देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली…

Date:

मुंबई: कोरोना प्रादुर्भावानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले करण्याचे काम केले जात असून, यामुळे राज्याचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत, हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणतात की, बांधकाम जगताला उभारी देण्यासाठी काय उपाय करता येतील, यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेत एका समितीने काही शिफारशी राज्य सरकारला केल्या होत्या. पण त्यातील काही निवडक आणि सोयीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे. असे करताना त्याचा परिणाम काय होईल, याचा कुठलाही विचार केला गेला नाही. राज्याच्या तिजोरीला फटका बसून काही निवडक लोकांनाच त्याचा लाभ होईल, अशा पद्धतीने काही लोक काम करीत आहेत.

मुद्रांक शुल्कातील सवलत, रेडीरेकनर दर आणि प्रीमियम या काही आवश्यक बाबी आहेत. त्याचा केवळ मूठभर लोकांनाच लाभ होणार नाही, हेही सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणण्यात आला होता. मात्र, तो पुढच्या बैठकीपर्यंत थांबविण्यात आला. केवळ पाच विकासकांच्या प्रस्तावांचा जरी विचार केला, तरी त्यांना दोन हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

या विकासकांची अनेक अशी प्रकरणे आपल्याकडे असून ती योग्य प्राधिकरणाकडे आपण सोपवू शकतो. या पत्रात फडणवीस यांनी काही विकासकांची प्रकरणे आणि त्यांना कसा लाभ मिळेल, याची उदाहरणे दिली आहेत. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा गुप्त असतो. पण, या निर्णयाचा अजेंडा, संलग्न संपूर्ण कागदपत्रे आणि जीआरचा मसुदा सर्व विकासकांकडे उपलब्ध आहे. तो समाजमाध्यमांवरही उपलब्ध आहे. त्या आधारावर अनेकांनी आपले हित साधणे सुरू केल्याची वदंता आहे.

आज राज्य सरकार दररोज आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंता करीत असताना राज्याच्या तिजोरीची अशी उघड लूट आपण होऊ देणार नाही आणि त्यामुळे तत्काळ प्रभावी उपाययोजना कराल, अशी मला खात्री आहे. एकीकडे शेतकरी, बारा-बलुतेदार यांच्यासाठी कोणतेही निर्णय होत नसताना, अशा काही मोजक्या खाजगी लोकांना फायदे मिळत असतील, तर ते अतिशय गंभीर आहे. बांधकाम क्षेत्रात मागणी वाढावी, यासाठीच्या सुधारणांविरोधात आपण नाही.

त्या नावाखाली सत्तेचा अमर्याद दुरुपयोग होता कामा नये. म्हणूनच हे पत्र आपण मुद्दाम इंग्रजी भाषेत लिहीत आहोत. यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तर नाईलाजाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल. यासंदर्भातील कोणताही तपशील आपण माझ्याकडून केव्हाही प्राप्त करू शकता, असेही फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Happy Holi 2024 Wishes, Whastapp Status, Quotes-Hindi,English

Holi, a highly anticipated and joyous festival of the...

Dalmia Cement: Now The RCF Expert! Welcoming Ranveer Singh As Brand Ambassador!

To extend its legacy of technical excellence to home...

Yellow Fever Vaccination in Maharashtra

Yellow Fever Vaccination Maharashtra Yellow Fever Vaccination Maharashtra, if you're...