रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू : नितीन गडकरी

Date:

नागपूर : देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार केले जात आहे. मात्र, ज्या ‘डीपीआर’ (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) नुसार हे रस्ते केले जात आहेत, त्या डीपीआरमध्येच प्रचंड चुका असतात. घरी बसून अभियंते डीपीआर तयार करतात, अशा शब्दांत कानउघाडणी करत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रोड इंजिनिअरिंगच्या चुकांमुळेच रस्त्यांवर मृत्यू होत असल्याचं विधान केलं. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आलं.

नागपुरात चौथ्यांदा होत असलेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलग्नित पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. रोड इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असतात. वळण बरोबर न घेणे, झाडांच्या फांद्या वाहतुकीच्या आड येणे यांसारखे अनेक दोष यात आढळून येतात. रस्ते सुरक्षा या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयानंही याची दखल घेतली आहे. ३ लाख लोक या रस्ते अपघातामुळं दिव्यांग झाल्याचं वास्तव आहे. अपघात सापडलेल्या ५० टक्के लोकांचे जीव वाचविण्यात आपल्याला अपयश आलं. एकाच जागी शेकडो अपघात होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.

एक वळण चुकले म्हणून १५० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना या देशात घडली. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. ५ लाख अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. यात १८ ते ३५ वयोगटातील युवकांची संख्या ६५ टक्के आहे. भारतातील या भयावह वास्तवामुळे आमची मान खाली जात असल्याचे गडकरी म्हणाले.

२४ नोव्हेंबरला आयआरसी जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या विविध शोधपत्रांचे सादरीकरण अधिवेशनात सहभागी झालेले तज्ज्ञ करतील. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण सात तांत्रिक सत्रे या दिवशी आयोजित करण्यात आली आहेत. २५ नोव्हेंबरला २१७ वी कौन्सिल बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर अधिवेशनाचा औपचारिक समारोप करण्यात येईल. याशिवाय सर्वसामान्य जनतेला तांत्रिक प्रदर्शन बघण्यासाठी खुले राहणार आहे. दिवसभराच्या तांत्रिक चर्चासत्रानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत. शनिवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्यासह प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Cloud Migration With Amazon Web Services: AWS Migration Services

Cloud migration refers to the process of relocating digital...

AWS Server Migration Service – Uses and Benefits

What is AWS Server Migration Service (SMS)? AWS server migration...

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...