महाजनादेश नाहीच; फडणवीसांची खुर्ची धोक्यात?

Date:

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार, हे निश्चित झाले असले तरी आतापर्यंतच्या निकालांचा वेध घेतल्यास भाजप शंभरच्या आत अडखळली असून हाच ट्रेण्ड कायम राहिल्यास सत्तेचं सूत्र पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यातूनच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का?, सत्तेत समान वाटा मिळावा, असा रेटा लावून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, हा फॉर्म्युला शिवसेना भाजपपुढे ठेवणार का? आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचं शिवसेनेचं स्वप्न पूर्ण होणार का?, असे अनेक प्रश्न चर्चिले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवरील निर्णायक आघाडी आता समोर आली आहे. त्यात भाजप ९९, शिवसेना ५७, राष्ट्रवादी काँग्रेस ५७, काँग्रेस ४५ आणि अन्य ३० असे संख्याबळ आहे. यात दोन-चार जागा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. त्याअनुशंगाने २०१४च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल व यंदाचे निकाल पाहिल्यास भाजपला सर्वाधिक फटका बसेल, असे दिसत आहे. गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.

भाजपने गेल्यावेळी निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली होती तर यावेळी ही निवडणूक खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती. निवडणुकीआधी फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढून सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत नेण्याचे काम केले होते. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावर बोट ठेवत भाजपला मोठा महाजनादेश मिळेल, असे दावे करण्यात येत होते. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी स्थिती असेल तसेच महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असेही काही नेते सांगत होते. मात्र, हे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. त्यामुळेच जसजसे निकाल स्पष्ट होत आहेत तसतसा भाजप नेत्यांचा सूर नरम होताना दिसत आहे.

भाजपचा आकडा कमी होतोय आणि शिवसेना गेल्यावेळच्या संख्याबळाच्या जवळपास पोहचतेय हे चित्र असल्याने शिवसेनेच्या आवाजाला नवी धार चढू लागली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे व आमचं ठरलंय, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केलं होतं. त्याचं स्मरणंही राऊत पुन्हा करून देत आहेत. त्यामुळेच पुन्हा सत्ता युतीचीच असेल हे स्पष्ट असलं तरी सत्तेचं सूत्र मात्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, असे संकेत मिळत असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत खल सुरू झाला आहे.

राज्यात भाजपची झालेली घसरण हे फडणवीस यांचं अपयश असल्याचा सुप्त सूर भाजपमधील दुखावलेले निष्ठावंत नेते काढू लागले आहेत. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्यास फडणवीस यांच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना ठाम राहिल्यास भाजपची चांगलीच गोची होणार आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...