घोटाळे केले नसते तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती: उद्धव ठाकरे

Date:

नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच, सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारसभा, रोड शो करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात प्रचार सभा होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसात सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे, असा टोला लगावतानाच तुम्ही तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा घणाघात त्यांनी केला. जेव्हा करायचं होतं, तेव्हा काही केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत होऊन पुढे पाऊल टाकत असताना, त्याला अपशकुन करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

>> एका विचारांचं स्थिर सरकार आपण या महाराष्ट्राला दिले.

>> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसामध्ये सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे.

>> तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर, तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आलीच नसती.

>> जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा.

>> समाजा-समाजांमध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून टाकल्या होत्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते.

>> ४५० वर्षांनंतरसुद्धा हा देश असा आहे की ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हटल्यानंतर अंगावर रोमांच उभा राहतो.

>> मराठा समाजाच्या मागे जशी शिवसेना उभी राहिली, तशीच धनगर समाज, माळी समाजाच्या पाठिशीही शिवसेना उभी आहे.

>> प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. शिवसेना प्रमुखांनी ही शिकवण दिली आहे.

>> प्रत्येक उपाशी पोट हे भरले गेले पाहिजे ही शिवरायांची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला वारंवार दिली.

>> पाणी हे काय समाज बघून देतात का ?

>> युती सरकार देईल ते पाणी माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये जाईल. तेव्हा कोणताही समाज बघितला जाणार नाही. हे माझे वचन आहे.

>> १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच.

>> एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी करणार म्हणजे करणारच.

>> माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related