नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; दोघांना अटक

Date:

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठोडा परिसरातील जलाराम नगर येथे एका तरुणाची चौघांनी मिळून हत्या केल्याची घटना घडली. मृताचे नाव राहूल शंकर खुबाळकर असे आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून २ आरोपींना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या हत्येमागे किरकोळ भांडणाचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपींच्या टाटा एस वाहनाची मृत राहुलच्या भावाच्या गाडी सोबत धडक झाली होती. या अपघातात राहूलचा भाऊ अमित जखमी झाला होता. वाहनाच्या दुरुस्तीकरीता आणि उपचारासाठी राहुलने आरोपी शूभमकडे नुकसानभरपाई मागितली होती. यावरून दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले होते. या प्रकरणात विशाल नावाचा एक आरोपी मध्यस्थी करत होता. त्याने शुभमकडून पैसे वसूल करण्यासाठी डील करत असताना राहुलने विशालला शुभमकडे पैसे मागण्यास मनाई केली. पैसे कमावण्याची संधी हुकल्याने आरोपी विशाल चिडला. विशालने नितीन ठाकूर तसेच चायनिज टपरीवाल्या दोघांसोबत संगनमत करून राहुलच्या हत्येचा कट रचला.

आरोपींनी राहुलला जलारामनगरमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. राहुल ठरल्या ठिकाणी पोहोचताच विशाल आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या जवळील चाकूने राहुलच्या पोटावर, छातीवर आणि हातावर वार करून राहुलची हत्या केली. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी विशाल आणि नितीनला अटक केली. तर त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला आहे.

अधिक वाचा : लोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related