महाराष्ट्र अर्थसंकल्प : ८०% दिव्यांग असलेल्यास घर

Date:

नागपूर : मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्ये :

> ११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष‍ किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

> मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पूर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर

> पत्रकार सन्मान योजनेत वाढ. आता ही रक्कम २५ कोटींवर

> छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी मंजूर

> ओबीसी समाजासाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणार

> राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार

> कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी १०० कोटी उपलब्ध करणार

> अर्थसंकल्प सुरू असताना विरोधकांचा सभात्याग

> अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात ओबीसी मुद्द्यावरून खडाजंगी

> लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद

> ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार

> मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता

> अर्थसंकल्पः २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर

> मृद व जलसंधारण विभागाकरीता ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजारांची तरतूद

> २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागासाठी १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजारांची तरतूद

> सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद

> साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

> बळीराजा जलसंजीवनी योजनेकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद

> गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन

> राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ

> काजू उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद

> चार कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

> कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद

> जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद

> जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

> शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न

> गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी खर्च

> शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावण्याची निर्मिती केली

> पिण्याच्या पाण्यासाठी राज्यात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना

> राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला

> दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५६३ कोटी रुपये मिळाल्याची अर्थमंत्र्यांची माहिती

> राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची अर्थमंत्र्यांकडून माहिती

> अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू

> शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विधानसभेच्या गॅलरीत उपस्थित

अधिक वाचा : आईएमए की हड़ताल से लड़खड़ाई स्वास्थ्य व्यवस्था, भटकते रहे मरीज

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...