भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी

Date:

भारतीय रेल्वे त आजघडीस २ लाख ७० हजार पदे रिक्त आहेत. रेल्वेची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेचे सरचिटणीस डॉ. एम. राघवय्या यांनी केली. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय रेल्वेत दर वर्षाला ९०० रेल्वे कर्मचाऱ्यांचा विविध घटनांमध्ये मृत्यू होतो. मृतांमध्ये ५० टक्के ‘ट्रॅक मेंटनर्स’ असतात असे सांगून राघवय्या म्हणाले की, रेल्वेत २ लाख २५ हजार ‘ट्रॅक मेंटनन्स’ कर्मचारी आहेत. अत्यंत जोखिमीचे काम त्यांना करावे लागते. त्यामुळे एकदा ‘ट्रॅकमन’ म्हणून नोकरी लागली की सात वर्षे त्याला ते काम द्यावे व नंतर त्याची अन्य विभागात बदली करावी, अशी सूचना त्यांनी केली. कारण ‘ट्रॅक मेन्टेनन्स’ हे जोखिमीचे काम असल्याने सुरुवातीच्या तरुण वयात संबंधित व्यक्ती ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल, असे त्यांचे म्हणणे होते.

काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना आजही १२ तास कामावर राहावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अलीकडेच रेल्वे कोच तयार करण्यासाठी भारत सरकारने एका अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. मात्र देशात अनेक कंपन्या उत्तम कोच तयार करीत आहेत. उलट आपण येथील कंपन्यांना बळ देऊन येथेच कोच तयार करावे व ते विदेशात पाठवावे, अशी सूचना त्यांनी केली.

अधिक वाचा : 3 अगस्त से HDFC बैंक का मोबाइल ऐप हो जाएगा बंद

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related