नगपूर : रेल्वेच्या खासगीकरणाचा डाव

Date:

नगपूर : ‘हळूहळू संपूर्ण रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र, आम्ही हा डाव हाणून पाडू. रेल्वे वाचविण्यासाठी गरज पडल्यास मुंबई आणि मध्य रेल्वेची वाहतूक बंद पाडू’, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियचे (एनआरएमयू) सरचिटणीस कॉ. वेणू पी. नायर यांनी शुक्रवारी येथे दिला. ईसीसी सोसायटीच्या ऐतिहासिक विजयानंतर कॉ. नायर यांचे नागपूरला आगमन झाले. त्यावेळी संघटनेतर्फे विजयी रॅली काढण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.

ईसीसी सोसायटीच्या निवडणुकीत मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, एनसीआर, डब्ल्यूसीआर मिळून एकूण २७४ जागा होत्या. त्यापैकी २४८ जागांवर एनआरएमयूचे उमेदवार विजयी झाले. कॉ. नायर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा शुक्रवारी नागपुरात सत्कार करण्यात आला. आपल्या संघटनेवरील रेल्वे कर्मचाऱ्यांचा विश्वास व कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळेच हा विजय मिळाल्याचे सांगून कॉ. नायर म्हणाले की, येणारा काळ भारतीय रेल्वेसाठी अतिशय आव्हानांचा आहे. एकीकडे रेल्वेमंत्री संसदेत रेल्वेचे खासीगकरण होणार नसल्याचे सांगतात आणि दुसरीकडे दोन गाड्या आयआरसीटीसीकडे सोपवितात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.

खासगीकरणाच्या विरोधात सोमवार, १५ जुलै रोजी मुंबईत ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. शिवगोपाल मिश्रा यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळ सचिव हबीब खान यांचेही यावेळी भाषण झाले.

अन्य एका कार्यक्रमात कॉ. नायर यांच्या हस्ते अजनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नरेंद्र धानफुले, नितीन समर्थ, आसीफ अली, देवाशिष भट्टाचार्य, इ.वी. राव आदी उपस्थित होते.

सीआरएमएसचे २३ जण एनआरएमयूमध्ये

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) २३ कार्यकर्त्यांनी कॉ. नायर यांच्या उपस्थितीत एनआरएमयूमध्ये प्रवेश केला. यात आर. एन. दुरुगकर, एच. एस. रघुवंशी, व्ही. के. पालीवाल, ए. के. कटारे, संजय डोंगरे, राजेश जैसवाल, विजय पाटील, अनिल चतुर्वेदी, हेमंत पाटील, ज्योतिष वर्मा, मनीष जौरकर, दिवाकर देवराव, संजय दत्तात्रे, नंदकिशोर मुन्नालाल, देवेंद्र मिश्रा, अवदेश सिंग, रूपकुमार, श्रद्धा देशपांडे, भारती लाभाने, मोना मेश्राम, मोनिका हरीश, सुनीता डोंगरे, कमला सोनी यांचा समावेश होता.

अधिक वाचा : नागपूर : राज्यातील शंभर डीवायएसपींच्या बदल्या

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...