आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय

Date:

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अटी-तटीच्या सामन्यात मुंबईनं बेंगळुरूवर पाच गडी राखून विजय मिळवला. सलग सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.

कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. बेंगळुरूला प्रथम फलंदाजी देण्याचा मुंबईचा हा निर्णय योग्य ठरला. बेंगळुरूनं एबी डीव्हिलियर्स (७५) आणि मोईन अली (५०) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १७१ धावा करून मुंबईला १७२ धावांचे आव्हान दिले होते.

बेंगळुरूनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. कर्णधार रोहित शर्मा आणि डी.कॉक बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्यांच्या झंझावाती खेळीनं मुंबईचा डाव सावरला. हार्दिकनं १६ चेंडूंमध्ये नाबाद ३७ धावा करत संघाला विजय प्राप्त करून दिला.

अधिक वाचा : प्रेमाला धर्माचं बंधन नसावं: आलिया भट्ट

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related