‘राजकीय संन्यास’ हा माझा जुमला !

Date:

नागपूर : ‘पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेऊ’, हा एक जुमला होता, अशी कबुली काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. भाजप नेत्यांनी गेल्या निवडणुकीत दिलेली शेकडो आश्वासने हे जुमले होते. त्यांच्या अनेक जुमल्यांमुळे मीदेखील एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. राजकीय संन्यास घेण्याची ही वेळ नाही तर, देशाला वाचवण्याची वेळ असल्याचे पटोले पत्रपरिषदेत म्हणाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून संतापलेल्या पटोले यांच्यासह शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अॅड. अभिजित वंजारी यांनी सोमवारी एका भरगच्च पत्रकार परिषदेत भाजप, नितीन गडकरी व प्रशासनाला लक्ष्य केले. पटोले यांनी गडकरी यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

नागपूर, भंडारा असो वा संघटना, आम्ही काम करणार आहोत. विधानसभा निवडणुकीबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बिगूल फुंकवण्यात येईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक लढण्याबाबत विचारले असता, पक्ष निर्णय घेईल, त्यानुसार आपण काम करू, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांची कार्यप्रणाली हुकूमशहासारखी आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करून न्यायालयात दाद मागण्यात येईल,’ असा पटोले यांनी दिला.

या मुद्यावर पटोले म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत मुद्गल यांनी अपेक्षित सहकार्य केले नाही. निवडणुकीतील अनागोंदीबद्दल त्यांच्याकडे वारंवार आक्षेप नोंदविले. ५५ तक्रारी केल्या. त्यांनी ईव्हीएमची तपासणी करू दिली नाही. मतमोजणीपूर्वी तपासणी करण्यापूर्वीच पाच विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम सीलबंद करण्यात आल्या. यानंतर एका मतदारसंघातील चार ईव्हीएमची तपासणी करता आली. ईव्हीएमबाबत फॉर्म-सी १७ आणि प्रतिनिधींकडे असणाऱ्या माहितीत विसंगती दिसून आली. त्यामुळे पूर्व नागपुरातील मतमोजणी काही वेळ थांबवण्यात आली होती. दुपारी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत असताना वंजारी व इतर पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी आवाज चढवला. यानंतर मी स्वत: मतमोजणी केंद्रावर गेल्यानंतर वाद झाला. त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. आम्हीही तक्रार करणार आहोत. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारचा चेहरा जनतेसमोर असतो. तशी प्रतिमा तयार होते. खासदार, आमदार राहिलेले व अन्य लोकप्रतिनिधी वा राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांशी जिल्हाधिकाऱ्यांची अशी वागणूक असल्यास सर्वसामान्यांशी ते कसे वागत असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, असेही पटोले म्हणाले.

अधिक वाचा : १२ वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...