ह.भ.प. चारुदत्त आफळे : संतांनी समाजाला जागृत ठेवले

Date:

नागपूर : संतांच्या मनात काय होते, ते त्यांच्या वाङ्मयातून आपणास जाणवते. त्यांनी समाजाला शिकवले. मात्र, त्यांना समाजाने त्रासच दिला. असे असतानाही सामाजिक उद्बोधन करणे थांबवले नाही. सातत्याने त्यांनी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आणि त्यांचे साहित्य आजही तेच कार्य करत असल्याचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी सांगितले.

राधा-गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने महालातील चिटणीस पार्क स्टेडियमवरील वं. मुकुंदराज महाराज साधू कीर्तन परिसरात आयोजित राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाच्या समारोपाला चारुदत्त आफळे यांनी ‘स्वामी विवेकानंद’ हा विषय गुंफला़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिक प्रमिलाताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, आमदार विकास कुंभारे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव समितीचे संयोजक श्रीपाद रिसालदार, शुभप्रेरक दिगंबरबुवा नाईक उपस्थित होते़ आजच्या आरतीचे यजमानपद पराग मुंजे, आशुतोष गोटे यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले.

गीत श्याम देशपांडे यांनी सादर केले़ याप्रसंगी शहनाई वादनात विश्वविक्रम प्रस्थापित करणारे विज्ञानेश्वर खडसे, राम खडसे व निखिल खडसे यांचा गौरव करण्यात आला़ यासोबतच वेदमूर्ती सतीश कठाळे, गोविंद पडेगावकर, सूरज वाशिमकर व कुणाल लाखे यांना सन्मानित करण्यात आले़ विष्णूदास महाराज आध्यात्मिक साधना केंद्रातर्फे दिगंबरबुवा नाईक, श्रीपाद रिसालदार यांचा सत्कार करण्यात आला़ ‘काय मानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती’ या संत तुकोबांच्या अभंगावर पूर्वरंग गुंफला. संतांच्या स्पर्शाने येथील जनमानसातील चेतना कायम जागृत राहिल्या आहेत. केवळ देवभक्ती आणि अध्यात्मातच ते गुरफटून राहिले नाही. तर, प्रसंगाची जाण ठेवत त्यांनी क्रांती करण्यास, संघटित होण्यास जनमानसाला सांगितले. वर्तमान राजकारणावर भाष्य त्यांनी कीर्तनातून केले. भगव्याला पराभूत करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष संघटित होत आहेत. मात्र, भगव्या विचारांना ती बुद्धी कधी सुचेल? असा उपहासात्मक टोला आफळे यांनी कीर्तनातून मारला.

महोत्सवाची साजसज्जा सुनिल हमदापुरे यांनी केली़ निवेदन स्मिता खनगई यांनी केले़ मृदंगमवर श्रीधर कोरडे, तबल्यावर हर्ष पायघन, संवादिनीवर धनराज यावलकर, सतारवर नासीर खान आणि व्हायोलिनवर शिरिष भालेराव यांनी साथसंगत केली़ महोत्सवाच्या आयोजनासाठी अनिल देव, सौरभ महाकाळकर, निरंजन रिसालदार, नितीश रिसालदार यांच्यासह समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा : नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी, मंदिरातील सोन्याची मूर्ती, साहित्य लंपास

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...

President Of India Inaugurates National Arogya Fair 2026 At Shegaon

Ayush Systems Of Medicine Have Made An Invaluable Contribution...