दिवसाला ९०० लिटर पाण्याची बचत

Date:

नागपूर: महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात सांडपाणाच्या पुनर्वापरासाठी बायो-डायजेस्टर टँक आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. यात डीआरडीओ पेटंट टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने विशेष जीवाणूंच्या साह्याने सांडपाण्याचे पूर्णपणे स्वच्छ पाण्यात रूपांतरण होते. प्रायोगिक स्तरावर नागपूर मेट्रोच्या रिच-१ मार्गावरील खापरी, न्यू-एयरपोर्ट, साउथ एयरपोर्ट या तीन स्टेशनवर सध्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा उपयोगात आणले जात आहे.

‘एनएमआरपी’ काही अद्ययावत तंत्रज्ञानासह केवळ बायो-डायजेस्टर आणि रीड बेड तंत्रज्ञानाचा यासाठी वापर करीत आहेत. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने स्टेशन आणि डेपोमध्ये वापरले जाते. या प्रक्रियेमुळे प्रत्येक वेळेस नव्याने लागणाऱ्या पाण्याची गरज राहत नाही. यामुळे अनुमानितपणे साधारणतः ३० टक्के म्हणजेच प्रत्येक स्टेशनवर सुमारे ८०० ते ९०० लिटर पाण्याची बचत दरदिवशी होत आहे. मोजक्या जागेत कमीतकमी खर्चात पारंपरिक पद्धतीने पाणी पुनर्वापराची प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेमुळे इतरत्र कुठेही सांडपाणी जमा राहण्याची शक्यता राहात नाही. तसेच यासाठी विजेची सुद्धा गरज भासत नाही. यामुळे पाण्यासह खर्चाचीदेखील बचत होत असल्याचा दावा महामेट्रोने केला.

लवकरच इतर स्टेशनवर…

झिरो लिक्विड डिस्चार्जची पर्यावरणविषयक बांधिलकी जपण्यासाठी महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पात ही प्रक्रिया राबविण्यासाठी महामेट्रो आणि डीआरडीओदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला होता. ही प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सर्व तपासण्या महामेट्रोतर्फे करण्यात आल्या आहेत. तर काही महत्त्वाच्या चाचण्या प्रयोगशाळेमध्ये करून ते प्रत्यक्ष अमलात आणली आहे, यामुळे नेहमीसाठी कमीत कमी खर्चात ही प्रक्रिया राबविणे सहज शक्य झाले आहे. पुढील काळात इतर स्टेशन आणि कार्यालयातदेखील या प्रणालीचा वापर होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related