ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान उद्भवलेल्या वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

Date:

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान, उद्भवलेल्या वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत, कुटुंबियांनी शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केले.

18 जानेवारी रोजी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोमल सिंग राजपूत यांच्या गटाचा विजय झाला. त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या गटातील संतोष पाटील यांना राग अनावर झाला. संतोष यांनी त्यांच्या इतर 22 साथीदारांसह कोमल सिंग राजपूत यांच्यासह काही विजयी सदस्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. झालेल्या मारहाणीत कोमल सिंग राजपूत यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चाळीसगावमधील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली आणि त्यामुळेच सहा दिवसांपूर्वी धुळ्यातील श्रद्धा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथूनही हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना हलवण्यात आले.

रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी धुळ्याच्या शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, अमर पाटील, राजेंद्र पाटील, केतन पाटील, मंगल पाटील, विजयसिंह पाटील, लखन पाटील, अरुण पाटील, देवराज पाटील या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना,  आरोपींवर आधीच 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून, शवविच्छेदन गृहाचा अहवाल प्राप्त होताच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करणार आहे, असे मेहुणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...