मुख्यमंत्री फडणवीस यांच्या साधेपणाने पोलिस दादा भारावले

Date:

नागपुर :- उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे 4 हजार 800 पोलिस बन्दोबस्तासाठी नागपूर शहरात आलेले आहेत. त्या पोलिस बांधवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुकवारी प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला.

मुख्यमंत्री येताच धुळे जिल्ह्यातील पोलिस शिपाई योगेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी साधेपणाने पोलिसांसोबत रांगेत उभे राहून स्वत: भोजन घेतले. तसेच पोलिसांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडुन झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने सर्व पोलिसही भारावून गेले.

 

राज्याच्या विविध भागातून राज्य राखीव पोलिस दल, महामार्ग सुरक्षा पथक, ग्रामीण पोलिस, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे 4 हजार 800 पोलिस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत.

पोलिस आयुक्तालयामार्फंत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.

पोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठया कालावधीनंतर नागपूरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्या समोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी 50 हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तीक घर खरेदी करिता आतापर्यंत 208 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील अग्रगण्य पोलिस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलिस दल बनविण्यासाठी कार्य करु, असे ते म्हणाले.

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलिस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंन्ट्रोल रुम, पोलिस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलिस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करित असून त्यात 135 ते 157 टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.

अधिक वाचा : नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Policybazaar Strengthens Presence in Nagpur as Demand for Market-linked Investments and Term Insurance Rises in Western India

Nagpur : Policybazaar, one of India’s leading online insurance...

Meta WhatsApp Business API: Pricing & Billing Updates Effective January 1, 2026

Meta continues to strengthen the WhatsApp Business Platform by...

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...