राम मंदिर अयोध्येत नाही, तर काय मक्का मदीना किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये बांधणार?: बाबा रामदेव यांचा सवाल

Date:

नागपुर: अयोध्यामधील ऐतिहासिक राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणातील ४० दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करीत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना योगगुरू बाबा रामदेव यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य करत लक्ष वेधून घेतले आहे. राम मंदिर अयोध्येत बांधले जाणार नाही, तर मग ते मक्का-मदिना किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये बांधले जाणार आहे का, असा खोचक सवाल बाबा रामदेव यांनी केला आहे.

राम मंदिर निर्माण मुद्द्यावर एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांनी वरील वक्तव्य केले आहे. या मुद्द्यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘राम मंदिर जर अयोध्या येथे बांधले जाणार नसेल, तर मग काय ते मक्का-मदीना किंवा मग काय व्हॅटिकन सिटीमध्ये बनवले आहे?. अयोध्येत तर कुणी ईसा मसीह किंवा मोहम्मद पैगंबर जन्माला आलेले नाहीत. राम या देशाची अस्मिता असून ते प्रत्येक भारतीयांचे पूर्वज आहेत. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई असा हा मुद्दा नाही. राम मंदिर उभारले गेले पाहिजे आणि या कामात प्रत्येक भारतीयाचा सहभाग हवा आणि यातच वर्तमान आणि भविष्य सुरक्षित आहे.’

देशभरातील हजारो मंदिरे तोडली गेली, मात्र, ज्या ठिकाणी आमचे पूर्वज जन्माला आले, ती जागा तर सोडा, असेही बाबा रामदेव म्हणाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये आराखडा फाडला जाण्याची घटना अत्यंत घृणास्पद असल्यातेही ते म्हणाले. आम्हाला अत्यंक चुकीचा इतिहास शिकवला गेला, असे म्हणत त्यांनी देशाचा इतिहास पुन्हा लिहिण्याबाबतच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले.

खट्टर आणि फडणवीस यांच्या शिवाय कोणताही पर्याय नाही

हरयाणा राज्यात मनोहरलाल खट्टर आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय कोणताही मजबूत पर्याय नसल्याचे म्हणत बाबा रामदेव यांनी मनोहरलाल खट्टर आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली. जनतेने या मजबूत नेतृत्त्वांसाठीच मतदान केले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. जम्मू आणि काश्मीर राज्यातून कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे रामदेव म्हणाले.

भारताचे सरन्यायाधीश पुढील महिन्यात १७ नोव्हेंबर या दिवशी निवृत्त होत आहेत. त्या पूर्वीच अयोध्या प्रकरणी निर्णय येऊ शकतो असे म्हटले जात आहे.

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अयोध्या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण होईल असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. परंतु, १ तासापूर्वीच ४ वाजता ही सुनावणी पूर्ण झाली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने संबंधित पक्षांना ‘मोल्डिंग ऑफ रिलीफ’वर आपले म्हणणे मांडण्यासाठी ३ दिवसाची अतिरिक्त वेळ दिलेला आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...