राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3202 वर, बळींचा आकडा 194; तर 52,762 नमुने कोरोना निगेटिव्ह

Date:

मुंबई: राज्यात गुरुवारी २८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ३,२०२ वर गेली आहे. राज्यात गुरुवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईच्या तिघांचा प पुण्याच्या चौघांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा १९४ वर पोहोचला आहे. दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

५२,७६२ नमुने कोरोना निगेटिव्ह

राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. आजपर्यंत झालेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाइन, तर ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका २०७३, ठाणे १३, ठाणे महानगरपालिका १०९, नवी मुंबई ६८, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ५१, पालघर ५, वसई विरार ३४, रायगड ६, पनवेल १२, नाशिक मंडळ ७९, पुणे मंडळ ४९२, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ ३२, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५४, नागपूर ६०, इतर राज्ये ११.

२०.५० लाखांवर लोकांचे सर्वेक्षण

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजने अंतर्गत २९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ५६६४ पथकांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

Also Read- बँका आजपासून नियमित सुरू राहणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Cloud Migration With Amazon Web Services: AWS Migration Services

Cloud migration refers to the process of relocating digital...

AWS Server Migration Service – Uses and Benefits

What is AWS Server Migration Service (SMS)? AWS server migration...

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...