Home Blog Page 106

अपहरण करून बालिकेवर सामुहिक अत्याचार

नागपूर Nagpur

नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना जरीपटका ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. आरोपींबाबत कुठलाही धागा गवसला नसताना केवळ चार तासात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली. शमशाद उर्फ सैम रफीक अन्सारी (21), रा. गिट्टीखदान आणि बबलू उर्फ बब्बू मोहन कतवटे (21) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पीडित बालिका 14 वर्षांची आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या दिवशी (वसुबारस दिवाळीचा पहिला उत्सव) दुपारच्या सुमारास पीडितेला तिची मैत्रिण मार्टिननगरमध्ये भेटणार होती. बराच वेळपर्यंत रस्त्यावर प्रतीक्षा केल्यानंतरही मैत्रीण आलीच नाही. त्यामुळे कंटाळून पीडिता घरी जाण्यासाठी निघाली.

दरम्यान, शमशाद आणि बबलू हे दोघेही उत्तर नागपुरातील मित्राला भेटून त्याच मार्गाने परतत होते. मोटारसायलकने जात असताना ते पीडितेजवळ थांबले. काहीच कारण नसताना तिला आपल्यासोबत मोटारसायकलवर येण्याबाबत विचारले. पीडितेने नकार देताच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून त्यांना गाडी दामटली. रस्त्यात चायनीजच्या दुकानातून नुडल्स खरेदी केले. यानंतर ते तिला घेऊन गोरेवाड्याच्या जंगलात आले. येथे दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला आणि सायंकाळच्या सुमारास तिला तिच्या घराजवळ आणून सोडले. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने घरी पोहोचताच स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतले. जेवण न करताच ती झोपी गेली. दुसर्‍या दिवशी आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सार्‍या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. कुटुंबीयांनी तिला घेऊन जरीपटका ठाणे गाठले. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अपहरण आणि सामुहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजवरून शोध

पीडिता दोन्ही आरोपींना ओळखत नव्हती. पोलिसांनी रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. त्यांना दोन्ही आरोपी मोटारसायकलवर पीडितेला घेऊन जाताना दिसले. मोटारसायकलचा नंबर आणि आरोपींच्या फोटोच्या माध्यमातून दोघांनाही शोधण्यात आले. चौकशीत दोघांनीही अत्याचार केल्याचे कबूल केले.

Body of unidentified woman found near Jaitala Bazar Chowk

Couple Found Dead In Kapil Nagar Under Mysterious Circumstances
Couple Found Dead In Kapil Nagar Under Mysterious Circumstances

NAGPUR: An unidentified woman in her 40s was found dead near Jaitala Chowk Market on Monday. The decomposed body was found in semi-naked condition, with the right arm eaten by stray animals.

Sonegaon police, which has registered the case as accidental death, said the body of the unidentified woman was found in front of an abandoned and ramshackle house. The body was discovered by a vegetable vendor who had been attracted to it by the strong stench, after which he alerted police.

Zonal DCP Noorul Hassan said there used to be two vagabond women in the locality but one of them is now dead while the other is missing. “There were no apparent injury marks on the body or the private parts. The post mortem would be able to throw more light on the question of foul play in the death,” he said.

“There was a sari and some hair on the ground around 50 meters away from the body,” said Hassan. “It’s possible the woman was taking shelter in one of the abandoned houses in front of which her body was found,” said the DCP.

Senior inspector Dilip Sagar of Sonegaon police station said post mortem would be conducted on Tuesday. “We are trying to establish the identity of the woman. She was likely a rag picker. We are probing the case from every angle,” said Sagar.

नागपुरात धावत्या रेल्वेत लुटमार करणारी टोळी जेरबंद

रेल्वे

नागपूर : धावत्या रेल्वेत शस्त्राच्या धाकावर लुटमार करणाèया टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील सातही सदस्य नागपुरातील रहिवासी असून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला आहे. अनेक आरोपींनी यापूर्वी घरफोड्या केल्या आहेत. हत्येचाही आरोपी आहे. यात एक अल्पवयीन आहे.

विशाखापट्टणमवरून नवी दिल्लीकडे निघालेली ०२८८७ समता एक्स्प्रेस २८ ऑक्टोबरच्या रात्री नागपूर स्थानकानजीक आउटरवर असताना अचानक याटोळीतील काही युवक गाडीत शिरलेत. काही कळण्यापूर्वी शस्त्राच्या धाकावर त्यांनी लुटमार सुरू केली, इंजिनपासून दुसèया बोगीतील नीलेश गुप्ता, सुनील गुप्ता (रा. उत्तरप्रदेश) यांना चाकूच्या धाकावर लुटले. नीलेशची पर्स आणि १ हजार ८०० रुपये तसेच सुनीलचे अडीच हजार रुपये, त्याचप्रमाणे भोपाळला जाणारा मनीष पटले आणि जितेश पटलेवरही घाव घालून लुटपाट केली. नंतर धावत्या गाडीतून उड्या टाकून ते अंधाराचा फायदा घेत पसार झालेत. या झटापटीत एक प्रवासी जखमी झाला. या प्रकरणी भयभीत झालेल्या प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली होती.

लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच लोहमार्ग पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधार्थ गठीत केले. गुप्त माहितीच्या आधारे नरेश उर्फ लखन भंडारकर (२०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह धावत्या गाडीत दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे मो. अतिक मो. रफिक वय २०, मोमीनपुरा, शाहरुख हनिफ हकीम खान (२०), कमलेश उर्फ जंगली शिंदेकर (२३), सक्षम उर्फ बोनड्या मौंदेकर (१८), रजत देवघरे (२३) या सहा जाणांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच मोबाइल व अन्य असा २७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील अनेक आरोपींनी यापूर्वी घरफोड्या केल्या आहेत. हत्येचाही आरोपी आहे.

ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात लोहमार्ग गुन्हे शाखेचे प्रभारी सपोनि कविकांत चौधरी, सपोनि सचिन म्हेत्रे, पोलिस हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, चंद्रशेखर येळेकर, पोलिस नायक श्रीकांत धोटे, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, अमित त्रिवेदी, गिरीश राऊत, विजय मसराम, संदीप लहासे, नलिनी भानारकर, मंगेश तितरमारे यांनी केली.

करोनावरील भारत बायोटेकच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

नवी दिल्ली – भारत बायोटेकची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन ( ‘Covaxin’) ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. या कंपनीने कोविड-१९ वरील लसीसाठी आयसीएमआर सोबत भागिदारी केली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सोमवारपासून सुरू झाली आहे.

भारत बायोटेक ही जगातील एकमात्र लसनिर्माती कंपनी आहे जिच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (बीएसएल३) उत्पादनाची सुविधा आहे. गेल्या महिन्यात कंपनीने सांगितले होते की, तिने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचे अंतरिम विश्लेषण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता कंपनी २६ हजार स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू करणार आहे. याबाबत कंपनीने वेबसाईटवर एक लिंक शेअर केली आहे.

भारत बायोटेक कंपनीने दोन ऑक्टोबर रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी मागितली होती. दरम्यान, ही कंपनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एक अजून लस विकसित करत आहे. ही लस नाकाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ड्रॉपच्या रूपात असेल. ही लस पुढील वर्षापर्यंत तयार होईल.

दरम्यान, अमेरिकन औषधनिर्माता कंपनी मॉडर्नाने त्यांनी विकसित केलेली कोरोनावरील लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. लेट स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एका आठवड्याच्या आत लसीबाबत सकारात्मक माहिती देणारी मॉडर्ना दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

जेडीयू नेते नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली

पाटणा : जेडीयू नेते नितीशकुमार यांनी आज सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी राजभवनवर पार पडत आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होत आहे. शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बिहारचे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून तर्कवितर्क लढवले जात होते. मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडे निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीरपणे सांगितले होते. निकालानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात आयोजित विजयी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली बिहारच्या विकासाला गती देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे संभ्रम संपला होता आणि आज नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

भाऊबीज 2020: भाऊबीजेला तुम्ही देऊ शकता आपल्या लाडक्या भावाला ‘हे’ गिफ्ट

वर्षभरामध्ये अनेक सण असतात. त्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा सण म्हणजे दिवाळी. या सणाच्या दिवशी सलग चार दिवस धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज हे सर्वजण एकत्र येऊन आनंदाने उत्सव साजरे करतात. यामध्ये भाऊबीज हा सण बहीण भाऊ यांच्यातील नातं आणखीन मजबूत करणारा दिवस. दिवाळीमधील या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला भेटण्यासाठी आपल्या घरी येते.

तसेच बहीण लहान असो वा मोठी आपल्या भावाला या दिवशी ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ओवाळणी केल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. तसेच हल्ली भावासोबत बहीणही भाऊबीजेनिमित्त भावाला गिफ्ट घेत आहेत. तुम्ही ही विचार करत असला ना. आपणही कोणती भेटवस्तू घ्यायला हवी? चला तर मग या आयडिया तुम्हाला भेटवस्तू घेण्यासाठी मदत करतील.

घड्याळ

भाऊबीजेनिमित्त तुम्ही भावाला घड्याळ भेट देऊ शकता. त्याला कोणत्या कंपनीचे घड्याळ आवडतो, त्यानुसार तुम्ही घड्याळ खरेदी करू शकाल. त्याच्या आवडीनुसार भेटवस्तू घेतल्यास त्याला जात आनंद होईल. सध्या मार्केटमध्ये आणि ऑनलाईन ही नवनवीन स्टाईल्सचे घड्याळ आलेले आहेत. तसेच दिवाळीमध्ये डिस्काउंट ही मिळत असल्यामुळे तुम्ही घड्याळ खरेदी करू शकाल.

वॉलेट

भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून वॉलेट ही चांगला पर्याय आहे. सध्या ही अनेक मुले पैसे, स्मार्ट कार्ड्स ठेवण्यासाठी वॉलेटचा वापर करताना दिसून येत आहे. मार्केटमध्ये आणि ऑनलाईन ही चांगल्या कंपनीचे वॉलेट खरेदी करता येतील.

फिटनेस स्मार्ट बँड

प्रत्येक बहीणीला आपला भाऊ लहान असो व मोठा त्याची काळजी असते. मात्र, ती त्याची काळजी घेण्यासाठी नेहमी त्याच्यासोबत राहू शकत नाही. परंतु, तुमचा भाऊ जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्याला फिटनेस स्मार्ट बँड गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल.

मोबाईल

सध्या ऑनलाईन शॉपींगमध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्डवर मोबाईल खरेदी करताना डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे कमी पैशात चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन खरेदी करून तो भावाला गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक व्हरायटीज मिळतील. त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकाल.

लॅपटॉप

जर तुमचा भाऊ नोकरी करत असेल किंवा शिक्षणासाठी त्याला लॅपटॉप लागत असेल तर तुम्ही भावाला लॅपटॉप गिफ्ट करू शकता. दिवाळी मध्ये ऑनलाईनखरेदी करताना वस्तूंवर डिस्कॉऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावासाठी लॅपटॉप खरेदी करू शकाल.

जॅकेट

सध्या फॅशनच्या जमान्यात मुले ही जॅकेट घालण्यास प्राधान्य देत आहेत. लग्न समारंभ तसेच घरातील एखादे कार्यक्रम असेल त्यावेळी भावाला जॅकेट घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला ब्रँडेड जॅकेट गिफ्ट करू शकता. तुम्ही जर आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचं जॅकेट घेतलं तर ते त्याला अधिक आवडेल आणि हे गिफ्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

Two Nagpur men found murdered, could be a case of gang war

Nagpur Crime News: Man kills neighbour in Kalamna

NAGPUR: In what could be a case of a gang war, two persons, having close links with a dreaded goon, were found murdered near Kuhi-Pachgaon road at Dongargaon in the early hours of Monday. The victims have been identified as Krunal Charde and Sushil Bawane.

Police said the victims were likely to be killed somewhere else before their bodies were dumped within the limits of the Kuhi police station. They both had multiple deep stab injuries on the upper part of the body.

Rural police sources said the mentor of Charde and Bawane is in jail in connection with a murder of a goon last year. Apart from a gang war, property disputes could also a reason behind the murder, they added. Kuhi police of Nagpur rural have registered a case of murder.

नफ्याचे आमिष दाखवून शहरातील गुंतवणूकदारांची १९ लाख ३५ हजारांनी फसवणूक

Biggest Froud

नागपूर : गुंतवणूक केल्यानंतर खूप फायदा होईल, असे आमिष दाखवून शहरातील गुंतवणूकदारांची १९ लाख ३५ हजारांनी फसवणूक केली आणि कार्यालय बंद करून फरार झाले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार विजय गुरनुले (रा. प्रतापनगर) अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय गुरनुले आहे. याच्या सोबत आरोपी जीवनदास डंडारे (रा. जयताळा), अतुल मेश्राम (रा. अमरनगर) आणि रमेश बिसेन (रा. वानाडोंगरी) होते. त्यांनी त्रिमूर्तीनगरातील मंगलमूर्ती चौकात मेट्रो विजन बिल्डकम व रिअर ट्रेड कंपनी या नावाने २०१५ मध्ये कार्यालय सुरू केले. गुंतवणूक आणि फसवणुकीचा प्रकार २०२० मध्ये झाला.

जयताळा निवासी फिर्यादी गणेश चाफले (३९) यांच्या पत्नीच्या नात्यातील आरोपी जीवनदास डंडारे हा फिर्यादीच्या घरी गेला. फिर्यादीला गुंतवणूकसंबधी माहिती सांगितली. फिर्यादीच्या पत्नीच्या नावे भूखंड असल्याची माहिती जीवनदासला मिळाली. यानंतर आरोपी अतुल मेश्राम व रमेश बिसेन यांनी वारंवार फोन करून फायदा बाजार बिजनेस विषयी जून २०२० मध्ये माहिती दिली.

तुम्ही पैसे गुंतवा. झालेल्या नफ्यातून १५ टक्के कपात करून तुम्हाला प्रत्येक आठवड्याला रक्कम परत मिळेल अशी माहिती दिली. ते आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच अतुल आणि रमेश यांनी फिर्यादीला विजय गुरनुले यांच्या कार्यालयात घेऊन गेले. ९ जुलै २०२० ला फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाचे प्रत्येकी ९३ हजार रुपये असे दोन पॅकेज गुंतवणूक केली. त्यानुसार त्यांना दर आठवड्याला १० हजार ६१८ रुपये मिळाले. एवढी रक्कम २० आठवडे कंपनी देणार होती.

९ आठवडे नियमित रक्कम मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यामुळे फिर्यादीने एकून ११ लाख ३५ हजार रुपये गुंतविले. यांना मिळणारी रक्कम पाहून त्यांचे शेजारी तेजराव झगडे यांनी ६ लाख रुपये, फिर्यादीचे मित्र राजेश कराडे व त्यांचे इतर मित्र यांनी २ लाख रुपये असे एकून १९ लाख ३५ हजार रुपयांची कंपनीत गुंवणूक केली.

२८ सप्टेंबर २०२० ला गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी काही गुंतवणूकदारांना अर्धी रक्कम दिली व काहींना भ्रमणध्वनीवर मॅसेजव्दारे कळविले की, कंपनीत सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तुम्हाला तुमची रक्कम नंतर देण्यात येईल. फिर्यादी कार्यालयात गेले असता कुलूप दिसले. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींना कळले होते. प्रतापनगरपोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

नागपुरात टीसीएसची विस्तार योजना, हजारोंना रोजगाराची संधी

नागपूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने आपली व्यवसाय विस्तार योजना जारी केली असून या योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी टीसीएसचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

टीसीएसच्या या विस्तार योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या मिहान प्रकल्पात टीसीएस या कंपनीने ५० एकर जागेवर आपला प्लांट प्रारंभ केला. आता आणखी ५० एकर जागा कंपनीने खरेदी केली असून एकूण १०३ जागेवर या कंपनीने काम सुरू असून नव्या विस्तार योजनेसाठी कंपनी प्रबंधनाने मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती गजघाटे यांनी नितीन गडकरी यांना दिली.

याप्रसंगी कंपनीच्या अधिकाèयांशी चर्चा करताना नितीन गडकरी यांनी, नागपुरात नियुक्त्या करताना शक्यतोवर स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा, नागपूरसह विदर्भात मोठ्या संख्येत सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी आणि नॉन आयटी क्षेत्रात तसेच मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नागपूरसह विदर्भातील युवकांना संधी द्यावी असे आवाहनही गडकरी यांनी केले.

टीसीएसची ही विस्तार योजना आगामी तीन वर्षात पूर्ण होणार असून त्यात विदर्भातील युवकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी टीसीएसच्या अधिकाèयांनी नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शासनाची उद्या पासून मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

Maharashtra

मुंबई : पाडव्यापासून (सोमवार) राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी लावून धरली होती.

यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुरवधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. आता धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ही शिस्त पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना

धार्मिक स्थळे सोमवारपासून उघडण्याची अनुमती देताना शासनाने त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. स्थळांमधील मूर्ती, पुतळे, धर्मग्रंथांना हात लावण्याची अनुमती भाविकांना नसेल. दूरुन दर्शन घ्यावे लागेल. व्यवस्थापन ठरवेल त्या वेळेनुसार ती उघडी राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळेच उघडली जातील. इथे जाताना मास्क घालणे, सॅनिटायजर/हँडवॉशचा वापर, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था अनिवार्य असेल. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन सुरक्षिततेसाठी काही नियम लागू करू शकतील.

ऑनलाइन बुकिंग सक्तीचे

शिर्डी : राज्य सरकारने येत्या पाडव्याला (सोमवार) साई मंदिर उघडण्याचा निर्णय घेऊन भाविकांना दिवाळी भेट दिली आहे. पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डीबाहेरील भाविकांनी ऑनलाईन
पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे, अशी माहिती संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली.

PUBG Mobile Will Back Soon In India

PUBG

New Delhi: PUBG Corporation has announced that it is preparing to launch PUBG Mobile India, a new game specially made for the Indian market. This will be a fork game of PUBG Mobile, which was banned earlier this year in India by the government. Alongside the announcement, the company has revealed its plans on how it will provide a secure and healthy gameplay environment for players, and how it will invest in the country to cultivate local video game, esports, entertainment, and IT industries.

The company is yet to announce the release date of PUBG Mobile India. However, we expect the game to be made available very soon.

PUBG has stated that it plans to create an Indian subsidiary, which will help in communication with players and provide them with localized services. It intends to hire over 100 employees that will specialize in business, esports, and game development. It will also work with local businesses to strengthen its gaming service. For this, Krafton Inc plans to invest around $100 million in the country.

PUBG Mobile India will have the privacy and security of Indian player’s data as its top priority, according to the company. It will conduct regular audits and verifications on the storage systems holding Indian users personally identifiable information to reinforce security

The in-game content will be tailored to reflect local needs, specially customized for Indian gamers. The game will now be set in a virtual simulation training ground, new characters automatically starting clothed, and green hit effects to reflect the virtual nature of the game. It will also include a feature that places restrictions on game time to promote healthy gameplay habits for younger players.

To recall, PUBG Mobile was banned in India on September 2, under Section 69A of the Information Technology Act. The reason behind the ban was that the app has been engaging in activities that are prejudicial to sovereignty and integrity, defense, and security of the country.

नागपुरातील डबलडेकर उह्नाणपूलाचे थाटात लोकार्पण

नागपूर : अजनी ते विमानतळ या मार्गावरील डबलडेकर उह्नाणपुलाचे काम मेट्रो प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे अतिशय गतीने केले. पण हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा अद्वितीय नमुना ठरला आहे. यामुळे मनीषनगरवासीयांना दिलासा मिळणार आहे. परंतु येत्या काही दिवसात मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग मार्गावर लवकरण नवा अंडरब्रीज साकारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर शहराचे वैभव ठरलेल्या माझी मेट्रोसाठी वर्धा मार्गावर डबलडेकर उड्डाणपूल साकारण्यात आला असून यासोबतच मनीषनगरकडे जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपुल आणि अंडरपासचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गिरीश व्यास, प्रवीण दटके, महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मध्य रेल्वेच्या डीआरएम रिचा खरे तसेच महामार्ग विकास प्राधिकरणाचे राजीव अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, नागपुरात उभारण्यात आलेला डबलडेकर फ्लायओव्हर देशभरातील एकमेवाद्वितीय बहुस्तरीय वाहतुक प्रणालीचा नमुना ठरली आहे. यात एकाच पिलरवर उड्डाणपुल आणि मेट्रोची रचना करण्यात आली आहे. यासोबतच मनीषनगरवासीयांसाठी रेल्वे ओव्हरब्रीज आणि उज्ज्वलनगर येथे अंडरपास तयार करण्यात आला आहे.

या व्यवस्थेमुळे शहरातील पांच लाख लोकांना लाभ होणार आहे. येत्या काळात विद्यमान रेल्वे क्रॉqसगखाली अंडरब्रीज तयार करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला असून त्यासाठी २५ कोटींचा निधी देण्यात आला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ब्रॉडगेज मेट्रोला देखील मंजुरी मिळाली असून हा मार्ग नागपूर, गोंदिया, वडसा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, रामटेक असा राहणार आहे आणि त्याची गती १६० किमी प्रती तास अशी राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

या कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, हा उड्डाणपूल शहरासाठी गौरवाची बाब असून मेट्रोने देशभरात सर्वात गतीने काम पूर्ण केले. यापूर्वी रामझुल्याच्या कामात देखील तत्कालिन शासनाला गडकरी आणि फडणवीस यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. येत्या काळात फुटाळा तलावाच्या कामाला देखील मंजुरी देण्यात आली असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवित प्रकल्पपूर्तीस शुभेच्छा दिल्या. संचालन श्वेता शेलगावर यांनी तर आभारप्रदर्शन प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी केले.

पाकिस्तानच्या हल्ल्यात काटोलचा भूषण सतई शहीद

काटोल : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या गुरज बाधिपुरा सेक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल निवासी भूषण रमेश सतई हा जवान शहीद झाला. ही घटना 13 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी दोनच्या सुमारास जम्मू काश्मिरातील सीमेवर घडली.

28 वर्षीय भूषण सतई गेल्या 9 वर्षांपासून भारतीय सैन्यातील 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होता. देशभक्तीने ओतप्रोत असलेला भूषण नेहमीच पुढे जात शत्रूचा सामना करीत असे. लढवय्या वृत्तीचा अन् न डगमगणारा असा माझा मुलगा देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाला हे एैकून धक्का बसला आहे. परंतु देशासाठी प्राणपणाने लढणार्‍या माझ्या भूषणवर मला गर्व असल्याचे मोठ्या अभिमानाने त्याचे पिता रमेश सतई यांनी म्हटले आहे.

रमेश सतई हे मजुरीचे काम करतात. लहानपणापासूनच भूषणला सैन्याची ओढ होती. त्यानुसार तो सैन्यात भरती झाला होता. हाच भूषण सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाल्याची वार्ता काटोलमध्ये येताच सर्वत्र खळबळ उडाली. अनेकांनी सतई कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वना दिली. ऐन दिवाळीत कर्ता मुलगा असा गेल्याने फैलपुरा काटोल निवासी सतई कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.

पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार

उरी सेक्टरमध्ये तीन नागरिकही पाकिस्तानच्या गोळीबारात ठार झाले, तर काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीचे विभागीय अधिकारी रियाज अहमद मलिक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे सात ते आठ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पाक लष्करातील स्पेशल सर्व्हीस ग्रुपच्या (SPG) सैनिकांचाही सहभाग आहे, तर काही पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाले आहेत.

Strike By Power Employees on Diwali

MSEDCL drops power cuts plans

NAGPUR: Employees of all three government-run power companies will strike work on Diwali on Saturday over the failure of the government to pay bonuses to them. All the 21 power unions have decided to participate in the strike.

Mohan Sharma, a senior power staffer union office-bearer, said the staffers had asked for a bonus against their performance in 2019-20 but energy secretary Aseem Gupta refused to give any assurance regarding it.

“In 2019-20, MSEDCL employees had worked hard to collect Rs 82,000 crore revenue. The discom had earned a profit of Rs 150 crore while Mahatransco had earned Rs 130 crore. In spite of this, the state government refused to sanction Rs 120 crore for the bonus of one lakh power staffers,” said Sharma.

The union leaders have asked all staffers including officers to gather in front of company offices at 8 am on Diwali and stage a dharna.

‘आत्मनिर्भर भारत ३.०’; अर्थचक्राला चालना देण्यासाठी केंद्राकडून घोषणा

नवी दिल्ली : करोना व्हायरसने मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला दिवाळीच्या सणासुदीत चालना देण्यासाठी आज केंद्र सरकारकडून डझनभर घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्मनिर्भर भारत ३.० मधील योजनांची माहिती दिली.

अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा झाली आहे. बाजारातील वस्तूंची मागणी वाढली असून अर्थचक्र गतिमान होत असल्याने सीतारामन यांनी सांगितले. सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना अंतर्गत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. संघटीत क्षेत्रातील रोजगाराला बळ मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. त्याशिवाय उद्योगांना दिला जाणाऱ्या तातडीच्या पत पुरवठाविषयक योजनेला (Emergency Credit Line Guarantee Scheme) ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सरकारची दिवाळी भेट ; बँक कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, देशातील १० प्रमुख क्षेत्रांसाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारताच्या उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणाला होणार फायदा?
१ ऑक्टोबरनंतर ज्यांना पुन्हा रोजगार मिळाला आहे आणि जे ईपीएफओमध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल.आत्मनिभार भारत अभियानाची कामगिरी चांगली झाली आहे. २ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रेशन कार्ड पोर्टेबिलिटीच्या अंतर्गत आहेत. ६८.६ कोटी लोकांना याचा फायदा झाला. पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १३७३.३३ कोटी रुपयांचे १३.७८ कर्ज वाटप करण्यात आल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.

मे २०२० मध्ये सरकारने स्टिम्युलस पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे लक्ष तरलता वाढविणे आणि छोट्या व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. या पॅकेज अंतर्गत कोरोनामुळे प्रभावित झालेले टुरिझ्म, हॉस्पिटीलीटी आणि एविेशन सारख्या सेक्टर्सना सूट मिळाली आहे.

नागपुरात बिहार यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजप आमदार, खासदारासह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले.

बिहार निवडणुकीत रालोआला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बुधवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गणेशपेठमध्ये जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून घेतली नाही. गर्दी जमविण्यास मनाई असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याची दखल घेऊन गणेशपेठ पोलिसांनी खासदार विकास महात्मे, भाजप शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे यांच्याशिवाय ६० ते ७० कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी भाजप नेत्यांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये हे गुन्हे दाखल केले आहे.

Akshay Kumar and Kiara Advani starrer Laxmii shatters records; becomes the biggest movie opening on Disney+ Hotstar VIP

One of this year’s most anticipated Bollywood movies, Laxmii starring Akshay Kumar and Kiara Advani that was released on Disney+ Hotstar VIP has gone on to shatter records! Within hours of its release, the movie has broken all previous records set by any other Bollywood blockbuster to become the movie with the biggest opener for Disney+ Hotstar VIP. The horror-comedy movie that sees Akshay Kumar in a never-before-seen role of transgender piqued the interest of millions of fans who logged in to catch the First Day First Show of the blockbuster film and made it the most-watched movie on the platform.

Actor Akshay Kumar said, “I am overwhelmed and overjoyed by the response that Laxmii received. It’s heartening to know that audiences and fans from across the country logged on to Disney+ Hotstar VIP to watch the movie within hours of its release. Who doesn’t love beating records – whether it’s at the box-office or opening night on streaming platforms. Nothing is comparable to this feeling of euphoria”

Sunil Rayan, President & Head – Disney+ Hotstar said, “We couldn’t be happier with the kind of response our direct-to-digital movies have received. They have been loved by millions across the country, and today we’re happy to see that Laxmii has gone and set a new record to become the movie with the biggest opening night! A movie like this one makes for a great festive watch and we hope that it continues to brighten everyone’s Diwali”

Laxmii is the story of a man possessed by the ghost of a transgender. The family entertainer has been directed by Raghava Lawrence and stars Akshay Kumar, Kiara Advani, Ayesha Raza Mishra, Sharad Kelkar, Tarun Arora, Ashwini Kalsekar, Manu Rishi Chadha, Rajesh Sharma, and others.

Sitabuldi Road To Be No Vehicle Zone between 4 pm to 10 pm daily.

Nagpur: Deputy commissioner of police traffic Sarang Awad has marked Sitabuldi main road as ‘no parking and no vehicle zone’ from 4 pm to 10 pm daily.

The move was initiated to de-congest the city’s most favorite shopping destination in view of the coronavirus scare. However, shopkeepers criticized the decision and pointed out that instead of taking action against illegal hawkers, the enforcement agency has made the Sitabuldi traders scapegoat.

The action seems to have been taken after a picture of Sitabuldi main road went viral on Sunday on social media and newspapers.

Though traffic police implemented the decision and started diverting vehicles coming towards Sitabuldi main road including Variety Square, it failed to identify parking space for shoppers in the small lanes interconnecting the main road.

अर्णब गोस्वामीना तात्काळ सुटका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

पनवेल : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. रात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर आले. या वेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती.

‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाली अर्णब’ – ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाइल टॉर्च लावून सर्वांनी केले.

अर्णबची रवानगी तळोजा कारागृहात केल्यापासून तळोजा कारागृहाबाहेर अर्णब समर्थक दररोज गर्दी करीत होते. आजदेखील अर्नबच्या जामिनाची माहिती मिळताच कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. कारागृहातून बाहेर आल्यावर मी सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया गोस्वामी यांनी दिली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जमलेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात कारागृहाबाहेर वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.

वाळू तस्करांना पोलिसांकडून मदत, नागपुरात चार पोलीस तात्काळ निलंबित

नागपूर : ओव्हरलोड वाहनातून रेती तस्करी करणाऱ्यांना पोलिसांकडूनच मदत केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोराडी पोलीस स्टेशनअंतर्गत समोर आला आहे. झोन क्रमांक ५ चे डीसीपी नीलोत्पल यांनीच सतर्कतेने या प्रकाराचा भंडाफोड केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या कठोरतेनंतरही पोलीस कर्मचारी रेती तस्करांची मदत करणे सोडताना दिसत नाही. डीसीपी नीलाेत्पल यांना काेराडीच्या लाेणारा तलाव मार्गावर एमएच-३१,एफसी-५१५८ या क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी काेराडी पाेलीस स्टेशनला संपर्क करून पाेलीस निरीक्षकांना त्या ट्रकवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. निरीक्षकांनी संबंधित एएसआय व तीन पाेलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. या पथकाने संबंधित ट्रकला राेखले. ट्रक ओव्हरलाेड असल्याची बाब चालक व मालकाने कबूल केली.

कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी अतिरिक्त रेती रस्त्याच्या कडेला टाकण्याची इच्छा केली आणि पाेलीस कर्मचारी तयार हाेताच त्यांच्या उपस्थितीतच अतिरिक्त वाळू खाली करण्यात आली. वजन क्षमतेनुसार असल्याचे दाखविण्यासाठी ट्रक पाेलीस स्टेशनला नेण्यात आला. मात्र पाेलीस कर्मचाऱ्यांच्या अशा व्यवहाराचा सुगावा डीसीपी नीलाेत्पल यांना लागला हाेता. त्यामुळे ज्या ठिकाणी रेती खाली करण्यात आली, त्याच ठिकाणी दुसरे पथक दबा धरून लक्ष देत हाेते. पाेलीस स्टेशनमध्ये पाेहचताच नीलाेत्पल यांनी पाेलिसांचा भंडाफाेड केल्याने त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आराेपी पाेलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये एएसआय दिनेश सिंह, नायक शिपाई सुरेश मिश्रा, रवी युवनाते आणि विष्णू हेडे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाेलीस विभागात खळबळ उडाली आहे.

डीसीपी नीलाेत्पल यांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत माहिती दिली. वाळू तस्करांविराेधात कारवाईबाबत आयुक्त कठाेर आहेत. त्यांनी नीलाेत्पल यांच्या शिफारशीवरून संबंधित पाेलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले. यानंतर वाळू तस्करी करणारे उमेश रामकृष्ण वनकर (३६) ओमनगर, जावेद बेग कलंदर बेग (३२) गौसिया मशीदजवळ व घाट मालकाविराेधात वाळू चाेरी व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करून ट्रक जप्त करण्यात आला. सूत्रानुसार आराेपींनी आरटीओ, महसूल विभाग व घाट कंत्राटदाराच्या मदतीने ओव्हरलाेड ट्रक भरून वाळू चाेरी करण्याची कबुली दिली आहे. अधिकाऱ्यांना लाखाे रुपये लाच दिल्याचेही मान्य केले आहे. पाेलिसांच्या कठाेरतेनंतरही आरटीओ व महसूल विभागाचे वाळू माफियांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळेच तस्करी व ओव्हरलाेडिंग थांबली नाही.

The State Government Issued The Notification Allowing Schools To Reopen

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरु

Nagpur: On Tuesday, the state government officially issued the notification allowing schools to reopen from November 23 onwards. The decision, announced a few days ago by CM Uddhav Thackeray, is applicable only to Std IX-XII and attendance is not mandatory.

But there is a complete ban on organizing any event on the campus. This includes cultural, sports, or the annual functions in schools. Only parents-teachers association meets can happen, but that too online.

The notification, however, is silent on who will fund Covid-19 sanitization costs in aided and government schools. Ravindra Fadnavis, executive member of an association which represents trusts that run schools, said they expect the government to acknowledge their concerns. “We wrote to CM Uddhav Thackeray citing our financial inability to reopen schools. As per the information received, the letter has been forwarded to the school education department. Unfortunately, no reply has come,” said Fadnavis. TOI had reported on Tuesday about the association’s demand for Rs1 lakh per 500 students. These aided schools remain firm in their stand of not reopening till the funds are provided.

The notification on school reopening mentions safety guidelines to be followed along with a reminder that attendance cannot be forced. The notification reiterated that students can attend school only after written consent from parents.

The SOPs for school reopening had been issued some time back, and the same will remain in effect. In the previous SOP list, schools had been asked to ensure the sanitization of the premises on a daily basis. Also, parents have been urged to not send their children to school if they have a fever. Schools have been requested to form groups with parents and teachers to monitor safety, cleanliness, etc on the campus. Apart from regular schools, ashramshalas, too, have been given the green nod to start their residential campuses.

IPL 2020 Final, Mumbai Indians beat Delhi Capitals to Win fifth IPL title

Dubai: Rohit Sharma led Mumbai Indians to an unprecedented five Indian Premier League (IPL) titles after beating Delhi Capitals on Tuesday. With this win, Mumbai broke their odd-number jinx and became the first team to win consecutive IPL trophies since CSK in 2010 and 2011. En-route, Rohit also became the first captain to score two-fifties in IPL final’s history.

Rohit’s Midas touch worked from the start when he made the ‘tactical’ move of including off-spinner Jayant Yadav in the playing XI to tackle Delhi’s long list of left-handed batsmen. Yadav replaced leg-spinner Rahul Chahar and the decision reaped the ideal reward as the off-spinner got the wicket of Shikhar Dhawan in the Powerplay.

Chasing 157 to win, Rohit led from the front with a charismatic 68 off 51 balls as Mumbai reached the target in 18.4 overs with five wickets in hand.

हिवाळी अधिवेशन मुंबईत; रविभवनात कायम राहणार चाचणी केंद्र

Maharashtra-election-2019

नागपूर : ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने मंगळवारी घेतला. डिसेंबरमध्ये शहरावर भार वाढण्याचा धोका होता, मात्र यामुळे नागपूरला मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच हिवाळी अधिवेशनासाठी जारी करण्यात आलेल्या ४८ कोटी ८० कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा होईल.

नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्यास विरोध होत होता. बाहेरुन लोक आल्याने नागपुरात संसर्ग वाढण्याचा धोका वर्तविण्यात येत होता. शहरात दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणादेखील यासाठी अनुकूल नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागदेखील संभ्रमाच्या स्थितीत होता. विभागाने तयारीसाठी ५४ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक विधिमंडळाला पाठविले होते. जवळपास ४८ कोटी ८० लाख रुपयांच्या निविदा जारी करण्यात आल्या होत्या. यात सिव्हील सोबतच इलेक्ट्रीकल कामांचादेखील समावेश होता. मात्र अधिवेशनाची अनिश्चितता लक्षात घेता ‘वर्कऑर्डर’जारी केले नव्हते.

रविभवनात कायम राहणार चाचणी केंद्र

रविभवन परिसरात कोरोना चाचणी केंद्र तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. अधिवेशन लक्षात घेता त्याला रिकामे करण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र आता हे केंद्र व निवासाची सोय कायम राहणार आहे. सोबतच आमदार निवासातील कोविड केअर सेंटर परत सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

एनडीएला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत, नितीशकुमार पुन्हा होणार मुख्यमंत्री

पाटणाः बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज पहाटे ३ वाजता लागला. विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने (भाजप-जेडीयू) या निवडणुकीत १२२ जागांचा बहुमताचा जादूई आकडा पार केला असून ३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडीला (आरजेडी – काँग्रेस ) निवडणुकीत ११० जागा जिंकता आल्या. यामुळे बिहारमधील सत्तांतराचं काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचं स्वप्न भंगलं आहे. पण भाजपच्या तोडीसतोड जागा मिळवत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचा हा विजयच मानला जातोय.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. यामुळे मतमोजणीत उशीर झाला. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास निवडणुकीचे निकाल हाती आले आणि बिहारमधील एकूण चित्र स्पष्ट झालं.

एनडीएने जिंकलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपने ७२ जागा तर जेडीयूला ४२ जागा जिंकता आल्या. व्हीआयपी आणि एचएएमचा प्रत्येकी ४ जागांवर विजय झाला. अशा मिळून एनडीएने १२२ जागा जिंकल्या. तर ३ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांपैकी आरजेडीने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या. काँग्रेसने १९ आणि १६ जागा डाव्या पक्षांनी जिंकल्या. महाआघाडीने एकूण ११० जिंकल्याने बहुमत मिळवता आलं नाही. तर एमआयएमने ५ जागा जिंकल्या. तर बसपा, एलजेपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी १ जागा जिंकली. निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वाधिक ७५ जागा मिळवून सर्वात मोठ पक्ष ठरला आहे.

Diwali Rush: NMC chief warns of lockdown in markets over Covid rules violation

Nagpur: Upset over the shopkeepers and hawkers taking “liberty” to violate Covid-19 guidelines, the Municipal Commissioner Radhakrishnan B warned of imposing lockdown in markets in some areas of the city.

On Sunday, the Sitabuldi Main Road was flooded and overflowing with Diwali shoppers without adhering to the corona protocol in place to curb the deadly virus. The shopkeepers and vendors too were found ignoring the safety norms like maintaining social distancing and wearing masks. The same situation prevailed in Itwari, Mahal and other main markets in the city.

The NMC authorities found that though most people visiting the markets wear masks, the physical distancing norm is being ignored inside shops or while walking in the market area. The Municipal Commissioner chaired a meeting with different enforcement agencies and departments including city traffic police and NMC’s Nuisance Detection Squad to discuss ways to prevent rush in commercial areas. DCP (Crime) G Rajmane, DCP traffic Sarang Awad, Deputy Municipal Commissioner Dr. Pradip Dasarwar, NDS Commandant Veersen Tambe among others were present.

The shopkeepers and hawkers associations have been told if they don’t follow instructions, it will be treated seriously. Both shopkeepers and hawkers must follow Covid-19 protocols like not allowing customers without face masks and follow physical distancing, the official said. Currently, NMC is imposing a fine of 500 on people caught without masks but there is no fine for not maintaining physical distancing. “NMC has warned the shopkeepers and hawkers that if they do not maintain physical distancing, fines of Rs 3,000, Rs 5,000 and Rs 8,000 will be imposed,” he said.

On the other hand, Commissioner of Police Amitesh Kumar has revived mask drive and launched a mission for de-congestion and crowd management at marketplaces.

भाजपकडून जोशींना चाल, सोलेंना विश्राम!

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपने महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करून संधी दिली तर, आतापर्यंत पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रा. अनिल सोले यांना थांबवून विश्राम दिला.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर उत्तर प्रदेशमधील नऊ व राज्यातील चार जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतील नेत्यांशी ऑनलाइन चर्चा करून हा निर्णय घेतला.

पदवीधरच्या उमेदवारीसाठी भाजपकडून प्रा. सोले आणि जोशी यांच्यात स्पर्धा रंगली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर आतापर्यंत प्रतिनिधित्व करणारे प्रा. अनिल सोले यांचा विश्वास उंचावला होता. त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांच्या संपर्कात होते. दुसरीकडे संदीप जोशी यांच्या उमेदवारीबद्दल समर्थकांना खात्री होती. त्यांनी सहा वर्षांपूर्वीच या जागेवर दावा केला होता. यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी दोन महिन्यांपूर्वी वाढदिवशी जाहीर करून मतदारसंघातील दावा अधोरेखित केला. अखेरच्या टप्प्यात सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय भेंडे यांनीही दावा केला होता. सोमवारी जोशी यांच्या पारड्यात उमेदवारी आली.

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी जोशींची ओळख आहे. गेल्या ३-४ वर्षांत त्यांनी नागपूर महोत्सव, नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवासाठी पुढाकार घेतला. भाजपचा ‘गड’ असणाऱ्या या मतदारसंघाचे आव्हान काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी स्वीकारले आहे.

‘गड राखणार’

‘पक्षाचा गड असलेल्या पदवीधर मतदारसंघात भाजपने मला संधी दिली आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन गड कायम राखण्याचा प्रयत्न करेन. पक्षाने आतापर्यंत दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांसह विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. दोन दशकांपासून शहरवासीयांना माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची पारख केली. यापुढेही असेच प्रयत्न राहतील’, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

धक्कादायक : अर्ध्या नागपूरकरांना कोरोना होऊन गेला

corona Survey

नागपूर : सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोमवारी मेडिकलने विभागीय आयुक्तांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला.

नकळत कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ‘कोविड अँटीबॉडीज’ वाढले असतात. अशा संसर्गाचे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी मेडिकलच्या पीएसएम विभागाने ग्रामीणमधील १३ तालुक्यातील २ हजार तर महानगरपालिकेच्या १० झोनमधील २ हजार लोकांचे रक्तांचे नमुने घेऊन तपासले. हे सर्वेक्षण विभागीय आयुक्तांच्या निर्देशनात करण्यात आले.

पूर्व नागपुरात अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक

प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पूर्व नागपुरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेषत: महानगरपालिकेच्या नेहरूनगर, आशीनगर, गांधीबाग व सतरंजीपुरा या भागातील दाट वस्त्यांमध्ये अँटीबॉडीज वाढलेले मोठ्या संख्येत लोक आढळून आले.

लक्षणे दिसून न येणाऱ्यांची संख्या जास्त

या सर्वेक्षणातून एक गोष्ट समोर आली आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अ‍ँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट आहे. शहरांमध्ये २००० लोकांमधून साधारण १००० लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढले असल्याचे दिसून आले. यावरून यातील एकाही व्यक्तीला लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांनी कोविडची तपासणी केली नाही.

रोगप्रतिकारशक्ती वाढली तरी धोका कायम

तज्ज्ञांच्या मते, सिरो सर्वेक्षणातून लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली असल्याचे दिसून आले असले तरी कोरोनाचा विषाणू प्रत्येक टप्प्यावर तो कसा गंभीर स्वरूप दाखवेल याचा नेम नाही. त्यामुळे धोका कायम आहे.

लोकांनी मास्क घातले पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे.

बायडन-हॅरीस यांचा विजय; भारतीय-अमेरिकन नागरिकांचा जल्लोष

वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्याचे वृत्त येताच अमेरिकेत जल्लोष सुरू झाला. या जल्लोषात भारतीय-अमेरिकन नागरीकदेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिेकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.त्यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.

अमेरिकेत भारतीय वंशाचे अनेक नागरीक आहेत. यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ट्रम्प आणि बायडन यांनी जोरदार प्रयत्न केले होते. सिलिकॉनमधील भारतीय-अमेरिकन आणि भारतीय समुदायाच्या संस्थेशी निगडित असलेले एम. रंगास्वामी यांनी हा दिवस आमच्यासाठी मोठा दिवस असल्याचे म्हटले. भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याबाबत बायडन यांची चांगली भूमिका आहे. अमेरिका-भारतादरम्यान झालेल्या अणू करारात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बायडन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम स्वरुपी सदस्यत्वाला पाठिेंबा दिला आहे.

साउथ एशियन्स फॉर बायडन या प्रचार मोहिमेच्या राष्ट्रीय संचालक नेहा दीवान यांनी सांगितले की, कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांचे आता सरकारमध्ये थेट प्रतिनिधीत्व असणार आहे. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत.

नागपुरातील शहीद गोवारी उड्डाण पूल होतोय ‘ओव्हरलोड’

नागपूर : नागपुरातील महत्त्वाचा उड्डाण पूल असलेल्या आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर नियमांना धाब्यावर बसवून जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे या उड्डाण पुलावर ताण येत असून भविष्यात याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असून कारवाईसाठी कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही.

उड्डाण पुलाच्या निर्मितीला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या उड्डाण पुलावरुन जड वाहनांना वाहतुकीला बंदी आहे. याशिवाय उंच व जड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी उड्डाण पुलाच्या सुरुवातीला ‘बॅरिअर्स’देखील लावण्यात आले होते. अनेकदा हे ‘बॅरिअर्स’ जड वाहनांमुळेच तुटले. याचा फायदा जड वाहनाच्या चालकांकडून घेण्यात येत आहे. आता कुठलाही अडथळा नसल्याने ट्रक, बस बिनधास्तपणे वेगाने जातात.

उड्डाण पुलाची क्षमता ही ३० ते ४० टन वजन असलेल्या वाहनांची आहे. मात्र ५० टनांहून अधिक ओझे असलेले ट्रक्स यावरुन जातात. त्यामुळे या उड्डाण पुलाला धोका संभवतो. काही ठिकाणी जड वाहने गेल्यानंतर जास्त प्रमाणात कंपनेदेखील जाणवतात.

नवीन ‘बॅरिअर्स’ कधी ?

उड्डाण पुलाच्या दोन्ही दिशांच्या बाजूस उंची संदर्भातील ‘बॅरिअर्स’ लावणे अत्यावश्यक आहे. मात्र २०१७ पासून याबाबत पुढाकार घेण्यात आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना ही बाब दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्दळीच्या वेळीदेखील वाहतूक

अगोदर रात्रीच्या सुमारास जड वाहने उड्डाण पुलाचा वापर करताना दिसून यायची. मात्र आता तर चक्क वर्दळीच्या वेळी दिवसादेखील जड वाहनांची वाहतूक होते. आश्चर्याची बाब म्हणजे यांचा वेगदेखील जास्त असतो. तरीदेखील या वाहनांवर कुठलीही कारवाई होत नाही. वाहतूक पोलिसांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

उड्डाण पुलाच्या ‘स्ट्रक्चर’ला होऊ शकते नुकसान

उड्डाण पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे. जड वाहनांमुळे पुलाच्या ‘आरसीसी स्ट्रक्चर’चे नुकसान होत आहे. जर मोठे नुकसान झाले तर पुढे धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाण पुलाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, सचिव तेजिंदरसिंह रेणू, सहसचिव अमरजितसिंह चावला यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदनदेखील सादर केले.

Nagpur: Bullion traders’ family duped of Rs 9.4 crore

Crime

NAGPUR: Three employees of a branded jewellery outlet were booked for cheating, forgery, and criminal breach of trust and conspiracy for their alleged role in duping the bullion traders’ family of more than Rs 9.4 crore.

Learnt to be from the same family, Ramkuwar Jangid, Sunil Jangid and Mohanlal Jangid allegedly transferred substantial cash, shares and properties in their names with fake signatures and documents, taking advantage of an ailing Anantrao Parekh, who owns a jewellery shop at Darodkar Chowk.

Ramkuwar is learnt to have diverted Rs6.9 crore in his account from that of the bullion trader. Sunil transferred shares worth Rs92.9 lakh by fraud. Mohanlal usurped three kilos of gold worth Rs1.5 crore, 30kg silver costing Rs12 lakh and also diverted considerable cash from his employer’s account to his own.

Preparing fake documents and death certificate, the Jangids also claimed to have received a property transferred to their name by Anantrao.

Nagpur Weather

Nagpur
haze
24 ° C
24 °
24 °
41 %
1kmh
1 %
Fri
27 °
Sat
39 °
Sun
41 °
Mon
42 °
Tue
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...