ग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत बस चा मोफत प्रवास

Date:

मुंबई(प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना १२वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत १०वी पर्यंतच्या मुलींसाठी होती. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा केली आहे. तसेच नवीन योजना सूरू करण्यात येत आहेत. याबरोबरच, पत्रकारांनाही आता वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे.

अहिल्याबाई होळकर योजना

या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. या योजनेत १०वी पर्यंत १९.५४ लाख विद्यार्थीनी तसेच १२वी पर्यंत २४ लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यासाठी वाढीव आर्थिक भार ४४ कोटी रुपये इतका असणार आहे.

विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास

१९८६नंतर सुरु झालेले विविध तंत्र आणि व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत ६६.६७ % असेल. सध्या या योजनेचे ४४ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे ५० लाखांपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.

६५ वर्षांवरील नागरिकांना शिवशाहीत सवलत

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण आणि निम-आराम बसेसमध्ये ५० टक्के सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही ४५ टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल ४००० किमी अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या ७० लाख लाभार्थी आहेत.

क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत

वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी ५० % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता ७५ % करण्यात येत आहे. या योजनेतून ८४ हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.

अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत

सध्या सर्वसाधारण आणि निमआराम बसमध्ये वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही १०० टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २८०० लाभार्थी आहेत.

याबरोबरच सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना १०० % प्रवास सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

सध्या १००% अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास ५०% प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे ६५% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही ५०% सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या ८० लाख लाभार्थी आहेत.

कौशल्य सेतु अभियान

कौशल्य सेतु अभियान ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. १०वी) अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी ६६.६७% टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या २५ हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.

लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती रावते यांनी दिली. सुमारे २ कोटी १८ लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत.

अधिक वाचा : एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...