मुख्यमंत्रिपद न देणाऱ्या भाजपला झुकवण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी

Date:

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये ऐतिहासिक गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले तरीही सत्तास्थापनेची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही. अशातच मुख्यमंत्रिपद न देण्यावर ठाम असलेल्या भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने नवी खेळी खेळली आहे.

सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी मागणी शिवसेनेकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (सोमवारी)राज्यपालांची भेट घेणार आहेत. संजय राऊत हे शिवसेनेच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत. मात्र घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत. त्यानंतर राज्यपालांनी सर्वाधिक 105 जागा मिळवलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यास भाजपची अडचण होऊ शकते. कारण विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही भाजपला स्वबळावर 145 हा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. हेच संख्याबळ लक्षात घेता शिवसेनेनं ही खेळी खेळली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेले काही दिवस शिवसेनेकडून भाजपवर डागण्यात येणाऱ्या तोफगोळ्यांची जबाबदारी राऊत हे सांभाळत आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांनी भाजपला घायाळ केलं असून राऊत दररोज नवनवीन दावे करत असल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. शिवसेनेकडे 170 आमदारांचं बहुमत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल असं वक्तव्य त्यांनी रविवारी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

दरम्यान, ‘सामना’ दैनिक आणि पत्रकार परिषदांमधून रोज भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार ‘नागपूर तरुण भारत’च्या अग्रलेखातून आज घेण्यात आलेला आहे. पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ देत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता ‘बेताल’ असा करण्यात आला आहे. तसंच विदूषक अशीदेखील त्यांची संभावना करत संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

‘राज्यात दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्यांचे दुःख वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही हे ही तितकच जळजळीत वास्तव आहे’ असे अग्रलेखात म्हटलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांची राजकीय समज त्यांची परिपक्वता समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडिकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे’ अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...