नागपुरात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक

Date:

नागपूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ६,३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्या तुलनेत ५,००७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. दिवसभरात ११२ मृत्यूंनी मात्र चिंता वाढवली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन ते तीन दिवसात प्रथमच करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १३,७५१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे करोनामुक्त होण्याची टक्केवारी ८०.५१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. जिल्ह्यात रविवारी १८,६२९ चाचण्या करण्यात आल्या. यात ५,००७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. शहरात प्रथमच तीन हजारांच्या खाली म्हणजे २ हजार ७२४, तर ग्रामीणमध्ये २ हजार २६९ रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सध्या करोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार १२७ इतकी झाली आहे. एकीकडे रुग्ण बरे होत असले तरी मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक ठरत आहे. यात जिल्ह्याबाहेरून उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे भर पडली आहे.

दिवसभरात जिल्ह्यात ११२ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात शहरात सर्वाधिक ६२, तर ग्रामीणमधील ३६ मृत्यूंचा समावेश होता. तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे १४ मृत्यूही नोंदवण्यात आले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ७,५९९ इतकी झाली आहे.

जिल्ह्याची स्थिती

  • रविवारचे बाधित : ५,००७
  • रविवारी बरे झालेले : ६,३७६
  • रविवारचे मृत्यू : ११२
  • अॅक्टिव्ह बाधित : ७४,१२७

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...