भाजप आहे तर बेरोजगारी शक्य आहे: प्रियांका गांधी

Date:

दिल्ली: दिल्लीमध्ये काँग्रेसने मोदी सरकारविरोधात ‘देश बचाओ रॅली काढली आहे. रामलीला मैदानावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅली दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मोदी सरकारमुळे चार कोटी रोजगार नष्ट झाले आहेत. भाजपच्या सहा वर्षाच्या सरकारमध्ये जीडीपीची मोठी घसरण झाली आहे. तरी सुध्दा प्रत्येक बस स्टॉपवर मोदी है तो मुमकीन है, अशा जाहिराती दिसत आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

‘भाजप आहे तर १०० रुपये किलो कांदा शक्य आहे. भाजप आहे तर ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य आहे. भाजप आहे तर ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी शक्य आहे. भाजप आहे तर १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या शक्य आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला करत या कायद्यामुळे देशाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

ही रॅली देशाला वाचवण्यासाठी आहे. देशामध्ये महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला थांबवायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे देशातील नागरिकांनी आताच आवज उठवणे गरजेचे आहे. जर आपण आज याविरुध्द बोललो नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना नष्ट होईल, असे प्रियांका गांधीनी सांगितले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...

Ram Navami 2025: The Significance, Rituals, and Celebrations of Lord Rama’s Birth

 Ram Navmi 2025 Significance: Ram Navmi marks the birth anniversary...