भारत समोर पाकची शरणागती

Date:

केदार जाधव आणि भुवनेश्वरकुमारच्या अचूक गोलंदाजीनंतर रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारत ने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर ८ विकेटनी सहज मात केली. आता सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील.

आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दुबळ्या हाँगकाँगची सलामीची जोडी फोडण्यासाठी भारताला ३५व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली होती. हाँगकाँगच्या निझाकत-अंशुमन जोडीने १७४ धावांची सलामी दिली होती.

मात्र, यातून योग्य तो धडा घेत भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत पाकिस्तानचा डाव ४३.१ षटकांत १६२ धावांत गुंडाळला. यानंतर भारताने २९ षटकांत २ बाद १६४ धावा करून शानदार विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने १३.१ षटकांत ८६ धावांची सलामी दिली.

रोहितने ३९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. धवन ५४ चेंडूंत ४६ धावा काढून माघारी परतला. यानंतर अम्बटी रायुडू आणि दिनेश कार्तिकने अर्धशतकी अभेद्य भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अधिक वाचाराजीव गांधी खेल रत्न पुरस्कार के लिए विराट कोहली और वेटलिफ्टर चानू के नाम की सिफारिश

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related