Home Blog Page 83

Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं मराठा आरक्षण

Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं मराठा आरक्षण

Maratha Reservation Verdict : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती अशोक भूषण असून या खंडपीठात न्या. एल नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या, एस रविंद्र भट आणि न्या हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. 26 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. त्यापूर्वी सलग दहा दिवस या प्रकरणाची या पाच न्यायमूर्तींच्या पुढे सुरु होती. महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या मराठा आरक्षण कायद्यावर म्हणजेच महाराष्ट्र एसईबीसी कायदा 2018 च्या वैधतेवर निर्णय देताना गायकवाड आयोगाच्या शिफारसींही फेटाळल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्या. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी तसंच सुनावणीदरम्यान करण्यात आलेले युक्तीवाद पुरेसे समर्पक नाहीत, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. सध्या आरक्षणावर असलेली 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी परिस्थिती मुळीच नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हा कायदा संमत केला होता.

न्यायमूर्ती अशोक भट आणि न्या. एस अब्दुल नजीर यांनी संयुक्त निकालपत्र लिहिलं आहे तर अन्य तीन न्यायमूर्ती भट, राव आणि गुप्ता स्वतंत्र निकालपत्र लिहिलं आहे. या प्रकरणासाठी लँडमार्क जजमेंट असलेलं इंदिरा साहनी प्रकरण जास्त न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी स्पष्ट केलं. इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालाने घालून दिलेले निकष आजही लागू असून त्याचा फेरआढावा घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी इंदिरा साहनी निकालाचा फेरआढावा घेण्याची मागणी केली होती. या निकालान्वये आरक्षणावर 50 टक्क्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देताना 2018 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार, कलम 342 अ समाविष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने खोडून काढवा. त्यामुळे न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं असलं तरी घटना दुरुस्तीमुळे राज्याला अधिकार नसल्याचा दावा करणारी याचिकाही फेटाळून लावली. तर मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका योग्य असल्याचं ठरवत मराठा आरक्षणाची तरतूद फेटाळून लावली आहे.

IPL सप्टेंबरमध्ये? स्थगित करण्यामागची ही आहेत कारणं, वाचा…

IPL

कोरोना मुळे IPL २०२१ स्पर्धा अखेर स्थगित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चं सावट स्पर्धेवर घोंगावत होतं. मात्र एक एक करत कोरोना ची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर करोनाची पडछाया होती. मात्र बायो बबलचं कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले होते. मात्र कोरोनाचं संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता टी २० विश्वचषकानंतर या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जातील असं बोललं जात आहे.

स्पर्धा सुरु झाल्यानंतर कोलकाता नाइटराइडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता आणि बंगळुरु दरम्यान होणार सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर कोलकाताच्या सामन्यानंतर दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात आला होता. त्यानंतर चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याचाही समावेश होतो. संपूर्ण संघ त्याच्या संपर्कात होता. त्यामुळे स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.

दिल्लीत आज सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार होता. मात्र सामन्यापूर्वी हैदराबादचा वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे हा सामना देखील रद्द करण्यात आला.

परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा अर्ध्यात सोडली होती. तर आर. अश्विनने घरच्यांना करोनाची लागण झाल्याचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीही काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात करत संघात पुनरागमन केलं होतं.

IPL आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

राज्यात ६ वर्षांच्या काळात वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारी, मात्र गुन्हे नोंदविले गेले फक्त २२

राज्यात ६ वर्षांच्या काळात वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारी, मात्र गुन्हे नोंदविले गेले फक्त २२

नागपूर : वन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१५ ते नोव्हेंबर- २०२० पर्यंत या ६ वर्षांच्या काळात वाघ, बिबट आणि रानगवा, चितळ, सांबर यांसह अन्य वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यातील फक्त २२ प्रकरणांतील शिकारींचे गुन्हे नोंद असून काही न्यायप्रविष्ट आहेत. या ६ वर्षात वाघांच्या शिकारीचे फक्त ५, तर बिबट्यांच्या शिकारीचे फक्त १७ गुन्हे नोंद आहेत. या स्थितीवरून वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोची गरज अधोरेखित होते.

वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना, अवयवांची तस्करी, आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असलेले संबंध यावर राज्यस्तरावर प्रभावी नियंत्रणासाठी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो स्थापन करण्याचे ६ वर्षांपूर्वी आदेश मिळूनही राज्यातील वन विभाग मात्र उदासीन आहे. या काळात वन विभागाने ब्यूरोच्या स्थापनेसाठी साधा प्रस्तावही दिला नाही. यावरून ही उदासीनता स्पष्ट होत आहे. पांढरकवडा येथील जंगलात अलीकडेच गर्भवती वाघिणीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर हा विषय चिंतेचा ठरला आहे.

केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने १४ नोव्हेंबर २०१४ ला देशातील सर्व राज्यांना वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरोची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. देशात फक्त मिझोराम वगळता याची अंमलबजावणी कोणत्याही राज्याने केली नाही. ब्यूरोची स्थापनाच नसल्याने राज्यभर वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्ये आणि अवयवांच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. नियंत्रण नसल्याने यातील अनेक प्रकरणांचा तपासच लागलेला नाही.

पोलीस – वन विभागाची सांगडच नाही

भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम – १९७२ नुसार, देशातील सर्व वन्यजीवांना सुरक्षा प्रदान करण्याची तरतूद आहे. असे असले तरी शिकारी टोळ्यांचा वावर, त्यांना कायद्याची नसलेली भीती, गुन्ह्यांची वाढती संख्या यामुळे प्रभावी नियंत्रणाची गरज व्यक्त होत आहे. वन विभाग आणि पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा राज्यात आहे. मात्र वन गुन्हे घडल्यावर एकत्रितपणे तपासासाठी सांगड नाही. यामुळे तपास कामात बरेच अडथळे येतात. आरोपींना पसार होण्याची संधी मिळते.

६ वर्षांतील शिकारीच्या घटना…

वर्ष –  वाघ – बिबट – अन्य वन्यप्राणी

२०१५ – १३ – ६६ – माहिती उपलब्ध नाही

२०१६ – १४ – ८९ – माहिती उपलब्ध नाही

२०१७ – २२ – ८६ – माहिती उपलब्ध नाही

२०१८ – १९ – ८८ – माहिती उपलब्ध नाही

२०१९ – १७ – ११० – खवले मांजर १, रानगवा १, घोरपड ४, कासव ३, अजगर २, उदमांजर १

२०२० (नोव्हेंबरपर्यंत) – १७ – १७२ – माहिती उपलब्ध नाही

एकूण – १०३ – ६११ – १२

(स्थलांतरित पक्षी, मोर, हरियल, तितर, बटेर यांसह अन्य पक्ष्यांच्या शिकारीकडे दुर्लक्ष असल्याने नोंद नाही.)

महाराष्ट्र राज्य वनसंपदेत संपन्न आहे. ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय वन उद्याने, ५० पेक्षा अधिक अभयारण्ये, मोठ्या प्रमाणावर जैवविविधता, वाघांची संख्या अधिक… असे असले तरी प्राणी धोक्यात आहेत. वन विभागाचा ब्यूरोच्या स्थापनेसाठी हवा तसा पुढाकार दिसत नाही. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला आहे.

कोरोनामुळे बॉलिवूडमधील कलाकार अडचणीत दीपिका पदूकोणचं संपूर्ण कुटूंबच कोरोना पॉझिटिव्ह

दीपिका पदूकोणचं

देशभरात लॉकडाउनचे नियम कठोर करूनही कोरोना मात्र काही संपण्याचं चित्र दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट तर दिसून येत आहे, मात्र ही संख्या करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं असल्यानं कमी दिसून येतेय असं जाणकारांचं मत आहे. त्यात करोनाने बॉलिवूडकरांनाही सूट दिलेली नाही. बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पदूकोणचं संपूर्ण कुटूंबच करोनाच्या जाळ्यात सापडलंय. दीपिकाच्या वडिलांना बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

१० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांवर बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर एक आठवड्यातच दीपिकाच्या आई उज्ज्वला पदूकोण आणि बहिण अनिशा पदूकोण यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू दीपिकाचे वडील प्रकाश पदूकोण अजुनही कोरोनाशी सामना करत आहेत.

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं. “जेव्हा मी, माझं कुटूंब आणि आपण सर्वच जण ठीक होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहीजे की आपल्याला भावनात्मक रूपातूनही ठीक होणं गरजेचं असतं.” कुटूंबावर कोसळलेल्या या करोना संकटात ती त्यांच्यापासून दूर असली तरी फोनद्वारे संपर्क करून त्यांची साथ देतेय. या पोस्टमध्ये तिनं, ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे.

६५ वर्षीय प्रकाश पदूकोण हे भारताचे पूर्व बॅटमिंटनपटू आहेत. एक आठवड्यापासून ते कोरोनाशी सामना करत असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसंच येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज ही देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

कोरोनामुळे बॉलिवूडमधील कलाकार अडचणीत

कोरोनामुळे बॉलिवूड क्षेत्राची अत्यंत वाईट अवस्था वाईट झाली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक कलाकारांना कोरोना झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिचे वडील रणधीर कपूरना सुद्धा करोना झाला. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय ‘पटियाला बेब्स’ फेम अनिरूद्ध दवे, ‘बिग बॉस १४’ फेम रूबिना दिलैक आणि काही दिवसांपूर्वी वडिलांना गमावलेल्या हिना खान सुद्धा कोरोनाशी झुंज देत आहे.

Coronavirus in Nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर : जिल्ह्य़ात करोनाचे पाच प्रकारचे नवीन स्ट्रेन (उत्परिवर्तित विषाणू) आढळल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळेच नागपुरात करोनाचा उद्रेक झाल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे. एवढय़ा प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, शहरात करोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एप्रिलमध्येच एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.

नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधून सुमारे ७४ नमुने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत तपासणीसाठी दिल्ली तसेच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यांचे अहवाल मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला प्रशासनाला मिळाले. यामध्ये करोनाच्या ५ नवीन रूपांची ओळख पटली. यापैकी १ नमुना ई४८के हा आहे. ३ नमुन्यात ई४८४क्यू हे रूप तर २ नमुन्यांत एन४४०के हे रूप आढळले. २६ नमुन्यांमध्ये ई४८४क्य: एल४५२आर आणि ७ नमुन्यांत एल४५२आर रूप आढळले आहेत. उर्वरित ३५ नमुन्यांमध्ये जुनेच स्ट्रेन आढळले आहेत. या पाचही स्ट्रेनमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. या नमुन्याचा अहवाल फेब्रुवारीत पाठवण्यात आला असला तरी विलंबाने म्हणजे मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात मिळाला.

या नवीन स्ट्रेनमुळे रुग्णांत ताणतणावात वाढ, डोक्याच्या तसेच डोळ्यांच्या वेदना, ८ ते १२ दिवस राहणारा ताप, सर्दी, खोकल्यासह अंगदुखीचाही त्रास दिसून आला. जिल्ह्य़ात करोनाचा उद्रेक आताही कायम आहे. सध्या जिल्ह्य़ातील सर्वच भागात मोठय़ा संख्येने करोनाग्रस्त आढळून येत आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान होणारे मृत्यूही चिंतेची बाब आहे. या करोना उद्रेकाला नवीन स्ट्रेन जबाबदार असल्याच्या वृत्ताला मेयोतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

शहरातील २०२१ मधील करोनाची स्थिती

महिना         नवे रुग्ण         मृत्यू

जानेवारी        ८,२७५          १२२

फेब्रुवारी        १२,६४४          १३

मार्च            ५९,८३२         ४७५

एप्रिल          १,१६,७४२      १,२३२

Bomb blast: म्यानमारमध्ये पार्सल बॉम्बचा स्फोट, खासदारसोबत 5 जणांचा मृत्यू

म्यानमारमधील हिंसाचार थांबत नाहीये. पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन पाच जण ठार झाले आहेत. या स्फोटात नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसीचे (एनएलडी) खासदार यांचे निधन झाले आहे. मृतांमध्ये तीन पोलिस अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रात चीनने म्हटलं की, म्यानमार गृहयुद्धेकडे वाटचाल करत आहे.

म्यानमारच्या दक्षिणेकडील भागात बेगो येथे पार्सल बॉम्बस्फोट झाला. येथे तीन बॉम्बस्फोट झाले, यापैकी पार्सल बॉम्बचा स्फोट घरात झाला. त्यात प्रादेशिक खासदार सु क्यू यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत तीन पोलीस अधिकाऱ्यांचा ही मृत्यू झाला आहे.

लष्कराच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. म्यानमारच्या सीमावर्ती भागातही बंडखोर सक्रिय झाले आहेत. या बंडखोरांवर यापूर्वी दोन विमानतळांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. आता या बंडखोरांनी असे म्हटले आहे की त्यांनी म्यानमार सैन्याच्या एका हेलिकॉप्टरला उडविले आहे.

फेसबुक पेजवर आणखी एक माहिती देण्यात आली आहे की बंडखोरांनी चीनच्या सीमेवर चार सैनिक ठार मारले आणि आठ सैनिक जखमी केले. यावर लष्करानेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत झांग जुन यांनी म्यानमारची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे म्हटले आहे. येथे मुत्सद्दी प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्वरित पावले उचलली गेली नाहीत तर म्यानमारमध्ये गृहयुद्ध होऊ शकते.

Sony Entertainment Television to host digital auditions for India's Best Dancer Season 2, starting May 5!

Sony Entertainment

The search for India's Best Dancer is back! Sony Entertainment Television is geared up to bring the second season of the home-grown property – India’s Best Dancer, which garnered an overwhelming response from dance enthusiasts and the audience in its first edition. And the show promises to be the " ultimate test" for the " dance ke best"  With its first season, India's Best Dancer became a success and stood out with its diverse representation of talent from all nooks and corners of the country.

The contestants were pushed to their limits in giving neck-to-neck competition to each other on the dance floor while the judges kept a close eye on their progress, making it one of the toughest dance reality shows on Indian television. The show earned its loyal fans right into the first season, and now, it’s back to identify the most sought-after talent and present them in their “ultimate best form” on the toughest dance platform.

After giving the audience a taste of superlative talent in its first season, this year Sony
Entertainment Television announces the Digital Auditions for India's Best Dancer – Season 2, starting May 5 through the SonyLIV app. Participants between the age of 14-30 years can fill in a detailed registration form and upload two videos of them dancing on the SonyLIV app from the safety and comfort of their homes.

READ: “It is important to find happiness in little things and set smaller goals in life” – says Sayantani Ghosh aka Daljeet Bagga from Sony SAB’s Tera Yaar Hoon Main

So, if you aspire to become the next India’s Best Dancer, then this is the first step towards
realising that dream!

Download the SonyLIV app to participate in the Digital Auditions of India’s Best
Dancer, starting May 5, 2021

अमरावती: घटस्फोटित पतीने महिलेवर केले ‘हे’ भयंकर कृत्य

अमरावती: घटस्फोटित पतीने महिलेवर केले 'हे' भयंकर कृत्य

अमरावती: अमरावती शहरातील एका तरुणीचे पश्चिम बंगालच्या तरुणाशी पुण्यात लग्न झाले होते. काही वर्षातच या दाम्पत्यात मतभेद झाले आणि त्यांनी बिहारमधील पाटणा न्यायालयातून घटस्फोट घेतला. आता तब्बल दोन वर्षांनंतर मुलीची आठवण आली म्हणून भेटीला आलो असे सांगत घटस्फोटित पतीने महिलेवर अत्याचार व अनैतिक कृत्य केल्याची घटना नुकतीच समोर आली. या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सदर तरुणावर बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या या तरुणीची पश्चिम बंगालमधील तरुणासोबत पुण्यातच ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. त्यातून दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. त्यानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली. नंतर महिलेचा पती नोकरीनिमित्त पाटणा येथे गेला. त्यासोबत ही महिला व मुलगीसुद्धा पाटण्यात गेले. दरम्यान, कुटुंबकलहातून या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आपसातील सहमतीने पाटण्याच्या न्यायालयात अर्ज करून घटस्फोटही घेतला. घटस्फोट झाल्यामुळे ही महिला तिच्या मुलीला घेऊन अमरावतीत माहेरी येऊन वास्तव्य करत आहे. शहरातील एका शाळेत शिक्षिका म्हणून ती सेवेत आहे.

दरम्यान, १५ जून २०१९ रोजी घटस्फोटित पती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अमरावतीत महिलेच्या घरी आला. मुलीची आठवण आली म्हणून आपण मुलीची भेट घेण्यासाठी आलो, असे त्याने महिलेला सांगितले. त्याचवेळी उद्या सकाळी साडेबारा वाजता मला गावी जाण्यासाठी रेल्वे आहे. त्यामुळे रात्रभर याच ठिकाणी मुक्काम करू दे, असे त्याने घटस्फोटित पत्नीला सांगितले. त्यामुळे महिलेने त्याला राहण्यास परवानगी दिली. रात्री जेवण झाल्यानंतर ही महिला तिच्या मुलीसह बेडरूममध्ये झोपली असता घटस्फोटित पती महिलेच्या बेडरूममध्ये जाऊन म्हणाला की, मला झोप येत नसल्यामुळे आपण काही वेळ गप्पा करू, त्यावर महिलेने आपला घटस्फोट झाला असून आपले लग्न संपुष्टात आल्याची आठवण त्याला करून दिली. त्यानंतर त्याने बळजबरीने पीडीत महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी कोणाला काहीही सांगितले तर मुलीला जीवानिशी मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. दरम्यान, १ मे रोजी पीडीत महिलेने आपल्या घटस्फोटित पती विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेल्या तक्रारीवरून घटस्फोटित पतीविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता नाही, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा

आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता नाही, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा

नागपूर : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये.

नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये 7 टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.

मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणं तळाला लागलेली असतात आणि या भागात पाणीटंचाईचं संकट उभं राहतं. पण, यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणं निम्मे भरलेली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची आता माहाराष्ट्राच्या जनतेला चिंता नाही.

राज्यातल्या कुठल्या विभागातील धरणात किती पाणीसाठा आहे? पाहुयात –

अमरावती – 51.82 टक्के
नागपूर    –  52 टक्के
औरंगाबाद – 58.35 टक्के
कोकण    –  51.35 टक्के
नाशिक    –  48.29 टक्के
पुणे        – 39.12 टक्के

एकूण पाणीसाठा – 47.72 टक्के

राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 47.72 टक्के पाणीसाठा आहे. काही धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्याची पाण्याची चिंता मिटली आहे.

Coronavirus in nagpur: दीक्षाभूमी येथे कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क ओपीडी सुरू

Coronavirus in nagpur: दीक्षाभूमी येथे कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क ओपीडी सुरू

नागपूर : सध्या नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या इतकी जास्त आहे की, शासकीय व खासगी वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोविड रुग्णांना वेळीच वैद्यकीय सल्ला व औषधोपचार मिळावेत तसेच प्रशासनालाही मदत व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पुढाकार घेत दीक्षाभूमी येथे कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क ओपीडी सुरू केली आहे.

दीक्षाभूमी स्मारक समिती व समता आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी परिसरातील यात्री निवासात ही ओपीडी सुरू झाली आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, प्रकल्प प्रमुख डॉ. महेंद्र कांबळे, ॲड. स्मिता कांबळे, विश्वास पाटील, राजेश लांजेवार, ॲड. आकाश मून आणि समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते.

ज्या कुणाला कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील आणि ऑक्सिजन लेव्हल ९२-९७ पर्यंत असेल त्यांनी या ओपीडीचा नि:शुल्क लाभ घ्यावा. ही ओपीडी दररोज दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.

नागपूरात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच

नागपूरात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच

नागपूर: नागपूरात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच आहे. सरकारचा आदेश झुगारुन बहुतांश खाजगी रुग्णालये आगाऊ पैशांची मागणी करत आहेत. नागपुरातील आयुष्यमान रुग्णालयाकडून तीन लाख ॲडव्हान्स वसूलीची पावती दाखवत माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय. त्यांनी संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केलीय.

कारवाई होऊ नये म्हणून साध्या कागदावर रुग्णालयाचा शिक्का मारुन आगाऊन पैसे घेतले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने लेखापरीक्षक नेमले होते. पण मनपाने नेमेलेल्या लेखापरीक्षकांनीच रुग्णालयाशी हातमिळवणी केल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.

नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा; ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी
कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली होती.

कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.

भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासोबत महिलेला अटक

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची केली हत्या; प्रियकरासोबत महिलेला अटक

बीड: गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती घातपाताचे व्रण होते. त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना गजाआड केलं आहे. संबंधित हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची उकल पोलिसांनी केली आहे.

संबंधित 32 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी आहे. ज्ञानेश्वरचा मृतदेह शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, तर गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. यातील पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. पण मृत ज्ञानेश्वर त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचला आणि त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात नेवून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात हत्या केल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

‘फेरे घेण्याआधी दोनचा पाढा म्हण’, परीक्षेत फेल झाल्यानं नवरीबाईनं केली नवरदेवाची मंडपातून हकालपट्टी

'फेरे घेण्याआधी दोनचा पाढा म्हण', परीक्षेत फेल झाल्यानं नवरीबाईनं केली नवरदेवाची मंडपातून हकालपट्टी

उत्तर प्रदेश: तुम्ही कधी असा विचार केला का, की गणिताची एक साधी परीक्षा एखाद्याचं लग्न मोडू शकते? कदाचित याचं उत्तर नाहीच असेल. मात्र, आता अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. लग्नासाठी सात फेरे घेण्याआधी नवरीबाईनं नवरदेवाची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितलं. मात्र, या गणिताच्या परीक्षेत नवरोबा फेल झाल्यानं तिनं त्याची थेट मंडपातून हकालपट्टी केली.

ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील. मिळालेल्या माहितीनुसार, महोबामधील एका गावात शनिवारी एक अरेंज मॅरेज होणार होतं. त्यासाठी संध्याकाळी नवरदेव वरात घेऊन लग्नाच्या मंडपात पोहोचला. मात्र, त्याआधीच नवरीला कुठून तरी अशी माहिती मिळाली, की नवरदेव तितका शिकलेला नाही, जितकं त्यानं सांगितलं आहे. मग काय, नवरीनं फेरे घेण्याआधी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं.

जेव्हा एकमेकांना वरमाळा घालण्याची वेळ आली तेव्हा नवरीनं नवरदेवाला दोनचा पाढा म्हणायला सांगितलं. अचानक झालेली ही भलतीच मागणी ऐकून नवरदेव आश्चर्यचकीत झाला. जेव्हा नवरीनं पुन्हा एकदा ओरडून त्याला पाढा म्हणण्यास सांगितलं तेव्हा नवरदेवानं खूप प्रयत्न केले मात्र त्याला पाढा म्हणता आला नाही. यानंतर तरुणीनं त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

पनवरी ठाण्याचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं, की हे एक अरेंज मॅरेज होतं. नवरदेव महोबा जिल्ह्यातील धवार गावातील रहिवासी होता. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि गावातील काही लोकही मंडपात उपस्थित होते. मात्र, नवरदेवाला दोनचा पाढा म्हणता न आल्यानं नाराज झालेल्या नवरीनं ऐनवेळी लग्नास नकार दिला. तिनं म्हटलं, की ती अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही, ज्याला गणिताचं साधं ज्ञानही नाही. मुलीच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.

सीबीएसई अकरावी प्रवेश 2021:विद्यार्थ्यांना मिळाल्या दोन मोठ्या सवलती

सीबीएसई

सीबीएसई class 11th admission 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (CBSE) आपल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी माहिती दिली आहे. बोर्डाने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतले काही नियम शिथील केले आहेत, ज्यांचा दहावीचा निकाल (CBSE 10th result 2021) यंदा येणार आहे आणि ते अकरावी प्रवेशाची (CBSE 11th admission 2021) तयारी करत आहेत. सीबीएसईने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे जाणून घेऊ…

सीबीएसईने रविवारी, २ मे रोजी दहावी निकालासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे. यात विना बोर्ड परीक्षा दहावीचा निकाल कसा तयार केला जाईल याचे निकष सांगण्यात आले आहेत. मार्किंग स्कीम आणि यासोबतच अकरावी प्रवेश कसे होतील याची माहिती देण्यात आली आहे. यात दोन प्रकारच्या सवलतींबाबतची सूचना देण्यात आली आहे.

  • CBSE 11th admission 2021: ही आहे सवलत

बोर्डाने अकरावी प्रवेशांसाठी गणित विषयातील बेसिक आणि स्टँडर्डचा नियम हटवला आहे. सीबीएसईने २०१९ या शैक्षणिक वर्षात दहावीत गणिताचे बेसिक आणि स्टँडर्ड असे दोन प्रकारचे विषय सुरू केले होते. ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर गणित विषय अभ्यासायचा नाही त्यांच्यासाठी बेसिक (CBSE Maths Basic) गणित होता. जे विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणातही गणित विषयाचा अभ्यास करणार आहेत, त्यांच्यासाठी स्टॅँडर्ड मॅथ्स (CBSE Maths Standard) हा विषय होता.

सीबीएसई बोर्डाच्या अकरावी इयत्तेत गणित शिकायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी दहावीला स्टँडर्ड मॅथ्स विषय घेतलेला असणे अनिवार्य आहे. असे नसल्यास अकरावीत मॅथ्स घेण्यासाठी दहावीत बेसिक मॅथ्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेत स्टँडर्ड मॅथ्सची परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र यंदाच्या वर्षापुरता हा नियम लागू असणार नाही. कोविड-19 (Covid-19) मुळे सीबीएसईने २०२० मध्ये पहिल्यांदा हा निर्णय घेतला होता की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत बेसिक गणित घेतले आहे, ते देखील अकरावीत गणित विषय घेऊ शकतात. त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. करोनामुळे यंदाही हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.

  • दुसरी सवलत काय आहे?

यंदा दहावीचा निकाल बोर्ड परीक्षेविनाच तयार होत आहे. शालेय स्तरावरील चाचण्या आणि प्री-बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे. जर या निकषांद्वारे मूल्यमापन करताना कोणी विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तरी तो अकरावीत प्रवेश घेऊ शकतो. सीबीएसईने याची परवानगी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट म्हणजेच पुरवणी परीक्षा होणार आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचा कंपार्टमेंटचा निकाल येत नाही, तोपर्यंत ते आपला अकरावीचा अभ्यास सुरू ठेवू शकतात.

जर तुमच्या लहान मुलांना कोरोना झाला असेल तर काय कराल? केंद्राने दिला सल्ला

जर तुमच्या लहान मुलांना कोरोना झाला असेल तर काय कराल? केंद्राने दिला सल्ला

भारतात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर भारतात लहान मुलांना ही आपल्या विळख्यात (Coronavirus in children) घेतलं आहे. मोठ्या संख्येने लहान मुलं संक्रमित होत आहेत. प्रत्येक दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या होत आहे. त्यातच लहान मुलांमध्ये कोरोना पसरत (Corona positive child) असल्याने चिंता वाढली आहे. यामुळेच कोरोना काळात आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी गाईडलाईन्स (Covid-19 guidelines for kids) जारी केल्या आहेत.

लहान मुलांमधील कोरोना प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने 2 डॉक्युमेंट जारी केले आहेत. एक म्हणजे मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याबाबतच्या नव्या गाइडलाइन्स (Revised guidelines) आणि पीडिएट्रिक एज ग्रुप (Paediatric age Group) म्हणजे लहान मुलांच्या उपचारासंबंधी प्रोटोकॉल (Management Protocol).

 

सौम्य संसर्ग असल्यास (Mild infection)

गळ्यात खवखव, घसा दुखणे अशी लक्षणं असतील पण शासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल. म्हणजेच माईल्ड इन्फेक्शन असेल तर, लहान मुलांना होम आयसोलेशन (Home isolation) मध्ये ठेवा. जास्तीत जास्त तरल पदार्थ द्या. त्यामुळे शरीर हायड्रेट रहायला मदत होईल. हलका ताप येत असेल तर, 10 ते 15 mg पॅरासिटामोल (Paracetamol) द्या. मात्र काही गंभीर लक्षणं दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.

मध्यम संसर्ग (Moderate infection)

ऑक्सिजन लेव्हल कमी असलेले मात्र, न्युमोनियाची लक्षण नसलेल्या मुलांना या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. मध्यम लक्षण असलेल्या मुलांना कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करावं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी मुलांना पातळ पदार्थ देत रहावेत. ताप आल्यास पॅरासिटामोल आणि बॅक्टेरियल इनफेक्शन असल्यास अमोक्सिसिलिनसाठी दिलं जाऊ शकतं. शरीरात ऑक्सिजन 94% पेक्षा कमी (Low oxygen level) असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा.

गंभीर संसर्ग (Severe infection)

गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये न्युमोनिया (Pneumonia), रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS), मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम (MODS) आणि सेप्टिक शॉक असे गंभीर लक्षण असतील तर अशा मुलांना तात्काळ आयसीयूत किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कॅटेगरीतल्या मुलांच कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला दिला आहे.

काही लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संक्रमणानंतरही कोणतीच लक्षण दिसत नाहीत. अशा मुलांवर उपचारासंबंधी काही सांगण्यात नाही आलं आहे. पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IPL 2021 बंद होणार का? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं उत्तर जानूं घ्या.

IPL 2021

करोना विषाणूने IPL २०२१ मध्येही धडक दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात  सोमवारी होणारा सामना पुढे ढकलण्यात आला असून लवकरच या सामन्याची नवीन तारीख जाहीर केली जाईल. करोना चाचणीत कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दोन्ही खेळाडूंना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा पुढील सामना ८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे, मात्र, हा सामना स्थगित होऊ शकतो, असे सांगितले जात होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

BCCI लवकरच केकेआर-आरसीबी सामन्याच्या तारखेचा निर्णय घेईल

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अन्य सामने पुढे ढकलले जाणार नसल्याचे सांगितले आहे. एका वरिष्ठ पत्रकाराने ट्विटरवर याचा खुलासा केला. बीसीसीआयने केकेआर आणि आरसीबी यांच्यातील हा सामना केव्हा आणि कोठे आयोजित होईल याबद्दल अधिकृत निवेदन दिलेले नाही. या दोन्ही संघांमधील सामना अहमदाबाद येथे खेळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

IPL कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत ७ सामन्यांत २ विजयांसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर सध्याच्या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मजबूत स्थितीत आहे. आरसीबीने ७ पैकी ५ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

जर तुम्ही ‘हे काम’ केले नाही तर १५ मे ला बंद होईल तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

जर तुम्ही 'हे काम' केले नाही तर १५ मे ला बंद होईल तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

इंस्टट टेक्स्ट मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप ला यावर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रायव्हेसी पॉलिसीवरून टीकेचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी याआधी फेब्रुवारी महिन्यात लागू होणार होती, मात्र आता १५ मे २०२१ ला लागू होणार आहे. विवाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू करण्याची तारीख टाळली होती. नवीन पॉलिसीबाबत कंपनी सातत्याने यूजरला नॉटिफिकेशन पाठवत आहे. मात्र, जर तुम्ही ही पॉलिसी स्विकारली नाही तर ?याबाबत जाणून घेऊया.

कंपनीने अनेकदा पॉलिसी लागू करण्याची तारीख टाळली आहे, मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याची शक्यता कमी आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की १५ मे पर्यंत जे यूजर पॉलिसी स्विकारणार नाहीत, त्यांना मेसेज करता येणार नाही. थोडक्यात, जोपर्यंत पॉलिसी स्विकारत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

१२० दिवसांनी अकाउंट बंद

व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे की अटी मान्य करत नाही तोपर्यंत यूजर मेसेज सेंड अथवा रिसिव्ह करू शकत नाही. जे या नवीन अटींचा स्विकार करणार नाही, त्यांचे अकाउंट इनएक्टिव्ह होईल व १२० दिवसानंतर बंद होऊन जाईल.नवीन पॉलिसीला सर्वाधिक विरोध भारतातून होत आहे. भारतात कंपनीचे सर्वाधिक यूजर आहेत. व्हॉट्सअ‍ॅप नवीन पॉलिसी अंतर्गत पॅरेंट कंपनी फेसबुकला अधिक डेटा शेअर करत असल्याचा आरोप आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने मात्र हे आरोप फेटाळत, अपडेट बिझनेस अकाउंटशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, यूरोपमध्ये आधीपासूनच वेगळे कायदे असल्याने तेथे व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी लागू होणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप यूजरच्या आयपी अ‍ॅड्रेससह अनेक माहिती फेसबुकला शेअर करते.

Prateek Gandhi च्या नवीन वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Prateek Gandhi

अभिनेता Prateek Gandhi सोनीलिव्ह वरील ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमधून प्रकाश झोतात आला. आता प्रतीक आणखी एका नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्याच्या या आगामी वेब सीरिजचं नाव ‘विठ्ठल तिडी’ आहे. ही एक गुजराती वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘विठ्ठल तिडी’चा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर Prateek Gandhi ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये प्रतीक एका जुगार खेळणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तो आधी गावात जुगार खेळतो आणि नंतर शहरात येऊन एक मोठा जुगारी होता.

प्रतीकने ‘स्कॅम १९९२’ मध्ये केलेल्या भूमिकेचे अजूनही कौतूक केले जाते. या सीरिजमध्ये त्याने हंसल मेहताची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजनंतर त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची प्रतिक्षा करत होते. आता शेवटी त्याच्या चाहत्यांना प्रतीकला एका नव्या रुपात पाहता येणार आहे.

दरम्यान, ‘विठ्ठल तिडी’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केले आहे. तर भार्गव पुरोहित यांनी ही कहाणी लिहली आहे. ही वेब सीरिज ७ मे रोजी Oho Gujarati या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जी ५ मे रोजी तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची ५ मे रोजी शपथ घेणार आहेत.

पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, बंगाली जनतेने भाजपला नाकारत ममता बॅनर्जी यांच्या पदरात मतांचे दान टाकले. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवला आणि तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, ६ मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले. शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

कोणीही विजयी रॅली काढू नका

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नये, जल्लोष करू नये, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी सर्व आमदार, नेते, कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे.

दरम्यान, देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले असून, राजकीय वर्तुळात भाजपच्या यातच पराभवाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

CoronaVirus: सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे, हे अत्यंत नुकसानकारक; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus: सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे, हे अत्यंत नुकसानकारक; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

कोरोनाच्या नवीन लाटेमध्ये आरटी-पीसीआर चाचणीत संसर्ग आढळला नसल्याचे बर्‍याचवेळा अहवालात समोर आले आहेत. मग लक्षण दिसत असल्यास रुग्णांनी सीटी स्कॅन रायला हवं का? असा प्रश्न लोकांना पडत आहे. परंतु आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे की सिटी स्कॅनचा वापर करायचा की नाही ते विचारपूर्वक ठरवायला हवे. त्यांनी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की,” सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे.”

गुलेरिया यांनी असे म्हटले आहे की, ”घरात आयसोलेशनमध्ये राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सेचुरेशन ९३ किंवा त्याहून कमी होत आहे, हे अशक्त होण्याचे लक्ष आहे. अशा स्थितीत जर आपल्याला छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.”

आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत असे सांगितले गेले आहे की जास्त बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये कोरोनाचे प्रकार वाढत आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये आहेत. २ मे रोजी रिकव्हरी रेट ७८ टक्के होता जो ३ मे रोजी ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

या सुरुवातीच्या सकारात्मक गोष्टी आहेत ज्यावर आपल्याला सतत काम करावे लागणार आहे. दिल्ली आणि मध्य प्रदेशात नवीन प्रकरणांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की जर आपण संपूर्ण देशातील कोरोना मृत्यू दर पाहिला तर ते अंदाजे १.१० टक्के इतका आहे.

दरम्यान सीडीसीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोना संसर्गापासून २ सर्जिकल मास्क किंवा कापडाचे मास्क वापरणं टाळा. यामुळे कोणताही फायदा होणार नाही. श्वास घ्यायला त्रास होईल. एन ९५ मास्क तुमच्या तोंडाला व्यवस्थित बसेल तसंच सुरक्षाही प्रदान करेल. तुलनेनं सर्जिकला मास्कची फिटिंग एव्हढी चांगली नसते. थोडावेळ वापरल्यानंतर तो लूज पडतो. कापडाचा मास्क ३ लेअर्सचा असेल तर ७७ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं.

कितीवेळा वापरता येऊ शकतो एक मास्क?

एन ९५ मास्क तुम्ही जास्तीत जास्त पाचवेळा वापरू शकता. सर्जिकल मास्क एकदा वापल्यानंतर फेकून द्यायला हवा. कापडचा मास्क वापरत असल्यास धुवून तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता. घाणेरडा मास्क वापरू नका, मास्कवर सॅनिटायजर किंवा कोणतंही केमिकल टाकू नका.

Viral: हे काय! प्लंबरनं किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी मागितले ४ लाख रुपये; व्हायरल होतोय बिलचा फोटो

Viral: हे काय! प्लंबरनं किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी मागितले ४ लाख रुपये

किचनचा पाईप तुटणं, लिकेज तर घरातील कधी वापराच्या वस्तू बंद पडणं, प्रत्येकालाच अशा प्रसंगाचा सामना करावा लागत असतो. असंकाही घडलं तर आपण प्लंबरला किंवा वायरमनला बोलावून आपल्या समस्या सोडवतो. ब्रिटनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

ब्रिटनमधील एका विद्यार्थ्यांच्या घरी प्लंबर पोहोचला त्यावेळी किचनमधील पाईप खराब झाल्यानं त्यानं तो पाईप दुरूस्त करण्याचं काम केलं. त्यानंतर जे झालं त्यावर तुमचा विश्वास अजिबात बसणार नाही. या प्लंबरनं जवळपास ४ लाख रूपयांचे बील बनवून या विद्यार्थ्याला दिलं. हे पाहून एश्ले डगलस नावाचा विद्यार्थी आश्चर्यचकीत झाला.

एश्ले हा २३ वर्षांचा असून हँट्समध्ये राहतो. द सनशी बोलताना त्यानं सांगितलं की,” सुरूवातीला मी पाहिलं किचनमध्ये खूप पाणी जमा झालं आहे. कारण सिंकमध्ये जोडलेला पाईल तुटला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून येऊ लागलं. त्यानंतर मी पी एम प्लंबर सर्विसच्या मेहदी पैरवी यांना फोन करून बोलावले. सुरूवातीला जेव्हा मी खर्चाबाबत विचारलं तेव्हा काहीच सांगितलं नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं न देताच त्यानं काम करायला सुरूवात केली. पण काम पूर्ण झाल्यानंतर त्यानं माझ्याकडून ३९०० पाऊंड्स ( जवळपास ४ लाख रूपये) मागितले. याच किमतीची पावतीसुद्धा माझ्याकडे दिली.”

ज्यावेळी एश्लेने एव्हढे पैसे का आकारले?, यााबाबात विचारलं तेव्हा मेहदी यांनी सांगितले की, ”मी माझ्या कामाचे एका तासाचे १ कोटीसुद्धा मागू शकतो. मला नाही वाटत यामुळे कोणाला फरक पडायला हवा. मी माझं ज्ञान आणि विशेषता लक्षात घेता पैसै ठरवतो.” खरं पाहता हे काम २५ हजारांत होऊ शकलं असतं. पण या प्रकरणात एश्लेला लुबाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जिंकल्यानंतर तुर्कीमध्येही ‘पगल्या’ चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जिंकल्यानंतर तुर्कीमध्येही 'पगल्या' चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

‘पगल्या’ या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी ‘ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल’ (टीजीएफएफ) तुर्की येथे ‘पगल्या’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाविला आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत, या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, “एक निर्माता म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळतेय ते पाहून मी खूप खूष आहे. अधिकृत निवडीबद्दलच नाही तर अनेक महोत्सवात या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार गौरवास्पद आहेत. मला आनंद होत आहे की, एका मराठी चित्रपटाला विविध देशांमध्ये आपली ओळख मिळत आहे. असे बरेच काही फिल्म फेस्टीवल झाले आहेत ज्यांत निवडलेल्या किंवा पुरस्कार मिळालेल्या यादिंमध्ये ’पगल्या’ हा पहिला चित्रपट आहे. भारताचा झेंडा जगभरात झळकल्याचा आपल्याला अभिमानच वाटतो.”

‘पगल्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. तसेच इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत. तसेच कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

Bajaj Auto rides into FY22 as India’s #1 Motorcycle maker

Bajaj

 Outpaces peers by clocking sales of 3,48,173 units worldwide in April 2021, becoming India’s

#1 Motorcycle manufacturer

 Reinforces its position as the World’s Most Valuable Two-Wheeler Company with a market
cap of INR 1,10,864 Crores as of 30 th April 2021

May 3 rd, 2021: Bajaj Auto, commenced the new fiscal with a strong exports performance which powered it to the top of the motorcycle segment in India. Bajaj Auto clocked worldwide sales (including India) of 3,48,173 units of which 2,21,603 units were exported to emerge as India’s #1 motorcycle manufacturer in April 2021.

Bajaj Auto leads Indian automobile exports, accounting for almost 60% of the country’s Motorcycle and three-wheeler exports last year. In FY 20-21, Bajaj Auto’s export income stood at INR 12,687 CR with 52% of its volumes exported to over 79 countries. With a cumulative 18 million vehicles exported over the last 10 years, Bajaj is one of the most visible Indian brands across the globe, truly making it ‘The World’s Favourite Indian’. The company’s global sales have earned over US$ 14 Billion of foreign exchange over the last decade.

Bajaj Auto pioneered the sports motorcycling segment in India with the launch of the Pulsar in 2001, which continues to be the market leader in India and in several overseas markets. In FY 21 itself, Bajaj Auto sold over 1.25 MN units of Pulsar globally. Over 80% of Bajaj Auto’s exports come from markets where it enjoys a No 1 or a No 2 position.

Commenting on this milestone, Mr Rakesh Sharma, Executive Director, Bajaj Auto said “We have commenced FY2022 on a very positive note despite the challenging environment. The wide range of motorcycles made by us covers the entire spectrum from entry, middle and up to premium level segments allowing us to engage with a wide spectrum of customers from the moto-taxi driver in Africa to the adventure seeker in Europe! This versatility is of enormous value in managing the current volatility as well as uncertainty and to keep the wheels of business moving for all our stakeholders!”

Bajaj Auto revived its iconic brand Chetak as a premium, stylish electric scooter last year to an overwhelming response. Bookings for the Chetak were re-opened recently and were sold out in less than 36 hours in Pune & Bengaluru. The company plans to scale up its presence to 24 more cities in the coming year.

Bajaj Auto has a highly successful partnership with KTM AG, and nearly 50% of KTM’s annual global sales are jointly designed by KTM & Bajaj and manufactured at Bajaj Auto’s state-of-the-art Chakan facility. This successful partnership has enabled KTM to become the no. 1 premium Sports motorcycle brand in the world.

To support the rising demand for its products globally, Bajaj Auto recently announced a major investment of INR 650 Crores in a fourth plant to be built at Chakan, Maharashtra for its premium motorcycle brand portfolio and the Chetak electric scooter. Bajaj Auto is the world’s 3rd largest manufacturer of motorcycles and the largest manufacturer of three-wheelers.

It continues to be the ‘World’s Most Valuable Two-Wheeler Company’ with a market capitalization of INR 1,10,864 Crores, which is nearly double of the next largest two-wheeler company in India.

“Fitness gives me sheer happiness” – says Rahil Azam aka DSP Anubhav Singh from Sony SAB’s Maddam Sir

Fitness gives me sheer happiness

1. What does fitness mean to you?

To me, fitness is a way of life and it gives me sheer happiness. I like the idea of being fit and having a healthy lifestyle makes me feel content. I believe health is wealth and no matter what activity you do, be it running or exercising, it is bound to make you fitter and better and will definitely give you a sense of satisfaction. I firmly believe that the person who feels healthy is always supercharged and is exceptionally fit.

2. How do you keep a healthy balance between your mind and your body?

I keep my mind healthy by doing my prayers, offering gratitude and for my body, I do my
workouts religiously, thereby maintaining a balance between the two.

3. Considering your hectic routine, how do you manage to stay fit and maintain a
healthy lifestyle?

Fitness is my priority and I adjust my shoot schedule according to my workout. I don’t miss my training because of a hectic schedule; I tend to work the other way around. It’s simply because I don’t want to fall ill, causing damage to my health. I believe a good workout makes me want to work better and when I carry out a proper workout, I am very energetic the entire day and in a lot of better headspace.

4. What kind of fitness routine makes you happy?

A simple workout routine would make me happy. A good blend of weight training, cardio, and stretching would be sufficient. Your workout routine is personal to you, and always remember that you have no point to prove to others.

READ: “It is important to find happiness in little things and set smaller goals in life” – says Sayantani Ghosh aka Daljeet Bagga from Sony SAB’s Tera Yaar Hoon Main

5. You play a role of a cop on the Maddam Sir. How do you maintain a fit body?

My love for fitness is irrespective of the roles I have portrayed on television so far. I have always invested more time into fitness, and I like the notion of having a healthy lifestyle.

6. Any quick healthy snack that you rely on during your busy days?

I think snack is something that organically shouldn’t be healthy. It is something you munch on and you enjoy gorging it. I think meals should be healthy and should have all the constituents that will make your body fit. Otherwise, hop onto any snack that makes you happy and burn it out during your workout.

7. What kind of music do you like listening to while you work out?

I believe you shouldn’t be dependent on anything for your training. I can work out even without music and in total silence. During the workout, your whole body is in a rhythm by default. For that matter, I don’t even need a training partner or anybody to prep me up for my workout. If given a choice, I would want to listen to retro songs or songs with more bass.

8. Given the current scenario, how are you staying fit at home and maintaining a
fit body?

I am a firm believer of where there is a will, there is a way. I think there is always room for a routine workout. You don’t require many things for that, just a pair of dumbbells would
suffice the purpose.

9. Any fitness tips for your fans?

The only tip I would want to give my fans is to be natural. As long as you are natural, you eat healthy food and consume supplements only to an extent; you are definitely doing things right. Your body should complement your personality, your look, and everything together is a package and is unique to you. So, don’t indulge in comparing yourself with anybody and focus on your identity and always remember to love yourself!

Watch Rahil Azam as DSP Anubhav Singh on Maddam Sir only on Sony SAB Monday to Friday at 10:30 PM

NMC issues latest SOPs for travellers coming to city

Nagpur: Following the order from the state government, Municipal Commissioner Radhakrishnan B has issued the latest SOPs for travelers coming to the city by railways or domestic flights from sensitive states such as Kerala, Goa, Rajasthan, Gujarat, Delhi, and NCR region, Uttarakhand, West Bengal, and Uttar Pradesh. Here is the order in this regard.

                                      latest SOPs

latest SOPs

latest SOPs

 

 

 

“It is important to find happiness in little things and set smaller goals in life” – says Sayantani Ghosh aka Daljeet Bagga from Sony SAB’s Tera Yaar Hoon Main

tera yaar hun main

Television artists have always put their best foot forward to entertain their audience. While following the stay home and stay safe mantra, the artists are utilizing their time off from the shoot. Such has been the experience of Sayantani Ghosh, who continues to win hearts with her exceptional portrayal as Daljeet Bagga in Sony SAB’s light- the hearted show, Tera Yaar Hoon Main, is utilizing and keeping herself engaged during these tough times.

Sayantani Ghosh talks about how she is keeping an optimistic approach during these unprecedented times, she shares, “To me, being cheerful and thoughtful is important and one needs to be in the right frame of mind during these tough times. During this time off from the shoot, I sincerely wanted to create a list of everything I would want to do and utilize this time fruitfully while staying at home. I believe it is important to find happiness in little things and set smaller goals in life. Since I love dancing, I sometimes put on some music and perform to keep myself happy and move ahead with a hopeful spirit. I stay in touch with my loved ones through phone and video calls and sometimes listen to music. Staying at home and meditation has guided me to look at the brighter side of life.”

With summers around the corner in Mumbai, Sayantani Ghosh is using this time for self-care. Talking about that she shared, “Since summers are here, to keep myself rejuvenated and hydrated, I prepare Nimbu Paani or Butter Milk and make them an essential part of my meals. While I am at home now, I am also using this time to help my skin rejuvenate by trying different DIY face masks. I am trying to keep myself healthy and ensuring that my immunity is in check.”

READ: Sony SAB’s Wagle Ki Duniya – Nayi Peedhi Naye Kissey gears up for an exciting week ahead with fresh episodes

Sayantani, while concluding, said, “We are facing one of the most challenging times and it is essential for us to take care of ourselves and everyone around us. I urge everyone to stay indoors and stay safe. We all need to act responsibly and fight this fight together. I assure our viewers that we will soon be back with fresh episodes, till then keep loving us, stay healthy, and safe.”

Keep watching Sayantani Ghosh as Daljeet Bagga in Sony SAB’s Tera Yaar Hoon

Main, every Monday to Friday at 9:30 PM

Let us know if there is any crisis, don’t take drastic steps: City Police

Let us know if there is any crisis, don’t take drastic steps: City Police

Nagpur: As we know the Covid-19 pandemic is getting worse day by day and the city police are working hard to protect the citizens from coronavirus. Efforts are being made to prevent people from the infection, citizens are being asked to wear masks and get vaccinated. Last year, 8 to 10 people committed suicide due to Covid. Given that experience, the police are also trying to maintain the morale of the citizens.

Superintendent of police, Nagpur Rakesh Ola stated that in the current situation, it is very important to boost the morale of the citizens. Someone is with you; this feeling makes the citizens stronger and ready to face the situation. For this, the officers and employees of each police station are advising the citizens. Let us know if there is any crisis. Don’t take the steps like suicide. City Police are assuring the citizens that they will help as much as possible. As per information, in the last three years, 920 people have committed suicide in the district.

Scolded for using phone, 15 year old girl commits suicide in Mankapur

Scolded for using phone, 15 year old girl commits suicide in Mankapur

Nagpur: A 15-year-old girl committed suicide by hanging herself from a ceiling fan at her residence after she was scolded by her mother, who had asked her not to waste time on mobile phone, Mankapur police said.                                                                                The deceased was identified as Sanskruta Chandrashekhar Singh, a resident of Waghoba Nagar, Godhani road.

Senior Police Inspector Vaijayanti Mandawgade informed that Sanskruta was a student of Standard IX. At 4 pm on April 24, Sanskruta’s mother asked her to have lunch immediately instead of wasting time on mobile phone.

Sanskruta got upset and hanged herself from a ceiling fan in the bedroom. After noticing the dangling body of their child, the parents rushed her to a hospital where she breathed her last on April 29. Her father is working with Railways. A case of accidental death was registered by Mankapur police. Further investigation is on.

West Bengal Election Results 2021: बंगालमध्ये भाजपचा अपेक्षा भंग; ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?

West Bengal Election Results 2021: बंगालमध्ये भाजपचा अपेक्षा भंग; ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?

फक्त 2 मे पर्यंत थांबा पश्चिम बंगालचे निकाल लागतात महाराष्ट्रात सत्तांतर होणार असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता आल्याने भाजपचा अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’ही बारगळण्याची चिन्हे दिसत आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?                                                                                                  फेब्रुवारी 2021मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले होते.

2 मेनंतर सत्तांतर होणार                                                                                                      भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर 2 मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील सत्तांतर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.

पवार- अमित शहा भेट                                                                                                        मार्च महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त बैठक होती. मात्र, एका वृत्तपत्राने या भेटीचं वृत्त देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असंही म्हटलं जात होतं. त्याचवेळी भाजप नेते राम शिंदे यांनाअमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया देऊन संभ्रमात भर टाकली होती.

मिशन बारगळणार?                                                                                                        भाजपचे नेते बंगालमध्ये चमत्कार होण्याची अपेक्षा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीद्वारे बंगालमध्ये सत्ता स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला होती. त्यामुळेच बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. तसं भाजपचे नेतेही बोलून दाखवत होते. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असल्याने भाजप राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न करेल याची शक्यता नाही. तसं झाल्यास भाजपच्या विरोधात जनमाणस जाऊ शकतं. त्यामुळे भाजप चुकूनही महाराष्ट्रात सत्तांतर करण्याचा प्रयत्न करणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Covid19: ब्युटी प्रॉडक्टच्या व्यवसायात घट मास्कमुळे मेकअपवर झाला परिणाम

Covid19

Covid19 कोरोनापासून वाचायचे असेल मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे झाले आहे. मास्क घालणे अनिवार्य केल्याने मास्क बनवणाऱ्या व्यवसायाला मोठी मागणी आली. मात्र मास्कमुळे ब्युटी प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे घराबाहेर पडताना मास्क लावावा लागतो त्यामुळे प्रामुख्याने महिलांनी लिपस्टिक लावणे कमी केले. ब्युटी प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाली त्यामुळे लिपस्टिकसह इतर ब्युटी प्रॉडक्टसच्या कंपन्यांवर मोठे संकट आले.

मोठ्या कंपन्यांना कोट्यावधींच्या नुकसाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्यां अनेक पार्लना लॉकडाऊनच्या काळात पार्लर बंद करुन घरी बसावे लागले. त्यानंतरही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांनी ब्युटी पार्लर त्याचप्रमाणे ब्युटी प्रॉडक्टकडेही पाठ फिरवली. त्यामुळे कोरोना महामारी सुरु झाल्यापासून गेल्या वर्षभरात ब्युटी प्रॉडक्ट क्षेत्राचे ७० टक्के नुकसान झाले आहे.

Covid19 देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्युटी प्रॉडक्ट्सची मागणी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेकांनी मागणी कमी झाल्याने आपला व्यवसाय बंद केला. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लग्न समारंभांवरही निर्बंध लावण्यात आले. लग्न सराईत मेकअप हा महिलांच्या फार जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र लग्न समारंभ,सण,सोहळे यांच्यावर निर्बंध आणल्याने महिलांचे नटणे,सजणे कमी झाले. घरच्या घरी सण साजरे होऊ लागले. त्याचप्रमाणे लग्नही काही माणसांमध्ये होत आहेत. त्याचप्रमाणे बऱ्यापैकी महिला घरुन काम करत आहेत.

हेही वाचा : Covid19 Nagpur; मास्क आला अन् लिपस्टिकची लालीच गेली

घरी असल्यामुळे मेकअपची तशी जास्त गरज पडत नाही म्हणून महिलांचा ब्युटी प्रॉडक्ट घेण्याचा कल कमी झाला. त्यामुळे ब्युटी प्रॉडक्ट्स कंपन्या आणि बाजारपेठा कोलमडून गेल्या आहेत. लोकांनी जीवानश्यक वस्तूंना जास्त प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे.

Covid19 ब्युटी प्रॉडक्ट्सच्या बाजारात लॅकमे,एल-टीन,मॅबेलीन,लॉरिअल, रेवलॉल यांसारख्या दोन हजारांहून अधिक कंपन्या ब्युटी प्रॉडक्ट्स तयार करतात. ब्युटी प्रॉडक्टमध्ये प्रामुख्यांनी लिपस्टिक,नेलपेंट, आय लायनर, कॉमपॅक्ट,प्रायमर,ब्लश, मस्करा,आय शॅडो यासारख्या काही महत्त्वांच्या वस्तूंकडे महिलांनी पाठ फिरवली आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
26 %
2.6kmh
20 %
Mon
36 °
Tue
36 °
Wed
38 °
Thu
37 °
Fri
38 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...