मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलनाऐवजी जनतेत जा, सहानुभूती मिळेल

Date:

नागपूर : वर्धा – ‘ईव्हीएम’ विरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याच मुद्द्यावरून विरोधकांना जोरदार चिमटा काढला. ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलन करण्याऐवजी जनतेत जावं. आम्ही ही कामं करू शकलो नाही. भविष्यात ती पूर्ण करू असं सांगितलं तरी, जनतेकडून तुम्हाला किमान सहानुभूती मिळेल, असा टोला त्यांनी लगावला. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट केली तरी, काही फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस वर्धा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळमुक्ती हे आमचे यापुढील ध्येय असेल. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत केलेली कामे जनतेला सांगत आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. ईव्हीएमवर अविश्वास दाखवणं म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे असं सांगतानाच या मुद्यावर विरोधकांची एकजूट होऊन काही फरक पडणार नाही, असं ते म्हणाले. ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याऐवजी त्यांनी जनतेत जावं. आम्हाला कामं करता आली नाहीत, भविष्यात ती करू असं सांगितलं तरी जनतेकडून तुम्हाला सहानुभूती मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

“कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी काही पक्ष त्यांना शपथा देताहेत, पण शपथ घेणारे तरी राहतील का?”
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

जागावाटपात अडचणी निश्चित आहेत. दोघांचेही नुकसान होईल. पण एकत्र येऊन लढायचे ठरवले की, काही गोष्टी सोडाव्या लागतात, असं सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला अभूतपूर्व विजय मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा : नितीन गडकरींना सोलापूर विद्यापीठाच्या जाहीर कार्यक्रमात भोवळ

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...