IIT गुवाहाटीने विकसित केले कोविड-19 साठीचे किफायतशीर तपासणीसंच

Date:

नोवेल कोरोनाविषाणूची पकड सैल करण्याच्या दिशेने योग्य तपासणी होणे आवश्यक आहे. या दिशेने प्रयत्न करत भारतीय तंत्रविज्ञान संस्था (IIT) गुवाहाटीने RR अ‍ॅनिमल हेल्थकेअर लिमिटेड आणि गुवाहाटी वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH) यांच्या संयुक्त विद्यमाने निदान करणारे किफायतशीर तपासणी संच विकसित केले आहेत. यामध्ये विषाणू संक्रमण तपासणी (VTM) संच, RT-PCR संच आणि RT-PCR आयसोलेशन संचांचा समावेश आहे.

नाक आणि घशातील स्वॅब घेऊन ते नमुने सावधपणे कल्चर आणि तपासणीसाठी पाठवण्यातील पहिली पायरी VTM संच बजावतात. या कालावधीत नमुन्यात विषाणू असतील तर तो नमुना पूर्ण तपासणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित राखणे आवश्यक असते. या संचात SARS-CoV-2चे नमुने घेणे व वाहून नेणे या दरम्यान वापरण्यासाठी एक साधारण द्रावण असते.

“या संचाच्या किंमती कमी राखण्यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा कच्चा माल वापरला. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आसाम आणि GMCH यांना आम्ही यातील दोन सेट्स दिले आहेत. मोठ्या व्यापक पातळीवर या संचांच उत्पादन करण्यात येत आहे”. असे आयआयटीचे मुख्य संशोधक प्रोफेसर परमेश्वर कृष्णन अय्यर यांनी स्पष्ट केले.

या संचात दोन वाहक माध्यमे आहेत. एक नासिकाद्रवासाठी तर दुसरा घशातून काढलेल्या स्रावासाठी. रोग नियमन आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) सुद्धा प्रमाणित केल्यामुळे हे दोन्ही वापरासाठी सुरक्षित आहेत. याचे संपूर्ण संच हे विषाणू नमुने जमा करणे, वाहतूक, संरक्षण आणि दीर्घ कालावधीसाठी साठवण यासाठी योग्य आहेत. एकमेवाद्वितीय वाहक माध्यमे विषाणू 72 तासांपर्यंत साठवून ठेवू शकतात (रेफ्रिजरेटर तापमानात).

स्वॅबचे नमुने सुरक्षितपणे साठवण्यासाठी व्यवस्थित अभ्यासपूर्वक संचाची आखणी केली आहे. निर्जंतुकीकरण केलेले हे VTM संच CDC ने दिलेल्या प्रमाणीकरणानुसारच आहेत आणि ते सहज वापरता येणाऱ्या पॅकमध्ये आहेत. “या संचांमुळे आसामात किफायतशीर आणि अत्युच्च या संचांचे मोठ्या प्रमाणातील दर्जाचे आरोग्यसेवा क्षेत्रातील उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे या क्षेत्रातील कामाच्या संधीही वाढतील”, असे प्रोफेसर अय्यर म्हणाले.

निर्जंतुकीकरण केलेल्या तपासणी संचासोबत संस्थेने आर आर अ‍ॅनिमल हेल्थकेअर लिमिटेडच्या सहयोगाने RNA आयसोलेशन संच आणि RT-PCRसंचही विकसित केले आहेत. आयसोलेटेड आणि प्युरीफाईड RNA मधून एन्झाईम रिवर्स ट्रान्सक्रिप्शनद्वारे DNA मिळवला जातो. त्यामुळे कोविड-19ची शक्यता आहे किंवा नाही स्पष्ट होते. आसामची गरज भागवण्यासाठी उत्पादन पुरेसे आहे आणि लवकरच ते देशाच्या इतर राज्यात उपलब्ध करुन देण्यात येईल.

Also Read- १ ऑगस्टपासून नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र होणार सुरू

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...