जाहीर प्रचाराचे रण शमणार आज

Date:

नागपुर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज, मंगळवारी संपणार आहे. विदर्भातील सात जागांवरील उमेदवारांना मतदारांशी उघडपणे ‘कनेक्ट’ होण्याची शेवटची संधी आहे. महाराष्ट्रातील या सात जागांसोबतच देशातील २० राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील ९१ मतदारसंघांमध्ये गुरुवारी, ११ एप्रिलला मतदान होत आहे. या उरलेल्या दोन दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्ते छुप्या प्रचारतंत्रावर भर देतील. सोशल मीडियावरील प्रचारासाठीही मतदानपूर्वीच्या ४८ तासांची मर्यादा घालून दिली असल्याने या प्रचाराला आवर घालण्याचे आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे.

गेले दोन आठवडे विदर्भातील विदर्भातील नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम या सात लोकसभा मतदारसंघांतील वातावरण तापलेले आहे. ‘लाज’ आणि ‘माज’ अशा शब्दप्रयोगातून महाआघाडी आणि युतीने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. रॅली, पदयात्रा, सभा, घरोघरी संपर्क, मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठका, नेत्यांची मंथने अशा पद्धतीचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून मतदार अनुभवत आहेत. हा जाहीर प्रचार आज, अखेरच्या दिवशी टिपेला नेण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न राहणार आहे. युती आणि महाआघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडी, बसपा-सपा आघाडी आणि बंडखोरांचे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न टिपेला पोहोचले आहेत. या दिवसांत या मतदारसंघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा अनुभवल्या. ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’चा सामना बघितला. आज, नागपुरात भाजप अध्यक्ष अमित शहा यांची नागपुरात तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची चंद्रपुरात सभा होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ९१ जागांमध्ये सर्वाधिक २५ जागांसाठीचे मतदान आंध्र प्रदेशात तर १७ जागांसाठीचे मतदान तेलगंणमध्ये होत आहे. उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या आठ जागांचाही यात समावेश आहे.

सुरक्षा दलांसमोर बस्तरचे आव्हान

रायपूर : माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या बस्तरमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान होत आहे. माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शांततेत मतदान पार पाडणे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान आहे. या लोकसभा क्षेत्रातील कोंटा, दंतेवाडा, बिजापूर व नारायणपूर येथे सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत तर बस्तर, चित्रकूट, कोण्डागाव व जगदलपूर येथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान होईल. एकूण १,८७९ मतदान केंद्रांपैकी ७४१ संवेदनशील आहेत. येथे ८० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : डिजिटल की ‘चल निकल’?

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...