कुलभूषण जाधव यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या हरिश साळवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Date:

नागपूर: इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजी)मध्ये कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला नामोहरण केल्याबद्दल भारताचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानने या खटल्यात दोन वकील बदलले, पण साळवे या दोन्ही वकिलांना पुरून उरले आणि कुलभूषण यांची फाशी रोखण्यात यशस्वी ठरले. कुलभूषण यांना हेर ठरविण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या वकिलावर २० कोटी रुपये खर्च केले, तर याप्रकरणात कुलभूषण यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या साळवे यांनी केवळ एकच रुपया घेतला.

व्हिएन्ना कराराच्या आधारावर साळवे हा संपूर्ण खटला लढवत आहेत. पाकिस्तानने कुलभूषण यांना कौन्सिलर उपलब्ध करून न देता व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं देत कुलभूषण यांची फाशी रोखली. तसेच कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचंही त्यांनी कोर्टाला पटवून दिलं. साळवे यांनी दिलेले तर्क आणि केलेल्या युक्तिवादामुळे पाकिस्तानी वकील खावर कुरैशी यांची बोलतीच बंद झाली. साळवे यांच्यापुढे कुरैशी यांचे सर्व युक्तिवाद फिके पडल्याने आयसीजेने १५-१ने भारताच्या बाजूने निर्णय दिला.

हरिश साळवे हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील असून देशातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची दिवसाची फी ३० लाख रुपये असल्याचं मीडिया वृत्त आहे. मात्र कुलभूषण प्रकरणात ते केवळ एक रुपया घेऊन खटला लढवत आहेत. १९९९ ते २००२पर्यंत ते देशाचे सॉलिसिटर जनरल होते. त्यांचे वडील काँग्रेसचे खासदार आणि क्रिकेट प्रशासक होते.

तर दुसरीकडे पाकिस्तानने गेल्या वर्षी नॅशनल असेंबलीत अर्थसंकल्प सादर करताना वकील खावर कुरैशी यांना त्यांची फी देण्यासाठी २० कोटींची तरतूद केली होती. कुरैशी यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. शिवाय आयसीजेमध्ये खटला लढवणारे ते सर्वात कमी वयाचे वकील आहेत.

अधिक वाचा: आता उबर बुक करता येणार SMS करून !!

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related