विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास

Date:

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच संघाबाबत थेट अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मुद्यावर राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठाने नुकतेच नवीन अभ्यासक्रम तयार केले. त्यात इतिहास अभ्यास मंडळाने बी.ए. पदवी दुसऱ्या वर्षाच्या भारताचा इतिहास १८८५ ते १९४७ या कालखंडाच्या तिसऱ्या घटकात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका’ या विषयाचा समावेश केला आहे. या पुस्तकाच्या पहिल्या घटकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, मवाळ राजकारणाचे स्वरूप १८८५ ते १९०५, जहालवाद्यांचा उदय आणि विकास १९०५ ते १९२० तर दुसऱ्या घटकात असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चलेजाव चळवळ या तीन आंदोलनांचा समावेश आहे. तर तिसऱ्या घटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन योजना, व चौथ्या घटकात सुभाषचंद्र बोस, माऊंटबॅटन योजना आणि स्वतंत्र भारताचा कायदा अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत विद्यापीठ शिक्षण मंचाचा वरचष्मा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मानव संसाधन विकासमंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी देशभरात शिक्षणाचे भगवेकरण करण्यात येत असल्याचा वाद निर्माण झाला होता. तर आता थेट विद्यापीठांच्या अभ्यास मंडळामार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणातील भूमिका असा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे त्यावर राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात २७ सप्टेंबर १९२५ रोजी झाली होती. तेव्हापासून संघ अव्याहतपणे कार्य करीत आहे. त्यामुळे बी.ए.च्या इतिहासात संघ स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात झालेल्या विविध घटना, घडामोडी यांचा उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. संघाने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला नसल्याचे राजकीय स्तरावर आरोप करण्यात येतात. त्या आरोपांना उत्तर म्हणून अभ्यासक्रमातच संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका हा विषय आणण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतिहास अभ्यास मंडळाने नेमके काय घेतले ते बघावे लागेल. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना गेल्या ९५ वर्षापासून देशात सक्रीय आहे. त्या संघटनेबाबत अभ्यासक्रमात वस्तूनिष्ठ माहिती असेल तर त्यात अडचण असायला नको. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपण इतर संघटनांचा इतिहास वाचतोय, तर संघाचा इतिहासही विद्यार्थ्यांना कळावा या उद्देशाने अभ्यास मंडळाने निर्णय घेतला असावा, असे शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे म्हणाल्या.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...