महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या

Date:

सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या मुलीची आई-वडिलांनीच हत्या केली. बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणार्‍या २२ वर्षीय मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे घरचे संतापले होते. रागाच्या भरात वडील व सावत्र आई यांनी मुलीची हत्या करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मृत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. अनुराधा ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत होती. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला. प्रेमविवाहाचे वृत्त आरोपी वडील विठ्ठल बिराजदार याला समजल्यानंतर तो सिंदगी येथे गेलाा आणि अनुराधा हिला घेऊन परत आला. दि.२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वा. बोराळे येथील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेला. प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे विठ्ठल बिरादार संतापला होता.

सालगड्याच्या मुलाबरोबर लग्‍न करून मुलीने माझी बदनामी केली, आता तिला सोडणार नाही, असे सांगून बिरादार बोराळेतून निघून गेला. गुरुवारी दुपारी १.३० वा.च्या दरम्यान बिरादार पुन्‍हा बोराळे येथे आला. अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे, तिला घेवून जातो असे सांगून तिला इनोव्हा गाडीतून घेवून गेला व शुक्रवारी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी ठार मारून शेतातच पहाटे ४ वा. अंत्यविधी उरकला.

मृत अनुराधा हिने मृत्युपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये वडील व सावत्र आई यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माझ्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.

अधिक वाचा : युवतीच्या अपहरणामुळे नागपुरातील पाचपावलीत खळबळ

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related