉन अब्राहम की सबसे बड़ी ओपनिंग कलेक्शन करने वाली फिल्म बनकर उभरी है. पहले दिन की कमाई से साफ है कि दोनों ही फिल्मों में 15 अगस्त की छुट्टी का फायदा मिला है. साथ ही दोनों फिल्मों को 5 दिन का लंबा वीकएंड मिला है, जिसका सीधा फायदा इसके कलेक्शन पर पड़ेगा.

अक्षय कुमार की ‘गोल्ड’ को साल 2018 की तीसरी सबसे बड़ी ओपनिंग मिली है, जबकि ‘सत्यमेव जयते’ 5वीं पोजिशन पर है. तरण अादर्श के मुताबिक, ‘बागी-2’ को पछाड़ ‘गोल्ड’ ने लिस्ट में तीसरी पोजिशन पर कब्जा किया. 34.75 करोड़ रुपये के कलेक्शन के साथ रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ पहले नंबर पर है, जबकि दूसरी पोजिशन पर सलमान खान की ‘रेस-3’ है.

बता दें, ‘गोल्ड’ एक हॉकी खिलाड़ी के वास्तविक जीवन पर आधारित है, जिसने स्वतंत्र भारत के लिए पहला स्वर्ण पदक हासिल करके भारत का नाम गर्व से ऊपर किया था. इस फिल्म में भारत के लिए पहला गोल्ड का सपना देखने वाले हॉकी खिलाड़ी की यात्रा को दर्शाया गया है. अक्षय कुमार स्टारर इस फिल्म से मौनी रॉय अपना डेब्यू कर रही हैं. फिल्म में अमित साध, विनीत कुमार सिंह, कुणाल कपूर अहम किरदार में दिखेंगे.

और पडे : Video : Salman Khan unveils Bharat teaser!

Ind vs Eng: विराट कोहली फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद?

विराट कोहली Virat Kohli

Ind vs Eng: विराट कोहली फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं

लंडन : इंग्लंड विरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. १८ ऑगस्टपासून तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या टेस्ट मॅचसाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि हार्दिक पांड्या फिट घोषित करण्यात आले आहेत. दुसऱ्या टेस्टदरम्यान बॅटिंग करताना हार्दिक आणि अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. तर बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह इंग्लंडविरुद्धची टी-२०, वनडे सीरिज आणि टेस्ट सीरिजच्या सुरुवातीच्या २ मॅच मुकला होता. पण आता बुमराह फिट झाला आहे. भारताचे हे तीन खेळाडू फिट घोषित करण्यात आले असले तरी विराट कोहलीच्या फिटनेसबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

पाठदुखीमुळे विराट दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा काही भाग आणि चौथ्या दिवशी विराट कोहली फिल्डिंगला आला नव्हता. फिल्डिंग न केल्यामुळे विराटला दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्या नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येता आलं नव्हतं. दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर आणि विराट पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. जास्त क्रिकेट खेळल्यामुळे पाठीच्या खालचा भाग दुखायला लागल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली होती. तसंच तिसऱ्या टेस्टसाठी फिट होऊ असा विश्वासही त्यानं व्यक्त केला होता. पण विराटच्या फिटनेसबद्दल अजून कोणतीच माहिती मिळालेली नाही.

विराट कोहली तिसऱ्या टेस्टसाठी फिट झाला नाही तर अश्विनकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु आहे. खरंतर अजिंक्य रहाणे भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे पण रहाणेचा सध्याचा फॉर्म बघता त्याच्यावर कर्णधारपदाचा आणखी दबाव देण्यात येईल का असा प्रश्न आहे.

अश्विननं दोन टेस्ट मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आहेत तसंच ८५ रनही केल्या आहेत. या सीरिजमध्ये धवन, विजय, राहुल, रहाणे आणि कार्तिक या बॅट्समनपेक्षाही अश्विनच्या रन जास्त आहेत.

हेही वाचा : Ramesh Powar has been appointed Head Coach of the Indian women’s cricket Team

Full list of India’s Ease of Living Index

Ease of Living Index

The Housing and Urban Affairs Ministry released the results of its survey on the Ease of Living in index across the country. There were 111 cities surveyed by the ministry. Minister of State (Independent charge) Hardeep Singh Puri, while announcing the results, said West Bengal refused to participate in the study.

The ministry studied quality of life in each city based on several parametres, including institutional (governance), social (identity, education, health, security), economic ( economy, employment) and physical (waste water and solid waste management, pollution, housing/ inclusiveness, mixed land use, power and water supply, transport, public open spaces) factors. Each parametre carried a weightage totaling 100 marks — institutional (25), social (25), physical (45) and economic (5). Based on this, the cities are given an overall rank.

The top three cities were all in Maharashtra; Pune is ranked the highest, followed by Navi Mumbai and Greater Mumbai. The cities which were ranked the poorest were Patna in Bihar, Kohima in Nagaland and Rampur in Uttar Pradesh.

See where your city ranks in the Ease of Living Index
1. Pune
2. Navi Mumbai
3. Greater Mumbai
4. Tirupati
5. Chandigarh
6. Thane
7. Raipur
8. Indore
9. Vijayawada
10. Bhopal
11. Karim Nagar
12. Tiruchirappali
13. Bilaspur
14. Chennai
15. Jabalpur
16. Amravati
17. Visakhapatnam
18. Bhubaneswar
19. Surat
20. Vasai-Virar City
21. Nashik
22. Solapur
23. Ahmedabad
24. Ujjain
25. Coimbatore
26. Erode
27. Hyderabad
28. Madurai
29. Tiruppur
30. Jaipur
31. Nagpur
32. Gwalior
33. Varanasi
34. Jhansi
35. Ludhiana
36. Vadodara
37. Tirunelveli
38. Rajkot
39. Gandhinagar
40. Dindigul
41. Mangaluru
42. Salem
43. Thanjavur
44. Thoothukkudi
45. Kochi
46. Ghaziabad
47. Diu
48. Vellore
49. Rae Bareli
50. Kalyan-Dombivali
51. Ajmer
52. Belagavi
53. Jodhpur
54. Udaipur
55. Agra
56. Dharamshala
57. Hubbali-Dharwad
58. Bengaluru
59. Kota
60. Puducherry
61. Warangal
62. Satna
63. Muzaffarpur
64. Kakinada
65. New Delhi
66. Sagar
67. Shivamogga
68. Ranchi
69. Pimpri Chinchwad
70. Tumakuru
71. Thiruvananthapuram
72. Faridabad
73. Lucknow
74. Gangtok
75. Kanpur
76. Amritsar
77. Jalandhar
78. Port Blair
79. Dahod
80. Dehradun
81. Bareilly
82. Karnal
83. Davanagere
84. Aizawl
85. Guwahati
86. Aligarh
87. Rourkela
88. Gurugram
89. Moradabad
90. Panaji
91. Imphal
92. Shimla
93. Agartala
94. Dhanbad
95. Jammu
96. Allahabad
97. Aurangabad
98. Shillong
99. Namchi
100. Srinagar
101. Meerut
102. Silvassa
103. Saharanpur
104. Kavaratti
105. Pasighat
106. Itanagar
107. Bhagalpur
108. Bihar Sharif
109. Patna
110. Kohima
111. Rampur

ALSO READ : राहण्यायोग्य शहरात नागपूर ३१ व्या क्रमांकावर

स्वातंत्र्यदिनी मोदींनी केली जनआरोग्य योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लाल किल्लावरून पाचव्यांदा भाषण करताना देशातील गरिबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात केली जाणार आहे. सदर योजनेमुळे यापुढे देशातील कोणतेही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, असे मोदी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतरर्गत 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देण्याचा प्रस्ताव आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील जनेतेला चांगली आरोग्य सुविधा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबांतील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेअंतर्गत सामान्य जनतेला केवळ आर्थिक निकषांच्या आधारावर लाभ दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णांना त्यांच्या सुविधेनुसार सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा पुरवली जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला आधारकार्डची सक्ती असणार नाही. मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने या योजनेला पूर्णपणे कॅशलेस ठेवण्यात आले आहे. या योजनेचे प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकारतर्फे भरले जाणार आहेत.

प्रीमियमची 40 टक्के रक्कम राज्य आणि 60 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून भरली जाईल. या योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी लाभार्थ्याला ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळणार आहे. या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी देशभर जवळपास दीड लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या योजनेमुळे गरिबांना चांगले आणि स्वस्तात उपचार मिळू शकतील. मोठ्या संख्येने रुग्णालये उभारण्यात येणार असल्यामुळे अनेकांना रोजगारही मिळेल असे ते म्हणाले.

मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही संस्थांना आणखी मजबूत करण्यासाठी पंचायत आणि पालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही जम्मू-काश्मीरला ‘इन्सानियत, काश्मिरियत, जम्हूरियत’ असे संबोधले होते. माझेही हेच म्हणणे आहे की, प्रत्येक समस्येचे निराकरण गळाभेटीनेच होऊ शकते. आमचे सरकार जम्मू-काश्मीरमधील सर्व क्षेत्रे आणि सर्व वर्गांचा विकास करण्यास कटिबद्ध आहे.

13 कोटी युवकांनी ‘मुद्रा योजने’चा लाभ घेतला आणि त्यांनी स्वयंरोजगार सुरू केला. डिजिटल इंडियाचा विस्तार गावांमध्येही होत आहे. तीन लाखांहून अधिक सेवा केंद्रे देशभरातील गावांमध्ये सुरू आहेत. आपला देश वेगाने पुढे जात आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक नव्या पिकांचे विक्रमी उत्पादन होत आहे, असेही ते म्हणाले.

 अधिक वाचा : ‘२०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल’ -पंतप्रधान

Xiaomi Mi A2 चा भारतातील पहिला सेल आज

Xiaomi mi a2 sale

Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची आज देशात पहिल्यांदाच विक्री सुरू होत आहे. आज दुपारी 12 वाजेपासून Amazon आणि mi.com वरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये कंपनीने Mi A2 आणि Mi A2 Lite हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. या दोन्ही फोनबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती. अखेर आजपासून Mi A2 ची विक्री सुरू होत आहे.

या फोनच्या मागच्या बाजूला 20 आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूसही 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंटही असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 4.5 टीबी अतिरिक्त डेटा देण्यात येत आहे. तसंच या फोनवर 2,200 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकची ऑफरही देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन –
डिस्प्ले : 5.99 इंच
प्रोसेसर : 1.8GHz ऑक्टाकोर
फ्रंट कॅमेरा : 20-मेगापिक्सल
रिजोल्युशन : 1080×2160 पिक्सल pixels
रॅम : 4GB
ओएस : Android 8.1 Oreo
स्टोरेज : 64GB / 128GB
रिअर कॅमेरा : 20-मेगापिक्सल
बॅटरी : 3000mAh

अधिक वाचा : प्ले स्टोर से गूगल ने हटाए 7 लाख खतरनाक, फर्जी एप्स

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

अटलबिहारी वाजपेयी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एम्स’मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी यांनी एम्सकडे धाव घेतली. वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी ४० मिनिटांहून अधिक वेळ एम्समध्ये घालवला. ११ जूनपासून वाजपेयी यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाजपेयी यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर मोदींनी एम्समध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आज पुन्हा एकदा एम्समध्ये जाऊन मोदींनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

९३ वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. २००९ पासून ते व्हिलचेअरवर आहेत. माजी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी हे १९९१, १९९६, १९९९ आणि २००४ साली खासदार म्हणून निवडून आले आहेत.

अधिक वाचा : Former India Test Captain Ajit Wadekar Passes Away at age of 77

Former India Test Captain Ajit Wadekar Passes Away at age of 77

Ajit Wadekar

Former Indian cricket captain Ajit Wadekar passed away at the age of 77 on Wednesday

An aggressive left-hand batsman, Ajit Wadekar’s name will forever be linked with 1971 when he led the Indian team to historic triumphs in the West Indies and England.

Wadekar made his first-class debut in 1958-59 but had to wait eight years before playing for India in 1966-67. He played 37 Test matches for India.

He established himself in the Indian team and was a tower of strength to the Indian batting for seven years. He was one of the best No. 3 batsmen in the history of Indian cricket and one of the finest slip fielders.

Indian Prime Minister Narendra Modi said Wadekar was “a great batsman and wonderful captain” who made a “rich contribution to Indian cricket”.

ALSO READ : Former Lok Sabha speaker Somnath Chatterjee dies at 89

स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन

महापौर नंदा जिचकार

नागपूर : नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्मार्ट शहरातील प्रत्येक नागरी सुविधा स्मार्ट करण्यावर भर आहे. त्यादृष्टीने कार्य सुरू आहे. नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट होत आहे. मेट्रो येत आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या ग्रीन बस, इलेक्ट्रीक टॅक्सी, ई-रिक्षा अशा अनेक पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोयी संपूर्ण देशात फक्त नागपुरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु जोपर्यंत नागरिक या सुविधांचा लाभ घेणार नाही, तोपर्यंत याचा काही उपयोग नाही. नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिका अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत करावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड सिद्दिकी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहर ‘विकासाचे मॉडेल’ म्हणून उदयास येत आहे. येथील प्रत्येक सोयी सुविधा स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास,सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक उत्सव अशा विविध पैलूंअंतर्गत कार्य सुरू आहे. विविध योजनांचा लाभ येथील त्या-त्या घटकातील नागरिकांना मिळावा, यासाठी यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. या सर्व कार्यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी प्रत्येक योजनांत, उपक्रमांत सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन पथकाचे महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निरीक्षण केले. त्यानंतर परेडची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. यावेळी उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रभाग १५ ला ५० लाखांचा पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डाची स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यात धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ ला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. द्वितीय क्रमांक धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १७ ला जाहीर झाला असून तो ३५ लाख रुपयांचा आहे. १५ लाख रुपयांचा तृतीय क्रमांक धंतोली झोनमधीलच प्रभाग क्र. ३३ व प्रभाग क्र. ३५ ला विभागून जाहीर करण्यात आला.

फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते फिरत्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, निगम सचिव हरिश दुबे, आरोग्य अधिकारी (मे.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

अधिक वाचा : राहण्यायोग्य शहरात नागपूर ३१ व्या क्रमांकावर

राहण्यायोग्य शहरात नागपूर ३१ व्या क्रमांकावर

नागपूर , Dharampeth

नागपूर: स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या उपराजधानीचा क्रमांक देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत मात्र ३१व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, अमरावती शहराने १६ वा क्रमांक पटकावत या यादीत आघाडी घेतली आहे. आज ३१ व्या क्रमांकावर असलो म्हणून काय झाले, मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांसारखी विकासकामे पूर्ण झाल्यानंतर आपले शहर सर्वच विभागात आघाडी पटकावेल, असा विश्वास नागपूर करांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने भारतातील राहण्यायोग्य शहरांची यादी  सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीत महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराने ३१वा आणि अमरावती शहराने १७ वा क्रमांक पटकावला. देशातील १११ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक, पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्याबरोबरच आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला. हिरवळीच्या बाबतीत उपराजधानी ही देशातील पहिल्या पाच शहरात आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अशीही या शहराची ओळख आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत स्मार्ट सिटीच्या दिशेने धावणाऱ्या या शहरात माझी मेट्रोची वेगवान वाटचाल सुरू आहे. शहराचे रस्ते देखील कात टाकत असून डांबरीकरणाऐवजी त्याचे सिमेंटीकरण होत आहे. त्यामुळे शहरात धूळ आदींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मात्र, एवढा त्रास होऊनही नागपूरकरांनी कधीच ओरड केली नाही.

याउलट प्रशासनाला सहकार्य करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. विकासाच्या प्रक्रियेत शहर असल्याने हे सर्व होणारच तरीही राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यास उपराजधानी तयार झाली आहे. अलीकडेच स्वच्छ सर्वेक्षणातही उपराजधानीचा क्रमांक माघारला होता.

शहरातील लोकांचे जीवन सहज आणि चांगले कसे बनवता येईल, या दृष्टिकोनातून केंद्राने हे सर्वेक्षण केले. चार मुख्य मानकांव्यतिरिक्त १५ उपश्रेणी आणि ७८ संकेतांच्या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले.

निकषांमध्ये पहिल्या दहात नागपूर नाहीच

या सर्वेक्षणाकरिता चार मुख्य मानकांमध्ये सामाजिक या मानकात विदर्भातील अमरावती हे शहर सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, या चार मानकांमध्ये एकाही मानकात पहिल्या दहाच्या आत नागपूरचा समावेश नाही. विशेष म्हणजे, एकूणच सर्वेक्षणात अमरावती शहराने नागपूरपेक्षा १४ क्रमांकांनी आघाडी घेतली आहे.

अमरावतीकरांनी विकासाला साथ दिली

अमरावती शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे शहर शैक्षणिकदृष्टय़ा विकसित झाले आहे. सामाजिक बांधीलकी आणि जातीय सलोखा कायम राखण्यासाठी अनेक समाजधुरिणांनी आजवर कार्य केले आहे. त्यामुळेच अमरावती शहर नावारूपास आले आहे. शहरातील सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी चांगले काम केल्यास शहराचा क्रमांक आणखी उंचावला जाऊ शकतो. शहराच्या सर्वागीण विकासासाठी नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते, अमरावतीकरांनी विकास प्रक्रियेला साथ दिल्याने ही कामगिरी साध्य झाली आहे.

नागपूरकरांनी घाबरण्याचे कारण नाही

शहरात विकास कामे खूप सुरू आहेत. मागील स्वच्छतेच्या सर्वेक्षणातही उपराजधानी माघारली होती. तीन वर्षांनंतर जेव्हा रस्त्यांचे काम पूर्ण होईल, मेट्रो धावू लागेल, त्यावेळी नक्कीच नागपूर पहिल्या क्रमांकाचे शहर असेल. त्यामुळे सर्वेक्षणात माघारले म्हणून घाबरण्याचे कारण नाही.

सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात झाली पाहिजे यासाठी सरकारने प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश आले आणि संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला. संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात तयार झाला. औद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहणावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत शहरी असो किंवा ग्रामीण राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा. त्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने विक्रमी पद्धतीने अन्नधान्याची खरेदी केली आहे. १९९८ ते २०१४ या १५ वर्षांच्या कालावधीत फक्त ४५० कोटी रूपयांची खरेदी करण्यात आली होती. पण मागील ३ वर्षांत राज्य सरकारने ८ हजार कोटींची खरेदी केल्याचे सांगत त्यांनी मागील आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष टीकाही केली. शेतकऱ्यांच्या प्रती राज्य सरकार प्रतिबद्ध असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने प्रयत्नरत आहे. जागतिक बँकेबरोबरही प्रकल्प सुरू केले आहेत.

हेही वाचा : स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत – स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत राज्यातील ३६ स्थानके

Video : Salman Khan unveils Bharat teaser!

As the country celebrates its 72nd Independence Day, Salman Khan makes it all the more special by sharing the teaser of his upcoming 2019 Eid release ‘Bharat’.

Salman Khan took to social media to unveil the glistening motion picture with an encrypted message on what the film is about.

“Kuch Rishte Zameen se hote hai, Aur kuch Khoon se.. Mere Paas Dono Thee !,” he tweeted on Wednesday with a small intro to the film. The teaser begins with credits to the makers of the film and has a ring of fire with a glowing map of India.

Apart from Salman Khan, the film also stars Katrina Kaif, Disha Patani, Nora Fatehi, Tabu and Sunil Grover. Helmed by Ali Abbas Zafar this is the third collaboration of the actor-director duo post Sultan and Tiger Zinda Hai. The film wrapped up its first shoot schedule earlier this month and the crew is now in Malta to shoot the second schedule.

ALSO READ : Watch : Jackky Bhagnani and Kritika Kamra starrer ‘Mitron’ trailer

Independence Day 2018: स्वातंत्र्य दिवसानिमित्त Google ने Doodle करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Independence Day 2018

मुंबई : भारत आज आपला 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात स्वतंत्रता दिनाचा उत्साह आहे. अशात गुगलने डुडलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या डुडलमध्ये भारतातील अनेक प्रतिष्ठित रंगांचे पान आणि शक्तिशाली असलेल्या जनावारांचे फोटो दाखवले आहेत. 15 ऑगस्टला संपूर्ण भारत देश एक आनंद साजरा करत आहे. भारतातील ट्रकांच्या सजावटींच्या प्रेरणेतून या डुडलच्या माध्यमातून स्वातंत्रय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलने या डुडलमध्ये दोन मोर, बंगाल टायगर आणि आशियातील हत्तींसोबत रंगीत फूल आणि उगवता सूर्य दाखवला आहे. चार मिलियन वर्ग किलोमीटर असा आपल्या देशाचा परिघ आहे. इथे रस्त्यांनी जोडलेला हा देश आणि या रस्त्यांवर आपल्या घरापासून लांब असलेले ट्रक ड्रायव्हर कशी परंपरा जपतात हे दाखवण्यात आलं आहे.

देशभरात वेगवेगळ्या राज्यांत स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाला किल्यावरून राष्ट्रीय तिरंग्याला सलामी देत लाखो – करोडो नागरिकांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी संयुक्त राज्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाल होतं. याचा आनंद सर्वत्र साजरा केला जातो. तसेच भारत मातेच्या सुपुत्रांना ज्यांनी देशासाठी बलिदान केलं त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

‘२०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल’ -पंतप्रधान मोदी

मोदी

नवी दिल्ली: ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना २०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी देशात राबवल्या जाणाऱ्या योजना, विकास आणि जगातली भारताची बदललेली प्रतिमा यावर प्रकाश टाकला.

२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील. तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यादृष्टीने वैज्ञानिकांनी पाऊलंही उचलली असल्याची माहिती त्यांनी दिली. इस्रोमध्ये याबद्द्ल फार वेगाने काम सुरू आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं.

‘ मला आज देशाच्या नागरिकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. २०२२मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असेल तेव्हा देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’ अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

आतापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिका या तीनच देशांनी अंतराळात माणूस पाठवला आहे. पण आता या यादीत भारताचंही नाव जोडलं जाणार आहे. इस्रोने गेल्या काही वर्षात अनेक अंतराळ मोहिमा हाती घेतल्या. चंद्रायन नंतर अनेक उपग्रह पाठवण्यात आले,चंद्रायन२ची तयारीही पूर्ण केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे यश पाहता भारत लवकरच अंतराळात माणूसही पाठवेल यात शंका नाही.

अधिक वाचा : महागठबंधन तेल और पानी के मेल जैसा, इसमें ना तेल काम का ना पानी: पीएम

स्वातंत्र्यदिनापासून अग्निशमन विभागाचा गणवेश बदलणार!

स्वातंत्र्यदिन पासून अग्निशमन विभागाचा गणवेश बदलणार!

नागपूर : नागपुरातील अग्निशमन व आणिबाणी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘खाकी वर्दी’ बदलणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणे आता अधिकारी पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्ट तर कर्मचारी आकाशी शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्टमध्ये स्वातंत्र्यदिन पासून दिसणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ नागपूर अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच खाकी वर्दी होती. आता संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखाच परिधान राहणार आहे.

नागपूर महानगरपालिकेतील अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ब्रिटीशकाळापासून खाकी परिधान होता. नागपूर महानगर पालिकेकडे हा गणवेश धारण करण्यासंदर्भात कसलीही नियमावली नव्हती. याकरिता विभागाने मुख्यत: अधिकारी वर्गाला खाकी रंगाचा पॅन्ट, शर्ट, खाकी पी कॅप, लाल रंगाचे बूट, लाल लेदर बेल्ट आणि कर्मचारी वर्गाला खाकी रंगाचे पॅन्ट, शर्ट, खाकी कमाण्डो कॅप, काळ्या रंगाचे बूट, काळा लेदर बेल्ट याप्रमाणे गणवेश व गणवेश साहित्य परिधान करण्यासंदर्भात २१ जून २००५ मध्ये ठराव मंजूर करवून घेतला.

पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संचालकांनी ड्रील मॅन्युअल (Drill Manual) प्रकाशित करून संपूर्ण राज्यातील अग्निशमन विभागासाठी एकच युनिफॉर्म असावा याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. तो युनिफॉर्म पदनिहाय कसा असावा, रँक कसा असावा, याबाबत सविस्तर नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमधील अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिधान या ड्रील मॅन्युअलनुसार पूर्वीपासूनच होते.

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने २० जून २०१६ च्या विशेष महासभेत ठराव क्र. २७४ नुसार गणवेशाबाबत मंजुरी घेतली. स्थायी समितीच्या १८ नोव्हेंबर २०१६ च्या ठराव क्र. ७२८ आणि १९ जानेवारी २०१७ च्या ठराव क्र. ४०२ नुसार सदर गणवेश व गणवेश साहित्य नियमावलीप्रमाणे विभागाने खरेदी करण्यास मंजुरी दिली.

त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना गणवेश प्राप्त झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजीपासून नागपूर अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचारी हा गणवेश परिधान करणार असून आता संपूर्ण महाराष्ट्रातील अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख या गणवेशामुळे एक झाली आहे. अग्निशमन सेवेची कार्यप्रणाली एकसारखीच असल्याने यामध्ये एकसूत्रता असणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा गणवेश व गणवेश साहित्य एकसारखेच असावे, असे ड्रील मॅन्युअल मध्ये नमूद केले आहे.

अग्निशमन विभाग सुसज्ज असावा यादृष्टीने नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आयुक्त वीरेंद्र सिंह, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते, उपसभापती वर्षा ठाकरे व सर्व समिती सदस्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवा गणवेश उपलब्ध झाल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

असा राहील गणवेश

नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी आता पांढरा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पॅन्ट, नेव्ही ब्ल्यू पी कॅप, काळा लेदर बेल्ट, काळे लेदर बूट परिधान करतील. कर्मचारी वर्ग आकाशी रंगाचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पॅन्ट, नेव्ही ब्ल्यू बॅरिड कॅप, काळा लेदर बेल्ट, काळा लेदर बूट याप्रमाणे गणवेश परिधान करतील.

अधिक वाचा : तिरंगे के रंगों से जगमगाने लगा नागपुर रेलवे स्टेशन

वंदे मातरम् स्पर्धेमुळे शहराला वेगळी ओळख : महापौर नंदा जिचकार

वंदे मातरम् स्पर्धेमुळे शहराला वेगळी ओळख

महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धें’मुळे शहराचे स्थान उंचावत आहे. मागील २२ वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान निर्माण होतो. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असून स्पर्धेमुळे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

त्या नागपूर महानपालिकेच्या वतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. महापौर चषक वंदे मातरम्‌ समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोड, ६ ते ८ वी गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर व पहिली ते पाचवी गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्युटने बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकाविला.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंदे, हनुमाननगर झोन सभापती रुपाली ठाकूर, नगरसेविका स्वाती आखतकर, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, भगवान मेंढे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, देवेन दस्तुरे यांच्यासह अंतिम फेरीचे परीक्षक शहरातील सुप्रसिद्ध गायक एम.ए. कादर, सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर, आशितोष पळसकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मागील २२ वर्षापासून मनपाने सुरू केलेल्या या उपक्रमाला मनपाच्या शाळांसह शहरातील इतरही शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षण विभागाचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी अभिनंदन केले. स्पर्धेमध्ये यावर्षी मनपाच्या १९ व इतर ८२ अशा एकूण १०१ शाळांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी यावर्षी पेक्षा अधिक शाळांना या स्पर्धेमध्ये सहभागी करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

स्वातंत्र्यदिनाला वंदे मातरम् सर्वत्र गायले जाते, मात्र यामधील फक्त एकच कडवा गायला जातो. इतिहासात काही आक्षेप आल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एकच कडवे गायनास मान्यता दिली होती. तेव्हापासून ती सुरू आहे. मात्र नागपूर महानरपालिकेने पुढाकार घेत १९९६ ला तत्कालिन महापौर कुंदाताई विजयकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे आयोजन सुरू करून देशात नवा उपक्रम सुरू केला असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले. देशभक्तीच्या अनेक ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकित त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रथम क्रमांक विजेत्यांना १० हजार पुरस्कार

महापौर चषक वंदे मातरम्‌ समूहगान स्पर्धेमध्ये इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉर्डन पब्लिक स्कूल कोराडी रोडने प्रथम, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर त्रिमुर्तीनगरने द्वितीय, ललिता पब्लिक स्कूल वर्धमाननगर कोराडी रोड संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय मनपाच्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ६ ते ८ वी या गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर श्रीकृष्णनगर, साउथ पॉईंट स्कूल ओंकारनगरने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान राखले. तर संजुबा हायस्कूल बहादुराने उत्तेजनार्थ व नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक मनपा शाळेने प्रोत्साहन पुरस्कार पटकाविला.

तिसऱ्या पहिली ते पाचवीच्या गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्युटने पहिल्या, जुना सुभेदार ले-आउट मानेवाडा येथील दुर्गानगर उच्च प्राथामिक शाळेने दुसऱ्या व द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर संघाने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. या गटात ग्रेट ब्रिटेन कॉन्व्हेंट शांतीनगर व आदर्श संस्कार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने क्रमश: उत्तेजनार्थ व प्रोत्साहन पुरस्कार मिळविले.

तिन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार व विजयी चषक प्रदान करण्यात आले. दुस-या स्थानावरील विजेत्यांना सात हजार रोख तर तिसऱ्या स्थानावरील विजेत्यांना पाच हजार रुपये रोख पुरस्कारासह चषक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या शाळांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, माधुरी धवड, संध्या पवार, लता कनाटे व मधु कराड यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत लाभलेले परीक्षक एम.ए. कादर, आशितोष पळसकर, विनोद मांडवकर, अनुजा मेंगड, निरंजन सिंग, बोरीकर, गायकवाड यांनाही महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी केले. संचालन मधु कराड यांनी केले. आभार अनिता हलमारे यांनी मानले.

अधिक वाचा : तिरंगे के रंगों से जगमगाने लगा नागपुर रेलवे स्टेशन

तिरंगे के रंगों से जगमगाने लगा नागपुर रेलवे स्टेशन

नागपुर :- कल मनानेवाले आजादी पर्व 15 अगस्त को देखते हुए नागपुर रेलवे स्टेशन को भव्य रूप से सजाया गया है। लाइट की झालरों की मदद से केसरी, हरे रंग के साथ इस तरह लाइटिंग का मेल-मिलाप किया है, कि इमारत पर तिरंगे की रोशनी जगमगाती दिख रही है। इससे बरबस ही मार्ग से गुजरने वालों का ध्यान भी इमारत की ओर आकर्षित हो रहा है। हर वर्ष स्टेशन को अलग-अगल तरीके से तिरंगे के थीम पर सजाया जाता है। इस बार भी नीले लाइटों का साथ लेकर स्टेशन को सजाया गया है। तिरंगे के रूप में जगमगाहट देखते ही बन रही है।
बता दे कि नागपुर रेलवे स्टेशन की इमारत हेरिटेज है। वर्ष 1905 से इस इमारत का निर्माण शुरू हुआ था। जिसे 1925 में ब्रिटिश सरकार ने साकार किया था। लगभग 70 मीटर लंबी इमारत की ऊंचाई 40 फीट है। 100 वर्ष से ज्यादा समय बितने के बावजूद आज भी स्टेशन की इमारत हर किसी का ध्यान खींचने की क्षमता रखती है। बुधवार को 15 अगस्त है, आजादी के दिन हेरिटेज इमारतों को सजाया जाता है। इसी तरह हर बार नागपुर स्टेशन को भी सजाया जाता है।
इमारत के ऊपर फोकस लाइटें व सीरीज लगाई गई हैं। रात होते ही इनकी रोशनी इमारत को ढंक लेती है। करीब ढाई लाख के खर्च के साथ निजी इलेक्ट्रिशयन की मदद से स्टेशन को सजाने का काम किया गया है। जिसे अगले पांच दिनों तक शुरू रखा जाएगा। स्टेशन पर रोजाना आने वाले यात्रियों की संख्या 40 हजार से ज्यादा है। ऐसे में यहां आने वाले लोगों को इमारत पर तिरंगे की रोशनी आकर्षित लग रही है। वहीं स्टेशन के सामने जाने वाले मार्गों से गुजरने वाले वाहन धारकों का भी इमारत बरबस ही अपनी ओर ध्यान खींचती है।

Mumbai’s biggest integrated realty project OID opens up inventory to Nagpur investors

Nagpur :- Mumbai’s leading housing firm Omkar Realtors & Developers is set to launch one of the country’s biggest mixed-use realty hub with an estimated Rs 22,000 crore topline revenue under the brand name Omkar International District (OID), located near Andheri highway in Mumbai. The project’s EOI (Express of Interest) is available now with key channel partners (CPs) in the Nagpur market.

Spread over 65 acres, adjoining Andheri east on the western express highway, the mixed redevelopment being undertaken by Omkar Realtors will see a record 10 million sq. ft development. Out of this 6 million sq.ft., is dedicated to residential development accounting for 9,000 boutique and luxury houses to be delivered in phases over the next 5-6 years, while balance 4 million sq.ft., will be retail and commercial development. According to Mr. Devang Varma, promoter director of Omkar Realtors “The record inventory to be rolled out in phases will see significant sales traction from Western region including Nagpur based investors and end users owing to the strategic business corridor between the two cities.

On a pan-India scale, capital-based business community are the biggest investors in Mumbai market and also Omkar projects. In fact, there has been an upswing in recent times with the trading corridor getting additional infrastructural boost”, he added. Omkar’s previous launch of Lawns & Beyond project in November 2017 had attracted an impressive 30 plus EOIs from Nagpur-based investors.

According to Mr. Rajat Khandelwal, Head-Sales & Marketing, Omkar Realtors : “The project with a fair share of inventory under sub-Rs 1 crore bracket holds strong attraction for pan-India customers and investors looking at buying in country’s primary realty market. Not only does this ticket sizing compare well with Nagpur micro markets; it holds attractive ROI proposition at the current pricing level.” He further added that the buyers and investors out of Nagpur are eyeing inventory in areas with upcoming infrastructure developments such as Metro, Mono rail, new link roads connecting the East – West Corridors etc., and Andheri – Jogeshwari is one such key location in Mumbai.

The project with a fair share of inventory under sub-Rs. 1 crore bracket holds strong attraction for pan-India customers and investors looking at buying in country’s primary realty market. Not only does this ticket sizing compare well with key Nagpur micro markets; it holds attractive ROI proposition at the current pricing level. Under the OID project, the company will be releasing 600 plus sale inventory by end-August 2018; the EOI (express of interest) for which has already been put out in the pan-India and global markets through the channel partner network.

The RERA compliant inventory, currently codenamed “Passcode Opportunity”, consists of 1/2 BHK units with the ticket size ranging from Rs 93 lakh onwards (365 sq.ft -510 sq.ft carpet area). The project offering a record 35 plus amenities and 550 plus apartments has a range of collaborations with leading names in hospitality for a 5-star hotel and services business will also be home to Mumbai’s biggest mall spanning over one million square feet. Currently the biggest mall in the vicinity and on the western express highway is the Oberoi Mall (5 lakh sq.ft).

The project strategically located on the Western Express Highway enjoying easy access to domestic and international airports comes with flexible payment plans and minimal down payment options. The key target customer groups in this micro market spans SME’s, trading community, corporate professionals, media & entertainment industry. The location is one of the most sought after by Mumbai’s film and television fraternity including artistes and production houses.

The project which commenced construction in January 2018 has an estimated gestation timeline of 7 years with deliveries scheduled in multiple phases for its residential and commercial inventory. The project is not only expected to transform the Andheri – Jogeshwari east highway belt with the creation of a new residential and commercial zone in Mumbai but usher in a major social reform with a slum-free zone. The Andheri / Jogeshwari East corridor has a flourishing rental housing market. Recent launches which are close to the highway in destinations have commanded premium rentals. Rentals of 2-3 BHK in this belt has been setting new benchmarks in the Rs. 60,000-90,000 per month bracket. Booming rentals in these markets are a factor of proximity to the highway and the value offering seen in branded projects.

Omkar’s key projects Omkar 1973 Worli (South Mumbai), Omkar Alta Monte (western suburbs), Ananta (Goregaon east), Signet (Malad east) has a customer base spanning some of the leading names from the world of arts, sports, entertainment and corporate sector.

Also Read : Inauguration of New Exhibition Hall – Water The Elixir of Life on August 14

Ramesh Powar has been appointed Head Coach of the Indian women’s cricket Team

Ramesh Powar

Former India off-spinner Ramesh Powar has been appointed Head Coach of the Indian Women’s Team till the World T20. Powar replaced Tushar Arothe, who stepped down after alleged differences with senior players in the team.

Powar, 40, played two Tests and 31 ODIs for India from 2004 to 2007. He was named interim coach after Arothe resigned in July.

Last month, Arothe was forced to resign after a few senior players wanted his ouster. The players were apparently not happy with Arothe’s training methods.

“It was almost final after the last meeting of CoA with the senior players. BCCI acting secretary Amitabh Chaudhary, GM (Cricket Operations) Saba Karim and CEO Rahul Johri were also present.

There has been adverse reports about his coaching methods from players, selectors and even the team manager,” a senior BCCI official had told news agency PTI on condition of anonymity.

PTI had also reported that ODI captain Mithali Raj and Twenty20 captain Harmanpreet Kaur did not have good things to say about Arothe’s coaching methods when the BCCI bigwigs sought their feedback.

Powar has now been named head coach and has been handed over full time duties till 30th November, 2018. According to a BCCI press release, Powar’s “term will include the tour to Sri Lanka in September, a bilateral series in West Indies in October followed by the ICC Women’s World T20 in West Indies in November.”

Read Also : सौरव गांगुली बन सकते हैं बीसीसीआइ के नए अध्यक्ष

अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

अडचणीच्या वेळी भारतीय रुग्णावर उपचार करण्यास पाकिस्तानचा नकार

नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारं काम केल्याचं समोर आलंय. तुर्कस्तानच्या एका विमानानं प्रवास करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यानं या फ्लाईटचं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं होतं. परंतु, पाकिस्तानकडून उपचारास नकार देण्यात आल्यानं या प्रवाशाला तब्बल सात तासांनंतर दिल्ली विमानतळावर उपचार उपलब्ध झाले. या घटनेची तक्रार रुग्णाच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परदेश मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करून केलीय.

तुर्की एअरलाईन्सच्या विमानात विपिन नावाचा युवक आपल्या काही कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. एका वीमा कंपनीत काम करणारा विपिन सेल्स मॅनेजर पदावर काम करतो. कंपनीकडून आपल्या ७०-८० कर्मचाऱ्यांना तीन दिवसांच्या पर्यटनासाठी तुर्कस्तानला पाठवण्यात आलं होतं. यामध्ये विपिन आणि त्याचा मित्र पंकज मेहता हेदेखील होते.

पंकजनं दिलेल्या माहितीनुसार, सर्व जण १२ ऑगस्टला रात्री ८.३० दरम्यान इस्तम्बूलहून दिल्लीसाठी तुर्की एअरलाईन्सच्या विमानानं रवाना झाले. प्रवासादरम्यान अचानक विपिननं १० वाजल्यादरम्यान वाईन घेतली होती. त्यानंतर जवळपास रात्री १.०० वाजता त्याला उलटी झाली आणि चक्कर येऊन तो कोसळला. त्यानंतर रात्री विमानानं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लँन्डींग केलं. पाकिस्तानी डॉक्टर लगेचच दाखल झाले… त्यांनी विपिनला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.

अशावेळी पायलटनं पाकिस्तानी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, अधिकाऱ्यांनी विपिनच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत हॉस्पीटलमध्ये भरती करण्यास नकार दिला… यामध्ये जवळपास तीन तास वाया गेले.

भारताशी संबंध खराब असल्याच्या कारणानं पाकिस्तान सरकार आणि इमीग्रेशन विभागानं रुग्णाला उपचार देण्यास नकार दिल्याची घोषणा पायलटला करावी लागली.. त्यानंतर सकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास विमानानं दिल्लीसाठी उड्डाण घेतलं… त्यानंतर सकाळी ८.३० वाजता विमान दिल्लीला पोहचल्यानंतर विपिनला वेदांता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या विपिनची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.

हेही वाचा : पाकिस्तान ने स्वतंत्रता दिवस से पहले 30 भारतीय कैदियों को किया रिहा

Watch : Jackky Bhagnani and Kritika Kamra starrer ‘Mitron’ trailer

Jackky Bhagnani

A directionless, lazy man, struggling to find his niche forms the core of Jackky Bhagnani-starrer Mitron, the trailer for which released on 14 August.

As the title aptly suggests, the trailer is abundant in its references to the Modi government, with the makers and Bhagnani sharing the posts related to the film with the hashtag Ache Din.

The trailer opens with the bark of an exasperated father trying to wake his son up from his deep slumber. Jai, essayed by Bhagnani is depicted as someone who neither has the inclination nor the drive to traverse the beaten path, thus looking for unique ways to make it big in the world.

Jai, along with his friends Raunaq and Deepu try out different offbeat career options, including making prank videos, renders unprofitable propelling his father to get his son married, in the hope that a marriage would bring stability in his life.

The trailer introduces Kritika Kamra known for her TV series Kitani Mohabbat Hai, who will be making her Bollywood debut with Mitron.

Watch the trailer here.

Mitron, set in the backdrop of the Gujarati milieu will be directed by Nitin Kakkar of Filmistaan fame and will see Neeraj Sood, Pratik Gandhi and Shivam Parekh in pivotal roles.

Presented by Abundantia Entertainment and Vikram Malhotra, Mitron is slated to release on 14 September.

Watch Also : Varun Dhawan and Anushka Sharma starrer ‘Sui Dhaaga – Made in India’ Trailer out

गोवारी समाज आदिवासीच नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर खंडपीठ

नागपूर : सरकारी कागदपत्रांमध्ये एक स्वल्पविराम नसल्याने गोंड गोवारी अशी नोंद झाल्याने गोवारी समाजाला अनुसूचित जाती जमातींना सवलतींपासून वंचित रहायला लागले होते. यावर नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गोवारी आदिवासी आहेत असे म्हटले आहे. या निर्णयाने गेल्या २३ वर्षांपासून लढा देत असलेल्या गोवारी समाजाला अखेर न्याय मिळाला आहे.

१९९४मध्ये विधीमंळांवर गोवारी समाजाने मोर्चा काढला होता. तेव्हापोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली. यात ११४ बांधव शहीद झाले होते. गोंड आणि गोवारी अशी वेगवेगळी नोंद करताना एक स्वल्पविराम न टाकल्याने फक्त गोवारी असणाऱ्यांना अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या सवलती मिळत नव्हत्या. आता न्यायाल्याच्या या निर्णयाने गोवारी समाजाला आरक्षण मिळणार असून त्यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये होणार आहे.

१९८६ मध्ये कालेलकर समितीने गोंड, गोवारी दोन्ही वेगवेगळे असल्याचे सांगितले होते. १९८५ सालापर्यत समाजाला सवलती मिळत होत्या. मात्र सरकार दरबारी दफ्तरातील नोंदी सुधारताना गोंड, गोवारी लिहण्यात चूक झाली. यामुळे समाजाला मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित रहावे लागले होते.

हेही वाचा : पीटा के सदस्य ने सांपो का रूप धारण कर किया सांपो को बचाने का आवाहन

Nagpur Weather

Nagpur
haze
26 ° C
26 °
26 °
31 %
1kmh
20 %
Fri
43 °
Sat
43 °
Sun
44 °
Mon
46 °
Tue
45 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...