आयटीने दिला सर्वाधिक रोजगार; ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची आकडेवारी जाहीर

Date:

नागपूर : नागपूर देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत असली तरीही त्यातील कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनीच तारणहार ठरल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजेसमधून सुमारे एक लाख १२ हजार विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांनी ‘कॅम्पस प्लेसमेंट’ मार्फत रोजगार दिला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वर्षभरातील विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कॉम्प्युटर सायन्स या विषयातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक संख्येने नोकरीवर लागले आहेत. या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांचे अधिक संख्येने प्लेसमेंट झाले असले, तरीही याच शाखांमधील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नाकारण्यात आले आहे, हे वास्तव देखील अहवालात नमूद करण्यात आले आहे. एआयसीटीईच्या आकडेवारीनुसार, गेल्या शैक्षणिक सत्रात देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये पाच लाख ८७ हजार २४४ इतकी कॉम्प्युटर सायन्स विषयाची प्रवेश क्षमता होती. त्यापैकी ३ लाख २० हजार ८१ जागांवर प्रवेश देण्यात आलेत. हे प्रवेश आयआयटी ते खासगी इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील आहेत. त्यामुळे याच विषयातील सुमारे दोन लाख ६७ हजार १६३ जागा शिल्लक राहिल्या होत्या. प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी सुमारे १ लाख १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेंट’ झाले आहे.

आयटीसोबतच इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात सर्वाधिक संख्येने ‘कॅम्पस प्लेसमेंट’ झाले आहे. या विषयाची ५ लाख ५६ हजार २३६ इतकी प्रवेश क्षमता आहे. देशभरातील कॉलेजेसमध्ये दोन लाख ३३ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे निम्म्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. सुमारे एक लाख ३८३ विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण होताच रोजगार मिळाला आहे. इंजिनीअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग देखील तिसऱ्या क्रमांकाची ब्रान्च मानली जाते. या ब्रान्चची ४ लाख ४१ हजार इतकी प्रवेश क्षमता आहे. दोन लाख १५ हजार ८३ जागांवर प्रवेश देण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ६९ हजार १२० विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली आहे. त्यामुळे या तीन प्रमुख ब्रान्चेसने २ लाख ८२ हजार २१५ विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मार्फत नोकरी मिळवून दिली.

परंतु, याच ब्रान्चमधील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळालेला नाही. सिव्हिल इंजिनीअरिंगची देखील तशीच अवस्था आहे. देशभरात सुमारे पाच लाख ७ हजार ६६४ इतकी या ब्रान्चची प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी २ लाख ६१ हजार ३८९ जागांवर विद्यार्थी प्रवेश झालेत. त्यापैकी केवळ ५४ हजार १०४ विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मार्फत नोकरी मिळाली आहे. देशात रिअर इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होत आहे. परंतु, सिव्हिल इंजिनीअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याप्रमाणात नोकरी मिळालेली नाही. बहुतांश कंपन्या या ‘कॅम्पस प्लेसमेंट’ करीत नाहीत. त्यामुळे देखील प्लेसमेंटचे प्रमाण कमी असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय अनेक कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट सेल देखील कार्यरत नाही. त्याचाही परिणाम प्लेंसमेंटचे प्रमाण कमी होण्यावर झाला असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा; अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिलासा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...

Happy Baisakhi 2024: Date Significance,Top Wishes & Greetings, More…

Let's look at the Baisakhi Festival 2024. You might...