दगाफटक्याबाबत सावध रहा; उद्धव यांच्या सूचना

Date:

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकांचा चौथा आणि शेवटचा टप्पा पुढील आठवड्यात पार पडणार असून यात प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यालगतच्या दहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात प्रचार करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून या मतदारसंघांच्या रणनीतीसाठी विभागप्रमुख आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. ‘राज्यात युतीच्या बाजूने जोरदार वातावरण असून मुंबई आणि ठाण्यात जराही दगाफटका होता कामा नये,’ असे उद्धव ठाकरे या बैठकांमधून पदाधिकाऱ्यांना बजावत असल्याचे कळते.

मंगळवार २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आता राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. यापैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आदी दहा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील सहा मतदारसंघ शिवसेना लढवत आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील शेवटच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या तीन दिवसांपासून ‘मातोश्री’वर बैठका पार पडत आहेत.

राज्यभराचा दौरा करून आलेले उद्धव ठाकरे, राज्यात सर्वत्र युतीच्या बाजूने वातावरण असून मुंबई आणि ठाण्यातही कोणताही दगाफटका होता कामा नये यासाठी पदाधिकाऱ्यांना बजावत आहेत. शेवटच्या टप्प्यात कोणाशी बोलले पाहिजे, कोणाची नाराजी असल्यास ती दूर केली पाहिजे, याची सविस्तर चर्चा करीत असल्याचे कळते. काँग्रेस तसेच मनसेची नाकाबंदी करण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही देत असल्याचे कळते.

भाजप पदाधिकाऱ्यांना ‘फोन’

भाजपच्या कमळाचे मतदान धनुष्यबाणाला होणार की नाही याची आधीपासूनच खात्री करून घ्या, याबाबत भाजपमध्ये कोणाला बोलायचे असल्यास ते लगेच पदाधिकाऱ्यांच्या समोरच संबंधितांना फोन करून संवाद साधत असल्याचे कळते. ‘व्हिडीओ, कात्रणांच्या आधारे भाषण करणाऱ्यांकडे फारसे लक्ष देऊ नका, विजय आपलाच आहे,’ असेही ते सांगत असल्याचे कळते.

अधिक वाचा : Sunny joins BJP, party fields him from Gurdaspur

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...