महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान

Date:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही प्रथम क्रमांकाचा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए. पी. शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी राज्ये व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्यासह उत्तरप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री यावेळी उपस्थित होते तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरजकुमार यावेळी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 5 टक्के लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्रात 4 लाख, 68 हजार 784, शेतकर्‍यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय यादी प्राप्त झाली होती, त्यातील 99.54 टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले. राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास 38,991 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, त्यापैकी 23 हजार 632 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही सन्मान                                                                                  या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त 2,278 तक्रारींपैकी 2062 तक्रारीचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्हयाचा मान पटकाविणार्‍या अहमदनगर जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणीअंतर्गत 28,802 लाभार्थ्यांपैकी 100 टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...