तुम्ही नियमित वीजबिल भरता ना? भरत नसाल किंवा चुकवलं असेल तर आजच भरून टाका. याचं कारण म्हणजे थकबाकीदारांना किंवा वीजबिल न भरणाऱ्यांना आता महावितरण मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही वीजबिल चुकवत असाल तर 3 आठवड्यात वीजपुरवठा कापला जाणार आहे. यासंदर्भात महावितरणकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याचं लक्षात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील 3 आठवडय़ात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी वीजबिल भरावेत आणि सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केलं आहे. आवश्यकता असल्यास हप्त्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे.
एकूणच राज्यातील आकडेवारीचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 आहे. या ग्राहकांकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे.
वीजबिलाबाबत ग्राहकांच्या शंकाचं आणि तक्रारींचे निवारण करण्यात आलं. इतकंच नाही तर वारंवार सांगून देखील अद्याप अनेकांनी थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे अशा ग्राहकांवर चाप लावण्यासाठी आता तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वीजबिल चुकवणाऱ्या या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती नाळे यांनी दिली आहे.
मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमधील महिन्यांची 100% फी पालकांना शाळांमध्ये भरावीच लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. राजस्थानातून आलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला असला तरी तो आता देशभरात लागू होऊ शकतो. परिणामी मुंबईसह महाराष्ट्रातील पालकांनाही हा मोठा दणका आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांनी राजस्थानमधील एका शाळा व्यवस्थापन समितीने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना स्पष्ट सांगितले की, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शाळा फी पालकांना 100 टक्के भरावी लागेल. 5 मार्च 2021 पासूनची थकीत शाळा फी पालकांना सहा हप्त्यांमध्ये भरता येईल. एकीकडे हे आदेश देतानाच न्यायालयाने असेही बजावले की, पालकांनी शाळा फी भरली नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येणार नाही. किंवा दहावी बारावीच्या परीक्षांपासून फी न भरणार्या मुलांना वंचित ठेवता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश म्हणजे मुंबईसह राज्यातील पालकांना मोठा धक्का आहे. फी वाढीसंदर्भात सरकार निर्णय घेत नसल्यामुळे मुंबईतील पालक गेल्या आठवड्यात आक्रमक झाले होते. शिक्षणमंत्री आणि शिवसेना पक्ष कार्यालयासमोर पालकांनी आंदोलन केले होते.शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही. याप्रकरणी न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या मे 2020 रोजीच्या शासन निर्णयास दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले होते. या संदर्भात एक समितीही गठित केली जाईल असे सांगत आक्रमक पालकांना सरकारने थंड केले होते. आता सर्वोच्च न्यायालयालयानेच कोरोना काळातील सर्व शालेय शुल्क भरावेच लागेल, असे बजावल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचा आधार घेत राज्यातील खासगी शाळा आता पालकांना फीचा तगादा लावण्याची शक्यता आहे.
IndianOil launched the Premium grade petrol XP100 at its Company Owned
Company Operated Retail Outlet at RBI Nagpur on 7th February 2021. IndianOil’s premium grade petrol with 100 Octane is designed to rev up the engine, give faster acceleration, significantly boost engine performance, give better drivability, enhanced fuel economy and engine life. It exceeds IS-2796 specifications and is also an environment-friendly fuel with much-reduced tailpipe emissions.
High-end premium vehicles equipped with the latest technology are fully geared to reap the full-throttle benefits of 100 Octane petrol. Worldwide, 100 Octane petrol has a niche market for high-end vehicles that demand high performance and is available only in six countries such as Germany, USA to name a few.
XP-100 was launched by Mr. Ajay Kumar Shrivastava, General Manager (Retail Sales), Maharashtra, IndianOil and he said, “XP100 is an ultra-modern, ultra-premium product designed to feed your superbikes and Cars and thrill your senses.
It is the finest grade of petrol to give your vehicle higher power & performance and give you a delightful drive.” He also added that “in order to fulfill the aspirations of the well-heeled car aficionados, who drive the modern machines that reflect the engineering marvels of the automobile revolution and to match their high-performance beasts, IndianOil is leading the path to launch (the country’s first) a high performing and the ‘best-in-class ‘premium fuel.”
As in the country, IndianOil has become the first company in Vidarbha to launch XP100 the premium world-class petrol at M/s COCO RBI Nagpur that enhances the performance of high-end luxury cars and bikes. As of date, this Premium fuel is available only at COCO RBI Nagpur outlet.
A team of enthusiastic Harley-Davidson bikers welcomed the arrival of this premium fuel during the launch ceremony.
IndianOil has launched XP100 in 7 cities across the country. This fuel solution is being deployed with homegrown technology developed by IndianOil’s R&D centre. This is yet another step in the direction of Atmanirbhar Bharat initiative initiated by the Govt of India.
नागपूर : ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात आतापर्यंत ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली आहे. मात्र, त्यातील सुमारे १९ टक्के म्हणजेच २३ कंपन्यांनी अद्यापही पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यांच्याकडे एकूण २०९ कोटींची रक्कम अडकल्याची बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एमएडीसी’कडे विचारणा केली होती. ‘मिहान-सेझ’मध्ये किती कंपन्यांनी काम सुरू केले आहे, ज्यांना जागेचे वाटप झाले आहे, मात्र काम सुरू झालेले नाही अशा कंपन्यांवर काय कारवाई झाली तसेच ‘एमएडीसी’मध्ये किती रिक्त जागा आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.
सद्य:स्थितीत ‘मिहान’मध्ये ‘सेझ’ व ‘नॉन-सेझ’ मिळून ३२ कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय २० नव्या कंपन्यांनी जागा मिळावी यासाठी अर्ज केला आहे, अशीही माहिती देण्यात आली.
१५ कंपन्यांना बजावली नोटीस
जमीनवाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीतर्फे (एमएडीसी) १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यापैकी १२ कंपन्या ‘मिहान-सेझ’मधील असून, उर्वरित तीन कंपन्या ‘नॉन-सेझ’मधील आहेत.
‘पतंजली’चे काम ९० टक्के पूर्ण
‘पतंजली’ समूहाला जमीन देण्यावरून बराच वाद झाला होता. ‘पतंजली’च्या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा उभारली असून, खेळते भांडवल उभारण्याचे काम बँकेकडे अखेरच्या टप्प्यात आहे.
नवीन कामगार कायद्यांतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. हे कायदे लागू करून देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आराखडा अंतिम झाल्यामुळे कर्मचार्यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.
कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार
याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.
चार कामगार कायदे 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील
कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
4 कोडमध्ये 44 प्रकारचे जुने कोड
कामगार कायदे सुधारण्यासाठी मंत्रालयाने एकूण 44 प्रकारचे जुने कामगार कायदे चार कायद्यांमध्ये एकत्रित केले आहेत आणि अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. कामगार मंत्रालयाला हे कायदे एकाच वेळी राबवायचे आहेत.
सरकार पोर्टल तयार करतंय
पोर्टलबाबत चंद्र यांनी सांगितले की, पोर्टल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, ते जूनपर्यंत सुरू करता येईल. या पोर्टलवर अल्प मुदतीवरील कंत्राटे किंवा कामावर आधारित कामगार, बांधकाम कामगार व इतर राज्यांतून मजुरीसाठी येणार्या कामगारांची माहिती संकलित केली जाईल. यावर अशा मजुरांच्या नोंदणीची सुविधा असेल. त्यांना एक वर्षासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येईल. कामगार ब्युरो चार नवीन सर्वेक्षण करणार असून, कामगार, घरगुती कामगार, व्यावसायिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्या परिवहन क्षेत्राद्वारे मिळणार्या रोजगाराशी संबंधित, असेही चंद्र यांनी सांगितले. ब्यूरो आस्थापनांवर आधारित अखिल भारतीय रोजगार सर्वेक्षण सुरू करेल.
10 वी आणि 12 वीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा द्यावी लागणार आहे.
कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण न शिकवता आल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला. मात्र, 10 वी आणि 12 वीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम पकातीचा निर्णय लागू होणार नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल,मे महिन्यात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावेळी रिपीटर आणि श्रेणीसुधारसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी परीक्षा देता येईल. मात्र, या विद्यार्थ्यांना 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा लाभ दिला जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांना 100 टक्के म्हणजेच पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे.
कारोना माहामरीमुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. देशात तसेच राज्यात सर्व शाळा, माहविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. तसेच, तास न झाल्यामुळे शिक्षकांना पूर्ण अभ्यासक्रमही शिकवता आला नाही. हा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेतला होता.
या तारखेला परीक्षा होणार:
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. 12 वी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल आणि 10 वी परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, हीच सवलत रिपीटर आणि श्रेणीवाढीसाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, या विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही ही सवलत मिळावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.
Veteran fast bowler Ishant Sharma on Monday became the sixth Indian and third pacer from the country to take 300 wickets in Test cricket, joining legends such as Kapil Dev and Anil Kumble.
Ishant Sharma reached the landmark when he trapped Dan Lawrence with a delivery that swung back sharply before hitting his pads in England’s second innings on the fourth day of the opening Test here.
Besides Kumble and Kapil, Ravichandran Ashwin, Harbhajan Singh, and Zaheer Khan are the other bowlers from the country who have reached the landmark.
The 32-year-old Sharma reached the milestone in 98 matches, more than the other Indian bowlers in the club.
Ashwin was the fastest to get there, taking only 54 matches, followed by Kumble (66), Harbhajan (72), Kapil (83) and Zaheer (89).
Ishant made his Test debut back in 2007 against Bangladesh.
महाराष्ट्रातनुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान, उद्भवलेल्या वादामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी करत, कुटुंबियांनी शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केले.
18 जानेवारी रोजी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोमल सिंग राजपूत यांच्या गटाचा विजय झाला. त्यांच्या विरोधात पराभूत झालेल्या गटातील संतोष पाटील यांना राग अनावर झाला. संतोष यांनी त्यांच्या इतर 22 साथीदारांसह कोमल सिंग राजपूत यांच्यासह काही विजयी सदस्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. झालेल्या मारहाणीत कोमल सिंग राजपूत यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चाळीसगावमधील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली आणि त्यामुळेच सहा दिवसांपूर्वी धुळ्यातील श्रद्धा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथूनही हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना हलवण्यात आले.
रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी धुळ्याच्या शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, अमर पाटील, राजेंद्र पाटील, केतन पाटील, मंगल पाटील, विजयसिंह पाटील, लखन पाटील, अरुण पाटील, देवराज पाटील या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना, आरोपींवर आधीच 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून, शवविच्छेदन गृहाचा अहवाल प्राप्त होताच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करणार आहे, असे मेहुणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले.
सोलापूर:सांगोला तालुक्यात स्वेटरची लेस लाकडी खुंटीला बांधून खेळत असताना गळफास लागल्याने नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सोहम नागनाथ शेंडे, असे बालकाचे नाव आहे. हि घटना न तालुक्यातील अचकदाणी या गावात ही घटना घडली. अचकदाणी येथे नवनाथ शेंडे हे आपल्या पत्नी, मुलगा, मुलगी, आजी यांच्या सोबत राहतात. पती-पत्नी शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोहम हा इयत्ता तिसरीमध्ये शिकतो, तर मुलगी पाचवीमध्ये आहे.
नवनाथ हे शेतीच्या कामानिमित्त पिसेवाडी येथे गेले होते, तर पत्नी या मजुरीसाठी गेल्या होत्या. सोहमची बहीणही बाहेर गेली होती. सोहम टीव्ही पहात स्वेटरची लेस लाकडी खुंट्याला बांधून गोल गोल फिरत होता. दरम्यान लेस खुंठीत अडकल्यामुळे अनावधानाने त्याला गळफास लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला. आजी घरात गेल्या असता त्यांना सोहम खुंटीला लटकलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी शेजारी असलेल्या महादेव शेंडे यांनी धाव घेतली व नवनाथ शेंडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली.
Nagpur University Cancels BSc Fourth Semester Maths 1 Exam As Gondia College Clerk Leaks Paper Online
नागपूर : राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आले होते. परीक्षा कशा घ्यायचा, याचा निर्णय विद्यापीठांना घ्यायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
नागपूर विद्यापीठाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने विद्यापीठाचा कशा पद्धतीने विकास करता येईल व किती निधीची आवश्यकता लागेल यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हेदेखील त्या समितीत असतील. शतकपूर्ती वर्षादरम्यान शासनाकडून विद्यापीठाला निधी देण्यात येईल व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह आ. नागो गाणार, आ. समीर मेघे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, आ. अभिजीत वंजारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे, सीईटी आयुक्त डॉ. चिंतामण जोशी, डॉ. शालिनी इंगोले, उपसचिव सतीश तिडके, अजित बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.
दीड हजाराहून अधिक तक्रारींचे निवारण
उच्च व तंत्र मंत्रालय @ नागपूर या कार्यक्रमादरम्यान २ हजार २७२ प्रलंबित तक्रारींपैकी १ हजार ६१७ तक्रारींचे निवारण करण्यात आले. याची टक्केवारी ७१ टक्के इतकी होती. यात शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचा समावेश होता. देशपांडे सभागृहात नोंदणी करून व ऑनलाईन पद्धतीने निवेदन स्वीकारण्यात आली होती. टोकन पद्धतीने तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये दोन नियुक्ती आदेश देण्यात आले. ३४२ प्रकरणे प्रलंबित असून ३०९ प्रकरणांत त्रुटी दिसून आल्या.
‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा
कार्यक्रमादरम्यान ‘कोरोना’संदर्भातील कुठलीही खबरदारी दिसून आली नाही. अनेक जण बिना मास्कचे आले होते. मंचावरदेखील ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला होता. अनेक आमदार, अधिकारी एकमेकांच्या अगदी जवळ बसले होते. शिवाय संघटनांचे प्रतिनिधी घोळक्यानेच मंत्र्यांशी संवाद साधताना दिसून आले. पत्रपरिषदेच्या ठिकाणी तर पत्रकारांपेक्षा इतरांची अक्षरश: दाटीवाटीने गर्दी झाली होती. एकाही अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्याने अशा लोकांना टोकले नाही. शिक्षणाशी संबंधित विभागाच्या कार्यक्रमात असा प्रकार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
HCL Technologies Ltd (HCL), a leading global technology company, today announced its plans to hire over 1000 freshers and experienced professionals at the HCL campus in MIHAN, Nagpur.
This will be a great opportunity for college freshers and working professionals with the desired skills and experience to apply for open job positions.
HCL’s 50-acre campus in MIHAN has been operational since April 2018 with nearly 2,000 employees. The center is now part of elite league of Platinum certificated campuses across the world by the United States Green building council (USGBC).
The HCL Nagpur center is in sync with HCL’s philosophy to create and operate a state-of-the-art global IT development center; recruit, train and employ local talent and create sustainable ecosystems for them. HCL Nagpur focuses on Engineering and R&D services (ERS), Application Development and Infrastructure Management Services line of business
HCL Nagpur’s ‘come back home’ campaign, reaches out to talent from Nagpur and encourages them to come back home to exciting careers in ERS, Application and Infrastructure Management Services. The “stay rooted” campaign focuses on creating global opportunities for graduates in their own city and reaches out to freshers with new opportunities.
HCL offers best-in-class skill-based training programs for entry-level job roles. Candidates interested to kick-start their IT career with HCL can apply for its training & hiring programs. HCL offers training programs for students who have completed Class XII, Science Graduates and Engineering Graduates as well as Post Graduates.
HCL employees have access to one of its kind benefits program called the HCL Benefit box. As part of this program, HCL employees have access to healthcare facilities for employees and their family members; education benefits for employee children besides a host of discounts and offerings available to employees as part of the amenities program.
Experienced Professionals can join HCL with 2-20 Years of Experience in key technologies including Java, .Net, Salesforce, Mulesoft, PLM, Automation testing, End-User computing, Data Centre operations, leadership roles like service delivery manager, operations manager, project and program managers. Interested candidate can send their resumes to [email protected]
Quote from Ms. Srimathi Shivashankar, Corporate Vice President, HCL Technologies
HCL’s ‘New Vistas’ initiative provides talent in India with innovative opportunities and platforms that will empower them with the necessary skills needed to play crucial roles in the technology landscape. At HCL Technologies, our core values of Courage and Care inspire us to Collaborate in the spirit of optimism toward a sustainable future. In the last four years, our centers in New Vistas locations like Madurai, Lucknow, Nagpur and Vijayawada have nurtured and hired over 15,000 candidates who are now an integral part of HCL Technologies.
Nagpur: A major fire broke out at Ambazari Biodiversity Park, Amravati Road on Wednesday afternoon reducing grass and trees to ashes in 50 hectares area. The fire broke out at the back side of the RTM Nagpur University administrative building. It was noticed by some commuters. As soon as the officials of Fire and Emergency Services Department of Nagpur Municipal corporation (NMC) received the information regarding the blaze at 1.12 pm, three fire tenders rushed to the spot.
The fire started from the Northeast part of the park and spread across southwest part. Due to dry grassland and heavy winds, the fire spread rapidly. Three more fire tenders were pressed into service by NMC. Along with this one fire tender each from Wadi Municipal Council MIDC fire brigade also rushed to the spot for assistance. Deputy Conservator of Forest Prabhunath Shukla informed that plastic bags and other garbage were the reason behind this massive fire that destroyed vegetation in the Ambazari Biodiversity Park. Different species of snake, birds, porcupine, jackal, deer etc. are dwelling inside the park. There is no loss of animal life registered in this incident, said Prabhunath Shukla. The firemen had to battle hard to get control over the fire.
Due to the uneven terrain and being a jungle full of grass and trees the movement of fire vehicles was restricted. It took six and half hours to get control over the fire, informed R. D. Uchake, Chief Fire Officer, Fire and Emergency Services Department, NMC. Ambazari Biodiversity Park has grassland with bushes, shrubs and trees. Forest department has developed the area to enjoy company of nature and viewing different birds in the surrounding. At present the park is open through MIDC Hingna main gate for nature lovers.
The park is famous for migratory birds during winters and bird lovers visit the spot regularly for photography and bird watching. The 750 hectares biodiversity park is maintained by Joint Forest Management Committee (JFMC). This two-year-old park is providing a chance for nature trail to people of Nagpur in the city limits. The park has the facility of bicycle ride, walking track, and e-rickshaw safari for nature lovers. Last year in the month of May, a huge tract of vegetation in the park was gutted in a fire incident. Many birds in park also lost lives in that fire. The fire was fought under the command and control of station officer Tushar Barate, Bhagwan Wagh and station officer Rajendra Dube.
The delivery of the Tejas LCA to the IAF will begin from March 2024 and around 16 aircraft will be rolled out annually till the completion of the total supply of 83 jets, said HAL MD, R Madhavan
THE Government on Wednesday formally sealed the Rs 48,000 crore deal to procure 83 Tejas LCA from State-run aerospace behemoth Hindustan Aeronautics Ltd, a deal described by the Government as ‘biggest’ Make- In-India defence contract. The contract was handed over by Director General (Acquisition), Ministry of Defence, V L Kantha Rao to Chairman and Managing Director of HAL, R Madhavan, at the inaugural ceremony of Aero India-2021, the country’s premier Defence and Aerospace show, here, in the presence of Defence Minister Rajnath Singh. “I am very happy that HAL has got the orders for development of 83 new indigenous LCA (light combat aircraft) Tejas MK1A from Indian Air Force valued at more than Rs 48,000 crore.”
“It is probably the biggest Make in India Defence contract till date,” Singh said. Tejas, manufactured by the HAL, is a single engine and highly agile multi-role supersonic fighter aircraft capable of operating in high-threat air environments. The Cabinet Committee on Security (CCS) chaired by Prime Minister Narendra Modi last month approved the procurement of 73 Tejas Mk-IA variant and 10 LCA Tejas Mk-I trainer aircraft from the HAL to boost IAF’s combat prowess. According to Madhavan, the delivery of the Tejas LCA to the IAF under the Rs 48,000-crore deal will begin from March 2024 and around 16 aircraft will be rolled out annually till the completion of the total supply of 83 jets. Prepared to defeat any misadventures to defend territorial integrity: Rajnath: INDIA is vigilant in the face of attempts to change status quo at its border and prepared to defeat any misadventures to defend territorial integrity, Defence Minister Rajnath Singh said on Wednesday, amid continued military stand-off with China.
“We have long witnessed unfortunate attempts to employ force to change the status quo at our unresolved borders”, Singh said at the inaugural ceremony of Aero India-2021, the country’s premier Defence and aerospace show, at Yelahanka Air Force Station here. “India is vigilant and prepared to counter and defeat any misadventures to defend our people and territorial integrity at all costs”, the Minister said. Singh also said that India plans to spend USD 130 billion on Defence modernisation in the next seven to eight years with focus on domestic manufacturing of bigger and complex platforms. The government has since 2014 brought in many reforms in defence sector to create a conducive ecosystem for exports, Foreign Direct Investment and offset discharge, he noted.
To achieve the twin goals of self-reliance and exports, the Government has set a target to achieve a turnover of Rs 1,75,000 crore in the field of Defence manufacturing, including export of Rs 35,000 crore in Aerospace and Defence goods and services, by 2024, Singh said. “We plan to spend USD 130 billion on Defence modernisation in the next seven to eight years”, he added. Like many of our friendly countries India also faces threats and challenges emanating from multiple fronts, the Union Minister said adding that the country was a “victim of state-sponsored and state inflicted terrorism which is now a global threat”. The Government has taken many steps to strengthen the country’s security apparatus recently. Domestic manufacturing of bigger and complex defence platforms has now become the focus of our policy under the Aatmanirbhar Bharat Abhiyaan. Singh said he has been informed that about 540 exhibitors including 80 foreign companies, Defence Ministers, Delegates, Service chiefs and officials from more than 55 nations are participating in the event. “It reflects the growing optimism of the global community”, he said.
नवी दिल्लीः लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. परंतु, या हेल्पलाइनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाइनवर फोन करताना अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना भेटायचे आहे. अनेकांना काही सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असल्यास या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आहे. तुम्ही मोदींच्या अधिकृतअकाउंटवरून तुम्ही तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट्स
www.facebook.com/narendramodi
twitter.com/narendramodi
https://plus.google.com/+NarendraModi,
https://www.youtube.com/user/narendramodi
https://www.instagram.com/narendramodi हे आहेत. https://www.mygov.in/home/61/discuss/ या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अॅप (नमो अॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.
ईमेल: ईमेल द्वारे तुम्ही पीएमपर्यंत पोहोचू शकतात. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला [email protected] वर मेल करू शकता किंवा [email protected] वर ईमेल पाठवू शकता.
पत्ता : जर तुम्हाला वरील सर्व प्रकारात काही अडचण येत असेल तर तुम्ही पीएम यांना पत्र लिहू शकता. वेब इनफॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011. या पत्त्यावर पत्र पाठवू शकता.
फोन नंबर किंवा फॅक्स: जर तुम्हाला फोन नंबर किंवा फॅक्स करायचा असेल तर 011-23015603, 11-23018939, 011-23018668 वर फोन करु शकता किंवा +91-11-23019545 या 23016857 वर फॅक्स करू शकता.
Mumbai’s local trains are considered to be the city’s lifeline, ferrying lakhs of commuters between different ends of the Maximum City every day. Now, a photograph going viral online has captured the significance that local trains hold for lakhs of Mumbai residents. The photographs show a man bowing down before a train as services resumed after months on February 1.
The suburban train services were suspended at midnight on March 22 last year due to the COVID-19 outbreak. The suspension was the first in many decades – Mumbai’s local trains have run uninterrupted for years, aside from a few brief interruptions.
In 1974, both the suburban and long distance train services in Mumbai were stopped for around 20 days due to a trade union strike.
The photograph of the man bowing before a local train in a gesture of respect has gone viral on Twitter with thousands of ‘likes’ and reactions.
Mumbai-based industrialist Anand Mahindra shared it and wrote: “The soul of India… I pray we never lose it…”
“Only Mumbaikars will understand the beauty of this action,” author Devdutt Pattanaik said.
Ashok Kumar Verma, Divisional Railway Manager Bengaluru, confirmed that the photograph was taken at Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj Terminus and said that it captured why the Mumbai local trains are known as the city’s lifeline.
The photograph was reportedly taken by Sachin Vaidya – a photographer for the Shiv Sena mouthpiece Saamana. Other Twitter users also showered praise on the photographer for capturing the importance of local trains for Mumbaikars.
“Nothing can match Mumbai Locals. When you live paycheck to paycheck, the confidence a monthly/quarterly season pass gives you is priceless,” one Twitter user remarked.
“That’s how significant the famous Mumbai Local train is to a regular commuter. It is a lot more than just a lifeline, it is a deity,” another said.
After a gap of about 320 days, the Railways permitted all members of the general public to travel in local trains in Mumbai from Monday morning, though for limited hours. The general public is allowed to travel in the suburban trains from the time of the start of services for the day till 7 am, from 12 noon to 4 pm, and from 9 pm till the closure of services for the day.
Wardha: Thirty-eight workers were injured, six of them critically, after coming in contact with hot air and coal particles from a furnace at the Uttam Galva Metallics steel plant near Wardha on Wednesday, an official said.
Wardha District Collector Vivek Bhimanwar told PTI the injured workers were admitted to two nearby hospitals, while those in critical condition were shifted to Nagpur for further treatment.
An official statement said the furnace was shut on Tuesday evening for annual maintenance. At 5.30 a.m. on Tuesday, 50 workers were removing the fly ash from the furnace when some of them came in contact with hot air and coal particles, the statement said.
While 28 injured were taken to the Vinoba Bhave hospital at Savangi, 10 were shifted to the Kasturba hospital at Sevagram in Wardha, the statement said.
Six workers, who sustained over 40% burn injuries, were later shifted to an intensive care unit. Uttam Galva Metallics is located at Bhugaon village, 10km from Wardha town and is among the largest manufacturers of cold rolled steel and galvanised steel in western India.
The company is into the business of procuring hot rolled steel. In galvanised coils it specialises in making ultra thin sheets. Earlier this month, Nithia Capital, a U.K.-based alternative investment manager and CarVal Investors, a global alternative investment manager, announced the acquisition of Uttam Galva Metallics Limited and Uttam Value Steel Limited for ₹2,000 crore through Wardha Steel Holdings, Nithia Capital’s Singapore-based joint venture holding company.
नागपूर : अपघातात अकोटच्या एका तरुणाचा जबडा विस्कळीत झाला होता. त्यावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू होती. तेव्हाच अचानक वीज खंडित झाल्याने शस्त्रक्रिया खोळंबली. त्याचवेळी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनरेटरमध्ये डिझेलच नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे रुग्ण ३० मिनटे शस्त्रक्रिया टेबलावर ताटकळत होता, परंतु सुदैवाने डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नाने त्याचे प्राण वाचले.
सुनील अंबादास लटकुटे (२९) रा. आकोट असे रुग्णाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत फिटर आहे. तो १५ जानेवारीला मोवाला फाटा परिसरातून दुचाकीवर जात असताना त्याला चारचाकी वाहनाने धडक दिली. त्याला गंभीर अवस्थेत अकोलातील एका रुग्णालयात दाखल केले गेले. तीन दिवस उपचार केल्यावर त्याला नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात पाठवले गेले. तेथे प्रथम त्याचे एक्स-रे, सीटी स्कॅन काढल्यावर त्यात एकही फॅक्चर आढळला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्ण गंभीर नसल्याचे सांगत दाखल करण्यास नकार दिला. या गंभीर अवस्थेतही तो दोन दिवस थंडीत रुग्णालयाच्या बाहेर झोपला.
रुग्णासोबत त्याचा भाऊ अनिल लटकुटे होता. दोन दिवस रुग्णालयाच्या बाहेर झोपला असताना तो उलटी व इतरही त्रासाने त्रस्त असल्याने भाऊ वारंवार रुग्णाला डॉक्टरांकडे नेत होता. भावाच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याला दाखल करत पुन्हा त्याच्या काही चाचण्या केल्यावर त्याचा गुडघ्याचे हाड मोडल्याचे पुढे आले. त्यावर शस्त्रक्रिया केल्यावर त्याला सुटी दिली गेली. त्यानंतर तीन दिवस रुग्ण मेडिकलच्या बाहेर थंडीत ताटकळत राहिला. त्यानंतर त्याच्या जभड्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने तो विस्कळीत झाला होता.
त्यामुळे शासकीय दंत महाविद्यालयातील दंत शल्यक्रिया शास्त्र विभागाने त्याला सोमवारी दाखल करून घेतले. मंगळवारी त्याची शस्त्रक्रिया निश्चित झाली. त्याला शस्त्रक्रिया गृहात घेतल्यावर भूलीचे इंजेक्शन देत चिरा मारून शस्त्रक्रिया सुरू झाली. परंतु दुपारी दोन वाजता अचानक वीज पुरवठा खंडित झाला. शस्त्रक्रिया सुरू असताना वीज गेल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली. तातडीने जनरेटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु प्रशासनाने तब्बल सहा महिन्यापासून जनरेटरसाठी डिझेलच खरेदी केला नसल्याचा अक्षम्य प्रकार समोर आला.
त्यामुळे येथूनही वीज सुरू होणार नसल्याचे बघत तातडीने रुग्णाची प्रकृती खालवू नये म्हणून डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. दरम्यान एका डॉक्टरने खिशातून ५०० रुपये देऊन डिझेल मागवले. तातडीने एक कर्मचारी डिझेल घेऊन येईस्तोवर अर्ध्या तासाहून अधिक कालावधी लोटला. परंतु ३० मिनिटात वीज आल्यावर तातडीने ही जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी शिताफीने पूर्ण केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. परंतु या घटनेमुळे पुन्हा दंत रुग्णालयातील निष्क्रियतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे पुढे आले.
‘‘दंत रुग्णालयात शस्त्रक्रिया होणारा रुग्ण खूप गंभीर नसतो. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान, करोना काळात शस्त्रक्रिया जवळपास बंद असल्याने रुग्णांकडून प्रशासनाला उत्पन्न नसल्याने डिझेलसह इतर खरेदीवरही मर्यादा आल्या. तर या जनरेटरचे सेंसर खराब असल्याने त्यातील डिझेल संपल्याचे निदर्शनात आले नाही. परंतु वीज खंडित झाल्यावर तातडीने डिझेल खरेदी केल्यावर ३० मिनटांनी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. पुढे काळजी घेतली जाईल.’’ – डॉ. मंगेश फडनाईक, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
यवतमाळ : चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा भयंकर प्रकार घडला. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली.
1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटाझर पाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या मुलांना पोलिओचा डोस दिल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी हे गौडबंगाल समोर आलं. या प्रकरणी यवतमाळच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात. 2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या लसीकरण मोहिमेला यवतमाळमध्ये गालबोट लागलं आहे. तब्बल 12 मुलं पोलिओ लस घेतल्यानंतर त्रास झाला. या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तर या प्रकरणी कोणाची चूक आहे हे शोधून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार घडला तेव्हा आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
नागपूर : नागपूर शहर देशाचे हृदयस्थान आहे आणि या शहरातील तसेच या शहरात येणाऱ्या नागरिकांनी एकाच जागी रेल्वे, मेट्रो, रस्ते, हवाई मार्ग अशा एकिकृत अत्याधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी अजनी परिसरात इंटर मॉडेल स्टेशन हब तयार करण्यात येत असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाची आढावा बैठक आज नितीन गडकरी यांनी घेतली व त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.हा प्रकल्प एकूण २०० एकर जागेवर साकारणार असून यासाठी महामार्ग मंत्रालयातर्फे पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी कॉनकोर, मेडिकल कॉलेज, पीडब्ल्युडी, कारागृह तसेच एफसीआय आदी प्रतिष्ठानांच्या जागा अधिग्रहीत करण्यात येणार आहे. कारागृह प्रशासन आणि राज्य पीडब्ल्युडी या जागांसाठी राज्य शासनाला विनंती करुन जागेची मागणी नोंदविण्यात येणार आहे. या प्रकल्पात परिसरातील सर्व छोट्या रेस्टॉरेन्टला जागा देण्यात येईल तसेच ई-रिक्षा, एसटी, मध्यप्रदेश एसटी, शहर बस, मेट्रो, रेल्वे तसेच ब्रॉडगेज मेट्रो आदी सुविधा एकत्रितपणे साकारण्याचा मानस आहे. मेट्रो रिजनमुळे नागपूर शहराबाहेरील शेजारचे जिल्हे जोडले जातील आणि या छाट्या शहरांना सॅटेलाईट टाऊनचा दर्जा मिळेल असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रदुषणरहित साधनांच्या वापराला चालना देण्याचा मानस आहे. त्यासाठी एलएनजी, सीएनजी, चार्जिंग स्टेशन, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, छोटे लॉज आदी सुविधा राहणार आहेत.हा प्रकल्प साकारत असताना जुनी रेल्वे कॉलनी व रहिवासी कर्मचाऱ्यांच्या निवासाचा मुद्दा प्राधान्याने सोडविण्यात येईल. ती जागा अधिग्रहीत केल्यानंतर या कर्मचाऱ्यांची कॉलनी प्रथम बांधण्यात येईल, त्यांना विद्यमान सुविधांपेक्षा तिप्पट अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याच भागात असलेल्या वृक्षांची समस्या आहे पण यातील बहुतांश झाडे पुन्हा प्रत्यारोपित करण्यात येतील. काही झाडे याच परिसरात तर काही झाडे महामार्गावर जागा निश्चित करुन प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दोन टप्प्यात हे काम होणार असून पहिल्या टप्प्यात भूमि अधिग्रहण होईल त्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. यातून किमान १० हजार नवे रोजगा स्थानिक युवकांना उपलब्ध होणार आहेत. आगामी १५ वर्षाचा विचार करुन हे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. ४४ एकर जागेवर स्टेशन तयार होत असून हा संपूर्ण प्रकल्प ७०० एकर जागेत पसरलेला असेल. आगामी काळात बुलेट ट्रेन देखील येणार असून त्यासाठी देखील स्टेशन तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, आ. नागो गाणार, उपमहापौर मनीषा धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदी येथे लॉजिस्टीक्स हब
वर्धा मार्गावरील सदी रेल्वे येथे देशातील सर्वात मोठा लॉजिस्टीक्स हब साकारण्यात येणार असून कॉनकोर, एफसीआय यांचे गोडाऊन आणि मालवाहतूक सदी ड्रायपोर्टवरुन होईल. मिहानमधील हब केवळ हवाई कार्गोसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.चौकटमहाल सोडणार नाही, इलेक्ट्रीक वाहनाचा वापरनागपूर शहर प्रदुषणमुक्त रहावे यासाठी मी प्रथम सुरूवात करणार असून आजपासून मी डिझेलच्या वाहनाचा वापर बंद करीत असून यानंतर इलेक्ट्रीक वाहनाचा वापर करण्याचा तसेच केळीबाग रोड रुंदीकरणामुळे मी पश्चिम नागपुरात वास्तव्यास आहे पण महाल कधीच सोडणार नाही. लवकरच मी माझ्या घरी वास्तव्यास जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर: राजुरा शहरातील गजबजलेल्या नाका नंबर तीन चौकात केस कापण्यासाठी आलेल्या कोळसा व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी राजू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुत्रांच्या माहितीनुसार, दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी दुकानात जाऊन देशी कट्ट्याने यादव यांच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. गोळीबाराचा आवाज एकताच चौकातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग केला असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी एकाच गर्दी केली.
मृत राजू यादव (वय ४५) यांचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला आहे. राजुरा शहरात प्रथमच गोळीबार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आली असून आरोपी तेलंगणा राज्यात पळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नवी दिल्ली: दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अब्दुल कलाम मार्ग हा व्हीव्हीआयपी परिसर आहे. याठिकाणी अनेक देशांचे दुतावास आहेत. इस्रायली दुतावासाबाहेर हा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. सध्या पोलीस आणि सुरक्षायंत्रणा अब्दुल कलाम मार्गावर दाखल झाल्या असून तपासाला सुरुवात झाली आहे. या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ
आयईडी स्फोटकांचा वापर?
जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा अंदाज आहे. सध्या बॉम्बशोधक पथक आणि इतर तपासयंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू होता .
EXTERNAL Affairs Minister S Jaishankar on Thursday outlined eight principles to repair strained relations between India and China that included strict adherence to all agreements on border management, fully respecting the LAC, showing sensitivity to each other’s interests, and making peace and tranquility along the frontier basis for advancing overall ties.
He also mentioned three “mutuals — mutual respect, mutual sensitivity and mutual interests” as determining factors for the ties which, he said, came under “exceptional stress” following last year’s events in eastern Ladakh as he referred to China’s massing of troops in the region.
“Any expectation that they can be brushed aside, and that life can carry on undisturbed despite the situation at the border, that is simply not realistic,” he said delivering the keynote address at the 13th All India Conference of China Studies.
He said the India-China relationship is truly at a crossroads today and choices that are made will have profound repercussions, not just for the two nations but for the entire world.
In criticism of China, Jaishankar said the developments in eastern Ladakh have “profoundly disturbed” the ties because they not only signaled a “disregard” for commitments about minimizing troop levels but also showed a willingness to breach peace and tranquility.
“Significantly, to date, we have yet to receive a credible explanation for the change in China’s stance or reasons for the massing of troops in border areas. It is a different matter that our own forces have responded appropriately and held their own in very challenging circumstances,” he said.
“The issue before us is what the Chinese posture signals, how it evolves, and what implications it may have for the future of our ties,” Jaishankar added.
Giving a clear perspective of India’s approach in dealing with China, the Minister said the development of ties can only be based on “mutuality”, whether it is immediate concerns or more distant prospects.
Talking about the experience of the past, he said it showed the importance of stabilizing ties even while adjusting to changes.
“From that, we can seek proper guidance that will be to the benefit of both nations. These can be summed up by eight broad propositions. First and foremost, agreements already reached must be adhered to in their entirety, both in letter and spirit,” he said.
“Second, where handling of border areas is concerned, the Line of Actual Control (LAC) must be strictly observed and respected; any attempt to unilaterally change the status quo is completely unacceptable,” Jaishankar added.
Third, he said, peace and tranquility in border areas is the basis for the development of ties in other domains, noting if they are disturbed, so inevitably will be the rest of the relationship.
This, he said, is quite apart from the issue of progress in boundary negotiations.
“Fourth, while both nations are committed to a multi-polar world, there should be a recognition that a multi-polar Asia is one of its essential constituents.
Fifth, obviously each State will have its own interests, concerns and priorities; but sensitivity to them cannot be one-sided. At the end of the day, relationships between major states are reciprocal in nature,” Jaishankar said.
“Sixth, as rising powers, each will have their own set of aspirations and their pursuit too cannot be ignored.
Seventh, there will always be divergences and differences but their management is essential to our ties,” he said.
The last principle, he said is that civilizational States like India and China must always take the long view.
“Respecting the three mutuals and observing those eight principles that I spoke about will surely help us make the right decisions,” he said.
Referring to talks to resolve the stand-off, he said discussions were underway through various mechanisms on disengagement at border areas.
He said the advancement of ties in the last three decades was clearly predicated on ensuring that peace and tranquillity was not disturbed and that the LAC was both observed and respected by both sides.
“For this reason, it was explicitly agreed that the two countries would refrain from massing troops on their common border,” he said.
Jaishankar also talked about “events” before 2020 that reflected the “duality” of cooperation and competition while referring to blocking at the UN the listing of Pakistani terrorists involved in attacks on India as well as Beijing’s opposition to New Delhi’s membership of the Nuclear Suppliers Group (NSG) and for a permanent seat in the UNSC.
“We saw trade grow dramatically, though its one-sided nature made it increasingly controversial. In sectors like power and telecom, Chinese companies obtained access to Indian market,” he said.
Jaishankar said though common membership of plurilateral groups by India and China was a meeting point, yet, when it came to interests and aspirations, some divergences were apparent.
“You may recall the practice of stapled-visas; or the reluctance to deal with some of our military commands. Then there was China’s opposition to India’s membership of the NSG and to a permanent seat in the UNSC.
“When it came to trade, promises of market access did not match delivery. The blocking of UN listing of Pakistani terrorists involved in attacks on India had its own resonance. And of course, the violation of Indian sovereignty by the China-Pakistan Economic Corridor,” he said.
सोलापूर: स्वतःचा मुलगा, नातू आणि सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार वृद्ध महिलेने केलीय. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे यांच्यासह अन्य दोघांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी भंगरेवा यांचे पती महादेव बागदुरे यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यू पूर्वी महादेव बागदुरे यांनी आपल्या पत्नीचा नावे 70 लाख रुपयांची ठेव ठेवली होती. तसेच पत्नी आणि स्वत:च्या नावाने काढलेल्या जाँईट अकाऊंटमध्ये 20 लाख रुपये ठेवले होते. मात्र कोणत्याही समंतीविना मुलगा, नातू तसेच दोन सुना यांनी बनावट कागपत्रे तयार करून परस्पर सर्व ठेवी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तसेच 150 तोळ्याहून अधिकचे सोने, 50 तोळे चांदी आणि इतर मौल्यवान वस्तु, खतावणी तसेच काही कागदपत्रे देखील काढून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.
“नातू राकेश बागदुरे याने रात्री झोपलेले असताना उठवून माझी स्वाक्षरी घेतली. बँकेत असलेल्या पैशाच्या व्याजाची वाटणी करायची आहे असे मला सांगण्यात आले. त्यामुळे खोटे सांगून माझी फसवणुक करण्यात आली. तसेच जवळपास 150 तोळे सोने देखील काढून घेऊन सुनांनी स्वत:साठी दागिने बनवून घेतले आहेत.” असा आरोप तक्रारदार महिला भंगरेवा बागदुरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
तर फिर्यादी वृद्ध महिलेच्या पतीने ठेवी एका सहकारी पतसंस्थेत ठेवल्या होत्या. त्यामुळे फिर्य़ादीच्या समंतीविना पतसंस्थेने हे पैसे इतरांना कसे दिले या बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासानुसार बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन हे पैसे खात्यातून काढल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सखोल चौकशीनंतर अधिकची माहिती पुढे येईल अशी प्रतिक्रिया विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.
या प्रकरणात आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे, सून राजश्री बागदुरे, सून शारदा बागदुरे यांच्यासह राकेश याचा मित्र माशाळ आणि नातेवाईक शिवानंद नागणसुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांदवि कलम 394, 465, 467, 471, 420, 506, 34 या प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 6 आरोपींपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक देखील केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठीचे संसदीय सत्र आजपासून ( दि. २९ ) सुरु होत आहे. कोरोनामुळे या सत्रात सुरक्षेसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सभागृहात सादर करण्यात येणार आहे. हे अधिवेशन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. नव्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सध्या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. त्यातच २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. कोरोनाच्या कडक नियमांमुळे सामाजिक अंतर ठेऊनच हे अभिभाषण होणार आहे. यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्य हे तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसून हे अभिभाषण ऐकतील. मात्र केंद्र सरकारने नवे कृषी कायदे चर्चा न करता संमत केले आणि त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, याचा विरोध १७ विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहेत. ही माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी दिली.
दरम्यान, अधिवेशनासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. राज्यसभेच्या जवळपास १२०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आहे. त्यापैकी कोणाचीही चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही कोरोनाची चाचणी करुन घेतली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहचला असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले होते पण, ते अत्यंत कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते. हिवाळी अधिवेश तर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे संसदेच्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पावसाळी अधिवेशनात आठवड्याच्या सुट्टीतही संसद सुरु होती. पण, आता तसे होणार नाही. याचबरोबर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला होता. आता मात्र तो पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेश सुरु होण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यावेळी लोकसभेचे १७ सदस्य आणि राज्यसभेचे ८ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर १० दिवसांच्या सत्रात अनेकांना कोरोनाची लागण झाली होती.
नागपूर : मुंबईहून आलेले सेवाग्रामचे डबे यार्डात घेऊन जाताना इंजिनाची ६ चाके रूळावरून घसरली. ही घटना नागपूर- अजनी दरम्यान यार्डात घडली. रेल्वे रूळाशेजारी असलेल्या बॅटरी बॉक्सला इंजिन धडकले तर ‘ओएच’ खांब तुटले. स्थानिक गाड्यांची देखभाल आणि दुरूस्ती यार्डात केली जाते. नेहमीप्रमाणे मुंबईहून आलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसचे डबे सायंकाळच्या सुमारास अजनी यार्डात घेऊन नेले जात होते.
सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास नागपूर – अजनी यार्डादरम्यान हॉटेल हरदेवजवळील पुलावर अचानक इंजिनाची ६ चाके रूळाखाली आली. विशेष म्हणजे इंजिनाचा बहुतांश भाग रुळ सोडून बाहेर पडला. या घटनेमुळे रेल्वे रुळाशेजारील इंजिनाला वीज पुरवठा करणारे ‘ओएचईङ्क खांब तुटले. या शिवाय बॅटरी बॉक्सलाही धडक बसली. वीज पुरवठा करणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याने याचा प्रभाव मुख्य मार्गावरही झाला. यावेळी विदर्भ एक्स्प्रेसला थोडा उशिर झाला. ओएचई खांबाच्या दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडित करावा लागला. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर ओएचई खांबांची दुरूस्ती करण्यात कर्मचाèयांना यश मिळाले.
माहिती मिळताच मदत वाहन आणि कर्मचाèयांनी घटनास्थळी धाव घेतली. ओएचई खांबाची दुरूस्ती झाल्यानंतर इंजिनाला रूळावर घेण्यासाठी बराच वेळ लागणार होता. मात्र, अनुभवी कर्मचाèयांनी कौशल्य दाखविल्याने अवघ्या पाच मिनिटात इंजिन रूळावर घेता आले. वरिष्ठ अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरळीत करण्यात आले.
पुरस्काराने सन्मानित
इंजिनाची चाके रुळाखाली आल्यानंतर इंजिनाला पुन्हा रूळावर घेण्यासाठी बराच वेळ लागतो. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि वेगवेगळ्या यंत्रांची गरज भासते. मात्र, एआरटी कर्मचारी गणेश रामदीप यांनी अनुभव आणि कौशल्य दाखविले. रूळाजवळ पडलेल्या लोखंडी तुकड्यांना ठिकठिकाणी जोडून ठेवले (खेळण्यांप्रमाणे) त्यावर चाके येताच क्षणात इंजिनाला रेल्वे रूळावर ओढले. या कौशल्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृषी ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त व्हावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, लघुदाब वाहिनी, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) किंवा सौरऊर्जेद्वारे कृषीपंपांना वीजजोड देण्याबरोबरच कृषी ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीत मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे नियमित विजबील भरणाऱ्या आणि यापूर्वीची थकबाकी असणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विविध टप्प्यांतर्गत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची सवलत या योजनेमुळे राज्यातील ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.
सौर कृषीपंप देणार
शिवजयंतीपर्यंत अर्थात १९ फेब्रुवारीपर्यंत १० हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. तसेच काही कारणास्तव वीजजोडणीची मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजजोडणी देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे वीजचोरी होत होती. हे वास्तव लक्षात घेऊन या सुमारे ४.८५ लाख अनधिकृत कृषी पंप वीजजोडण्या अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून येत्या २ महिन्यांत सर्वच अनधिकृत कृषी पंप वीजजोडण्या अधिकृत करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत, असेही डॉ. राऊत म्हणाले.
‘सौरऊर्जा वापराला गती’
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, शेतीसाठी सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणे ही अत्यंत योग्य भूमिका असून या धोरणामुळे कृषीपंपांसाठी सौरऊर्जेच्या वापराला गती मिळेल. शेतीप्रमाणेच उद्योग हे राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असून उद्योगांनाही स्पर्धात्मक व वाजवी दराने वीज दिली पाहिजे. मुक्त बाजारपेठेतून वीज घेणाऱ्या उद्योगांना स्थीर आकारात सवलत मिळावी, अशी भूमिकाही देसाई यांनी मांडली.
देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममधून त्याचे उद्घाटन झाले. हे सांगण्याचे कारण म्हणजे, आपल्या देशात डिजिटल प्रणालीचा वेगाने होणारा प्रचार-प्रसार, विविध क्षेत्रात झालेली डिजिटल इंडियाची प्रगती यावरुन ‘अवघे जग मुठीत’ आले आहे.
आज डिजिटल इंडियात एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. विविध सुविधा एका छता खाली येण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यामुळे देशात डिजिटल प्रणालीचा वेगवान प्रभाव दिसू लागला आहे. आपल्या देशात मतदानाला फार मोठे महत्व प्राप्त आहे. देशात सर्वात गरीब आणि श्रीमंत व्यक्तीला देखील तितकाच मतदानाचा समान हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. त्यामुळे आपल्या मतदान प्रक्रियेत वारंवार बदल करुन सरकारकडून विश्वासहर्ता जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या डिजिटल इंडियात ओळख पत्र (वोटर कार्ड) आता स्मार्ट होताना दिसत असून मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करता येऊ शकते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये (पीडीएफ) मुद्रित केले जाऊ शकते. याचा प्रभाव आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स डिजिटल मोडमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे या स्मार्ट प्रणालीचा उपयोग लाभदायक ठरणार आहे.
आयोगाने, आता वोटर कार्डसुद्धा डिजिटल मोडमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाइलमध्ये वोटर कार्ड डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात मिळणार असून पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ ते ३१ जानेवारी दरम्यान केवळ नवीन मतदारांनी ही डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा, त्याशिवाय या प्रणालीचा वापर करता येणार नाही. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतात. यासाठी सुद्धा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट सोबत रजिस्टर असायला हवा. हे काम तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन करू शकतात, तसे केल्यास तत्काळ त्याचा रिझल्ट शक्य आहे.
महत्वाचे : वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल ॲप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये ॲप नसेल तर तो ॲप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफमध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल, त्यामुळे आपले कार्ड सुरक्षित राहण्यास ही मदत होणार आहे.
नागपूर : आरोपीने मुलीला निर्वस्त्र करून तिच्या छातीला स्पर्श केला नाही, त्यामुळे ही कृती पोस्को कायद्यातील लैंगिक अत्याचारात मोडत नाही, या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निर्णयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी हा वादग्रस्त निर्णय दिला होता. या निर्णयावर देशभरातून आक्षेप घेतले जात आहेत. याप्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वातील न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली.
अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नागपूर खंडपीठाच्या या वादग्रस्त निर्णयाकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. तसेच हा वादग्रस्त निष्कर्ष अतिशय धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने वेणुगोपाल यांना या निर्णयाविरुद्ध कायद्यानुसार याचिका दाखल करण्याची परवागनी देऊन या वादग्रस्त निर्णयावर स्थगिती दिली. तसेच याप्रकरणातील आरोपी सतीश बंडू रगडे (39) याला नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.
असे आहे प्रकरण-
आरोपी सतीश बंडू रगडे नागपूरमधील गिट्टीखदान येथील रहिवासी असून, त्याला विशेष सत्र न्यायालयाने 5 फेब्रुवारी 2020 रोजी लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियममधील (पोक्सो) कलम 8 अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही आरोपीची कमाल शिक्षा होती. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून त्याला भादंविच्या कलम 354 (विनयभंग) अंतर्गत दोषी ठरवले व एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने मुलीला निर्वस्त्र करून तिच्या छातीला स्पर्श केला नसल्याने, ही कृती पोक्सो कायद्यातील लैंगिक अत्याचाराच्या व्या‘येत मोडत नाही, असा निष्कर्ष या निर्णयात नोंदवण्यात आला होता.
मुंबई: सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात १० ग्रॅम (१ तोळं) सोन्यामागे ३३० रुपयांची घसरण झाली असून ४८,००० रुपये इतका भाव झाला आहे.
Good Returns वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४८,००० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४९,३३० रुपये मोजावे लागतील. २६ आणि २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले होते.
गेल्या आठवड्यात २३ जानेवारीला प्रति १० ग्रॅम सोन्यामागे २३० रुपयांची घट झाली होती. त्यानंतर आज जानेवारी महिन्यातील सर्वाधिक ३३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर
मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्यासाठी ४८ हजार रुपये मोजावे लागतील. तर देशात बंगळुरू, केरळ आणि हैदराबादमध्ये सर्वात कमी ४५,७५० रुपये इतका दर नोंदविण्यात आला.
Valentine’s Day also known as Saint Valentine’s Day or the Feast of Saint Valentine. It began as a day of Western Christian celebration honoring 1 or 2 early Christian martyrs named Santa Valentine and is known as an important cultural, religious, and commercial celebration of love and affection in many parts of the world.
Valentine’s day is the day of Love and Friendship. Valentine’s day is celebrated on 14th February, it’s very popular for celebrating the love between couples and their loved ones. Valentine’s day is a special day for couples and lovers to express their feeling of love and affection, it is for everyone girlfriend boyfriend, husband, wife friends and family. On this day lovers give gifts, flowers, chocolates to their loved ones. We share some best messages and wishes to express your feeling on valentine’s day
I’ve fallen in love many times… Always with you. Happy Valentine’s Day
My love for you sets my heart on fire and makes each day of my life so special. Happy Valentine’s day!
You mean so much to me. You know you drive me crazy! I want you for my Valentine!
There’s nobody else in this world that my heart loves more than you and that my soul cherishes more than you.
Happy Valentine’s day to a special person who fills my life with sweetness and love that cannot be measured. You’ll always have a special place in my heart.
When the world seems more beautiful, and life even more worth living, I find I’ve been thinking of you.
A Hundred Hearts would be too few to carry all my Love for you. Happy Valentine’s day.
I truly love you from my heart. No one can ever make us apart. I love you a lot.
I want to grow old with you and be able to say that I have lived an amazing life with you.
I knew that I loved you the very first time that I looked into your eyes. You made me happy ever since that first time that I say you. Happy Valentine’s Day!
You are the love of my life, you are the smile on lips, you are my Valentine. Happy Valentine’s Day, My love!
Your love is stirred up in my heart every now and then I wonder how it’s never depreciated for a very long time. I can’t imagine living without you
You’re my soulmate and my sidekick, Thanks for being by my side! I Love You! Happy Valentine’s day!
My love for you sets my heart on fire and makes each day of my life so special… Happy Valentine’s Day!
Anyone can catch your eye, but it takes some special to catch your heart. Happy Valentin’s Day
Happy Valentine’s Day to the sweetest Valentine I could want. You are my sweetheart, and I am glad you’re mine.
My heart is locked away and you have the key. I am all yours, my valentine.
I promise to be by your side forever and for always. I love you. Nothing can do us apart.
If love is a serious mental disease, I’m completely out of my mind.
Whether we’re celebrating together or miles apart my heart belongs to you, now and forever. Happy Valentine’s Day!
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...