भाजपनं विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला, महाजनादेश यात्रेला सुरुवात

Date:

नागपुर:  भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्यात, आता भरती नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे स्पष्ट केलं. आज अमरावतीतून ‘महाजनादेश’ यात्रेला सुरुवात करून भाजपनं विधानसभा निवडणुकीचा बिगुलही फुंकला.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतून भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या महाजनादेश यात्रेच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या कामांची जंत्री मांडतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहोत. जनता दैवत आहे. जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं सांगत या जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने गेल्या १५ वर्षात काय काम केलं? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी केलं.

दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या

आम्ही गेल्या पाच वर्षात राज्यात ३० हजार किलोमीटर रस्त्याचं जाळं विणलं. हा देशातील विक्रम आहे. दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचं कामही आमच्याच सरकारनं केलं. आता मुंबई-नागपूर समृद्झी महामार्गाचं कामही सुरू आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक योजना आम्ही प्रामाणिकपणे राबवली आहे. त्यामुळे आम्हाला दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

अधिक वाचा : बांबू लागवडीमुळे नागपुरच्या तापमानात घट होईल

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related